शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

चिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप

दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील कन्सेप्सिअन शहरात आज पहाटे ३ . ३४ वाजता झालेल्या भूकंपाने ७८ जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष मायकल बॅचलेट यांनी पत्रकारांना दिली. या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर इतकी होती.

इमारती हादरल्या आणि राजधानी सॅन्टियागोतील वीजपुरवठाही ठप्प झाला. चिलीतील भूकंपानंतर लगेच चिली आणि पेरू या देशांना , ` पॅसिफिक त्सुनामी केंद्रा ' तर्फे संभाव्य त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कन्सेप्सिअन शहरापासून ईशान्येकडे सुमारे ९० किलोमीटर अंतरावर भूगर्भात ५५ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.



प्रचंड मोठा भुकंप झाला आहे, हैतीच्या भुकंपापेक्षा कैक पटीने हा भुकंप मोठा आहे समजले.. कोणाकडे काही बातमी असेल तर येथे द्यावी ही विनंती.



* वरील माहीती टाईम्स ऑफ ईडियाच्या सौजन्यांने. त्यांच्या संकेतस्थळावरुन.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

मी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल !

http://www.mimarathi.net




हा दुवा वाचा
आहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन
हि & हि चा अर्थ पण दिला आहे ;)

त्यातच नवीन सुरू झालेली "मी मराठी" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे!

अशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार !!!!

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

देशाचा अपमान व षंढ राजकर्ते !

दुवा वाचा व गप्प बसा !

घ्या अजून घ्या ह्यांना शिंगावर... भें** साले झ* भर नाहीत पण दंगा किती... आपले सरकारच षंढांचे आहे दोष कोणाला म्हणून देणार... कसली चर्चा करायला जाता तुम्ही ! येता जाता थुकतो तो तुमच्यावर तुमच्या कुटनितीवर.... ! अरे काय हे देशाचे नशीब.. कर्मदरिद्री जनता व त्यापेक्षा लाखोपटीने नालायक राजनेते हेच पाहत राहणे हेच ह्या पिढीच्या नशीबी आहे वाटतं !!!

पाकिस्तान के विदेश मंत्री सलमान बशीर ने कहा है कि भारत-पाक बातचीत कश्मीर पर ही केंद्रित रही। उन्होंने कहा कि पाकिस्तान कश्मीर में चल रहे संघर्ष को राजनीतिक, कूटनीतिक और नैतिक समर्थन देता रहेगा।


हो तुम्ही द्याच सपोर्ट तुम्ही कसा व कुठे देता ते जगाला माहीत आहे.... साले हरामखोर... पण त्यांचा दोष नाही आहे हा.. दोष आपला आहे.. आपल्या मध्ये तो दमखम / जोष नाही आहे की शत्रुच्या नांग्या पायाने ठेचाव्यात.... अरे तुम्हाला गरज काय पडली आहे त्याच्या दरवाज्यावर जाण्याची शांतीची भिक मागत ! मणगटामध्ये ताकत असेल तर शांती प्रस्थापित करुन दाखवता येतेच ना... इवलेले इस्त्राईल.. आहे ना जगाच्या नकाश्यावर.. ते पण नाकावर टिच्चून... आपली ताकत / शक्ती दाखवून ... !

देशाने किती अपमान सहन करायाचा ह्या षंढ राजकरणापायी ?????


हाफिज सईद को सौंपने की भारत की मांग पर उन्होंने कहा,'हाफिज सईद पर जो कुछ हमें दिया गया है वह डॉजियर नहीं बल्कि साहित्य का नमूना है।'


एवढं बोलल्यावर देखील हे हरामखोर नेते गप्प कसे ??????

की अपमान सहन करण्याची तयारी आधीच केली होती ?

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

गोल्ड - मार्केटवर एक नजर

सोनं खरेदी करावे की नाही करावे हा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराना नेहमी पडतो. गेले खुप दिवस गोल्ड १६००० - १७००० च्या रेंज मध्ये फिरत आहे व आपला भाव अस्थिर ठेऊन आहे, ह्यामागे गुंतवणूकदारांची मानसिकता आहे व थोडेफार शेअर मार्केट मधील चढ-उताराचा हात देखील. २५ नोव्हेंबर २००९ ला सोन्याने १८००० चा भाव दाखवला होता व त्यानंतर वीस दिवसाच्या आतच भाव १६५०० पर्यंत आला होता. व सध्या तो १६०००-१७००० च्या भावामध्येच फिरत आहे.
भारतामध्ये सोने खरेदी सर्वात जास्त लग्नासाठी केली जाते व त्याचा खुप मोठा फरक मार्केटवर पडतो , ऑफ सिझन मध्ये सोने खरेदी करणारे खरेदीदार आता खरेदी करत नाही आहेत कारण त्यांना असे वाटत आहे की सोन्यामध्ये अजून १०००-५०० रु. चा उतार येईल व शक्यतो येईल ही कारण लग्नाचा सिझन येण्यासाठी अजून खुप महिने बाकी आहेत व डिसेंबर महिन्याच्या तुलनेने जानेवारी महिन्यात सोन्याच्या खरेदी मध्ये १०-१५% ची घट झाली आहे हीच घट चालू राहीली तर सोन्याचा दरावर नक्कीच फरक पडेल. जास्तित जास्त ग्राहक सध्या सोन्यामध्ये भाव उतरण्याची वाट बघत आहेत जर काही कारणाने सोन्याच्या भावामध्ये १०००-१५०० ची घट झाली तर नक्कीच सोनं खरेदीदारांची झुंबड उडेल खरेदीसाठी हे नक्की.
शेअर मार्केट व नजर मारली तर मागील दोन महिने मार्केट खुप मोठा चढ उतार दाखवत आहे व त्याचा देखील मानसिक परिणाम गोल्ड मार्केटवर होतो. कारण मोठ मोठे गोल्ड फंड वाले मार्केट खाली जात असेल तर आपला पैसा गोल्ड मध्ये गुंतवतात व मार्केटवर जात असेल तर शेअरमध्ये (हेजिंग पध्दतीने ) पण रेंज बाऊड शेयर मार्केट मुळे त्याना देखील तसे करणे अवघड होऊन बसलेले आहे कारण शेयर मार्केट + गोल्ड दोन्ही पण सध्या रेंज बाउंड झाले आहेत. शक्यतो पुढील आठवड्यात येणार्‍या बजट मुळे ही अढी सुटायला मदत होईल.
एक नियमित विचारला जाणारा प्रश्न की मला गोल्ड मध्ये गुंतवणूक करायची आहे कसे करु ?
ह्याचे उत्तर - मार्केट चा विचार करुन गुंतवणूक करावी. जसे वर लिहले आहे की लग्न सिझनला अजून खुप वेळ आहे व त्या दरम्यान गोल्ड मार्केट मध्ये खुप चढ उतार होईल तुम्हाला आपल्यासाठी एक रेट टार्गेट फिक्स करावे लागेल ( जसे मी १५५०० चे टार्गेट फिक्स केले आहे) कि त्या रेट ला आल्यावर मला गुंतवणूक करायची आहे ५०% गुंतवणूक तुम्ही तेव्हा करा व चुकून अजून काही शे रु. रेट खाली गेला तर राहीलेले २५% खरेदी करा व २५% आपले खेळते भांडवल ठेवा म्हणजे जर मार्केट मध्ये तेजी दिसत असेल तर काही चढ्या भावाने देखील उरलेले २५% चे गोल्ड घेता येऊ शकेल.
गोल्ड घेताना शक्यतो २४ कॅरेट च्या कॉईन / विटा ह्या स्वरुपात घ्या. शक्यतो दागीने घेऊ नका कारण जेव्हा विक्री करण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यातील तुट वजा करुन किंमत मिळते व २४ कॅरेट मध्ये तुम्हाला पुर्ण भाव मिळतो. गोल्ड मधील गुंतवणूक ही दिर्घ अवधीची गुंतवणूक मानली जाते ह्याचा खरेदी करताना नक्की विचार करावा. जास्त रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर मार्केट मध्ये चांगले गोल्ड फंड आहेत त्यामध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय होऊ शकतो.
***********
गुंतवणूक करताना आपल्या अर्थ सल्लागाराकडुन पुर्ण माहीती घ्यावी.
वरील लेख हा माहीतीसाठी लिहला आहे, सल्ला नाही आहे ह्याची नोंद घ्यावी.


मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

लुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)










हॅ हॅ हॅ !


सगळे फोटो मुद्दाम वरुन घेतले आहेत, व्यवस्थीत अ‍ॅगल् ने फोटो घेतले तर तुटलेले ईजिंन ड्रम दिसला असता व नको ती इज्जत उघड्यावर आली असती =))

माझी सफर..... भेट -भाग -१७

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."

मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !

सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...

एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "

मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..

दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.

आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.

काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

गावाची भटकंती..

कॅमेरा - आपला नेहमीचाच सॅमसंग मोबाईल ;)

स्थळ - सदलगा, चिक्कोडी. कर्नाटक.














सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

वाचण्यासारखं काही...



और बाजार से ले आये अगर टूट गया
सागरे जम से मेरा जामे सफाल अच्छा है।
उनके देखे से जो आ जाती है मुँह में रौनक
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है।
देखिये पाते है पुसाख बुतों से क्या फैज
इक ब्रहामण ने कहा है कि ये साल अच्छा है।
हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन
दिल को खुश रखने को ‘गालिब’ ये ख्याल अच्छा है




मिर्जां गालिब


ह्यांचे पुर्ण नाव मिर्जा असदुल्लाह बैग खान.
उर्दु गझल मधील एक नावाजलेले नाव. ह्यांचा जन्म आग्रात २७ डिसेंबर १७९७ ला झाला व आजच्या दिवशी ( १५ फ्रेब्रुवारी १८६९ ) ह्यांचा मृत्यु दिल्ली येथे झाला. त्यांचे लग्न १८१० मध्ये उमराव बेगम ह्यांच्याशी झाले. ह्यांच्या गझल मध्ये जो दर्द दिसून येतो त्याचे कारण त्यांच्या जिवनात घडलेल्या काही दुखःद घटना होत्या जश्या की त्यांना ७ मुले झाली पण ती अल्पवयीन असतानाच देवाघरी गेली त्याचे दुखः त्याच्या अनेक शायरी मध्ये दिसून येत.




ह्या शायरला मी मराठीचा सलाम !

माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६

काही नवीन घरे व बदल पाहून आपलीच गल्ली कळेना हीच आहे की नाही ? पण घरमालकांचे नाव आठवत आहेत व त्यामुळे मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहीलो व त्यांना विचारले. पण त्यांच्या कडुन काही जास्त माहीती मिळाली नाही व मी विचार मग्न होउन परत रंकाळ्यावर पोहचलो व वडीलांचे जुने मित्र आठवू लागलो व एकदोन आठवले व मी त्याच्या जवळ मंगळवार पेठेत पोहचलो.
जोशीकाका , मी त्यांना नमस्कार केला व आपली ओळख सांगितली , त्यांनी मला सांगितले की सहा एक वर्षापुर्वीच वडिलांनी कोल्हापुर सोडले व सांगली जवळ कुठल्या तरी गावी राहण्या करता गेले. का गेले ? कसे गेले ? काय कारण होते ते काही कळालेच नाही खरंतर त्यांना देखील माहीत नव्हते.

पुन्हा मी शुन्य जागी पोहचलो होतो, मानसिक त्रास होतच होता व त्यात पाण्याच्या बदलामुळे मी अजारी पडलो. जरा जास्तच तब्ब्येत खराब होत होतवामी पुन्हा परत दिल्लीला जाणे ह्या निर्णयावर येऊन पोहचलो, जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे गेलो, वडीलांचा कडील कुठल्याही नातेवाईक / काका ह्यांना मी ओळखत नव्हतो ना त्यांचे घर माहित होते, आई कडील पाहून्याची फक्त नावेच आठवत होती पण ती लहान लहान गावे आठवत नव्हती.. काय करावे कसे करावे !

मी शिवाजी पेठ पासून बुधवार पेठ पायी फिरलो... काही खुणा दिसतात का... कुठला चेहरा ओळखिचा दिसतो का... हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जात होते.... शेवटी शेवटी मी घरातल्यांच्या भेटीची आस सोडून देऊ लागलो... तोच एक बस समोरुन गेली.... चिक्कोडी ! अरे हे गाव तर माहीत आहे आपल्याला मामाच्या गावी जाताना रस्त्यात पडत होते ...

मी सरळ दोन एक तासाचा प्रवास करुन चिक्कोडीला पोहचलो... व बसस्थानकांवरील उभ्या सर्व गाड्यावरील पाट्या वाचणे हे नक्की करुन मी ईकडे तीकडे पाहू लागलो तर .. तेथे ही एक अडचण उभी राहीली.. सर्व नावे कन्नड मध्ये... लहानपणी कन्नड येत होते पण वाचणे येत नव्हते.. फक्त बोलणे ईतकेच. दोन एक सिगरेट तेथेच उभ्या उभ्या मारल्या व बसस्थानकाच्या बाहेर आलो.

कोणी... निपाणी... निपाणी असे ओरडत होता... कोणी कागवाड.. कागवाड असे... त्याच वेळी रायबाग हे नाव कानावर पडले व मी तडक त्या मिनीबस जवळ गेलो व विचारले रायबागला जाण्यासाठी किती वेळ लागेल ? त्या मिनीबस मधून प्रवास करत मी रायबाग बस स्थानकावर पोहचलो... लहान पणी खरेदी साठी मामा बरोबर आलो होतो असे आठवत होते पण कसे ? कोठून हे काही आठवेना !
रायबाग मध्ये हाती काहीच लागले नाही , मी परत चिक्कोडी साठी बस मध्ये बसलो .. बसचा प्रवास चालू होता.. तोच एका छोट्याश्या स्थानकावर बस थांबली... व एकाने आरोळी दिली...नसलापूर... मी एकदम उभा राहीलो व म्हणालो.. " थांबा.. मी उतरणार आहे "
हेच माझ्या मामाचे गाव ! नसलापूर !
अजोबाचे घर शोधत शोधत मी जैन मंदीराजवळ आलो व एकाला विचारले ..."काका..अप्पासो मगदुम ह्यांचे घर ? " त्याने जैन मंदीरासमोरील गल्ली समोर बोट केले व म्हणाला... सरळ आत जा... आंब्याच्या झाडाजवळील घर" पण आता तेथे कोणी राहत नाही... ते सर्व गाव सोडून मळ्यात राहण्यासाठी गेले आहेत...

मळा.... कोठे शोधावा हा मळा... त्या माणसालाच रस्ता विचारला व मळ्याच्या दिशेने वाटचाल चालू केली !
गावा बाहेर दोन एक किलोमीटर चालत मी आलो.. जवळपास चिटपाखरु देखील दिसेना की कोणाला तरी विचारावे मगदुमांचे घर कोठे आहे !
अर्धा एक तास चालल्यावर एका शेतात एक आजोबा काम करताना दिसले, मी त्यांना जाऊन विचारले " काका, मगदुमांचे घर कुठे आहे ?' त्यांनी विचारले " मगदुम.. कोण ? मास्तर का ?" मी हो म्हणालो. त्यानी सांगितले की मी उलट दिशेला आलो आहे... पुन्हा त्यांनी मला रस्ता दाखवला व मी त्यांना नमस्कार करुन पुन्हा... घर शोधण्यासाठी पायपिट करु लागलो.
संध्याकाळ होऊ लागली होती.. समोरच काही घरे दिसत होती तेथे गेलो व त्यांना विचारले की हे मगदुमांचे घर का ?
एक बाई बाहेर आली व म्हणाली " हो, तुम्ही कोण ?"
मी म्हणलो " अप्पासो मगदुमांचा मी सर्वात लहान नातू.."
त्या म्हणाल्या " अप्पासो मगदुम तर वारले काही वर्षापुर्वीच "
मी थबकलोच... काय बोलावे हे कळे ना.. परत विचारले " मामा.. त्यांचा मुलगा ? "
ती म्हणाली " ते तर बेळगाव मध्ये राहण्यासाठी गेले आहेत.. आम्ही हे घर व शेत विकत घेतले आहे चार वर्षापुर्वी"
मी " त्यांचा काही पत्ता आहे तुमच्याकडे ?"
ती म्हणाली " माझ्या कडे नाही आहे पण माझ्या मुलाकडे आहे पण तो सर्विससाठी बाहेर गावी राहतो.. आल्यावर घेते, दोन महीन्यानंतर तो घरी येईल"
मी " तुमच्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? "
ती म्हणाली " आहे देते" थोड्यावेळाने तीने मला एक नंबर आणून दिला व मी तीला माझा नंबर दिला व म्हणालो " मी फोन करेन त्यांना, पण शक्य नाही झाले तर त्याना माझा फोन नंबर जरुर द्या."

मी परत चिक्कोडी ते कोल्हापूर आलो, रात्र झाल्यामुळे मी फोन सकाळी करण्याचा निर्णय घेतला व झोपी गेलो.
सकाळ सकाळी मी त्यांना फोन लावला व विचारना केली पण त्याच्याकडून काही पत्ता मिळाला नाही.. ते म्हणाले की दोन एक वर्ष झाली आमचा संपर्क नाही आहे...

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५

"राज, आज तुम मुझे सबकुछ बता देना जो तुम हो, तुम महाराष्ट्र के कोल्हापुर से हो यह छोड कर बाकी मुझे कुछ भी पता नही है तुम्हारे बारे में" विभा.
"ह्म्म ठीक है बता हूं" - विभाच्या घरी मी संजना व विभा तथा तीची आई बसलो होतो तेव्हा हा संवाद झाला व जे मी सांगितले तेच येथे मराठी मध्ये लिहीत आहे मी अचानक घर का सोडले ह्याचे उत्तर येथेच सापडेल.

गावाकडची शेती भाऊ बंदकी मध्ये गेली व मी जा घरात जन्म घेतला ते घर वडीलांच्या मित्रामुळे लिलाव झाले होते व ह्याच दुख:त वडील जे कमवू लागले ते दारु मध्ये घालवू लागले व त्यांचे माझ्यावरील प्रेम कसे व का हे माहीत नाही पण अटू लागले व मला लहानपणा पासूनच प्रचंड मार व शिव्या मिळू लागल्या, जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा मी प्रचंड रागीट व उच्छःदी बनू लागलो घरी जो मार मिळायचा त्याचे समाधान मी सकाळी ८ला बाहेर जाणे व रात्री १० नंतर घरी येणे ह्या नियमामध्ये मिळाले, कारण सकाळी मी उठायच्या आधी बाबा बाहेर कामावर व मी रात्री घरी येण्याआधी झोपी गेले असायचे व आमच्या मधील संवाद संपला तो संपलाच. पण आमच्या दोघाच्या लढाई मध्ये बिचारी आई नेहमी आग का विस्तव अश्या प्रकारात राहू लागली बाबाची बाजू घेतली की मी नाराज व माझी घेतली तर बाबा नाराज. आमच्या तिघांना जोडणारा दुवा माझी लहान बहीण अक्का, ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे माझ्या हून ती लहान दोन वर्षाने. वयाच्या दहाव्या वर्षीच मी पहील्यांदा पळून गेलो पण दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राच्या गावावरुन पकडून आणले व बाबांनी मला न मारता शिव्याच शिव्या देऊन मला पळुन जाण्याचे बक्षीस दिले ते एक वेळचे जेवण बंद.

माझ्यात व घरामध्ये दुरी वाढूच लागली व घरापासून दुर राहण्याचा प्रयत्न करु लागलो, पण शाळेत झालेल्या मुलीच्या लफड्यात बाबांना शाळेत यावे लागले व मला पुन्हा प्रचंड मार पड्ला व मी पुन्हा पळुन गेलो.
दोन एक महीने कोल्हापुरातच राहीलो शाळेत गेलो पण घरी गेलो नाही पंचगंगेच्या काठीच राहीलो. अश्यातच मला पुन्हा समजावून घरी आणले गेले व मला एके जागी कामावर लावले गेले पण माझे प्रताप पाहून मला कामावरुन कमी केले, त्यातच माझ्या व्यसनांची गोष्ट घरी कळाली व मला पहील्यांदा घरातून बाहेर काढले दोन एक वर्ष मी सांगली व कोल्हापुर येथेच फिरत राहीलो व वयाच्या १७ व्यावर्षी स्नेहा, संगणक संस्था हे प्रताप केले पण किरण ने संस्था बंद करुन माझे सर्व मार्ग बंद केले होते. मनाचा हिय्या करुन घरी गेलो तर बहीण पुढील शि़क्षण व्यवस्थीत व्हावे ह्यासाठी मामाच्या घरीच राहत होती व बाबानीं मला पाहील्यावर परत माझा उदो उदो केला व आई काहीच न बोलता गप्प उभी राहील व मी तडत रेल्वे स्टेशन गाठले व सरळ मुंबई ला पोहचलो... (ह्या पुढिल सर्व गोष्टी माझी सफर च्या १४ भागात आहे )

विभा म्हणाली " राज, तुने कभी ट्राय कीया है घर फोन करणे का ? घरवालों को खोज ने का ? उन्हें बाताया की तुम यहा हो ? " मी सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारामध्ये दीली व मी सरळ विषय संपवायला सांगितला.

पण विभाच्या प्रश्नांनी मी विचारचक्रामध्ये अडकलो व खुप दिवस विचार केल्यावर मी सर्वात प्रथम स्नेहाच्या घरी फोन लावला, माझे नशीब चांगले होते ती बाळंतपणासाठी घरी आली होती व मी तीला सर्व काही सांगितले व मार्ग सांग असे म्हणालो. ती म्हणाली " राज, तु काळजी करु नकोस मी पाहते प्रयत्न करुन , करते थोडी शोधा शोध व मी तुला कळवत जाईन काय घडले ते ठीक आहे, उगाच काळजी करु नकोस कामात लक्ष दे व काम करत राहा." स्नेहाच्या ह्या आश्वासक बोलामुळे मला अधार मिळाल्या सारखे वाटले.

घरी जाण्य़ाची आई वडीलांना, अक्काला भेटण्याची माझ्या मनाला हुरहुर कधीचीच लागली होती पण मी माझे मन कोणासमोर असे मोकळे केलेच नव्हते कधी. स्नेहा ने खुप शोधा शोध करुन पाहीले पण तीला काही माझ्या घरच्यांच्या विषयी माहीती भेटलीच नाही. मी प्रचंड निराश झालो व कामावरुन लक्ष उडू लागले, प्रचंड तनावामध्ये मी दोन-तीन महीने काढले व पुन्हा स्वत: कोल्हापुरला जाऊन शोध घ्यावा ह्या विचारावर मी आलो.

मी कोल्हापुर जाण्यासाठी तयार झालो व कंपनी मधुन सुट्टी मंजुर करुन घेतली व मी कोल्हापुरला जाण्यासाठी मुंबईला आलो.... १२ वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात, त्याच मुंबई मध्ये जेथून मी महाराष्ट्रातून बाहेर पडलो होतो त्या मुंबई मध्ये.

सकाळ सकाळी गाडी कोल्हापुरात पोहचली व मी सरळ सयाद्री मध्ये एक रुम बुक केली व अघोळ करुन सरळ पहील्यांदा महालक्ष्मी मंदीरामध्ये गेलो व मातेचे दर्शन करुन जेथे आम्ही रहात होतो त्या जुन्या पेठेत, गल्लीमध्ये पोहचलो....

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४

दोन दिवस झाले होते विभा भेटून. संजनाने गडबड केलीच होती पण चूक माझी देखील होती माझी व्यक्तीगत डायरी माझ्या कडे नाही आहे हे मला लवकर लक्ष्यात आलेच नव्हते... ही माझी चूक.
तिस-या दिवशी देखील १० वाजले तरी विभा कार्यालयात आली नाही हे पाहून मात्र माझे मन अस्वस्थ झाले व काही विचारणा न करता मी तडक विभाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, मी लगेच बाहेर पडलो व अर्धा तासाच्या आतच विभाच्या घराच्या गेट समोर उभा राहीलो, पण आत कसे जावे व काय बोलावे ह्या विचारात मी खुप वेळ बाहेरच उभा राहीलो तोच विभाची आई बाझार खरेदी वरुन परत येत होती व मला पाहून म्हणाली " अरे बेटे राज, बाहर काहे खडे हो अंदर चलो" मी त्यांच्या मागोमाग घरात घूसलो व माझी तळमळत असलेली नजर शक्यतो तीच्या आईने ओळखली व मला म्हणाली " अरे राज, विभा तो घर में नही है, वह नैनीताल गयी है, अपने चाचा के घर ! दो दिन हो गये है" मी जरा रिलाक्स झालो व म्हणालो " अभी अचानक नैनीताल क्या कर ने चली गयी, बिना बता ये ?" तीची आई म्हणाली " अचानक नही गयी है, एक दिन तो तबीय्यत खराब थी उसकी डॊक्टर साहब बोले की सैर करना जरूरी है तब गयी है वह दोपहर को पिताजी के साथ... वह कंपनी फोन लगा रही थी पर मेंने ही मना किया था फोन करने के लिए .. कही कुछ काम ना बता दे उसे .. यह सोच कर ! पर तुम्हे तो फोन किया होगा ना उसने ?" मी म्हणालो " नही. आंन्टी जी, में चलता हूं अभी मुझे कई जाना भी है, विभा अपना फोन ले गयी है क्या साथ में ? " तीची आई म्हणाली " हां"

मी खुप विचार केला व मनाचा हिय्या करुन एसटीडी वरुन फोन लावला... रिंग होत होती ... खुप वेळानंतर तीने फोन उचलला " कोन " मी म्हणालो " अरे विभा में राज ! तुम्हारी तबीयत कैसी है " ती म्हणाली " अरे राज, अभी तो ठीक है, तबीयत तुम्ह बताओं तुम्हारा क्या हाल है " मी म्हणालो " अच्छा है, तुम्ह से कुछ बात करनी थी... अगर बुरा ना मानो तो ?" ती म्हणाली " देखो राज, इतने दुर से तुम ने फोन कीया है, तथा मेरी तबीयत के बारे मे पुछ रहे हो मुझे काफी अच्छा लगा, लेकीन बाकी बाते जब तुम यहा आयोगे मुझे मिलोगे तभी करेंगे.. पता नोट करो अभी," मी जरा चकरावलोच पण एका आजारी तथा जी मला आवडते त्या मुलीची इच्छा मोड ने मला जरा वेगळेच वाटले व मी नकळत तीचा पत्ता नोट करु घेतला.

"क्या, नैनीताल, अभी जाना है, तुम्हे क्या लगा.. नैनीताल यही है.. कीं तुम बस में बैठ गये तथा एक घंटे में पोहच जाओगे ! " - ईती वर्माजी.
"लेकीन सर मेरा जाना बहोत जरुरी है.." मी (जाने का महत्वाचे आहे हे मी स्वत:लाच पटवून देऊ शकलो नव्हतो तेथे वर्माजींना काय पटवणार)
"अबे लेकीन काम कोन करेगा तेरा यहा, " - वर्माजीं. पण एक तासाच्या मिटींग नंतर मात्र ते तयार झाले पण का व कसे हे देव जाने.

"अरे हीरो उठो, नैनीताल आ गया है, बस आगे नही जायेगी अब. पता नही सोना ही था तो बस में क्यूं सोते हो भाई.... कही रुम लो वहा सो जायो मस्त !!" - बस कंडेक्टर.
" अरे भाई, जरा सस्तासा हॊटेल बता देना मुझे कोन सा है ! "- मीच नेहमी प्रमाणे.
" हम्म, नीचे उतर पहले. जहा देखेगा वही हॊटेल मीलेगा तुझे " - - बस कंडेक्टर.

खुप घासाघासी करुन एक रुम फिक्स केली व जवळचे असलेले सर्व सामान तेथे ठेऊन मी लगेच यसटीडी जवळ गेलो व विभाला फोन लावला " विभा में राज, नैनीताल में पोहच गया हूं.... तुम्हारा दिया हुआ पत्ता तो है मेरे पास फिर भी जरा तुम गाईड करोगी मुझे ?"
" सच्ची ? " विभा. " तुम सही में नैनीताल पोहच गये हो ? "
मी - " नहीं, मे तो नैनीताल के यसटीडी बुथ से तुम्हे पागल बनाने के लिए फोन कर रहा हूं..! क्या बात कर रही हो विभा, में यहा नैनीताल में हूं.. आना कहा है बता दो !"
" राज मुझे विश्वास नही हो रहा है, तुम नैनीताल में आ गये हो।" - विभा. " देखो किसी को पुछ कर तुम ज्योलीकोट रोड की तरफ आ जाना, वहा से बस मेरे चाचा का हॊटेल xyz तुम्हे दिख जायेगा" - विभा.
मी ठीक आहे असे म्हणून ज्योलीकोट मार्ग शोधून त्यीच्या काकाच्या हॊटेल जवळ पोहचलो, तर तेथे तीचे वडील बागेत काहीतरी माळीला सांगताना दिसले मी त्याच्या जवळ गेलो व नम्स्कार केला " नमस्ते अंकल जी"
"हो, राज तुम यहा कैसे ?" -अंकल.
"नैनीताल घूमने आया था अंकल जी" - मी
"अब, इस महीने मे ?, अरे नैनीताल तो जरा गरमीओं मे आते... चलो अंदर जरा चाय पीते है" - अंकल.
इकडची तीकडची खुप बोलणी झाली पण बुढा मुळ गोष्टीवर काय येत नव्हता व मला विभाचा विषय काढता येत नव्हता मी काय करावे ह्या विचारात असतानाच एक नोकर त्याच्या कडे आला व म्हणाला " सर, विभाजी आप को बुला रही है" तो अंकल काही म्हणायच्या आतच मी म्हणालो " अरे वा, विभा भी आप के साथ है ?" मला जरा त्याचा चेहरा पडल्यासारखा वाटला पण काही क्षणाने तो हसून म्हणालो " हां, वह भी यही है,मीलोगे उसे ? चलो. "
मी आपल्याच हुशारीवर बेहद खुष झालो व मनातल्या मनात म्हणालो " देखा, राज का दिमाग." मी त्यांच्या बरोबर विभाच्या रुम वर पोहलो.
तीचा बाप तीच्याशी काय बोलला व काय नाही हे काही लिहीत बसत नाही, जास्तच फिल्मी वाटू लागेल मला व तुम्हाला देखील.
"विभा, तुझ्याशी काही बोलायचे आहे मला, मध्ये बोलू नकोस, फक्त मी काय सांगतो ते लक्ष दे" - मी.
"ठीक है बोलो" - विभा.
"देखो विभा जो कुछ संजनाने कहा, तुम्हे अच्छा लगा नही लगा मुझे पता नही, लेकीन तुम मुझे धक्के दे के यहा से निकालो उस से पहले एक ही बात मुझे तुम पसंद हो, मुझे तुमसे प्यार है"- व मी खिश्यात हात घातला व तीच्यासाठी घेतलेले एक गिफ्ट तीच्या समोर धरले.
ती दंगा करेल, शिव्याशाप देईल, मला म्हणेल तुझी आई बहीण आहेत की नाहीत घरात अथवा आपल्या वडीलांना बोलवेल..... असे काही मला वाटत होते.. पण तसे काही न घडता ती मला म्हणाली " डियर, हीच जर गोष्ट तु मला संजनाने सांगायच्या आधी सांगितली असतीस तर...."

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३

लहाना मुला बरोबर मुलासारखंच वागावे तर सम-वयस्क मित्रा बरोबर मित्राप्रमाणे, हा माझा सिध्दांत विभाला व संजनाला दोघींना देखील आवडला व त्या दोन छकुल्या मुलींबरोबर जसा मी रमत गेलो तसे तसे त्या घरासोबत माझे नाते एकदम मजबुत होऊन गेले, मी जेव्हा ही वेळ मीळत असे त्या घरी पळत असे, माझ्या कंपनी पासून त्यांचे घर जवळ जवळ ४० एक किलोमीटर होते पण मला ते अंतर त्यावेळी काहीच वाटायचे नाही व त्या घराला देखील मी शक्यतो आपलासा वाटत होतो त्यामुळे मला घरी येण्या-जाण्याची काही काल मर्यादा कधी पडलीच नाही, घरातील सर्व मेंबर मला आपलाच समजत व त्या दोघी छकुल्या तर रवीवारची वाट पाहत बसत की राज मामा घरी येणार व आम्हाला संगणक शिकवणार, फिरायला घेऊन जाणार हे त्यांचे प्लान मी येण्याच्या आधीच तयार असत. संजना कामात बीझी तर तीचे पती एअर्फोर्स मध्ये कामावर कधी दिल्ली तर कधी बाहेर शहरी. त्यांचे आई-वडील वयाने ७० पार त्यामुळे त्या मुलींना माझाच एक आधार राहीला हसण्या खेलण्यासाठी व मला त्यांचा.

"अरे राज, बच्चोंके च्क्कर में तो तुम मुझे भुल ही गये हो ना.. ? तुम्हे याद होना चाहिए की में भी तुम्हारी एक दोस्त हुं" विभा. हा विभाचा माझ्यावरचा शेरा नेहमीच लागू पडत असे कारण संजनाच्या घरी जान्याच्या आधी मी विभाच्या घ्री जाईन हा माझा निर्णय विभाच्या गेट पर्यंत जाऊ पर्यंत बदलत असे व मी विचार करत असे की यार असे मुलीच्या घरी सारखे सारखे गेल्यावर तीचे आईवडील काय म्हणतील असा विचार करुन मी माझा मोर्चा सरळ संजनाच्या घराकडेच जात असे , असे नेहमी होत राही व विभा मला रोज आपल्या घरी बोलवत राही.

एके दिवशी विभा माझ्या केबीन मध्ये आली व मला म्हणाली " राज आज कोई बहाना नहीं चाहीए, देखो आज मेरा बर्थडे है, शाम को छोटीसी पार्टी है घर पें तुम सीधे घर चले आना, संजना भी वही मिलेगी तथा बच्चे भी, ठीक है" माझा हो - ना काही विचारता सरळ बाहेर गेली व अर्धा-दिवसाची रजा टाकून घरी निघून गेली. मी देखील मागोमाग अर्धा-दिवसाच्या रजेचा अर्ज घेऊन वर्माजीच्या समोर उभा राहीलो, पहील्यांदा त्यानी काही न बोलता रजा मंजुर केली व मी बाहेर जाता जाता फक्त एवढेच म्हणाले " बिना गिफ्ट मत जाना" व हसले. मी चमकुन त्यांच्या कडे पाहीले त्यांच्या डोळ्यात मला असे दिसले की ते म्हणता हेत " जा बेटा जा, मुझे पता है तुम कहा जा रहे हो"

गिफ्ट खरेदी करणे - सर्वात मोठा प्रश्न की तीला काय आवडत असेल, मी विचार केला अरे यार तु तीला कधीच तीची आवड - नावड विचारलीच नाहीस गिफ्ट कसे घेणार.
तरी देखील मनाचा हिय्या करुन मी बाझार मध्ये एका शोरुममध्ये घुसलो, व प्रचंड भाव पाहून परत मागे फिरलो, जिवाची मोठीच घालमेल चालू होती व विचार केला, लेका कधी मुलीसाठी गिफ्ट खरेदी केले असते तर तुला नक्की माहीत असते की मुलींना काय आवडते ते, स्नेहाला पण कधी गिफ्ट दिले नाहीस ना कधी कोणाला. आता काय करावे, ह्या विचारामध्ये मी मग्न असताना वेळ भराभर निघून जात होता माझा कडे एक तास वाचला होता तीच्या घरी जाण्य़ासाठी, मी मुर्खासारखा ईकडे-तीकडे शोधक नजरेने फिरत होतो व मला काहीच तीच्यासाठी योग्य वाटत नव्हते, तेव्हा मात्र मी गिफ्ट न घेताच तीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला व लगेच घरी जाण्यासाठी मार्केटच्या बाहेर आलो तर बाहेर एक फुलवाला फुले विकत बसला होता, माझ्या चेह-यावर एक बेरकी हसू उमटलं व मी लगेच एक फुलांचा गुच्छ डॊळे मीटून निवडला व सरळ पैसे देऊन तीच्या घराकडे निघालो.

जसे ती वाट पाहत उभी असावी ह्या पध्दतीने ती मला घराबाहेरच भेटली दरवाज्याजवळ. विभाला मी ती फुले दिली व म्हणालो " मुझे बस यही पसंद आया, जो तुम्हे में दे सकता था" ती ने हसून ती फुले आपल्या छातीशी लावली व म्हणाली " तु यहा मेरे घर पें आए हो यही बडी बात है, बाकी यह फुल मुझे बहोत पसंद है, थक्स." व मला आत घेऊन गेली व मी नियमाप्रमाणे तीच्या आईला व वडीलांना भेटलो व नमस्कार करुन तेथेच एका कोप-यामध्ये मी उभा राहीलो, तीचे जे मित्र आले होते त्यासर्वामध्ये मी एक बावळटासारखा दिसत होतो ना त्यांच्या सारखे कपडे माझे किमती ना माझ्या कडे त्या सोन्याच्या साखळ्य़ा गळ्या भोवती. पण जसा जसा वेळ जाऊ लागला तसे तसे समजू लागले की ही सर्व मंडळी फक्त एक फार्मालिटी पुर्ण करण्यासाठी येथे आलेली आहेत ना कोणाला वाढदिवसाचे अप्रुप ना कोणाला विभाचे. सर्वांना खाने पीणे व फक्त केक शी मतलब. मी जैन त्यामुळे केक ह्या प्रकारापासून दुरच उभा होतो, जेव्हा विभा माझ्या जवळ केक घेऊन आली तेव्हा मी तीला सांगितले "माफ करना में केक नही खां पाऊंगा, इस में अंडा है ना" ती हसली व म्हणाली " मुझे पता है तुम जैन हो, कोई बात नहीं यह दुसरा वाला केक लों इस में अंडा नही है" मी तो केक घेऊन तेथेच बाजूला उभा राहीलो.

ह्या ५.५ ईचाच्या पोरीमध्ये आहे काय ? का मी येथे उभा हा, गिफ्ट दिले , केक देखील खाल्ला तरी देखील मी येथे का उभा ?
आज ही सफेद ड्रेस मध्ये नेहमी पेक्षा सुंदर दिसत आहे ना ? नेहमी ही केसे बांधून फिरते पण हीला कोणीतरी सांगा हो, मोकळ्या केसामध्ये ही जरा जास्तच सुंदर दिसत आहे, नेहमी माझ्या समोर गालातल्या गालात ह्सणारी ही विभा आज एकदम दिलखुलास पणे हसत आहे मी आजच तीचे हे निरागस हसू पाहत आहे, कार्यालयीन वेळेत ही कीती व्यवहारीक वागते व आपल्या मित्रांसोबत. मैत्रीणी सोबत की मनमोकळे पणाने वागते... सुंदरता तन में नही मन में होनी चाहीए... असे म्हणतात, खरोखर तन भी सुंदर व मन भी सुंदर अशी ही विभा. माझा विषयी आपुलकी बाळगते अथवा दया माहीत नाही पण माझ्याशी खुपच प्रेमाने वागते.. असाचा बीनपायाचा मी विचार करत उभा होतो तोच मला विभाने आवाज दिला व मला विचारले " अरे कहां खो गए हो राज ? आज यहीं रुक जाना देर हो गयी है" मी म्हणालो " अरे नहीं, अभी तो दस ही बजे है, जादा टाईम नही हुंआ है, मे चला जाऊगां" तीने जरा जास्तच प्रयत्न केला पण मी जाने नक्की केले होते तेव्हा तीचा नाईलाज झाला व मला नाक्यापर्यंत सोडण्यासाठी ती माझ्या बरोबर चालत चालत येऊ लागली.

"राज, पता है, यह सब दोस्त बहोत कुछ गिफ्ट लाए, यह सब मुझे बचपण से जान ते है, सब को मेरी पसंद पता है, पर फिर भी कोई मेरी पसंद का गिफ्ट नही लाया" मी जरा नर्वस झालो व म्हणालो " यार, मुझे माफ करना, तुम्हे अचानक ही बताया था की तुम्हारा बर्थडे है, तथा मुझे पता नहीं था की तुम्हे क्या पसंद है, मेंने कधी तुमसे पुच्छा ही नही था" पण त्याच वेळी विभा म्हणाली " अरे नहीं, पुरी बात तो सुना करो पहले कभी, तुम जो फुल लाए थे ना वह मुझे बहोत पसंद आएं, सच्ची" मी म्हणालो" अरे मुझे पता है, तुम मेरा दिल रखने के लीए कह रही हो, पर कोई बात नहीं तुम्हारा एक गिफ्ट मेरे उपर उधार रहा..ठीक है"

मी तीला तेथेच सोडुन पुढे रिक्षा स्टाप वर उभा राहीलो काही काळ, तीने दोन एक मीनीटे वाट पाहीली व आपल्या घरी निघून गेली, मी तसाच चालत निघालो व मनामध्ये एक प्रकारचे युध्द चालू होते, यार ती कीती मार्डन मुलगी आहे, तु कुठे, स्नेहा मुळे झालेली पोकळी भरुन काढण्याचा तुझा प्रयत्न असेल तर विचार देखील करु नको, तु तीच्या शिवाय जगू शकत नाहीस हे तुला माहीत आहे, तर दुसरे मन अरे लेका, असे काय एकाच मुली मागे जगणे शक्य आहे का ? परत पहीले मन, अरे यार, ना तुझ्या कडे घर ना दार. काय म्हणून ती तुझ्यावर प्रेम करेल अथवा तुझे प्रेम स्विकारेल. असे काही ना काही विचार डोक्यात घेऊन मी कळत न कळत मारुती कंपनीच्या गेट पर्यंत आलो व मागून एका बाईक वाल्याने मानेसर जाण्याचा रस्ता विचारला मी त्याला म्हणालो " आप को दिक्कत ना हो तो में आप को मानेसर के रोड्तक ले जाता हूं, मुझे भी वही जाना है: तो ठीक आहे म्हणाला व मी त्याच्या बरोबर कंपनी गेट पर्यंत आलो.

रोज रोज ची बस व रिक्षाची कटकट मला अतीच होत होती मी वर्माजी तथा साहबांची बोलून दोन एक महीन्याचा पगार आगावू घेतला व नवीन सीबीझी होंडाची घेतली.
लहान छकुल्या मुलींना भेटावे ह्या उद्देशाने मी संजनाच्या घरी गेलो पण हाती माझ्या कंपनी मधील माझी पिशवी देखील होती, लहान मुलींनी खेळता खेळता माझ्या पिशवीतील सर्व सामान विस्कटले व त्यातील काही सीडी, फ्लापी काढून खेळू लागल्या, मी त्यांना मना केली तर छोटी रुसून एका खोलीत नीघून गेली, मोठीला मी जवळ घेतले व समजावून सांगितले की बेटा ही सर्व माझ्या कामाच्या वस्तू आहेत ह्या हरवल्या तर माझे काम थांबेल, ती समजली व जाऊन आपल्या लहान बहीणीला देखील समजावून आली पण एका अटीवर काहीतर खाण्यासाठी आना, आताच्या आता. मी काही चिप्सची पाकेटे व काही चाक्लेट आणून दिले तेव्हा तीने काही सामान परत दिले पण नजर चुकीने माझी महत्वाची डायरी तेथेच राहीली, व त्याचा मला खुप मोठा त्रास पुढे होणार होता.

दोन एक दिवसानंतर रवीवारी मी संजना व विभा जवळच्या एका मार्केट मध्ये फिरत होतो तोच एका मोबाईल दुकानातुन मला दोघींनी मिळून एक मोबाईल घेण्यास भाग पाडले व बोलता बोलता संजना माझ्या लग्नाचा विषय घेऊन माझ्याशी व विभाशी बोलू लागली व तीने अचानक विभाला विचारले " तुम करोगी शादी राज से ? यह शायद तुम से प्यार भी करता है" मी दचकलोच व संजनाला म्हणालो " अरे सिंस यह क्या बोल रही है आप, संजना गलत बात है यह, बुरा मत मान ना सिस्टर ने मजा की या है" मी परत संजनाला म्हणालो " यह आप को कीस ने बताया" संजना म्हणाली " तुम्हारी डायरी ने, जो तुम घर भुल गये हो, कल."

विभा काही न बोलताच सरळ निघून गेली, संजना व मी एकदम विचारत पडलो की अरे यार गफलत तर नाही ना झाली ?

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.
मी- काय झालं व्यवस्थीत सांग.
तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.
मी- मग, तु काय केलं.
तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा.
मी- धत्त तेरी की.. पुढे.
तो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या.
मी- तु वाचलास ना ?
तो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला.
तो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार.
मी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते ?
तो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात.
मी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच.
तो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही.
मी- तु मिपा वर नाही आला होतास का ? बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच.
तो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही.
मी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला ?
तो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं... जेवणासाठी फोन करतयं येडं.
मी- अरे बापरे... म्हणजे जेवण कलटी ? तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का ? आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची ?
तो- अरे, शनिवार... एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं.
मी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार.
तो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता.
मी- अरे अरे, कोण गेलं ?
तो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा.
मी- असं काय... मग ठीक आहे, पुढे.
तो- मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.
मी- म्हणजे तु टल्ली.
तो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता.
मी- का ?
तो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं.
मी- का रे ?
तो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली.
मी- बरं झालं तुला वेळीच आठवलं.
तो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार.
मी- मग तु काय केलंस.
तो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत.
मी- मग काही मिळाले का गिफ्ट.
तो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले... चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे.
मी- मग काय केलंस तु ?
तो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो.
मी- धन्य आहेस, पुढे.
तो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये.
मी- ती खुष झाली असणार मग.
तो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले.
मी- मग काय झालं बॉ !
तो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली.
मी- किचन मध्ये का ? चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार... ती पाघळली... ह्या बायका अश्याच.
तो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.
मी- का ? ती का भडकली रे ?
तो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून.
मी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली ?
तो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात " जानु, आय लव्ह यु - राधिका." लिहले होते.
मी-
तो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु ? परवा पासून तीने जेवायला सोड.... चहा पण नाही विचारला .
मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का !
तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार
मी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार... !
तो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच.
मी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा

नैनिताल

नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर. १९३९ मीटर उंची वर वसलेले हे शहर खरं तर इंग्रजाची देन भारताला, त्या जागेची सुंदरता व निसर्गांचा आविष्कार जगा समोर आणला ते पी बैरन ह्यांनी १९३९ मध्ये.


नैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.
शहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.


नैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे नाममात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.


पर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.


* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे

लफडा

प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा

आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !

ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.

गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !

काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही

पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !

कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !

भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !

»

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर.... मैत्री !!! --- भाग -१२

सर्व काही व्यवस्थीत चालू होते, एक दोनदा कंपनीच्या कामासाठी मला गुजरात तथा मध्यप्रदेशला पाठवले गेले होते पण ह्यावेळी मला जवळच जयपुर येथे पाठवले गेले ते सरळ एक महीन्यासाठी. एक सुंदर शहर व एकदम मस्त समाज असे जयपुरचे मी वर्णन करेन, शहरापासून १५ एक कीमी वर आमची कंपनी होती व राहण्याची व जेवणाची सोय तेथेच. ह्या मुळे मी मात्र जाम खुष होतो जेवण बनवण्याची कटकट मीटली होती व संध्याकाळचा वेळ मला जसा हवा तसा वापरता येत होतो, तेव्हा मी जवळ जवळ मी महीनाभर रोज कोठे ना कोठे जयपुर फिरुन येत असे. जयपुर वारी मध्ये वेगळे असे काही घडले नव्हते तेव्हा जास्त काही लिहीत बसत नाही.

महिन्याच्या कालावधी नंतर मी परत गुरगांव कार्यालयात आलो व व सर्व रिपोर्ट व्यवस्थापनाला देऊन मी आपल्या कामावर रुजू झालो, तर येथे जरा नवीनच अडचण आली होती काही उंदरांच्या दंग्यामुळे कंपनीतील नेटवर्क विसकटले होते व काही प्रमाणात केबल्स ही खराब झाल्या होत्या रितसर पध्दतीने केबल तथा जरुरी सामान ह्याचा मी पीओ बनवून घेतला व लगेच दुस-या दिवशी सामान पोहचल्यावर नवीन केबल टाकणे चालू केलेच होते.. जुन्या पध्दतीच्या ह्या कंपनीमध्ये केबल टाकताना माझे केस , कपडे हे धुळीने माखलेच होते व चेह-यावर ही काही जागी काळे पाढंरे डाग पडले होते अश्या अवतारात मी एका केबीन मधुन दुस-या केबीन पर्यंत काम करत होतो, उन्हाळ्याचे दिवस त्यातून मी घामाघुम झालो होतो तेव्हा मी आपला शर्ट काढला व टी-शर्ट मध्येच काम चालू केले, माझा शर्ट व कंपनीचे आय-कार्ड दोन्ही बाजूलाच पडले होते व मी ते उचलून वर ठेवावे ह्या उद्देशाने माझ्या केबीन कडे ह्याच अवतारात निघालो, तोच एक मधुर आवाज कानावर पडला " अरे सुनो" मी चमकुन इकडे तिकडे पाहीले तर जी केबिन गेली सात-आठ महिने बंद होती ती उघडलेली होती व एक युवती हातामध्ये काही जुन्या फायली घेऊन काहीतरी शोधत होती, ती मला म्हणाली, " जरा बहाद्दुर को बोल ना मुझे चाय पीलायेगा" मी तीच्या चेह-याकडे पाहातच राहीलो व तीने पुन्हा मला तीच आर्डर परत मला दिली, मी हसलो व म्हणालो " अभी बोलता हूं" मी विचार करत च बाहेर रिशेपशन जवळ आलो व रिशेपशन वर जो शर्मा होता त्याला मी विचारना केली की ही नवीन बया कोण ? तर तो म्हणाला " दस-दिन हो गये है कंपनी में काम कर रही है.. पर क्या काम कर रही है यह तो साहब को ही पता होगा" मी त्याला तीची आर्डर सांगितली व आपले काम पुन्हा चालू केले.

दोन एक दिवसामध्ये माझे काम संपले व मी नेहमी प्रमाणे माझ्या केबीन मध्ये बसू लागलो, तोच शर्मा माझ्या कडे आला व साहबांनी बोलवले आहे असे सांगून निघून गेला, मी लगेच साहेबांच्या केबीन मध्ये गेलो " राज, देखो व जो विभा है ना उसे एक पीसी तथा प्रिंन्टर चाहीए देखना को कुछ होता है क्या , जादा दिन के लिए नही चाहीए १० दिन काही उसका काम है" मी ठीक आहे म्हणालो व एक पीसी विभाच्या केबीन मध्ये घेऊन गेलो व त्यांना माझी ओळख करुन दिली व म्हणालो " अगली बार चाय चाहीए होतो २३१ पें रिंग करना " मी असे म्हणताच ती एकदम जोरात हसली व माझी क्षमा मागीतली व आपली ओळख करुन दिली.

कंपनीमध्ये तीचे काम दुपार पर्यंत चालत असे व ती तीन नंतर आपल्या घरी जात असे पण जशी जशी आमची ओळख होत गेली तसे तसे तीचे घरी जाण्याचे टाईम बदलू लागले, पाच-सहा दिवसामध्ये आमची चांगलीच गट्टी जमली व आम्ही खुप जुने दोस्त असू ह्या पध्दतीने वागू लागलो होतो, माझी ही जवळीक वर्माजींनी ओळखली व मला आपल्या केबीन मध्ये बोलावले, एकदोन कामाच्या गोष्टी करुन ते मुख्य मुद्द्यावर आले व म्हणाले "राज, दो-तीन दिन से देख रहा हूं तुम बहोत खुश रहने लगे हो.. क्या बात है?" मी जरा वरमलोच व म्हणालो असे काही नाही आहे मी असाच आहे तर ते हसत म्हणाले " कोई बात नही सीए ट्रेनी है वह, चल उसे रख ना न रख ना मेरे हात में है... जा तू" मी हसत बाहेर आलो व मी विचार केला खरोखर माझ्यात काही बदल झाला आहे का ?

दोन एक दिवसांनी विभाने मला सांगितले की कंपनीमध्ये ती अजून दोन एक महीना ट्रेनिंग घेणार आहे व त्याची परवानगी तीने वर्मा सर कडून घेतली, मी अचानकच हसलो व मला वर्माजींचे बोल आठवले, तीने खुप प्रयत्न केला विचार ण्याचा की मी का हसलो पण मी वेळ मारुन नेली. ती देखील विचारात पडली की हा असा मध्येच का हसला असावा, पण तीने जास्त वेळ न घेता आपल्या कामावर परत गेली.

कामाच्यावेळेतून मला बाहेर जाण्याचा वेळ कधी मीळत नसे व कधी वेळ मीळालाच तर बाहेर जाऊन काय करावे ह्या विचाराने मी कंपनी मध्येच पडीक असे, पण एक रविवारी विचार केला चला आज बाजार मध्ये जाऊन कपडे घेऊ व जरा फिरुन येऊ या. प्लान तयार केला की लगेच अमंलबजावणी करने हा माझा स्वभाव त्यामुळे मी लगेच सेक्टर १४ पोहचलो व काही दुकानामध्ये फे-या मारल्या पण जिवनामध्ये दोनगोष्टी कधी जमल्याच नाही एक भाजी विकत घेणे व दुसरे कपडे विकत घेणे, मी माझा कपडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द केलाच होता तोच मागुन कोणीतरी राज अशी आवाज दिली , व पक्के माहित होते की तो आवाज विभाचाच आहे, मी मागे वळुन पाहिले तर ही आपल्या मत्रिणी बरोबर येत होती, मी हसून तीचे व तीच्या मैत्रीणेचे स्वागत केले व विचारले " यहा कहा, घुम रही हो आप ? " तीने सांगितले की दर रवीवारी ती व तिची मैत्रीण येथेच फिरत असतात काही ना काही खरेदी करण्यासाठी. मी माझे कारण सांगितले तर ती म्हणाली चल ठीक आहे मी करुन देते खरेदी.

मनातील ईच्छा पुर्ण झाली मला संगे कोणीतरी हवेच होते तेव्हा ही विभा आली, मी,ती व तीची मैत्रिण माझे कपडे खरेदी करण्यासाठी एका शोरुम मध्ये घुसलो " तेथील एक दोन कपड्यांचे भाव पाहताच मी विभाच्या कानामध्ये कुजबुजलो व म्हणालो " विभा मेरा बजेट सिर्फ २००० तक ही है " ती हसली व म्हणाली " बहोत है २००० तो रुको पहले पसंद करो" तीन शर्ट दोन टिशर्ट व दोन एक जिन्स अशी खरेदी विभाने मला १६०० रु. मध्ये करुन दिली व मी तीचे आभार मानले व तीला म्हणालो " विभा तुम नही आते तो शायद में खाली हात ही रुम पे जाता, चलो तुम्हारी वजह से मेरा एक काम तो हो गया चलो तुम मेरे साथ एक एक कप चाय पीलो या कुछ खालो" ती हसली व म्हणाली " नही कभी ओर दिन आप की चाय का मजा लेंगे, मुझे देर हो रही है में चलती हू" असे म्हणून ती आपल्या मैत्रीणी बरोबर निघून गेली व मी काही क्षण तेथेच थांबलो व परत आपल्या रुम वर आलो, आल्या वर सर्व कपडे पाहीले तर जरा मी वैतागलोच अरे यार, कसला हा रंग, काय ही रंगसंगती, आणी ही विभाच्या नजरेतील अर्धवट रंग गेलेली सर्वात मस्त जिन्स. कोई बात नही १६०० गये पाणी में... व मी दिवस भर झालेल्या घडामोडीचा पुन्हा विचार केला तेव्हा आठवले की आपण आपल्या आवडीचे काही घेतलेच नाही ही सर्व निवड तर विभाची आहे, मी जरा दचकलोच व म्हणलो, राज बेटा जरा दुर रह ना.... अभी तो बहोत कुछ करना है"

जवळ दिवाळी आली होती सर्वजण आपापल्या घरी जाण्याची, कपडे खरेदी करण्याची अथवा सोने चांदी खरेदी करण्याचा प्लान तयार करत होते व मी मात्र विचार मग्न होऊन मागे गेलेल्या जिवनातील एक एक दिवाळाची आठवण काढून त्यावरच खुष होत होतो. मी जरा भुतकाळामध्येच मग्न राहू लागलो व कामामध्ये चुका करु लागलो, तेव्हा माझी गत ना घर का ना घाट का...... अशी झाली होती, एक दिवस असेच बसलो होतो केबीन मध्ये तर शर्माजींनी एक साप्ताहीक वाचन्यासाठी दिले तर त्या साप्ताहीकामध्ये भारतभर साज-या होणा-या दिवाळीची सचित्र माहीती दिली होती, एका पानावर महाराष्ट्रातील दिवाळीची माहीती व काही चित्रे दिली होती ते पाहताच कळत न कळत डोळ्यातुन काही आश्रु गालावर ओघाळत आले व ते मी फुसत असतानाच विभा माझ्या केबिनमध्ये आली व माझा मुड पाहून विचारु लागली " राज, क्या हुवा ? " मी " कुछ नही, तुम बता क्या काम था " पण तीने पिच्छा सोडला नाही व जवळ जवळ दहा मिनिटे ती माझ्या जवळ बसुन दिवाळीची माझी अडचण समजुन घेतली, व म्हणाली बस यही बात ? चल यह दिवाली हम मनायेंगे एकदम खुषी से " मी हसलो व म्हणालो " वह सब ठीक है, तुम बता काम क्या था " ती हसतच बाहेर निघून गेली व थोड्यावेळाने परत आली व म्हणाली "देखो परसो संन्डे है तब तुम पालम विहार आ जाना मेरे घर पे मुझे फोन करना वहा आ के वहां से में तुझे लेके अपने दिदी के घर चलूंगी वही पास में है, वह भी १० साल महाराष्ट्र में रही है मेरी अभी बात हुंई है उससे ठीक है ना" मी हो म्हणालो व विचार केला चल थोड्या ओळखी तर वाढतीलच अजून काय... मी होकार दिला.

रवीवारी जसा प्लान होता तसा मी विभा बरोबर तीच्या बहीणीच्या घरी आलो, एक छानसं तीन खोल्यांचे ते बसके घर, आतील रंगसंगती तथा सामान सगळे कसे एकदम व्यव्स्थीत. तोच तीची बहीण आली संजना. माझी ओळख करुन घेतली व मला सांगितले की तीने आपले काही शिक्षण नागपुरला घेतले होते व काही काळ ती पुण्यात देखील होती पण मराठी सध्या ती विसरली होती जे काही तेथे शिकलेली होती ते. त्यांच्या घरी दोन लहान मुली होत्या, त्या ही आमच्या गप्पा मध्ये सामिल झाल्या व कामाच्या विषयावरुन घरी असलेला संगणक ही मला दाखवला, त्यांनी तो नवीन घेतला होता. चहा व खान्यापीण्याचे सामान तयार करण्यासाठी त्या दोघी स्वयंपाक घरात गेल्या व मी ह्या लहान मुलीं बरोबर बोलत बसलो.
"आपका नाम क्या है बेटा " "मामा, मेरा नाम वीना है" मोठी मुलगी प्रथम बोलली व लगेच पाठून छोटी देखील " मेरा नाम अना है.. अनामिका" मी हसलो. थोड्यावेळातच त्या छोट्या मुली बरोबर तथा विना बरोबर गट्टी जमवली व त्यांच्याशी गप्पा मारु लागलो, मोठीचे वय नऊ वर्ष तर, छोटीचे वय सात वर्ष. दोघी Egilish मिडीयम शाळेमध्ये जात होत्या व बोलता बोलता माझ्या बोलण्यातील चुका काढत होत्या. चहा पाणी झाल्यावर विभाने सांगितले की ही संजना तीची मुंहबोली (मानलेली) बहीण. मी त्यांना म्हणालो खरोखर खुप दिवसानंतर मी एका घरगुती वातावरणामध्ये आलो व मला तुम्हाला भेटून आनंद झाला व तसेच तुमच्या मोठ्या मुलीने मला मामा बनवलेच आहे तर चला मला देखील भाऊबीज व राखी साठी येथेच एक बहीण भेटली व मी हसतच त्यांचा व त्या दोन छोट्या मुलींचा निरोप घेतला व विभा बरोबर तीला सोडण्यासाठी तीच्या घरापर्यंत गेलो.

माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११

कंपनीमध्ये मी चांगलाच रमलो होतो व जवळ जवळ कंपनीमधील सर्वजण मला नावानीशीच ओळखू लागली होती, संगणक कमीच होते व जे होते देखील जुने, मी थोडाफार प्रयत्न करुन व मालकाशी बोलणी करुन काही नवीन संगणक विकत घेण्याचा व जूने संगणक नवीन लोकांना देण्याचा निर्णय घेतला, व गुडगांव व दिल्ली मधील काही दुकानातून कोटेशन्स मागवली, चार पाच चांगले भाव पाहून मी ती कोटेशन्स मालकांच्या समोर ठेवली व म्हणालो निवडा जो भाव व काम ठीक देइल त्यांला काम देऊ असे ही सांगितले तेव्हा ते म्हणाले ते सर्व तु पाहा व मला फक्त रक्कम सांग कीती चा चेक तयार करायचा तो. मी हसलो व ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो तोच दोन एक व्यक्ती माझी बाहेर वाट पाहत होते, मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांची विचारपूस केली, तेव्हा कळाले की ज्या काही कोटेशन्स आल्या होत्या त्यातील एका कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ते माझ्या कडे आले होते,
प्रतिनिधी -"नमस्कार सर."
मी - "नमस्कार बोला."
प्रतिनिधी -"सर, आमची कोट तुम्हाला भेटलीच असेल."
मी - "हो, भेटली ना. विचार चालू आहे अजून काही नक्की झालेले नाही आहे पाहू"
प्रतिनिधी -"सर, आम्ही चांगली सर्विस देऊ, तसेच तुमचा फोन आलेल्या काही मिनिटामध्येच आमचा अभियंता तुमच्या कंपनीमध्ये पोहचेल, दहा मिनिटाचाच रस्ता आहे"
मी - "ह्म्म्म, बरोबर आहे."
प्रतिनिधी -"सर बाकीच्या काही दुकानदारांचे कोट तुमच्या कडे आले असतील त्यातील सर्वात कमी कोट आमचीच आहे ह्याची खात्री आहे आम्हाला"
मी - फक्त हसलो.
प्रतिनिधी -"तरी ही मार्केटचे काम आहे जरा कमी जास्त झाले असेल तर आम्ही बदल करु शक्तो कोट मध्ये"
मी - "ह्म्म नाही कोट मालकांच्या समोर गेली आहे मी काही करु शकत नाही आता पण पाहू काय होते ते"
प्रतिनिधीचा साथी -"सर, मी अरविंद आहे व ही संस्था माझीच आहे गेली ५ वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये आहे, व मला माहीत आहे कोट गेली आहे पण तुमच्या हाती सर्व काही आहे असे माझे गुप्त सुत्र... सांगत होता"
मी - "च्या मायला, कंपनी मध्ये गुप्त-सुत्र...माफ करा मी मराठीमध्ये बोललो, आमच्या कंपनीमध्ये तुमचा जुगाड मी समजलो नाही"
अरविंद -"सर, काय करावे हा कारोबार जरा असाच आहे सर्व माहीती ठेवावी लागते आम्हाला."
मी - " ह्म्म बरोबर, तर मग."
अरविंद-" सर, ईकडचे तिकडचे बोलत बसत नाही, १० टक्के व नक्की करा."
मी - "दहा टक्के ??? " च्यायला ही काय नवीन भानगड.
अरविंद-"सर, ठीक है ११% कर लो...ह्म्म्म नही सीधा आप १२ % कर लो ठिक है अब. तो कब फोन करु पीओ के लिये ?"
मी - अजून गोंधळलोच होतो काही कळत नव्हते हा काय बोलतो आहे ते, मी सरळ त्यांना म्हणालो थांबा आलोच. व जवळ जवळ पळतच माझे एक सहकारी व नवीन मित्र यादव ह्यांच्या कडे गेलो व सगळी बातचित त्यांना सांगितली, ते हसत म्हणाले " अबे, वह तुम्हे तुम्हारा हिस्सा बता रहा है... १२% मतलब जो भी बिल बनेगा उसका १२%. हा कर दे बेटा, तेरे तो मजे है अब."मी हसलो व परत मिटीग रुमवर आलो.
मी अरविंदला म्हणालो "ठीक है, कल बात कर ना एक बार"

संपुर्ण दिवस १२% वरच मी फिरत राहीलो, कमीत कमी मला २८००० हजार रुपये मिळणार होते, काय करावे , कसे करावे.. हाच विचार करत थांबलो, चार महिन्याचा सरळ सरळ पगार हाती येणार होता काय करावे..
दिवस संपला, एकच्या जागी दोन बियर संपल्या व वैतागुन झोपी गेलो तर रात्रभर झोप नाही आली, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी विचार करता करता एक निर्णय घेतला व रात्री एकदम शांत झोपलो.

सकाळच्या कामातून मालक असे मोकळे झाले तसा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सर्व काही खरं खरं सांगितले, ते माझ्याकडे पाहतच राहीले व म्हणाले "अरे, भाई यह सब तु मुझे बता रहा है, यह तो मुझे सब पता है, सारी जगह काम इसी तरीके से चलता है, अपने यहा भी, लेकीन तु पहला आदमी है जो अपने मालिक को बता रहा है" असे म्हणत जोर जोरात हसू लागले, मला काहीच कळाले नाही व चुपचाप त्यांच्याकडे पाहत उभा राहीलो, त्यांनी इंटरकॊम वर कंपनीचे जीएम शी बोलणी केली व त्यांना आपल्या रुम वर बोलावले, ते आल्यावर म्हणाले " वर्मा जी, देखो मै नही कहता था मेरा बेटा उं ही कीसी को मेरे यहा काम के लिए नही भेजेगा व तो हीरा है तथा अपने साथ हीरे ही रखता है, देखो ईसे आप कहते थे की यह २८०००.०० मे बिक जायेगा, यह मेरे सामने खडा है आप के २८०००.०० की पेशकश बता रहा है" व पुन्हा हसू लागले व वर्माजी माझ्या कडे पाहत म्हणाले, " बेटे, १२ साल की नोकरी में मैंने पहली बार धोका खाया आदमी पहचानने में, माफ करना कल जो तुम्हारे साथ घटा व सब मेरी तथा इंन्ही की प्लानिंग थी." अरे बाप रे, मी तर चक्क परवानगी न घेताच एका खुर्चीवर मटकन बसलो व आपला चेहरा झाकून घेतला व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पाहू वर्माजी तथा मालिक दोघे गडबडले व म्हणाले" अरे राज बेटा, क्या बात है क्या हुंवा, कोई बात चुभी क्या तुम्हे ? अगर हां तो माफ कर ना भाई." मी म्हणालो " सर नहीं, यह बात नही हैं, आपने जो कीया तथा बताया यह एक मालिक कर के आप का फर्ज था, आपको अपने कंपनी मी सिर्फ अच्छे लोग ही चाहींए, पर मेरे आखोंमे आसू मेरे घरवालों की याद की वजह से आये, शायद मैंने ही उन्हे समजने मे देरी की लेकीन जो बात आपको मैंने बतायी उसके पिच्छे मेरी प्रेरणा मेरे संस्कार ही थे जो बचप्पन में मुझे अपने घर से मिले थे.. उसी के वजह से मेरे आखं हर आयी मुझे माफ कर ना सर. " "अरे राज, कोई बात नाही, लेकिन सच्ची बात बता ने का तुम्हे भी तो फायदा है ... वर्माची इस को पक्का कर लो तथा इसकी पगार आज से ३०००.०० रू. बढां दो "
वर्माजीं माझ्या कडे हसत म्हणाले "तो राज, आज पार्टी होगी तुम्हारे तरफ से हा.... हा हा..." मी देखील हसत हो म्हणालो पण मालिक म्हणाले " अरे छोडॊ, आज सबका दोपहर का लंच कंपनी खाते से, बाद में राज से पार्टी लेना वर्माजी" मी हसलो व म्हणालो "सर कोई बात नही लेकीन आप का ट्टीफन का क्या हो ?" व हसत बाहेर आलो. आपल्या केबीन मध्ये जाऊन सर्वात प्रथम देवाचे आभार मानले व म्हणालो " अरे देवा, असेच मला पापातून नेहमी वाचवत राहा रे, गणेशा"

क्रमश

माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...

परत चारींजीच्या जवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, व नवीन मार्ग शोधावा ह्या साठी मी प्रयत्न करु लागलो..राहण्याची सोय प्रथम केली व लगेच नेहरु प्लेस गाठले व नेहरु प्लेस मध्ये कमीत कमी ३००च्या वर संगणक दुकाने होती (आहेत व आज जास्त संख्या असेल)
दोन चार जणांशी बोलणी केली व एक छानशी नोकरी पकडली... महीना ३५०० वर पण हे पैसे पुरेसे नव्हते त्यासाठी लगेच थोडी धावपळ केली व संध्याकाळ साठी काम शोधले व तेथे ३०००.०० वर काम पक्के केले.. सकाळी ८.३० ते ५.० पर्यंत एका दुकानात व ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत एका दुकानात असे दोन शिफ्ट मध्ये काम पकडले... सगळं कसे मना प्रमाणे चालू होते, चार महीने एकदम व्यवस्थीत गेले व तेथे खुप काही शिकण्यासाठी देखील भेटले व मी आनंदात असतो तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती कोल्हापूरची. मला कोल्हापूर सोडून खुप काळ झाला होता... एकदा मनाचा ठीय्या करुन जवळच्या नातेवाईकांना फोन करावा व आई व वडीलांची खबर घ्यावी व माझी माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी हा विचार सारखा सारखा मनामध्ये डोकावू लागलाच होता तेव्हा फोन बुथ वर गेलो व नंबर फिरवला... पण नशीब अजून कच्चेच होते ... फोन बंद झाला होता. प्रचंड निराशा मनामध्ये घेऊन रुम वर आलो, तो पर्यंत नवीन नावाचा एक त्या गल्ली मधील मुलगा माझी वाट पाहतच उभा होता.. माझ्या जवळ येऊन त्याने मला आपल्या संगणकामध्ये आलेली अडचण सांगितली व मला घरी घेऊन गेला चांगलाच श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता तो.

काही वेळ संगणकाशी घालवल्यावर मी त्या संगणकातील अडचण दुर करुन त्याला दिली व त्याच्या कडून मोबदला घेतला, पण नवीन ने मला संगणक दुरुस्त झालेल्या आनंदामुळे बाहेर जेवणासाठी घेऊन गेला जेव्हा आम्ही परत आलो तो पर्यंत त्याचे वडील घरी परत आले होते त्यांनी माझी थोडीफार माहीती विचारली व आत निघून गेले, दोन एक दिवसांनी तोच नवीन मला बोलवण्यासाठी रवीवारी माझ्या रुम वर आला व आपल्या वडीलांकडे घेऊन गेला, त्यांनी आपल्या कंपनी मध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली व पगार तथा सुविधा दोन्ही बद्दल मला माहीती दिली, मी एक तारखे नंतर कंपनीसंगे काम करेन असे त्यांना सागून परत आपल्या रुम वर आलो, नेहरु प्लेस मध्ये जेथे काम करत होतो तेथे सुचना दिली व पगार तथा बाकी हिशोब पुर्ण केला.

दिल्ली पासून ३० एक कि.मी. वर गुडगांव मध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मला घेऊन गेले व काम तथा राहण्याची सुविधा दाखवली, तेथे १० एक संगणक व काही प्रिंन्टर होते व महाजालाची जोडणी व कार्यालयाच्या वरच मला राहण्याची सुविधा केली होती तेथे एक कपाट एक गादी व एक चादर ह्या वस्तू. लाईट ही असून नसल्यासारखी व भिंतीचा रंग येथे तेथे उडालेला व जागो जागी खड्डे तश्यात भरीस भर खिडकीला दरवाजाच नव्हता... पण जे मुफ्त मध्ये मिळाले ते काय वाईट असे ठरवून आपले सामान ठेवले. जेवणाची सोय विचारली तेव्हा मात्र माझी विकेट उडाली.. ते म्हणाले समोरच स्वयंपाक घर आहे तेथे सर्व सामान आहे व जे नसेल ते तु पाहा जेवण तुझे तुलाच करावे लागेल कारण कंपनीच्या आसपास कोठेही जेवणावळ / ढाबा नाही आहे..पुढे ४-५ किंमींवर धाबा आहे पण जाण्यायेण्याचा वेळ व खर्च पाहता तु येथेच जेवण तयार कर.

दिवसभर मला सुट्टीच दिली होती व सकाळ पासून मी उपाशीच फिरत होतो तेव्हा स्वयंपाक घरात जाऊन मी काय काय आहे ते पाहून घेतले सर्व सामान होते पण खुप मोठा प्रश्न होता जेवण तयार कसे करावे ? कारण मला जेवण तयार करताच येत नव्हते व कधी प्रयोग देखील केला नव्हता. तरी देखील प्रयोग करावा ह्या विचाराने मी तांदुळ निवड्ले व चुल पेटवली पाण्याचा अंदाज घ्यावा असे कुठे कुठे तरी मी जो स्वयंपाक करतो त्याच्या तोंडून कानावर पडले होतेच पण पाण्याचा अंदाज घेणे म्हणजे काय हेच माहीत नव्हते तरी देखील प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पाणी घातले व तादूळ घातले व त्यावर झाकण ठेवले व मी भात तयार होण्याची वाट पाहू लागलो, थोड्या वेळाने थोडा फार करपल्याचा वास आल्या आल्या मी पळत जाऊन आपला भात पाहीला सर्व बाजूने काळा पडलेला पण थोडाफार मध्ये चांगल्या (अर्ध कच्च्या अवस्थेत) अवस्थेत भात दिसला. तोच भात ताटामध्ये वाढून घेतला व थोडे लाल चटणी व तेथे मिक्स करुन माझ्या हाताचे पहील्याच जेवणाचा चव मी चाखला... आळणी मीठच घातले नव्हते तरी देखील तसेच वरुन मीठ टाकून मी आपले जेवण सुरु ठेवले कधी कच्चे / कधी जळलेले असे लाल चटणी / मीठ /तेल व भात असे विचित्रच नवीन डीश मी तयार केली... व जवळ जवळ एक महिना मी रोज एक विचित्र भात तयार करत असे व व रोज नवीन डीश जेवताना अनुभवत असे ह्या मध्ये ही मला खुप आनंद मिळायचा... पण प्रयोग करता करता महिन्यानंतर एकदा माझा भात नेहमीच्या भाताप्रमाणे तयार झालाच. भात शिकलोच होतो आता बारी होती आमटी अथवा भाजीची... आमटी व भाजी अर जे जे अत्याचार मी केले तेथे लिहणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते तेव्हा तो विषय सोडुनच देऊ. प्रचंड महनतीने भाजी शिकलो व चपाती करण्याचा अचाट प्रयोग चालू केला कधी रशिया तर कधी अमेरिका तर कधी कधी माझे आवडते कोल्हापुर अश्या आकाराच्या मी चपात्या ? तयार करु लागलो व जेवतानाच त्यांचा आकार पाहून स्वत:वरच हसत असे.

ह्या कंपनी मध्ये राहून मी जेवण करणे तर शिकलोच पण कसे जगावे हे देखील शिकलो ... आनंदाने जिवनातील प्रत्येक क्षण अनुभवत मी आपले जिवन गाडी ओढतच होतो व वेळ मिळेल तसे तसे घरी फोन करण्याचा प्रयत्न चालुच केला होता पण नंबर बदलल्यामुळे कुठेच कसलाही संपर्क होऊ शकला नव्हता.... प्रत्येक दिवस आनंदाने संपत असे पण रात्री वेळ काढणे जिवावर येत असे कारण ह्याच्या आधी मी लोकांच्या मध्येच राहत असे पण हा कारखाना संध्याकाळ नंतर जवळ जवळ मृत समान असे व अश्या वेळी मनामध्ये घराचे विचार, मित्र मंडळी, कोल्हापुर, पन्हाळा चे विचार भरकटत असत व प्रचंड मानसीक त्रास होऊ लागला व ह्या वर मला उपाय ही सापडला.. बियरचा रोज एक बियर व रात्रीची आरामाची झोप ना घराचा विचार ना स्वत:चा विचार फक्त जगत जाणे हा विचार डोक्यात....

माझी सफर... निर्णय भाग - ९

पोर्ट ब्लेयर च्या विमानतळावर कंपनीचा एक सदस्य मला घेण्यासाठी आलाच होता. थोड्या वेळाने मी कार्यालयात पोहचलो व तेथे जाऊन श्री अनुज पाटलांची भेट घेतली व काही कागद पत्रे त्यांच्या हाती सोपवली व त्यांना राहण्याच्या सोयी बद्दल विचारणा केली, त्यांनी देखील सर्व माहीती मला दिली व कार्यालयीन नियमांची तसेच येथे जे काम मला बघावयाचे आहे त्याची थोडीफार माहीती मला दिली जवळ जवळ अर्धा एक तास आम्ही बोलत होतो पण अनुज ह्यांच्या तोंडून एक ही मराठी शब्द बाहेर पडला नव्हता, तरी देखील मधून मधून त्यांना जाणिव करुन देण्यासाठी की मला मराठी येते मी काही प्रश्न मराठीतून विचारत असे, पण त्या महामानवाने एकाही प्रश्नाचे उत्तर मराठीतून दिले नाहीच. मी ही काही हरकत न घेता तेथून बाहेर आलो व पहिलाच दिवस असल्याने थोडे फार जवळची मार्केट एकाची सोबत घेऊन फिरुन आलो व जरुरी सामान विकत घेतले व संध्याकाळच्या वेळी कंपनीच्या गेस्ट रुम मध्ये पोहचलो. तर तेथे थोडाफार माहोल बद्दलेला दिसला व कंपनीचे अनुज सर, प्रदिप सर, गुप्ताजी, अविनाश असे चार-पाच जण माझी वाट पाहत बसले होते. माझी काळजीपुर्वक माहीती घेतली पण त्यांच्या बोलण्यातून मला थोडा वेगळेपणा वाट्त होता मी ती शंका माझ्याच वयाच्या अविनाश समोर बोलून दाखवली तेव्हा तो हसत म्हणाला " अरे राज सर, कुछ नही है सब ने थोडी थोडी लेनी चालू ही की है अभी वह देखो वहा टेबल पे.." माझी नजर तिकडे टेबलाजवळ गेली तर तेथे एकदम मैफिल जमली होती. सगळे आपले कार्यलयीन अधिकार / खुर्ची विसरुन एक दुस-याला दारु पाजत होते व त्यामध्ये कंपनीचा चपराशी देखील शामिल होता.. तिकडे जिंदल मध्ये मला असे कधीच काही दिसले अथवा कळाले नव्हते की कोण कोण दारु पितो ईत्यादी पण येथे पहिल्या दिवशीच पार्टी टाईम. काहीजणांच्या आग्रहानंतर मी आपला एक ग्लास घेऊन त्याच्या गप्पामध्ये शामिल झालो येथे माझा रुल मी लागू केला रुल एक. अनजान व्यक्ती समोर जास्त पिणे नाही व जास्त बोलणे नाही. रुल दोन. आपले डोळे व कान सतत उघडे ठेवणे. व ह्या रुलस चा मला नेहमीच फायदा होतो. सर्वजण एकदम मस्त पैकी मजा करत होते बोलण्यातूनच कळाले की कोण्याच्या तरी बायकोचा वाढदिवस आहे त्यामुळे ही पार्टी. हे सगळी पार्टीच भारतातील एक-एक प्रदेशातून आली होती कोणीच लोकल नव्हते, त्यामुळे भाषा व शिव्या ह्या माहीत असल्यामुळे काही जास्त विचित्र वाटत नव्हते, पण जेव्हा थोड्य़ा वेळाने अनुज सर माझ्या जवळ आले व मला बाजूला घेऊन माझ्या शी मराठीमध्ये बोलू लागले तेव्हा मात्र मला असे वाटले की मी महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकाच्यामध्ये आलो आहे, कमीत कमी ४ वर्षाच्या कालावधीनंतर मी मराठी प्रथमच बोलत होतो.. व मला नेहमीच्या वापरातील मराठी शब्दच सापडत नव्हते तेव्हा मात्र मी त्यांची क्षमा मागीतली व म्हणालो " सर जास्तच काळ येथे झाला व पंजाबी, हिंदी लोकांच्या सोबत बोलून बोलून स्वत:ची जन्म भाषा मात्र थोडीफार विसरलो आहे." त्यानी हसून उत्तर दिले " काही हरकत नाही, माझे देखील असे होते कधी कधी गावी गेल्यावर, वाईट वाटून घेऊ नकोस. बाकी मी कार्यालयात मराठी बोललो नाही ह्याचा राग तर नाही ना ? अरे आपल्या आसपास जी लोक काम करत आहेत त्याना वेगळे पण वाटू नये ह्या साठीच मी तुझ्याशी हिंदीतून बोलत होतो, मी जे म्हणतो आहे ते तु समजतो आहेस ना ? " मग ईतरची तीकडची बोलणी झाली व जेवण करुन ते परत आपल्या घरी. व मी आपल्या रुम वर परत आलो.

दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता, एखाद दुसरा संगणक चालू होत होता... चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो, बाकी सगळे १२ संगणक बंद. काहीचा OS तर काही़चा RAM, तर काही मध्ये Software खराब. पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले. सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [काही RAM, Prosessor, Motherbaord's] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली, मस्त पैकी झोपलो. दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता, ते म्हणाले, " राज, देखो सामान तो ५-६ दिन के बाद ही आयेगा, तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो, यह लिस्ट काम की" मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली, बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा, कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा, काही नळ खराब आहेत, काही गेट वर बेल नाही आहे.
सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले. बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले, येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला. अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले, माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले " राज माफ कर, अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन-तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही, पण पुढील वेळी मात्र मी स्वत: तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली." मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे. मी तेथून परत दिल्लीला आलो.

कंपनीमध्ये आल्या आल्या मला शिमला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले गेले तेव्हा मात्र मी भडकलोच . व सरळ जिंदल साहबांच्या समोर जाऊन नकार दिला व म्हणालो " बाबूजी, अभी कल ही तो आया हूं मै, मुझे यहा के भी तो काम देखने है, आते ही यहा मेरे लिऎ ढेरसारा काम पडा है तबभी मुझे आप शिमला भेज रहे हो," जिंदल साहेब एकदम आरामात मला म्हणाले " ठीक है तो मै चारी जी कॊ मना करता हूं की राज नही आयेगा, आप अपना काम खुद करे।" चारीजींचे नाव आल्या आल्याच मी जरा वरमलो व म्हणालो " चारीजीं ? वहा शिमला क्या कर रहे है?" तेव्हा जिदल साहेब म्हणाले," अरे वहा शिमला में चारीजी का तथा मै मिलके एक स्कुल चलाते है वहा कुछ नये पीसी लगाने है वहा तुम्हे जाना है।" मी ठीक आहे म्हणालो व एक नवीन प्रवासाची सुरवात पुन्हा चालू केली.

अंदमान हून आल्यानंतर मी एका आठवड्याच्या आतच शिमला मध्ये आलो होतो, थंडीची ती नुक्तीच सुरवात होती पण माहोल एकदम मस्त होता. जे चित्रपटामध्ये शिमला पाहिले होते त्या शिमला मध्ये मी स्वत: होतो व माझ्या नशिबावर मला जरा देखील विश्वास वाट नव्हता की कधी अंदमान तर कधी विमान प्रवास तर येथे मी स्वत: शिमला मध्ये ? जे माझे नेहमीचे काम होते ते मी चालू केले व दोन-चार दिवसामध्येच ज्या काही संगणकीय अडचणी होतो व जे नवे संगणक जोडायचे होते ते पुर्ण करुन मी चारीजींची परवानगी घेऊन शिमला फिरून आलो. रोज सकाळी पहाडावर चढून वर तास तास भर बसण्याची व निसर्गाच्या अदभूत करणीचा आनंद घेणे हा कार्यक्रमी चांगला चार दिवस चालवला, जिंदल साहबांच्या एका फोन ने परत मला दिल्ली मध्ये पोहचवले, पण तेथे ती पोहचण्य़ाआधीच माझ्या यशस्वी शिमला तथा अंदमान वारी मुळे माझ्या बद्दल त्यांना विश्वास वाटत होता की काय जाने मी पोहचण्याआधीच मला तेथून परत एकदा प्रवासासाठी पाठवण्याची तयारी जिंदल साहबांनी केली होती. मला पुण्याला जायचे होते पण काही कारणामुळे मला पुण्याच्या जागी विशाखापट्ट्णम ला जाण्याची तयारी करा असे सांगीतले गेले पण बीन-पगारी मला येथे ११ महिने झाली होती व हे पक्क केले की जो पर्यंत पगार ठरत नाही व त्यानूसार पगार भेटत नाही तो पर्यंत नो वर्क. काम बंद..

माझ्या ह्या काम बंद आंदोलनांची माहीती काही तासातच जिंदल साहबांच्या जवळ पोहचली, व मला बोलवणे आले, दिड तासाच्या वाद विवादातून काहीच बाहेर पडले नाही अथवा जिंदल साहबांनी बाहेर पडू दिले नाही व मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व त्यांच्या समोर बोलून दाखवून मी त्यांच्या रुम मधून बाहेर आलो, शर्माजींनी मला खंदा वीर असे म्हणून पाठीवर थाप मारली व म्हणाले " राज, जो काम में पिछले ९ साल में नही कर पाया वह तुमने कर दिखा या, जा बेटे जा यहा से अच्छा कुछ तेरे लिऎ भी होगा तभी तो भगवान यह चहाता है तु यहा ना रहे.. जा"

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...

माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8

" साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

दिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.
दुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले " राज, यह क्या ? तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये ?" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो " बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना ?, तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है ?" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय ?

मी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबांची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.

माझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है ?तुझे यहा खाना नही मिल रहा है ? रहना अच्छा नही है ? क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..
मी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.

दोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले " राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना"

सगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो " जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है ?" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या समोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.

शर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले " हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे." मी लगेच त्यांना म्हणालो " शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है"

पवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

प्रतापगड - एक सुरेख सफर

महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड... चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना ;) महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो ;) तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली :( व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.






जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !





गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.



मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.



तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!










मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.





















* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.