शनिवार, २२ नोव्हेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ६

बाबांनी हात मागे बांधले व उचलून खुंटीला टांगला व म्हणाले " राजा, बघ हे शेवटंच. सहा महीने राहीले आहेत व्यवस्थीत रहा. पळुन नको येऊ, त्यानंतर तुला पुन्हा कोल्हापुरातील शाळेत घालेन ठीक. तुझ्या नादी आमची मल खुप पळापळ होत आहे.." मी हो म्हणालो तेव्हा मला खाली ठेवला पुन्हा उचलुन.
पुन्हा घरला न जाता सरळ बाबांनी मला हॊस्टेल वर पोहचवला व अण्णाच्या तावडीत दिला अण्णा म्हणाले " तु मारणार नाही आता बस..."
कसे बसे मी व्यवस्थीत एक महीना काढला व ना कोणी मारलं ना... राग दाखवला... ! पण शिस्ती तर शिस्त होती.. सकाळी अण्णा दुस-या मुलाला उठवायला सागंत असे

दिवाळी सुट्टीला घरी घेऊन आले बाबा ! दिवाळी सुट्टी चांगलीच १५ दिवसाची होती... पुन्हा घरचे वातावरण भेटल्यावर परत हॊस्टेलला जाण्याची काय मनात इच्छा येत नव्हती ... पण बाबांचा मार विचारात घेऊन जाण्याची तयारी झाली पण काय झालं आठवत नाही पण कश्यावरुन तरी बीनसलं व मी घरातून निघून पंचगंगेच्या काठी जाऊन बसलो... ! दोन एक तासाने शोधा शोध चालू झाली... आजू बाजूचे काका.. मामा... घरमालंकाची मुल सगळीच मला शोधत फिरु लागली !

मी आपला मस्त मजेत शिवाजी फुल पार करुन... पार आंबेवाडी पर्यंत पोहचलो.. सायकल होतीच. जवळ.. आंबेवाडीतून सरळ... निगवेला आलो... व निगवेपासून ३ चार किलोमिटर वर एक गाव आहे.. तेथे आमच्या बाबांचे मित्रांचे घर होते... त्याच्या घरी मी खुपदा गेलो होतो.. व ते देखील रोज आमच्या घरी येत.. त्यामुळे मला नवीन नव्हते..घर त्यांचे.. !
जोतिबा डोंगराच्या पायथ्यालाच घर त्यांचे... ! मी घरात गेलो... प्रभात काका... घरी नव्हते... ते कोल्हापुरात. त्याची मुलगी मनिषा व काकी होती... गेलो... मस्त पैकी जेवलो व झोपलो...
त्यांनी विचारलंच नाही कसा आलो व का आलो त्यांना वाटले असावे की मी बाबाच्या बरोबर आलो आहे.. व बाबा.. काकांच्या बरोबर शेतात गेले असावेत !

चारच्या दरम्यान उठलो... व मनिषाला घेऊन सरळ जोतिबाच्या डोंगरावर... फिरायला.. मनिषा माझ्या पेक्षा वयाने जरा मोठी.. ! त्यामुळे ती पुढे व मी मागे हा असा प्रवास आम्ही चालू केला.. व चांगले दोन तास.. जंगलाचा मेवा शोधत फिरलो जे मिळाले करवंदे.... बोरं.. खिश्यात जमा करत खात.. संध्याकाळी सहाच्या दरम्यान खाली आलो !

रात्री आठच्या दरम्यान प्रभातकाकांचा घरी फोन आला व काकीला म्हणाले " राजा अजून घरी आला नाही आहे... पळाला बहूतेक पुन्हा... जरा घरी यायला वेळ होईल.." तेव्हा काकी म्हणाल्या " अगं बाई, हा लेकाचा तर येथेच आहे... मला वाटलं तुमच्या बरोबर आला आहे.." असं म्हणताच काकांनी फोन ठेवला व अर्धा तासात घरी पोहचले बाबांना घेऊन.
"अप्पा, मारुन काय फायदा नाय... ह्या पाठवूच नकोस पुन्हा हॊस्टेलला... येथेच घाल शाळेत कुठेतरी" इती काका.
बाबांच्या डोळ्यातून राग स्पष्टपणे दिसत होता. पण दुस-याच्या घरी आहे ह्याचे त्यांना भान होते म्हणून अजून मारला नव्हता... काकांनी ते ओळखले होते म्हणून रात्री काय घरी जाऊ दिले नाही व बाबांना जेवण करायला लावून मला झोपवले !

हॊस्टेलची सवय म्हणा अथवा काही ही.. मी चारच्या आसपास उठलो.. उगाच कोणाला त्रास नको म्हणून कोणाला न उठवता मी संडासला जाण्यासाठी हळूच बाहेर आलो.... पाण्याचा डबा शोधता शोधता जरा धडपडलो... तोच काकांना जाग आली व ते जवळ जवळ पळतच बाहेर आले व मला बकोटीला पकडले व म्हणाले " अरे मर्दा, पळून चालास व्हय ? " मी म्हणालो " नाही हो... मी तर..." पण मी अजून काही बोलणार तोच बाबांनी एक कानाखाली वाजवली व मला उचलून बैठकीच्या खोलीत घेऊन आले ह्या सगळ्या गडबडीत घरची सगळीच मंडळी जागी झाली व एक चांगलाच गोंधळ चालू झाला

काकीने मला एका बाजूला ओढले व बाबांना म्हणाली " असं, पोराला का गुरावानी मारताय !" बाबा म्हणाले " तुम्ही बाजूला व्हा.. ह्याचा पायच तोडतो पळतो कसा हे बघतो" त्यात मी पुन्हा म्हणालो " मी पळून...." तोच काका म्हणाले " अरे पोरां असं कसे करतोस... तु इकडे तीकडे पळतोस .. तुला शोधायला आम्ही पळतो.. जर का कुठ खरंच दुरवर गेलास तर तुला शोधणार कुठे ? " मला आता राग आला होता.... व संडास देखील जोरात आले होते... मी ओरडलो व म्हणालो " पळून चाललो नव्हतो... हॊस्टेलच्या सवयी मुळे जरा लवकर उठलो व संडासला चाललो होतो.. लई जोरात आलं आहे.. जाऊ द्या मला" हे एकुन मनिषा फिस्स करुन हसली व ती हसलेले बघून... काका व काकी हसू लागल्या... व मी बाबाना पहिल्यांदा दिलखुलास हसताना पाहीले... ! मी पळतच पडसाकडे गेलो व क्रियाकर्म करुन परत आलो..!

पण झालेल्या प्रकारामुळे... आमच्या घरात एक बैठक बसली व त्यात आईने निक्षुन सांगितले की राजाला हॊस्टेलला पाठवायचं नाही... बाजूचे घाटगेकाका पण मध्येच बोलले..एकुलता एक दिवटा हरवला तर काय करनार ?... शेवटी बाबा म्हणाले.. मी शाळेत विचारतो.. जर साध्य झाले तर घरीच अभ्यास करुन परिक्षा देईल हा.. नाही तर दुसरा उपाय आहे माझ्याकडे !

जसा शाळेचा नियम होता त्या प्रमाणे मला शाळेत येऊनच अभ्यास करावयाचा होता व बाहेरुन परिक्षा हा प्रकार तेथे नव्हता
पुन्हा माझा गणपती उचलून बाहूबली हॊस्टेल मध्ये ठेवण्यात आला.... आईला काळजी लागली होती की हा पुन्हा पळाला व गावला नाही तर काय ?

क्रमश:

रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

युवाअड्डा.कॉम !

युवा अड्डा !

आम्ही एक नवीन संकेतस्थळ चालू केले आहे, युवाअड्डा.कॉम !


युवा अड्डा काय आहे ?
युवक / युवतींच्यासाठी , तरुणांसाठी (व मनाने तरुण लोकांसाठी) एक माहीती केंन्द्र म्हणुन ह्या संकेतस्थळाची सुरवात केली आहे !
सध्या संकेतस्थळावर इंग्रजी / हिंदी भाषाचा वापर होत आहे, पण लवकरच अजून आठ भाषामध्ये संकेतस्थळ वापरता येऊ शकेल !
युवाअड्डावर आम्ही छायाचित्र संग्रह, गाणी (एमपी३) चा संग्रह करण्याची सुविधा दिली आहे ! तुम्ही येथे प्लिकर प्रमाणे फोटो अपलोड करु शकता ! येथे पिडीएफ फाईल अपलोड / डाऊनलोड करण्याची सुविधा दिलेली आहे, मोबाईल / लॅपटॉप / संगणक ह्याच्या विषयी माहीती व नवीन आलेल्या उत्पादांच्या बद्दल सचित्र व योग्य मुल्यापन केलेली माहीती व कुठे व कसे विकत घ्यावे ह्या बद्द्ल सुचना देखील उपलब्ध आहे !
नवीन प्रसिध्द झालेल्या चित्रपटांबद्दल परिक्षणे व त्यांच्या शोचे टायमीग देखील युवा अड्डावर उपलब्ध केले आहे !
सरसकट बातम्यांचा ओघ न करता महत्वाच्याच बातम्या येथे प्रकाशीत केल्या जातात ! तेव्हा तुम्हाला ताज्या बातम्या लगेच भेटलीत , शेयर मार्केट साठी देखील वेगळा विभाग केला आहे ज्यामध्ये तुम्हाला शेयरचे भाव / तेलाचे भाव व सोन्याचे भाव तत्काल उपलब्ध होतात ! खेळ विभाग देखील आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळा बद्दल बातम्या व क्रिकेटचे थेटप्रेक्षपण ( दुस-या संकेतस्थळाच्या मदतीने) उपलब्ध आहे ! तसेच ऑनलाईन गेमची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे !

लवकरच, अजून काही नवीन विभाग चालू करण्याचा मानस आहे त्यामध्ये पर्यटन / फॅशन /कार / बाईक्स विभाग व सॉफ्टवेयर डाऊनलोड विभाग असतील !

अजून काही सल्ले / माहीती / संकेतस्थळावरील चुका ह्या बद्दल काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही मला येथे सुचवू शकता !

धन्यवाद !
युवाअड्डा.कॉम !

ती व मी !

***
अशीच एक सुस्त संध्याकाळ होती व अचानक माझा फोन वाजला !
अनोळखी नंबर होता, पण आला महाराष्ट्रातुनच होता, दोन एक क्षण विचार करुन मी फोन उचलला !
समोरुन हॆलो झाले व मी लगेच म्हणालो " बोल, कशी आहेस !"
ती. " अरे तुला कसं कळाले की मीच आहे ते ?"
मी " ह्म्म ! अजून स्मरणशक्ती चांगली आहे माझी, व तुझा आवाज तर माझ्या... ते राहू दे कशी आहेस"
ती " माझा आवाज तर तुझ्या ?? पुढे"
मी " राहु दे तुला माहीत आहे काय... हजार वेळा एकले असशील माझ्या कडून तु"
ती "ठीक, मी एकदम मजेत आहे तु कसा आहेस"
मी " मी ! एकदम मजेत तुला माहीतच आहे.. नावातच राज आहे.. तर ! मी नावाप्रमाणेच राजा माणूस काय"
ती " हुं ! खुप बोलायला ही शिकला आहेस"
मी " ह्या जगात राहून हेच तर एक शिकलो आहे"
ती " म्हणजे?"
मी " तुला नाही कळायचं ! ते सोड, तु सांग काय चालू आहे"
ती " काही नाही... सगळं व्यवस्थीत चालू आहे, तुला माहीत आहे मी किती वर्षानंतर तुझ्याशी बोलत आहे ते ?"
मी " तु वर्ष विचारत आहेस ? मी तुला वर्षे, महीने, दिवस व तास देखील सांगू शकतो.. "
ती " म्हणजे तु विसरला नाहीस अजून तर "
मी " छे ! विसरलो कधीचाच आहे.."
ती " हो दिसत चांगलच विसरला आहेस.. माझा आवाज ओळखलास तेव्हाच कळाले होते "
मी " ह्म्म ! मुलंबाळ काय करत आहेत सध्या ?"
ती "एक मुलगा आहे तो.. अजून शाळेत जातो.. आता नववी मध्ये आहे.... तु नाही लग्न केलसं"
मी " हा हा हा ! मस्त जोक आहे ! एक भेटली होती... लग्न ही केलं असतं.. पण दैवाला मंजुर नव्हतं"
ती " राज, तो जोक नव्हता... तुला एकदम मनानं विचारलेला प्रश्न देखील जोक वाटला ? "
मी " काही गोष्टी सुप्त अवस्थेत राहू देने चांगल असतं ! बरोबर ना"
ती " म्हणजे तु उत्तर देणार नाहीस तर"
मी " तसं काही नाही आहे.. पैशाच्या मागे पळता पळता आपलं घर कधी मागं राहीले हे कळालंच नाही, जेव्हा कळालं तेव्हा खुप उशीर झाला होता"
ती " असं कोड्यात नको रे बोलू , तुला माहीत आहे मला काहीच कळत नाही"
मी " चांगलं आहे.. काही गोष्टी नकळालेल्या चांगल्या "
ती " काय करतोस सध्या "
मी " तुला जेव्हा मी पहीले प्रेमपत्र दिले होते तेव्हा त्यात एक ओळ होती... माझ्या वर विश्वास ठेव.. तुला कोठेच काहीही कमी पडू देणार नाही जिवनामध्ये.. जिद्द आहे माझ्या अंगात एकदा गोष्ट मनावर घेतली तर ती मी पुर्ण करतोच... आठवतं तुला ? "
ती " हो.. खुप दिवस माझ्या जवळ होतं ते पत्र ! एके दिवशी तुझ्या वरील रागाने मी ते जाळलं होतं"
मी " तो राग का आला होता आठवतं तुला "
ती " अंधुकसं ! मी सगळे विसरले आहे राज ! माझं लग्न झालं आहे "
मी " ओह ! माफ कर... तुला माहीत आहे तु व तुझा विषय म्हणजे मी कुठे थांबावे हेच विसरतो"
ती "हरकत नाही, तुझा स्वभाव मला माहीत आहे !"
मी " तुला तुझ्या मैत्रीणीने सांगितलेच असेल मी दिल्लीत असतो ते , बाकी एक छोटासा बिझनेस आहे , वर्षाकाठी.. दोन-एकदा फिरायला जातो, कधी कधी गाडी घेऊन मस्त पैकी हायवे वर फिरतो... हे माझं लाईफ !"
ती " लग्न का नाही केलंस"
मी "तुझी गाडी परत माझ्या लग्नावर का ?"
ती " तुझी काळजी वाटते आहे"
मी " जेव्हा गरज होती तेव्हा काळजी घेणारं कोणीच नव्हतं गं, एक एक सण, एक एक उत्सव मी कोणाची तरी वाट बघत घालवले.. कुणाच्या लग्नाला जाऊन देखील वर्षानु वर्ष झाली आहेत... खास मित्राच्या लग्नाला न जाता नंतर काही दिवसानंतर त्यांना गिफ्ट देतो.. हा हाल झाला आहे.. एकलंकोडा झालो होतो ! तेव्हा कोणीच नव्हतं जवळ काळजी घेणारं ! "
ती " राज, I am really Sorry ! जे काही घडलं त्यात माझा काहीच दोष नाही रे !"
मी " ये वेडी, मी तुला कधीच दोष दिला नाही व देणार ही नाही ... कमी पणा तर साला माझ्या नशीबात होता.. चल सोड ना ! "
ती " नाही रे, मला निर्णय घ्यायला घरच्यांनी वेळच नाही रे दिला"
मी " सोड ना यार.. चांगलीच वर्षे निघून गेली त्या गोष्टीला... एक गोष्ट सांग तु घरी आली आहेस का सध्या ? "
ती " हो, बाबांनी नवीन घर घेतलं आहे.. जुनं घर विकलं त्यांनी !"
मी " अरे रे ! माझ्या कडे असलेल्या अनेक आठवणी मधलं ते घर विकलं. चल ठीक आहे तुझ्या बाबांनी काही विचार करुनच विकलं असावे"
ती" राज, तुला आठवतं तु सकाळ सकाळी बाईक वरुन आमच्या घरा समोरुन फेर-या मारायचास ? "
मी " हा.. तो काळ जबरदस्त होता यार... एक विचारु "
ती " बोल"
मी " एकदा भेटु शकतो आपण ?"
ती " काय ? कधी ? "
मी " उद्याच ? "
ती " पण तु तर दिल्ली मध्ये मी येथे "
मी " पाच तासाच्या आत पोहचेन "
ती " पण... घरी येशील ?"
मी " हो, तुझ्या बापाला मी आता पुर्वी सारखा घाबरत नाही गं "
ती " राज, माझे वडील आहेत ते"
मी " ठिक आहे, तुझ्या वडीलांना"
ती " ठिक आहे ये भेटूच आपण"
मी " thanks "
ती " अरे हा नवीन शब्द कधी शिकलास तु.. "
मी " अरे चुकन बोललो.. नियम विसरलो होतो मी पण..."
ती " किती वाजतो पोहचशील तु"
मी " उद्या चार वाजु पर्यंत"
ती " ठीक आहे ये मग. उद्याच बसून बोलु "
मी " ठीक आहे"

फोन कट झाला !
बाय बाय करायची सवय तीला आधी पण नव्हती व आज देखील नाही ! सुधरणार नाही कधीच !
मी दुसरा फोन लावला yatra.com ला ! "मला आताच्या आता मुंबई जाणे आहे कुठली फ्लाईट उपलब्ध आहे ?"
यात्रावाला " सर, रात्री ९.४५ ची आहे , जेटची"
मी " बुक कर ! "
यात्रावाला " सर फेयर चार्जेस "
मी " हरकत नाही जो रेट आहे काहीच हरकत नाही.. जरुरी आहे जानं"
यात्रावाला " कार्ड नंबर सर"

टिकीट तर मीळालेच .. प्रिंन्टं काढून हाती तयार.. कपडे काय घालू ? दोन भर ना बॆंग जो हाती येईल तो भर.. नंतर हॊटेल मध्ये बदलू !
"अंकल कुठ चालला गडबडीत ?"
च्या मायला हा कोण माझ्या घरी येऊन मला अंकल म्हणतो आहे ?
मी मागे वळालो व पाहून दचकलोच !

**********************

एक अनोळखी मुलगा माझ्या घरात... तेरेस वर माझ्या समोर उभा होता....
एक १०-११ वर्षाच्या लहान मुलगा हस माझ्या कडे पाहत उभा होता मी आठवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ओळखीचा वाटलाच नाही.
मी " कोण है बेटा.. कहा से"
तो " काका मी अवधुत "

च्यामायला हा मराठी पण बोलतो !

मी "अवधुत ?"
तो " काका असे काय करताय मी तुमचा छकुला.. फोन व किती बोलता माझ्याशी"
मी " अरे छकुल्या तु ? येथे कसा काय आलास रे , घरातून पळुन तर आला नाहीस ना ? कोणाबरोबर आला आहेस ?"
तो " काका, असे काय करताय तुम्हीच तर बोलवलं होतो मम्मी पप्पा व मला .. दिल्ली दाखवतो म्हणून"
मी " अरे देवा, तुझी मम्मी पण येथेच आली आहे काय ?"
तो " हो खाली अंगणात बसली आहे पप्पा बरोबर.. तुम्हाला शोधून शोधून दमलो मी "
मी " अरे माझ्या बाळा.. मी विसलोच होतो रे तुम्ही येणार आहात ते , चल खाली चल !"
तो " ह्म्म्म, माझे चॉकलेट ? "
मी " अरे हा चल देतो"

त्याला चॉकलेट देऊन मी त्याच्या बरोबर बाहेर आलो तर लॉन मध्ये मनिषा व विवेक बसले होते !
मला पाहताच मनिषा पळतच आली व पाया पडत म्हणाली " दादा कधी पासून फोन वाजवतो आहे कुठ होतास "
मी "अगं पाया काय पडतेस... मी अजून म्हातारा झालो नाही बाई... बरं झालं आजूबाजुला कोणी पाहणारं नाही.. ... मी वर टेरेस वर बसलो होतो "
ती " तुझी सवय अजून गेली नाही.. संध्याकाळी नेहमी टेरेस वर जातोस काय करतोस रे वर टेरेस वर "
मी " एकटा खाली बसून काय करु म्हणून वर बसतो.. आजूबाजुच्या टेरेसवर जवळपासची लहान मुलं खेळतात च्या खेळ बघत बसतो"
ती "असं ! माझ्या लग्ना नंतर तु आज भेटतो आहेस आम्हाला "
तो पर्यंत विवेक ही जवळ येऊन बसला होता.. नमस्कार करुन म्हणाला " राज, तुम्हाला भेटण्याचा योग आज आला गेली पंधरा वर्ष आपण फोनवरच बोलतो आहे..."
मी " अरे हो यार.. हा बघ ना छकुला रोज बोलतो माझ्याशी पण मी हा कधी विचारच केला नाही की हा कधी समोर आला तर ओळखेन कसा .. विश्वासच बसत नाही मनिषाच लग्न होऊन १५ वर्षे झाली... शाळेतील दोस्ती.. आमची कुठल्या कुठं नातं जुळलं !... काय म्हणत आहे.. तुमचं विजयवाडा ?"
तो " छान आहे.. तुम्ही देखील या कधी तरी"
मनिषा पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली " म्हणजे अजून तु मला मैत्रीणच मानतोस..."
मी " अगं तसं नव्हे ! तु तर माझी सख्खी बहीणीच !"
ती " विवेक म्हणाला होता की राज ने दिल्लीला बोलवलं आहे आधी मला विश्वासच नाही बसला.. पण हा टिकीट घेऊन आला तेव्हा खुप आनंद झाला..."

तोच छकुला बोलला " मम्मी, काका कुठे तरी बाहेर चालले आहेत कपडे पॅक करत होते "
मी " अरे, नाही असंच कपडे भरुन ठेवतं होतो.. बँगे मध्ये.. "
ती " कुठ चालला आहेस ? काही काम आहे का जरुरी ? "
मी " अगं काही नाही.. असंच कपडे पॅक करत होतो"
मी "चल आत चला... फ्रेश व्हा !"
ती " तुझा गडी कुठे गेला "
मी " पळुन गेला आहे.. येईल दोन एक दिवसामध्ये.. त्याला पण महीन्या दोन महीन्यातून पळण्याची सवय आहे"
ती " मग जेवण कोण तयार करतोय ? तु ? "
मी " होय... मी तयार केलं असतं तर तुला येथे भेटलो असतो का ? सरळ हॉस्पिटल मध्ये नाही का आली असतीस भेटायला"
ती " म्हणजे हॉटेलचे जेवण चालू आहे तर... चल ह्या आठवड्यात तु माझ्या हातचंच खा ! "
मी " अरे वा ! म्हणजे आमची आठवडाभर दिवाळी तर "

मी " अरे विवेक, काय घेणार तु ? "
तो " मी , मी नाही घेत हो.."
मी " अरे मी आहे ना... हिला नको घाबरुस तु"
तो " मग बियर घेईन"
मी " हा हा हा.... चल वर तेरेस वर.. फ्रेश होऊन ये बसू.. खुप बोलायचं देखील आहे यार"
ती " दादा, कश्याला उगाच त्या पेक्षा मी मस्त पैकी ज्युस तयार करते ते पी.. बीयर पीण्यापेक्षा "
तो " जे काम कर... तु ज्युसच तयार कर "
मी " अरे, लगेच सुधरलास की बायको म्हणाली व तु नंदीबैला सारखा मान डोलवलीस "
तो " तसे नव्हे काका.. आपण कॉकटेल करु "
मी " बढिया "
ती " तुम्ही पुरुष लोक ना कधीच नाही सुधरणार.. "
मी "चल, जा बाळ तयारी कर लवकर .. व मस्त पैकी देशी जेवण तयार कर... जे सामान नाही आहे.. ते मला सांग दुकानदार येथेच देऊन जाईल "
ती " ठीक आहे.. "

तासाभरामध्ये आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो व मी एक चपातीचा तुकडा मोडलाच होता... तोच फोन वाजला.. मी उठ्णार तोच मनिषा म्हणाली "एक मिनिट , मी बघते कोण आहे.. जेवताना उठू नकोस "

ती " कोण "
समोरुन " मॅम, सर का फ्लाईट टाईम ९:४५ है.. ३५ मिहै..बाकी है.. सर पोहचे नही है एयर पोर्ट पे "
ती " किस के नाम पे है तिकीट "
समोरुन "मीस्टर राज जैन ! "
ती " ठिक है.. पोहच जायेंगे ! "
फोन ठेऊन परत आली व म्हणाली " दादा, तु टिकीट बुक केले आहेस , तुझ्या फ्लाईटचा टाईम झाला आहे त्यांचाच फोन आला होता "
मी " अरे, राहू दे.. मी प्लान रद्द केला आहे .. चल जेऊन घे "
ती " पण तु आताच कुठे चला होतास रात्री... "
मी " कुठ नाही "
ती " काही लपवत तर नाही आहेस ना "
मी " अगं काही नाही.."
ती " दादा.."
मी " मनिषा... जेव आता "

पाच-दहा मिनिटामध्ये जेवण उरकलं व आम्ही वर टेरेस वर आलो !

ती " दादा, तुझा मोबाईल दे पाहू.. घरी फोन करते "
मी " खाली रुम मध्ये आहे बघ चार्जिंगला "

काही मिनिटे निघून गेली !

ती " दादा, तु तिला भेटायला जाणार होतास उद्या ? "
मी उडालोच... !
मी " तुला कोणी सांगितलं ? "
ती " खाली तीचाच फोन वाजत होता जेव्हा मी खाली गेले होते"
मी " मग ? तु काय म्हणालीस "
ती " त्या सटवीला दिल्या चांगल्या चार ठेवणीतल्या कोल्हापुरी शिव्या .. व म्हणाले की पुन्हा फोन नको करुस"
मी कपाळाला हात मारुन घेतला व म्हणालो " ३० मिनिटामध्ये.. तु ही एकच ओळ बोललीस ? शक्यच नाही.. ! इतके वर्ष ज्या वेळेची तु वाट पाहत होतीस झालं ! समाधान झालं तुझं ! "
ती " जे काही हाल झाले तुझे हे सगळे तीच्यामुळे... तु अजून लग्न केलं नाहीस हे तीच्यामुळे... मग काय मी तीची आरती ओवाळू ? " असे म्हणत... ती रडू लागली..!
मी तीच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणालो.. " बाळ, दुस-याला कधीच दोष देऊ नये.. कर्म व त्याचे फळ आपलंच ! त्याचा उत्तराधिकारी कोणीच नाही.. चल तु तुझ्या मनातील बोललीस ना तीला.. तुझा राग गेला मनातून.. आता शांत हो.. ! "
ती " मला नाही जमत तुझ्या सारखं नेहमी शांत राहणं ... तीच्या बरोबर झालेल्या प्रेमाची गोष्ट देखील तु शांत पणेच सांगितलीस... तीच्या लग्नाची गोष्ट पण तु शांत पणेच सांगितलीस.. व विभाची..पण.. मला नाही रे जमत "
मी "नको काळजी करुस ! बस ! जे होत आहे ते होऊ दे ! आता तु तीला शिव्या दिल्यास, काही बोललीस म्हणून का मी तुला रागवेन ? नाही ना.. मग ! तीच्या आधीचा माझ्यावर हक्क तुझा बाळ... देन डॉन्ट वरी.. ! चुप बस आता... विवेक हिला घेऊन जा रुम मध्ये.... सकाळी बोलु आपण... "

ह्म्म! आता ?
पुढे काय ?
त्या बिचारीचा देखील काही दोष नाही.. ना मनिषाचा... !
तीला समजवावे लागेल.. नाहीतर कुठेतरी मनाला घाव लागेल !

************

मी " हलो !"
समोरुन " हलो, कोण ?"
मी "राज, राज जैन. आपण कोण ? "
तो "माणिक बोलतोय मी, राज"
मी "अरे माणिक.. कसा आहेस लेका ?"
तो " मी मजे में . तु कुठे आहेस .. कसा आहेस ?"
मी "अरे मी पण मजेत... दिल्लीतच आहे ! तुझ्या दिदीला फोन दे पाहू जरा"
तो "थांब हं.. देतो.. ( " दिदी.. राज को फोन छे.. रुममांसे उठाले").... राज.. एक मिनिट हं !"
ती " हलो,... राज !"
मी " माणिक फोन ठेव आता..."
तो " ठिक ठिक.."
मी " लेकाची अजून सवय नाही गेली तर "
ती " तुझी गेली ? "
मी " ते सोड.. काल रात्री मनिषा... तीच्या वतीने मी माफी मागतो.. रियली.. "
ती " राहु दे राज, पण खुप टिखट बोलली ती त्याचंच दुखः झालं "
मी " अरे मला माहीतच नव्हतं की तुझा फोन आला आहे.. मी टेरसवर होतो"
ती " पण तीचा हक्कच काय मला बोलायचा "
मी " हक्क ! तुला नाही कळायचं.. "
ती " का ? मला का नाही कळणार ?"
मी " काही नाती जपावी लागतात... ते तीला कळतं"
ती " म्हणजे, मला नाही कळत ? "
मी " मी असे नाही म्हणालो "
ती " मग ?"
मी " अरे ! ते सोड.. काय म्हणाली ती तुला ?"
ती " बापरे... किती तरी बोलली ! काही वेळ मलाच कळाले नाही काय म्हणाली ते"
मी " ह्म्म ठीक झालं नाही कळालं ते.. ती खास कोल्हापुरी भाषा आहे तुला नाही कळायची "
ती "अरे पण तीला झालं काय होतं ? ठीक आहे.. तुझ्या माझ्यात जे नातं आहे ते आपलं पर्सनल आहे ना त्यामध्ये ती कुठे आली ?"
मी " हे बघ, ती मला भाऊ मानते व मी तीला बहीण... तीच्या सुखः-दुखः मध्ये... मी जशी साथ दिली तशीच तीने देखील दिली"
ती " कुठे होती ती ? तु जेव्हा.. महाराष्ट्र सोडून भारतभर भटकत होतास तेव्हा कोठे होती ? मीच तुझ्याशी बोलत असे .. तुला धीर देत असे"
मी "अहमं !"
ती " अहमं ? म्हणजे ? "
मी " काही नाही... जशी तु संपर्कात होतीस तशीच ती देखील होती .. ती लग्न झालानंतर देखील संपर्कात होती व तू ?"
ती "तुला माझं सासरं माहीत आहे ना कसे आहे ते ! "
मी " तिचे सासरे.. देखील तुझ्या सार-यापेक्षा जास्तच कट्टर आहेत... सासू देखील खाष्ट आहे.. फोनला हात लावू देत नव्हते लग्नानंतर कित्येक महीने"
ती " तु मला हे का सांगतो आहेस ? "
मी " तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं ते"
ती " आपण पुन्हा भांडणार आहोत का ह्या विषयाला घेऊन ?"
मी " मला नाही वाटत की आपण भांडत आहोत.. पण नेहमी प्रमाणे तुझा आवाज चढत आहे.. बस इत्येकच "
ती "...... ठिक ! सोड हा विषय !"
मी " ठीक !"
ती " तु येणार होतास ? काय झालं "
मी " मनिषा जो पर्यंत येथे आहे तो पर्यंत तर नाही "
ती "राज, मी काही दिवसात परत जाणार आहे... मग माहीत नाही पुढे मागे भेट होईल की नाही ! "
मी " हो माहीत आहे... "
ती " तरी ही तू .. "
मी "एक स्पष्ट बोलू ? "
ती " बोल."
मी " आपल्या भेटीतून काय प्राप्त होईल ?... सरळ सरळ हे म्हणतो आहे.. आपण का भेटावे असे तुला वाटतं ?"
ती " तुला वाटतं आहे .."
मी " प्रथम इच्छा तु व्यक्त केली होतीस"
ती " म्हणजे सरळ सांग तुला नाही भेटायचं आहे ?"
मी "मी असे नाही म्हणालो.. पण एक उगाच डोक्यात आलेला प्रश्न तुला विचार ला का भेटायचं आहे ? "
ती " दोस्ती म्हणून.. एक मैत्रींच नातं म्हणून तरी भेटूच शकतो ना ?"
मी " देन... माझ्या जुन्या मित्रा... जरा तुला वाट पहावीच लागेल.. माझी बहीण लग्नानंतर प्रथमच माझ्या घरी आली आहे...."
ती " ठिक आहे.. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा भेट... फोन जरुर कर आधी !"
मी " ठिक"

*****
मनिषा "दादा, चहा देऊ का ?"
मी " ह्म्म, हा दे ! विवेक कुठ आहे ?"
ती " झोपलाय अजून.. तू तीलाच फोन केला होतास ना आता ?"
मी " हो यार.."
ती " तू.. कश्याला तीच्या मागे आहेस अजून.."
मी "तुला कोण म्हणालं की मी तीच्या मागे आहे म्हणून ? "
ती " मग हा फोन का ? तीला भेटण्याचं प्रयोजन काय ? कुठल्या नात्यानं भेटणार आहेस ? मित्र म्हणून ? शक्य आहे ते ? "
मी "माहीत नाही... पण कधी वेळ मिळालाचं तर.. तीला फोन करतच असतो मी ... काही तरी ईकडेचे तिकडचे बोलुन मोकळा होत होतो... पण तीच लग्न झाल्या पासुन बोललंच नव्हतो.. हा तीचा माझा दुसरा-तीसरा संपर्क असावा सध्याच्या दिवसातील बस.."
ती " पण ह्यात माझ्या प्रश्नांच उत्तर कुठे आहे.. "
मी " देईन.. योग्य वेळी देईन."

****
क्रमशः

अव्यक्त क्षण

****
परवा चूकन तुझ्या लग्नाचे फोटो फ्लिकर वर भेटले.. खुपच छान दिसत होतीस लग्नाच्या दिवशी... कुठेच अपसेट दिसली नाहिस हे पाहू खुप बरं वाटलं , हा त्या दिवशी माझा वाढदिवस होता शक्यतो तु विसरलीस... कित्येक वर्ष तु मला न चुकता शुभेच्छा देत होतीस न चुकता... .. पण त्या दिवशी तु विसरली... मी खुप वेळ वाट पाहीली होती तुझ्या फोनची.. पण तो फोन काही वाजलाच नाही.. असेच दिवस दिवस काढले पण तुझा फोन आला नाही.. एक दिवस दुसराच कोणी सांगून गेला की तुझं लग्न झालं म्हणून.. मी इतका वाईट ही नव्हतो गं.. तु मला स्वतःच सांगितले नाहीस.. लग्नाच्या दोन दिवस आधी तु माझ्याशी तास भर गप्पा मारल्यास... त्यावेळी तर सागायचे .. पण तुझं मन मला कधीच कळालंच नाही.. !

तुला आठवतो तो गज्या.. तु त्याला गजकर्ण म्हणायचीस.. फक्त तुला चिढवतो म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो होतो... व त्याने माझा हात मोडला होता.. त्या दिवशी पण तु अशीच .. काना डोळा करुन निघून गेली होतीस ... सर्वाच्या समोर... पण संध्याकाळी हॉस्पीटल मध्ये आली होतीस भेटायला..... जेव्हा त्या व्यक्तीने तुझ्या लग्नाची बातमी दिली .. तेव्हा कोठे तरी वाटलं होतं.. की दोन-एक दिवसामध्ये.. फोन करुन.. बोलली तर असतीस माझ्याशी.. पण तो फोन आलाच नाही कधी !

तुला आवडतो म्हणून निळा रंग वापरायचो... तुला आवडतो म्हणून पिच्चर पाहायचो.. फक्त तुला आवडते म्हनून मला कधीच नआवडलेली शेपुची भाजी आवडीने खायचो... पण तुला माझी आवड कधी कळलीच नाही... तु आपल्याच दुनिये मस्त राहीलीस... आपले रस्ते कधी वेगळे झाले हे तुलाच काय मला देखील कधी समजलेच नाही.. तुझ्यासाठी तुझ्या घरासमोरुन मारल्या जाणा-या चकरा कधी कमी झाल्या... कळत न कळत कधी बंद झाल्या हे तुला कळालेच नाही... दिवसातुन दहादा येणारा माझा फोन कधी येणं बंद झाला तुला कळालेच नाही...!! हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही... खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस ! तुझ्या मनात असलेली माझ्या बद्दलची भावना मला कधीच उमजली नाही... तुला माहीत होतं की मी वेडा आपले विचार कधी व्यवस्थीत व्यक्त करु शकणारच नाही तरी देखील तु एकदा ही विचारलं नाहीस !

गरब्याच्या रात्री.. तुझ्या कळत न कळत मी तुझ्या पाठीशीच असायचो ! तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू ... तोच मी तुझ्या समोर येऊन... तुला घरापर्यंत सोबत करायचो... आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच ! पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही ! छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं ... ! तुला आठवत असेल तु एकदा नापास झाली होतीस कुठल्याश्या तरी परिक्षेत... व तु रडून रडून डोळे लाल करुन बसली होतीस.. राम मंदिराच्या मागच्या बागेत.... त्यावेळी देखील तुला आधार देण्यासाठी मीच आलो होतो.. तुला कधी झोप लागली व तु माझ्या खांद्यावर विसावलीस हे तुला लक्षात देखील नसेल.. पण तुझे गालावर सुकलेले अश्रु पाहू माझे पाणावलेले डोळे.. तुला कधी उमजलेच नसतील !

मी जेव्हा जेव्हा माझं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा... तु काही ना काही कारण सागून तेथून निघून जात असे... पण जेव्हा तु स्वतः आपलं प्रेम व्यक्त केलं होतस तेव्हा तु विसरली होतीस... की मी तुझ्या पासून किती दुरावलो होतो.... ! तरी ही ... सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो... पण जसं जसे... तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो... ! आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला न बोलवता त्याला बोलवलंस तेव्हाच खरं तर ह्या कहानीचा अंत होणे गरजेचे होते पण मी वेडा... तुला पुन्हा पुन्हा माफ करत राहीलो .. व तु कधी पुन्हा येशील माझ्या कडे ही आशा करत बसलो !

****
खुप वर्षी झाली होती आपल्या अनाम नात्याला... शक्यतो तु मला विसरली देखील असशील पण मी अधीमधी तुझी माहीती शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत होतो... कधी काळी एकदोन चकरा देखील तुझ्या घरासमोरुन मारल्या.. एकदा तु दिसलीस ही.. मोठी वेणी बांधलेली मागे... गुजराती पध्दतीची ती सिल्कसाडी... गळ्यात मंगळसुत्र... कानातील सोन्याच्या रिंगा... हात देवपुजेचे साहित्य ... ह्म्म बरोबर एक लहान छकुलासा गोंडस मुलगा... असेल ३-४ वर्षाचा... तु आंबाबाईच्या मंदिरामध्ये.. आली होतीस... तु जेथे उभी होतीस त्याचा बरोबर मागे दगडी खांबाच्या मागेच मी उभा होता... तु एकदा पदर सावरायला मागे वळली होतीस... एक क्षण शक्यतो नजरेला नजर मिळाली असे वाटताच मी तेथून बाहेर पडलो... व बाजूच्या छोटेखानी मंदिरामध्ये घुसलो.. ! थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला! ह्म्म तो तुझा नवरा होता.. शक्यतो तुम्ही देवी दर्शनालाच आला होता... !

काही दिवसापुर्वीच तुझी मैत्रीण भेटली होती नेट वर चॅटींग मध्ये.. बोलता बोलता ओळख झाली व जुन्या आठ्वणी पुन्हा हिरव्या झाल्या... ! तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे... ! खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो... ! तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो! पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा ? राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी ? नकोच तुला भेटणे ! पण पुन्हा पुन्हा विचार डोक्यात येत गेले व मी त्या मैत्रीणीला हो भेटतो म्हणून सांगितले !

तुझ्या भेटण्याच्या विचारानेच अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात... कधी काळी हरवलेल्या वाटा... पुन्हा सापडतील ह्याची आशा देखील कधी केली नाही मी.. पण तो योग पुन्हा येत आहे.. माहीत नाही तु मला ओळखशील की नाही... म्हातारा जरी दिसत नसलो तरी मध्ये खुप मोठा काळ वाहून गेला आहे... ज्या काळ्या भोर केसांचा मला कधी काळ माज होता ते केस आता थोडे थोडे पांढरे झालेले आहेत... डोळ्यावर चष्मा चढला आहे.. व आज काल फ्रेंच कट दाढी देखील ठेवली आहे.. माहीत नाही तु ओळखशील की नाही... पण तु अजून तशीच दिसत असशील नाही... त्या तुझ्या पुढे पुढे करणा-या केसाच्या लटा.. आज देखिल हलकेच गालाला स्पर्श करत विसावल्या असतील.. तुझे ते टपोरे डोळे आज देखील तुझ्या मनातील सुख / दुखाचे भाव जसेच्या तसे प्रतिबिंबीत करत असतील... आज देखील देखील तु पहाटे पहाटे अंगणात रांगोळीचा सडा घालत असशील व चुकुन कोणी वेगाने गाडी घेऊन घरा समोरुन गेला तर बाहेर येऊन पाहत असशील की मी तर नाही... दिवस दिवस भर फोन वर गप्पा मारणे तुझ्या इतकं मला कधी जमलंच नाही... त्या तुझ्या मित्राच्या गाडीचे.. पैश्याचे... स्टाईलचे तु केलेलं कौतुक मला कधी जिव्हरी लागलं ह्याचा तु विचारच केला नाही व अचानक एक दिवस मी सोडून गेल्या वर मात्र फिर फिर भिंगरी सारखी गावभर मला शोधत फिरली होतीस .. तेच प्रेम .. तोच भाव आज देखील असेल का तुझ्या मनात ? अशी अनेक प्रश्न मनाच्या कोप-यात चरफडत आहेत... बोचत आहेत.. व कोठे ना कोठे मी संपत आहे !

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ५

दोन एक दिवसानंतर बाबांनी सुट्टी घेतली व म्हणाले " तयार हो, तुला सोडून येतो, परत पळून घरला येऊ नकोस समजले का ?" आईने कपडे भरलेच होते पिशवीत, खायला म्हणून लाडू व चिवडा करुन दिला होता, मी ते घेऊन गुमान बाबांच्या पाठी मागे चालू लागलो पण घरातून बाहेर पडताना आईला नजरेनेच सांगितले मी नाही राहणार तेथे.. पुन्हा पळून येणार.

दुपारच्या दरम्यान बाबा मला घेऊन अण्णाच्या खोलीत पोहचले व म्हणाले " अण्णा, हा लई वात्रट आहे, जरा ठीक ठाक वळण लावा ह्याला" अण्णा " मी काय बळण लावू ह्याला, ह्याला बघून अजून दोनचार पोरं पळून गेली मागच्या आठवड्यात, तुम्ही ह्याला घरीच घेऊन जा. तेथेच राहू दे." मी एकदम खुष झालो पण झालेली खुषी चेह-यावर दिसली व बाबांनी एकदम कान खेचले व म्हणाले " राजा, लेका तंगडचं तोडतो बघ तुझं... पुन्हा हसलास तर" अण्णाची समजुत घालून बाबा परत गेले व मी परत आपल्या हॉस्टेल मध्ये !

बाकीच्या पोरांच्यात माझं जरा नाव झालंच होतं.. चार-पाच वेळा पळुन गेलो होतो ह्याचंच त्याना नवल वाटत असे.. त्यामुळं बाकीची पोरं माझ्या बरोबरच फिरु लागली, अण्णाच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नव्हती, मग अण्णाने एक एक पोराला धमकीच्या सुरात समजवले की माझ्या नादी लागू नका.

सगळ व्यवस्थीत चालू होतं, पण मध्येच पुर्व परिक्षा झाली व नेहमी प्रमाणे मी पास झालो पण जरा मार्क कमी पडले व ३५% नेच पास झालो ! मग शाळेत वळ पडू पर्यंत मारला.... व संध्याकाळी अण्णाने धुतला व शेवटी घरी पत्र लिहिले व बरोबर माझे मार्कशीट पण पाठवले ! मी विचार केला बाबा येथे आले म्हणजे झालं.... सगळ्याच्या समोरच मार खाण्याची पाळी.. एक चुकीसाठी तीन तीन वेळा मार ? पळायची तयारी कर पुन्हा... तावडीत सापडलो तर मेलो.. हाच विचार करत रात्रभर जागून काढली व पहाटे पहाटेच बाहेर पडलो.. !

रात्री ३.३० / ४.०० च्या आसपास चा वेळ होता अण्णा अजून झोपलाच होता व मंदिर देखील शांत शांत दिसत होतं... ! मी हळुच खाली उतरलो व मेन रोडनेच चालत चालत.. गेटचा बाहेर आलो.. एक आजोबा बाहेर उभे होते... मला पाहून हसले व म्हणाले " सकाळ सकाळी फिरणे चांगली सवय आहे बाळा " मी " हो" म्हणालो व सरळ हातकलंगडेचा रस्त्ता पकडला
जरा वेगानेच मी जवळ जवळ अर्धा रस्ता पार केला... तो पर्यंत सुर्य उगवला होता म्हणजे अण्णाला माहीत झाले असनार की मी गायब आहे ! तेव्हा मी जरा आड रस्त्यानेच चालु लागलो व मेन सांगली हायवे वर दोन्-तीन तासात पोहचलो. चालता चालता विचार केलाच होता कुठ जायचे ह्याचा, जवळच जयसिंगपुर होतं व इचलकरंजी विरुध्द दिशेला पण दोन्ही पैकी एका बाजूला !
जयसिंगपुरला आत्या राहत होती.. व इचलकरंजीला माऊशी.. मी जयसिंगपुरला जाणे नक्की केले... कारण बाबाच्या स्वप्नात पण हा विचार येणार नाही की मी जयसिंगपुरला जाऊ शकतो !

कधी बैलगाडितून कधी... सायकलसवारी करुन.. कधी मध्ये.. ट्रक मधून प्रवास करत मी दहाच्या दरम्यान जयसिंगपुरला पोहचलो ! पण एक लोचा होता.. मी आत्याच्या गावी कधीच आलो नव्हतो.. त्यांनी मला बघितलं होतं पण मला त्यांच नावच आठवत नव्हतं.. फक्त दोन गोष्टी आठवल्या.. मगदुम मळा.. व कागवाडे अत्त्या !

मी फिरत फिरत मगदुम मळ्यात पोहचलो तर इन मीन तीन घरं ! मी विचार केला ह्यातलंच कुठली तरी एक घर .. नक्की ! मी सर्वात प्रथम येणा-या घरात घुसलो.. व विचारले " कागवाडे अत्या ?" आतुन एक बाई आली म्हणाली.. " कागवाडे ? इथं कोणीच नाही राहत, आम्ही पण नवीन आहोत.. मागे पाटिल बाईंना ईचार" मी पाटिल बाई कडे पोहचलो " काकु, कागवाडे अत्याचे घर ? " त्यांनि मला नखशिकांत पाहीले व म्हणाली " तु जेवढ्या वयाचा आहेस तेवढी वरिस झाली त्यांना मळा सोडून" मी टरकलोच .. तो च त्या म्हणाल्या " ते तर धरणगुत्तीला गेले आहेत राहायला कवाच" धरणगुत्ती नाव कानावर येताच सगळा उलगडा झाला.. मी म्हणालो " ठीक ठीक..." धरणगुत्तीची आत्या.. व जयसिंगपुरची अत्या जवळ जवळच राहत होत्या.. वे धरणगुत्तीची अत्या आमच्या अघरी नेहमी येत असे... ! व मी देखील सुट्टीला गेलो होतो त्याच्या मळात !

मळा ते सांगली हायवे कमीत कमी ३ किलोमिटर ! म्हणजे सहा किलोमिटरचा चक्कर... ! व जयसिंगपुर ते धरणगुत्ती ८ किलोमीटर ! तीन च्या आसपास मी धरणगुत्ती मळ्यात पोहचलो व शेतातल्या झोपडीत पोहचलो ! जवळ पास कोणी दिसतच नव्हतं.. धरणगुत्ती अजून दोन एक किलोमीटर .. पण हे आत्याचे शेत हे नक्की माहीत होतं... ! त्यामुळे मी बिन्धास्त होतो.. आत गेलो.. जेवण बांधून ठेवलेले होते.. मस्त पैकी जेवलो.. व ताणून दिली.. !

"राजा, तु कवा आलास रे" मी डोळे चोळत बघीतलं तर आजोबा समोर.. मी त्यांना मीठी मारली व म्हणालो.. " दुपारी" आजोबा " कुणा बरोबर आलास व कसा आलास ?" मी " पळून आलो, हॉस्टेल मधून... चालत आलो जयसिंगपुर पासून येथे पर्यंत" आजोबांनी कप्पाळाला हात लावला व मला सायकल वर बसवून गावाकडे निघाले व म्हणाले " लेका राजा... येवढ कसं काय रे चालास तु ? पाय दुखत हायत का नाय ? " मी म्हणालो " बाहुबली मध्ये.. कसरत करुन .. आता नाय दुखत पाय"
आजोबा म्हणाले " पण तु पळालासच का ?"

संध्याकाळ पर्यंत आम्ही घरी पोहचलो व दोन्ही अत्यांना माझा प्रताप व्यवस्थीत समजला... पण सकाळ ३.०० वाजल्यापासून.. दुपार पर्यत केलेल्या पायपीटीमुळे अथवा थकव्यामुळे मला रात्री जबरदस्त ताप चढला... ! रात्रभर अत्याने माझ्या डोक्यावर पाणाचा पट्ट्या लावून जागून काढली तेव्हा कुठे सकाळी जरा मला आराम आला... व मी निवांत झोपलो..

आजोबांनी गावातल्या एकाला आमच्या घरी पाठवले व घरी निरोप द्यायला सागितले..! दुस-या दिवशी सकाळ सकाळच्या बसने आई-बाबा व अक्का धरणगुत्तीला पोहचले तेव्हा मी बाजूच्या पोरा बरोबर कवडीचा खेळ खेळत बसलो होतो पाठीमागून रट्टा बसणार येवढ्यात अत्याने बाबांना थांबवले व मला बाजूला केले.. व म्हणाली " अण्णा, लहान आहे अजून.. परवा रात्री लई ताप पण हुता त्याला.. राहू दे मारु नकोस.. मी लई मारलय आधीच. पण पोरंग लई शहाणं हाय बघ.. आपल्या आत्येचा पत्तापण त्याला थाव हाय "
बाबा म्हणाले " पळाला म्हणून मारत नव्हतो.... पण पळून जाण्यासाठी जेवढं डोकं वापरतो तेवढं आभ्यासात का नाही वापरत."
आजोबा म्हणाले " एवढंच कार्ट... हाय पण जीव लई हाय ह्याच्या मंदी... खेळ हाय व्ह.. ह्या वयात... दहा -पंधरा मैल चालणं .. तरी बरं.. अप्पासो हा लेकाचा इकडंच आला... जरा कुठ अजून गेला असता तर ह्याला शोधायचा कुठ ?... "

आई बरोबर मी बसलो होतो, आई म्हणाली " तुला इकडे कसं यावसं वाटलं...इचलकरंजीला का नाही गेलास मग ?"
मी म्हणालो " मी इचलकरंजी आहे ते तात्यांनी तुम्हाला लगेच कळवले असते म्हणून ईकडे आलो"

क्रमश :

रविवार, २८ सप्टेंबर, २००८

जिवनामधील महत्त्वाचे घटक

आपल्या रोजच्याच वापरातील काही गोष्टींनी आपल्या जीवनावर ताबा मिळवलेला असतो पण आपण एकदम गाफील राहतो व एक दिवशी वापरातील एखाद्या गोष्टीने दगा दिला तर काय मनस्ताप होतो ते आपल्यालाच माहीत मी खाली काही माझ्या रोजच्या वापरातील महत्वाच्या घटकांची माहिती लिहिली आहे व मी विचार केला अरे खरंच ह्यातील एखाद्या गोष्टीने दगा दिलातर माझा संपूर्ण दिवसच अस्ताव्यस्त होतो... असेच काही घटक तुमच्या जीवनामध्ये देखील असतील त्याची माहिती द्या.



वीज: ह्यांच्या शिवाय जीवन..... नुसतीचं कल्पना करा, आहाकार माजेल. ही जर १ तास जरी गायब राहिली तर मला एका युगासारखे वाटते... ह्याच्या शिवाय जीवनाला काहीच अर्थ राहत नाही.

संगणक : ह्या ने मला जगण्यातला खरा आनंद दिला व खरंतर माझ्या पोटापाण्याची व्यवस्था केली. ह्याच्या शिवाय जीवन..

कल्पना नाही कसे असेल.

महाजाल : कोल्हापूर सारख्या एका लहान शहरातला बिघडलेला मुलगा कधी महाजालाच्या प्रेमात पडला हे कळलेच, ह्या महाजालाने काय नाही दिले, जगभरातील माहिती, विविध मित्र, संगीत व पैसा. सर्व काही एका टिचकी मध्ये सामावलेले.

युनिकोड : जेव्हा महाराष्ट्रापासून ८ वर्षे दूर राहिलो व मराठी वाचन करण्याची प्रचंड भूक आवाक्याबाहेर जाऊ लागली तेव्हाच २००१ च्या आसपास युनिकोड वापरलेली विविध संकेतस्थळामध्ये मराठी संकेतस्थळे ही गाजू लागली व मनोगत सारखे एक प्रचंड मोठे व सोयी युक्त संकेतस्थळामुळे मला येथे दूरवर बसून ही महाराष्ट्रातील मृद्गंधाचा आनंद घेता येऊ लागला, दिवसाची सुरवात मनोगतापासून व दिवसाची समाप्ती देखील मनोगतावरूनच.

आय-पॊड : संगीत, काही कळो ना कळो पण गाणे ऐकणे हा एकच धर्म मी नियमित पाळतो, पहील्या पहिल्यांदा रेडिओ व नंतर संगणकावर तासंतास गाणी वाजायची... पण काम करता करता, बाहेर फिरता फिरता संगीत माझ्या जवळ २४ तास राहील ह्याची काळजी ह्याच वस्तूने घेतली.

चारचाकी : गुरगांव सारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणाली नावाची वस्तू नसलेल्या शहरामध्ये चारचाकी किती महत्वाची आहे हे येथे आल्या शिवाय लक्षात येणार नाही, साधी भाजी आणण्यासाठी देखील ३-४ कि.मी. जेव्हा जावे लागते तेव्हाच कळते. ह्याच्या शिवाय गुरगांव मध्ये जगणे अशक्य.

दूरध्वनी : फिरता दूरध्वनी ... एकच शब्द आजच्या जगातील सर्वात महत्वाची व उपयोगी वस्तू. पण ही कधी कधी त्रासदायक देखील वाटते पण धरलं तर चावते व सोडले तर पळते अशीच गत. ह्याच्या शिवाय जीवनामध्ये अर्थच नाही. ह्याच्या मुळेच फिरता फिरता महाजाल पण आपल्यासंगे, जास्त नाही तरी ईपत्रे वैगेरा वाचता व उत्तरे पाठवता येतात हे काय कमी आहे.

दूरदर्शन (टी.वी.) चा रिमोट: ह्याचा उपयोग, सर्वांनाच माहीत आहे. ह्याच्या शिवाय करमणूक साध्य नाही..

गूगल सेवा : हा पठ्ठा कानामागून आला व तिखट झाला असा आहे, रोज काहींना काही नवीन सुविधा पुरवतच राहतो.गूगल शोध यंत्र माझे काम किती सोपे करतो हे शब्दात सांगणे कठीण. व गूगल अर्थ वर तर सगळे जग फिरून झाले अजून काय हवे ? :) जीमेल मुळे तर ईपत्र नष्ट करणेच विसरून गेलो आहे.


राज जैन

शनिवार, २७ सप्टेंबर, २००८

फाइनांशियल क्राइसिस 2008



जानेवारी ११,२००८
रिस्की लोन मध्ये पैसा बुडाल्यामुळे बँक ऑफ अमेरीका ने कन्ट्रीवाइड फायनान्सियल ला ४ बिलियन डॉलरची मदत दिली.

जानेवारी २०,२००८
यूबीएस ने अडकलेल्या कर्जाची किंमत ४ बिलियन डॉलर ने कमी केली व अश्याच पध्दतीने सबप्राईम कर्जा संबधी राईटडाउन्स वाढून १८.४ बिलियन डॉलर च्यावर वर गेले.

फेब्रुवारी १७,२००८
ब्रिटन ची बँक नॉर्दर्न रॉक पैशाची कमरतता भासू लागली म्हणून सरकार ने सरकारी केले.

मार्च १७,२००८
बेयर स्टर्न्स ला अमेरीकन इनवेस्टमेंट बँक जेमी मोर्गन चेज ने विकत घेतले प्रति शेयर २ डॉलर रेट ने !

जुलै १३,२००८
अमेरीकेतील रियल ईस्टेट मार्केटला वाचवण्यासाठी युएस फेडरल रिजर्व ने फेनी व फ्रेडी मेक ह्यांचे जवळ जवळ सर्व कार्य आपल्या हाती घेतले.

सप्टेंबर १५,२००८
९/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेन मार्केट मधी ७ वर्षातील सर्वात काळा दिवस . लीमैन ब्रदर्स दिवाळेखोर झाली व मैरिल लिन्च ला सरकारने मदतीने वाचवले व जगातील सर्वात मोठी इन्स्युरन्स कंपनी एआयजी अडचणीत सापडली.

सप्टेंबर १६,२००८
सरकारी बँकानी आर्थिक मंदी व क्राइसिस पासून वाचवण्यासाठी अरबों रुपये मार्केट मध्ये आणले, एआयजीचा शेयर ५०% डाऊन झाला तेव्हा अमेरिकन सरकारने एआयजीला ८५ बिलियन डॉलर ची मदत दिली व बार्कलेज बँकने लीमैन १.७५ बिलियन मध्ये विकत घेतले.

सप्टेंबर १७,२००८
गोल्डमैन सैक्स व मोर्गन स्टेन्ली चे शेयर खुप खाली आले व ब्रिटन ची लीयड टीएसबी ने राइवल एचबीओएस ला विकत घेतले व युएस सिक्योरिटीज & एक्सजेंज कमिशन ने शॉर्ट सेलिंग वर बंदी आणली. (ह्यामुळे भारतीय मार्केट संभाळले गेले नाहीतर त्याच आठवड्यात आपण ११००० च्या पण खाली गेलो असतो)

सप्टेंबर १९,२०,२१ २००८
अमेरिका सरकारने ७०० बिलियन पैसे ओतून मंदीच्या मारामध्ये सापडलेल्या कंपन्या विकत घेण्याची तयारी दर्शवली व त्यामुळे जगभरातील मार्केट मध्ये तेजी आली

सप्टेंबर २५, २००८
अमेरीकेचा सर्व मोठा बँक वॉशिंगटन म्युच्युअल बरबाद झाला व त्याची संपत्ती जेपी मोर्गन चेज ने १.९ बिलियन डॉलरला विकत घेतली.


माहीती स्त्रोत्र : इकानॉकिक्स टाइम

ह्यामुळे काय झालं ?

ह्यामुळे भारतीय शेयर बजार जो २१००० पॉइंन्ट होता जानेवारी मध्ये तो आज १३२०० वर आला आहे, मोठ मोठे शेयर आपल्या नेहमीच्या भावापेक्षा १५०-२०० रु खाली आले आहेत, आयसीआयसीआय बँक मागील दोन आठवड्यामध्ये ७३९ वरुन सरळ ५३२ पर्यंत गेला... मोठ मोठ्या बँका आपल्या कर्मचारी वर्गाना नोकरीवरुन कमी करत आहेत आजच एचएसबीसी व एचपीने आपले हजारो कर्मचारी नोकरीवरुन कमी केले ! लीमैन ब्रदर्स ब्रदर्समुळे भारतातील २५००० लोकांच्या नोकर्या गेल्या व तीतक्याच लोकांच्या नोक-या धोक्यात आहेत.

बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ४

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

मार मार मारला... एकदम बैलाला मारावा तसा... चागंले अर्धातास धुलाई झाली वर घरी पत्र पाठवा व आई-वडीलांना बोलवून घ्या असा आदेश ही भेटला !
दुस-या दिवशी एक पत्र लिहले व अण्णाला दाखवले व अण्णाने ते पोस्टहॉफिस मध्ये स्वतः जमा केले (विश्वास नव्हता की जमा करेनच की काय माहीत नाही) संध्याकाळी मला बोलवले व एकदम आपुलकीने विचारले की "बाळा, येथे तुला काय त्रास आहे, का सारखा सारखा पळून जाण्याच्या मागे लागलेला आहेस ? " मी त्यांच्या चेह-याकडे पाहतच राहीला ... डुकरा सारखं रोज मारता वरुन सकाळी चार वाजता लात मारुन उठवता.. जबरदस्ती संध्याकाळी आठलाच झोपवता वरुन विचारत आहात की त्रास काय आहे मी मनातील हे सर्व प्रश्न मनातच ठेवले व गप्प बसलो.. त्यांनी एक कानाखाली वाजवावी ह्यासाठी हात उचलला असे मला वाटले पण त्यांनी तोच हात मागे घेत आपली मान खाजवली व जा म्हणाले व तेथून लगेच पसार झालो.. !

१० एक दिवसानंतर आई-बाबा आले रविवारी !
मी आईला बघून तीच्या कडे एकदम पळतच गेलो मिठी मारायला.. तोच एक जोरदार थप्पड गालावर पडला व त्या बरोबर मी देखील तेथेच मातील लोळलो... पुन्हा बाबानीं उठवला व पुन्हा एक वाजवली.. व म्हणाले " खबरदार पुन्हा येथून पळालास तर" माझा पुन्हा पोपट झाला होता... मी विचार केला होता की आई-बाबा आल्यावर सर्व अडचण सांगेन व ते मला घेऊन घरी जातील.. पण कैच्या कैक.. येथेतर उलटा मलाच मार बसला विनाकारण ! बाबा म्हणाले " तुझ्यावर पाचशे रुपये खर्च केले आहेत वर्षासाठी आगाऊ, वर्ष संपायच्या आत घरी आलास तर तंगडी तोडून लटकवेन घराबाहेरील खुट्याला" मी आई कडे बघतीलं व म्हणालो "मला बोलु तरी द्या" तोच आई म्हणाली " दादया, बाळा येथून सारखं सारखं पळून नको जाऊस... कोठे तरी रस्त्यात हरवलास तर काय करायचं... शाळापण बुडेल... तु नापास होशील... एक महीना झालाच आहे तुला येथे येऊन... तीन-चार महीन्यात दिवाळीची सुट्टी पडेल तेव्हा घरी ये ठीक आहे बाळा" बाळाला तोंडात बोळा घालून मारल्या सारखं मला वाटू लागलं होतं, कुणाला माझ्या दुखःचे काहीच वाटत नव्हतं.

मी पुन्हा रडारड चालू केली तोच निल आला व म्हणाला... " जरा हळू रड.. तो अण्णा बाहेर व्हराड्यातच आहे.. लगेच वर येईल... काकी तुम्ही काळजी करु नका... ह्याचावर हा काळी पळणार नाही... व ह्याच्यामुळे जी दुसरी मुलं पळायच्या तयारीत होती ती पण पळणार नाहीत... शाळेने व हॉस्टेलने गेटच्या बाहेर जाण्यासच मज्जाव केला आहे " मी त्याच्याकडे बघीतलं व म्हणालो " मी जाणारचं" बाबा समोर बसले होते... परत एक वाजवली... व म्हणाले " घरात आल्या आल्या तुला पंचगंगेत नाय फेकलं तर माझं नाव बदल" व आपल्या दाढीवर हात फिरवत तेथे आरामात बसले, आई म्हणाली " का उगाच पोराला मारताय, समजवून चार गोष्टी सागाच्या सोडून... तुम्ही मारु लागला.." जरा मला समाधान वाटलं.. व आईला माझी सर्व अडचण सांगितली तशी ती म्हणाली " ह्यामुळे तुला चांगलं वळण लागेल.. सकाळी लवकर उठणे.. रात्री लवकर झोपणे ह्या चांगल्या गोष्टी आहेत.. हेच येथे शिवतात बाळा.. तुझा सुभाषमामा पण येथे शिकला होता ... व तुझे अप्पाकाका पण "

अण्णा समोर मला घेऊन बाबा गेले व म्हणाले " गुरुजी, हा पुन्हा पळाला ना... पाय तोडून ठेवा.. पण हो येथेच शिक्षण होणार ह्याचं दहावी पर्यंतचं" व माझी शेंडी पकडून म्हणाले " पुन्हा येथून बाहेर पडलास ह्याच्या परवानगी शिवाय तर बघ " मी चिमणी एवढे तोंड करुन बसलो होतो... आईने घरुन.. बेसनचे लाडू , शंकरपाळ्या व चिवडा आणला होता माझ्या साठी त्या सगळ्या पिशव्या माझ्या ताब्यात देत म्हणाली " बाळा, वाटून खा, व आठवण आली की फोन कर शेजारच्या काकूच्या घरी हा घे नंबर त्यांचा नवीन फोन लागला आहे त्यांच्या घरी, हे घे दहा रुपये.. खर्चा साठी.. त्यांना सांगू नकोस.. जपुन खर्च कर" मी अजून पण रडतच होतो व एकदम बारीक आवाजात आईला म्हणत होतो.. मी नाही राहणार येथे.. पण बाबा जवळ आले की, मी फक्त मुसमुसत नाक फुसत असे.. दिवस भर मी हेच रडगाणे लागले... शेवटी आई पण वैतागली व एक रप्पाटा घातला व म्हणाली " कार्ट हाय काय... अवदसा.. सकाळ पासून माग लागलं आहे... येथेच रहा.. आता दिवाळीला पण येऊन नको घरी..." व आई-बाबा संध्याकाळी पाच च्या बसने निघून गेले !

मी एक पंधरा दिवस व्यवस्थीत एक ही चुक न करता हॉस्टेल मध्ये जगत होतो... एक दिवस देखील मार खल्ला नाही ! एके दिवशी रविवारी सहावीच्या वर्गातील सर्व मुलांना अण्णांनी बोलवलं व म्हणाले की दहा वाजल्या पासून सर्व जण डोंगरामागच्या शेतातून हिरव्या मिर्ची तोडण्यासाठी जाणे आहे तेव्हा आपले ड्रेस काढून ठेवा व नियमीत वापराचे कपडे घालून तयार रहा ! नऊलाच जेवण करुन मुलं तयार झाली व आम्ही रांगेने डोंगराच्या मागे जाण्यासाठी आड रस्त्याने जाऊ लागलो सर्वात पुढे अण्णा होते व मागे मागे मुलं... जरा चढण चढल्यानंतर दुस-याबाजूची उतरण चालू झाली व थोडा पाय घसरला म्हणून पुढील मुलाला पकडण्यासाठी पुढे झालो पण त्याला धक्का लागला व तो पडला... पुढील मुलावर असे करत पुढील पाची मुलं पडली व त्यांच्या सोबत अण्णा देखील! त्यांनी मागे वळून पाहीले तर मी हसत उभा होतो एका फांदीला पकडून ... त्यांनी तीच छोटी फांदी तोडली व त्याच हिरव्यागार फांदीने मला सोलून काढले व सर्वांना शेतामध्ये दोन दोने ओळी दिल्या मिर्च्या तोडण्यासाठी व मला एकट्याला दहा ओळी दिल्या !

अण्णाचा राग काही गेला नाही, कधी मध्ये समोर आलो तरी काही ना काही कारण काढून धम्माकलाडू मिळत असे पाठी वर ... असाच एक दिवस मार खाऊन रुम मध्ये आलोच होतो तोच निल म्हणाला " मला पण पळून जायचे आहे... आईची आठवण येत आहे खुप" मी हसलो व म्हणालो... " मला देखील येथून जायचं आहे पण .. कोल्हापुरला गेल्यावर बाबा मारतील... एक काम करु.. मी तुझ्या घरी येईन ठीक आहे.. दोघे मिळून पळू "
आई ने दिलेले पैसे होतेच जवळ.. बस आता योग्य वेळ व मोका हाती आल्या आल्या येथून पार होणे ठरलंच !

क्रमशः

गुगल फोन ( ड्रीम) !




आज गुगल ने आपला गुगल फोन ड्रीम बझार मध्ये उतारला ;)

किमत कमी वाटत आहे आयफोन पेक्षा $१९९ (रु. ९००० च्या आसपास)



१. Gphone will have a tilt sensor for gaming and a camera.
२. ३जी नेटवर्क साठी उपयुक्त !
३. वेगवान महाजाल समर्थक
४. जीपीएस सपोर्ट (थर्ड पार्टी)
५. 'open platform' वर आधारीत प्रणाली आहे युनीकोड ला सपोर्ट करु शकतो !

A slick communications suite, including "push" GMail, Google Calendars, and IM. Basically a consumer-oriented BlackBerry service. Perhaps some sort of built-in file syncing between a PC/Mac, the cloud, and your phone -- like Apple's MobileMe, but free, ad-supported... and functional.

Some buy-in from big game studios like Electronic Arts (ERTS). We're surprised how much time we've spent playing games on the iPhone; Spore, for example, is an addictive time suck. We're ready for more.

A Web browser that's fine-tuned to rock Google's Web services, like Google Docs.
Video recording that can upload straight to YouTube.
A way to sync the Android phone with our Mac/PC that's as simple and elegant as Apple's iTunes. No one has come close. (Ideally via wifi/3G, in addition to USB.)
"Visual voicemail" that transcribes your voicemail into an email.
Copy and paste. Seriously.

भारतात येणाची वाट पाहत आहे ;)



सोमवार, १५ सप्टेंबर, २००८

शेयर मार्केट - काळा दिवस !

आज शेयर मार्केट मध्ये सेंसेक्स ७७० व निफ्टी २४१ अंक खाली आला आहे....
बँकींग तथा उर्जा क्षेत्रामध्ये खुप मोठी पडझड झालेली आहे.. अजून मार्केट सुरवाती तासामध्येच आहेच आहे.. पुढे अजून पडझड होण्याची आकांक्षा आहे... ह्या मागे लीमन ब्रदर्स ने स्वतःला दिवाळीखोर (bankruptcy) घोषीत करणासाठी अर्ज दिल्यामुळे गोल्बल मार्केट मध्ये हा क्रश झाला आहे व त्याचा परिणाम भारतीय बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला आहे, आशियाई मार्केट देखील खाली जात आहेत शक्यतो मार्केट ना पुढील डाऊन स्टॉप हा १२८०० च्या आसपास व १३५०० च्या दरम्यान राहील अशी आशा !

मोठ मोठे शेयर आपल्या नेहमी च्या पोझीशन पेक्षा ५ ते ७ % खाली आले आहेत.. गेल्या पाच दिवसामध्ये आयसीआयसीआय बँक १४० रु. खाली आला आहे तसेच रिलायन्स इंड्रस्टी २०० रु खाली आहे... डिएलफ देखील ७० रु. खाली आहे आज !
थोडाफार हातभार आतंकवाद्यामुळे देखील लागला आहेच मार्केटला खाली ढकलण्यात..

ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांनी गडबड न करता व्यवस्थीत योग्य वेळेची वाट पाहावी असे माझे मत आहे.. क्रुड ९८ च्या रेंज मध्ये पोहचले आहे हा जो गोल्बल इफेक्ट मुळे जो मार्केटचा डाऊन ट्रेन्ड चालू झाला आहे हा लवकर थांबेल !



***
भारतात मंदी येत आहे का ?

माझ्या मते आली आहे... सुरवात मागील वर्षीच झाली होती... जमीनीचे भाव अव्वाच्या सव्वा झाली तेव्हाच

येथे हरयाणामध्ये मी एक गोष्ट नेहमी पाहतो ती येथे देत आहे....

एका गावात एक कंपनीची माणसं आली व म्हणाली आम्हाला काही जमीन विकत घेणे आहे.. व तेव्हाचा जोर बाजार भाव होता त्या भावाप्रमाणे जमीन खरेदी केली, काही दिवसांनी पुन्हा जमीन खरेदी करण्यासाठी ती माणसं आली... तेव्हा जरा चढ्या भावाने देखील जमीन खरेदी केली... असं करुन त्यांनी १ लाख किमतीच्या जमीनीचा तुकडा शेवटी शेवटी २० लाखापर्यंत विकत घेतला ! ह्यांच्यामुळे काय झालं की आसपास च्या सगळ्याच गावाच्या जमीनीच्या किमती गगनी भिडल्या व मातीचे सोनं झालं... थोड्या काळाने बाकीच्या कंपन्यानी देखील तेथे जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न चालू केला जेव्हा भाव ६० लाखावर आला... तेव्हा जी फालतू जमीन त्या कंपनीने विकत घेतली होती.. ( अव्हरेज प्राईझ - ३ लाख ) ती जमीन त्यांनी ६० लाखाला विकली (शेकडो एकर) कंपनीचा फायदाच फायदा झाला कंपनी मध्ये हिस्सेदार त्यावेळचे सरकार .. ईनोलो सरकार !!!!

ते गाव गुडगांव आहे व ती कंपनी डिएलफ त्या कंपनीने ज्या जमीनीला लाख रुपयात कोणी विचारत नव्हंत त्या जमीनीला करोडो रुपयांचा भाव मिळवून दिला !

*****
गुंतवणुकीसाठी

बँकींग मध्ये :

HDFC Bank Ltd. - सध्या - ११८१ वर आहे टार्गेट १२८५ ते १३००
आयसीआयची आय - सध्या ६१२ आहे टार्गेट ६९५ -७०५
एक्सिस बँक - सध्या ६५२ आहे टार्गेट ७१५-७२०
बँक ऑफ बडोदा - सध्या २९१ आहे टार्गेट ३१०-३१५

शुगर सेक्टर -
बजाज हिंन्द - सध्या १३६ आहे टार्गेट १५५-१६०
रेणुका शुगर - सध्या १०० आहे टार्गेट १२२-१२५

पॉवर सेक्टर -
रिलायन्स पॉवर - १५० आहे टार्गेट १६०-१६५ व जास्तीत जास्त १७० जाऊ शकतो !

कालावधी - एक महीना ते दिड महीना !

*
ह्या टिप्स माझ्या स्वतःच्या आहेत, आपले सर्व व्यवहार आपण आपली सदविवेक बुध्दी शाबुत ठेऊन / जाणकाराकडून मार्गदर्शन घेऊन मगच करावेत ही अपेक्षा !

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग २

मी म्हणालो " इतक्या लवकर ? " तो हसत म्हणाला " येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे... पाच दिवस झाले मला येथे येऊन... माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु"

एका मोठ्या हॉल मध्ये खाली लाकडाचे सहा सहा फुटी पाट व ओळीने बसलेली सर्व मुले.. व एका बाजूला स्वयंपाक घर व वाढपीची धावपळ ! प्रत्येकाच्या ताटात दोन गरम गरम भाक-या, भाजी व एका वाटीत ताक ( फोडणी घालेल्या ताकाला काय म्हणतात , विसरलो) व डाळीची आमटी ! घरात असलो असतो तर.. हे असलं जेवण कधीच घेतलं नसं.. ना वांग्याची भाजी.. ना शेपुची.. ना कांदा ना लसूण घातलेली आमटी... मी नाक मुरडतच पहीलं हॉटेलचे जेवण घेतलं व विचार केला की आता वर्ष भर हेच खावे लागणार आहे तेव्हा... गुमान खा ! जेवण संपवून ताट व वाट्या स्वतःच धुवायच्या ? छे ! हा एक नवीन त्रास जिवाला...

ताट व वाट्या हॉल मध्ये ठेऊन मी व निल मंदिरामध्ये फिरण्यासाठी निघालो... निल नांदेडचा व हुशार देखील होता शिक्षणामध्ये मागिल वर्षी पाचवी मध्ये तो आपल्या शाळेत प्रथम आला होता.. व देखील प्रथम आलो होतो... ( पण मागुन आमच्या जाधव बाई म्हणाल्या होत्या ) मी म्हणालो " निल जी मुलं आभ्यास करत नाहीत त्यांना हॉस्टेल मध्ये ठेवतात तु तर हुशार आहे.. मग तुला का हॉस्टेल मध्ये ठेवलं आहे तुझ्या आईवडीलांनी ? " तो म्हणाला " चांगले वळण लागावे ह्यासाठी, व सारखे सारखे हॉस्टेल काय म्हणतो आहेस हे गुरुकुल आहे.. आण्णाच्या समोर हॉस्टेल म्हणालास ना... धुलाई होईल" मी म्हणालो "अण्णा ? हो कोण ?" तो म्हणाला " वेताचा मार येवढ्यात विसरलास.. जे तुला मारत होते तेच अण्णा, गुरुकुलचे सर्व काही तेच पाहतात... रोज दोनचार मुलांची धुलाई करतात.. तेव्हा नियम पाळ... नियम तोडला की ... मार नक्की तो देखील सर्वांसमोर.. चल आता... संध्याकाळ झाली.. आठच्या आत हॉलमध्ये असायलाच हवे... लाईट बंद करतात नाही तर" मी म्हणालो " अरे, आठ वाजता झोपायचं ? अरे सवय नाही मला" तो म्हणाला" होईल सवय चल."

सकाळी चार वाजता... कोणी तरी पेकाटात लात घातली व मला जाग आली... समोर पाहीले तर आण्णा उभे ! " तुम्हाला पावणे चारची घंटा वाजलेली कळाली नाही ? " मी काही न बोलता.. मान खाली घालून उभा राहीलो होतो... तोच निल पुढ होत म्हणाला " चल, अंघोळीला जाउ.. टॉवेल घे आपला.." मी आपले कपडे व टॉवेल घेऊन अंघोळी साठी निघालो, कंबर जोरात दुखत होती... रागाने थर थर कापत होतो... पण करणार काय ? ... मी निल ला म्हणालो " कुठ जायचं आहे अंघोळीला ?" तो म्हणाला " तो म्हणाला " विहरी वर ! " थोड्या वेळातच विहरी वर पोहचलो, समोरचे दृष्य पाहून दंग राहीलो.... एक मोठी विहीर... त्या विहीरीला पाणी खेचण्यासाठी चार चार बालटी लटकवलेली... सगळे विद्यार्थी स्वतःच पाणी काढत होते बाल्टी डोक्यावर ओतून घेत होते.. झाली आंघोळ ! मी निल ला म्हणालो.. " थंड पाण्यानेच आंघोळ करयाची का ? मी नाही करणार... जरा उजाडल्यावर करेन पाणी गरम होईल तो पर्यंत " तो जोरात हसला व म्हणाला " आताच आंघोळ करायची, नंतर दिवस भर वेळ देखील मिळणार नाही व पाच नंतर विहरी वर सापडला कोणी की त्याची आण्णाशी गाठ नक्की " मी कशी बशी आंघोळ उरकली व नवीन आणलेले कपडे... शाळेचा गणवेश घातला... पांढरा शर्ट व काळी हाफ चड्डी !

साडे चार ला बरोबर... सगळे मैदानामध्ये जमले मी पण निल च्या पाठोपाठ तेथे पोहचलो , सगळे रांगेत उभे होते... लहान मुलांची एक रांग... त्यांच्या पेक्षा मोठ्या मुलांची एक रांग .. अश्या किती तरी रागा लागल्या होत्या... व समोर चबुत-यावर आण्णा हातात वेताची काठी घेऊन उभे होते व त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ वयाने मोठी मुले पाठी मागे हात घालून उभे होते... सर्वात प्रथम प्रर्थना व जिन वंदन केले गेले व थोड्या वेळाने व्यायामाला सुरवात झाली.... कधी हात वर तर कधी खाली... डावी कडे वाका... उजवी कडे वाका.. उड्या मारा.. व एक उडी चुकली व मी धडाम करुन खाली पडलो... सगळी मुलं हसली.. व आण्णा.. काही क्षणात तेथे पोहचले... दोन छड्या मारल्या पायावर व म्हणालो " पुन्हा पडलास, पाच फटके " व पुन्हा कसरत चालू !

मांडीवर वेताच्या छडीचे वळ पडले होते.. निल ने आचा-याकडे जाऊन थोडे हळद आणले व माझ्या वळांवर लावत म्हणाला " नियम पाळ.. गोट्या... नियम पाळ.. नाही तर रोज मार खाशील " मी म्हणालो " मी मुद्दाम थोडीच पडलो होतो.. चुकुन पडलो होतो.. " तो म्हणाला " चुकुन पण पुन्हा काही करु नकोस.. तो बघ... श्रेणीक येत आहे माझा नवीन मित्र आहे.. तो येथे दोन वर्षापासून आहे व आठवी मध्ये आहे तो..." तो श्रेणिक आला व माझ्या कडे पाहत म्हणाला " अरे छोट्या, तुच पडला होतास ना सकाळी " व हसू लागला. एक तर त्यांने मला छोट्या म्हणाला वर माझ्या वरच हसत होता... मी रागाने निल कडे पाहीले.. त्यांने लगेच श्रेणिकला म्हणाला " दादा, तो नवीन आहे.. घाबरला आहे... चार-पाच दिवसामध्येच ठीक होईल असे सगळेच हसले तर पळुन जाईल तो "
माझ्या डोक्यात एकदम विज चमकली "पळून जाईल तो " येथून पळ काढायचा आजच !

सहा ते सात मंदीरामध्ये भजन व सकाळी आठ वाजता जेवण हा रोजचा नियम ठरलेला व मी ह्याच वेळात पळून जाण्याचे ठरवले.. पेटी वजनाने जास्त मोठी होती व ती हात घेऊन बाहेर जरी पडलो तर सगळे समजतील मी पळून चाललो आहे... मी आहे त्याच गणवेश मध्ये पळून जाण्याचे ठरवले ! पुजे नंतर निल म्हणाला चल जेवण घेऊ.. मी भुक नाही असे सांगितले व एकटाच हॉल मध्ये बसून राहीलो. व पाच एक मिनिटाने गुपचुप पणे मी हॉलच्या बाहेर आलो व ग्राऊंड च्या बाजूने... विहीर जवळून शाळेच्या गेट पाशी आलो व बाहुबली मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या पाय वाटेने सरळ हातकलंगडे रस्त्यावर आलो.. मी वेगाने पळत पळत जास्त होतो अर्धा तास तरी पळालो... पण हातकलंगडे काही आलं नाही... पण एक गाव जरुर आलं .. तेथे एकाला विचारलं हातकलंगडे किती दुर आहे.. तो माझ्या कडे नखशिकांत पाहत म्हणाला " १२ कि.मी. आहे, हॉस्टेल मधुन पळून आलास ? " मी नाही म्हणालो व तेथून जाण्यासाठी मागे वळलो... त्यांने मानगुटीला पकडून सरळ सरळ वर उचलला मला व म्हणाला " पोरा मी तुझ्या सारखं लई नमुने बघीतली हाईत.. चल हॉस्टेल मध्ये" व आपल्या राजदुत वर बसवून... सरळ गुरुकुल मध्ये घेऊन आले.. व आण्णाच्या समोर उभे केले व म्हणाले " हे कबुतरं, पळून चाललं होतं.. नशीबानं मला सापडलं... लेकाचा.. त्या पोरं पळवणा-याच्या हाती लागलं असंत तर कळालं असंत... " आण्णा म्हणाले "पोलिस पाटिल, धन्यावाद तुमचे.. हा नवीनच आला आहे बघतो त्याला मी" चाललेला संवाद मला महत्वाचा नव्हता... बसणारा मार कसा चुकवावा ह्याचा विचार करत होतो.. तोच पाठीवर जोरात छडी पडली... पुढील पाच-दहा मिनिटामध्ये... दहा पंधरा थप्पड व सात-आठ छड्या पाठीवर... मांडीवर पडल्या व मी रडत खाली जमीनीवर लोळत होतो... आण्णा नी दोनचार मोठ्या मुलांना बोलावलं व मला उचलुन हॉल मध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितले !

थोड्यावेळाने निल मला खोत डॉक्टरांच्या कडे घेऊन गेला जे गुरुकुलचे डॉक्टर होते.. थोडा मलम माझ्या वळांवर लावत म्हणाले " कश्याला पळून जात आहेस.. बघ मी येथेच शिकुन गेलो होतो.. आता डॉक्टर होऊन येथेच सेवा करत आहे... आण्णा.. पण खुप शिकलेला आहे पण अविवाहीत राहून येथे सेवा करत आहे... येथे तुला खुप काही शिकायला मिळेल" थोडा मलम कागदावर देत निलला म्हणाले " रात्री झोपताना लाव एकदा !दिवस भर पडलेल्या मारामुळे मी हॉल मध्येच काढला, संध्याकाळी निल हात पकडून जेवण्यासाठी घेउन गेला... चालणे देखील मुश्कील होत होतं !

क्रमश:

गुरुवार, ११ सप्टेंबर, २००८

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग १

प्रस्तावना

माझे एक वर्षाचे शिक्षण बाहुबली विद्यापीठ, बाहुबली, कुंभोज (जि. कोल्हापुर) येथे झालं त्याच्या काही आठवणी येथे देत आहे त्याला कारण गुगल ने मला अचानकच आमच्या विद्यापीठाचे संकेतस्थळ समोर आणून दिले, शोधत दुसरंच काही होतो.. !


हे शाळेचे ब्रिद वाक्य



हे गुरुकुल म्हणजेच आमचं हॉस्टेल व त्यावेळची जेल ;)


हे मंदीर... चांगले उंच जागी आहे !


हेच ते ग्राउंड जेथे आम्ही रोज चकरा मारल्या ... चुका केल्यामुळे ;)


घरच्या एका पत्रासाठी डोळे लावून आम्ही वाट पाहत असू.. शाळेच्या गेट समोरच असलेले पोस्ट ऑफिस :(


हे बाहुबलि स्वामी ह्यांच्याच आशिर्वादाने मी पंधरा वेळा यशस्वी पणे हॉस्टेल मधून पळून गेलो (नंतर परत पकडून आणला व धुतला ही गोष्ट वेगळी )




सर्व फोटो ह्या संकेतस्थळाद्वारे भेटले - www.bahubali-vidyapeeth.org
अजून काही चित्रे शोधत आहे भेटतील तस तशी मी येथे प्रकाशीत करत राहीन.

******************************************************************

कोल्हापुरातील शालेय प्रगती पाहून आई-वडीलांनी मला बाहुबली हॉस्टेल मध्ये ठेवणे नक्की केले, नुतन मराठी विद्यालय मधून माझा दाखला काढला गेला व सरळ मे मध्येच मला घेऊन आई-वडील बाहुबलीला आले व दोन तासाच्या आतच सर्व कार्य संपुर्ण करुन मला हॉस्टेल मधील हॉल मध्ये (एका हॉल मध्ये ५० एक मुले राहत होती) सोडण्यासाठी आले, मला माझी लोखंडाची पेटी व त्यावर माझे नाव व पत्ता, बेसनचे लाडू व थोडा चिवडा हे सर्व हाती देऊन बाबा बाहेर गेले व हॉस्टेल मधील पुर्ण इतिहासामध्ये कोणी रडून दंगा केला नसेल इतका दंगा मी केला.. आईला जाऊच दिले नाही अर्धा तास, थोड्या वेळाने गुरुजी आले .. पाढंरा कुर्ता.. पांढरे धोतर... व डोक्यावर विरळ केस.. सडसडीत शरीर .. वण गोरा... व डाव्या हातात वेताची काठी !

पुढील पाच मिनिटामध्येच आई-बाबा हॉस्टेल मधून बाहेर जाऊ शकले एकदम आरामात व मी मुसमुसत अंगावर पडलेले वळावरुन हात फिरवत तेथेच बसून राहीलो .. डोळ्यात पाणी जमा करुन ! संध्याकाळची वेळ झाली थोड्या वेळाने माझ्या आजू बाजूची मुलं आपापली ताट-वाट्या - तांब्या घेऊन निघाली ... मला काही कळाले नाही मी एकाला विचारले""कुठ निघालात ?" तो खेसकला, "जेवणार नाहीस की काय ? चल जेवायला" " मी म्हणालो " इतक्या लवकर ? " तो हसत म्हणाला " येथे नियम चालतात.. आपल्या सवयी नाही, मी पण नवीनच आहे... पाच दिवस झाले मला येथे येऊन... माझं नाव निल, चल जेवण घेऊन मग बोलु"


क्रमशः

चिंतन


अहिंसो परमो धर्म - महावीर स्वामी ने जगाला दिलेला मंत्र, ते ज्या काळात होते तो काळ एकदम वेगळा होता, पण आज समाज मानस एकदम वेगळे आहे, जेथे पाहावे तेथे खुन, मारामा-या, विस्फोट व आतंकवादी हल्ले ह्या सर्वांवर मी सामान्य माणुस म्हणून कसा विचार करतो आहे ? खुन का बदला खुन असा एक कायदा चंबल च्या घाटी मध्ये चालतो तसे वागावे तर तो धाडशी पणा माझ्याकडे नाही, मुंगी मारावी की न मारावी ह्याचा देखील विचार करणारा मी समोरचा शत्रु आहे हे उमजुन ही त्याला मारु शकेन .. ह्याची मलाच खात्री नाही, पहावे कोणाकडे राजकीय नेते मंडळी ह्यांना तर भ्रष्टाचार व स्वतःची स्तुती करण्यापासून वेळच मिळत नाही ते काय रक्षा करणार ह्या शत्रु पासून.. पोलिस नावाची एक व्यवस्था आहे असे म्हणतात आम्ही पोलिसांना नावे ठेवतो ते राजकीय मंडळींना नावे ठेवतात.. जावे कुठे मग ?मग काय त्या होणा-या कलीच्या अवताराची वाट पाहत बसावे ह्यावर ?

चिंतन जरुरी आहे ..

बुधवार, १० सप्टेंबर, २००८

पुर्वाभास !

काय असतो हा पुर्वाभास ?
महाजालावर शोधा शोध केली खुप काही संकेतस्थळे भेटली पण ती विदेशी भाषेमध्ये होती पण हिंदी व मराठी मध्ये काही ह्या विषयावर सापडले नाही.. तेव्हा सर्वात प्रथम मिपावर !
पुर्वाभास ह्या विषयी लहानपणापासून प्रचंड आवड असलेला मी, का आवडतो मला हा पुर्वाभास विषय... ह्या मध्ये तुम्हाला पुढे घडणा-या घटना आधीच कळतात.. मला ह्या गोष्टीचे खुप अप्रुप वाटायचे की असे झाले तर कीती छान नाही... काय होणार आहे हे आधीच कळाले तर किती मजा येईल, त्यावेळि काही पुस्तके , मासिके वाचली होती त्यामध्ये ह्या प्रकारातील काही गोष्टी असायच्या पण त्याचा शेवट अथवा मध्य बिंदू हा नेहमी भुत, चेटकिण अथवा जादुगर असायचा त्याच्या कडे भविष्य पहाण्याची शक्ती असायची अथवा हिरोला मदत करणा-या एखाद्या व्यक्ती कडे... त्यातच लहानपणी हकीम-ताई नावाचा चित्रपट पाहीला व भविष्य पाहण्याची शक्ती आपल्याकडे असती तर हा ... असे राहून राहून वाटू लागले होते...पण जस जसा मी मोठा होत गेलो तस तसे तो विष्य सोडून मी जिवनाच्या गाड्यामध्ये भरकटत राहू लागलो... पण कधी मधी वर्तमानपत्रामध्ये भविष्य बघ व कोठे कोणाला हात दाखव... कुठे केरोचे भाषांतरीत पुस्तक वाच हा नाद चालूच होता, कधी मधी कोणीतरी भेटायचा व म्हणायचा अमुक-तमुक ने भविष्य सांगितले व ते १००% खरं झाले , असा तो छातीठोक दावा करत असे.... व मग मी पुन्हा शोधाच्या / वाचनाच्या मागे लागत असे की खरंच असे होत असेल का ? ह्या वाचनाच्या नादातच कोठेतरी मला नास्त्रोदामस हे नाव कानावर पडले (९/११) च्या आसपास, मी थोडी शोधा शोध केली व जे वाचले ते वाचून पुन्हा पुर्वाभासच्या प्रेमामध्ये पडलो....
कधी कधी आपल्याला आपल्या सामान्य जिवनामध्ये असे वाटते की आपण ही गोष्ट / घटना अनुभवली आहे ... येथे आपण होतो व आपल्या समोर हे होणार आहे हे माहीत होते... इतकाच माझा व आपला पुर्वाभास संगे संबध. पण मी एका गोष्टीचा विचार केला की ती घटना घडून गेल्यावरच असे का वाटते की आपण ही घटना घडताना येथे कोठे तरी होतो ? हा विचार माझे डोके खाऊ लागला. ह्याचे समाधान मी काही चित्रपटामध्ये भेटते का ह्याचा शोध घेऊ लागलो... तेव्हा मला "फायनल डिस्टीनेशन" ह्या चित्रपटाबद्दल माहीती सापडली व मी तो चित्रपट पाहीला....मला उत्तर भेटण्यापेक्षा जास्त मी त्या प्रश्नामध्येच गुरफटून गेलो व डोके चक्रावून गेले....तोच""डेजावू " हा चित्रपट आला परत तेच उत्तर काही सापडले नाही... तेव्हा मनात आले तुम्हाला विचारावे काही माहीत आहे का हो "पुर्वाभास" विषयी ????

१०/०९/२००८

आज शेयर मार्केट मध्ये जास्त उतार चढाव नाही आहे, व मी कश्या काळाला सुवर्ण काल समजतो, सर्व पैसे मोठ्या शेयर मध्ये अडकल्या मुळे.... जरा स्वतः नाराज होतो पण, एक्सिस बँकने नेहमी प्रमाणे हात दिला व ५००० रु. कमावले... आता जरा बंद करुन बॉग लिहावा म्हणत आहे खुप दिवस झाले दरबार भरलाच नाही...
बँकेचे शेयर F&O खरेदी करुन दोन-चार रु. नफामध्ये विकले की तुम्ही सुध्दा २००० एक हजार रोज कमवू शकता, फक्त लालच केले की मग मात्र गडबड होते.
हे बघा एक्सिस चा एक लॉट २२५ शेयरचा ४४००० च्या आसपास येतो .. रोज ह्या शेयर मध्ये १५ ते २० रु चा चढाउतार असतोच.. तुम्हाला फक्त त्याचा चढ अथवा उतार ची दिशा पकडायची आहे... !
बघा जमलं तर ...

गुरुवार, ५ जून, २००८

मी कोठे तरी हरवलो आहे...

दोन चार दिवस बोटे दुखावल्यामुळे शांत होतो [काहीच काम नव्ह्ते करण्यासारखे] तेव्हा बसून लहानपण / तारुण्यात पाय ठेवला ते वर्ष / जुने दोस्त / गाव / शेत हे सगळेव विषय डोक्यात एकदम घुमत होते... जे त्या वेळी केले ते आज करने शक्य देखील नाही... [जा पाहू कोणाच्या ही शेताचे पाट वेडे वाकडे करा कळेल, अथवा कोणाच्याही बंद दुकानावर अजून एक कुलूप चढवा रात्रीच्या रात्रीच.... जास्तच वेळ असेल व ताकत असेल जर मार खाण्याची तर पोलिसांच्या सर्व गाडीची हवा काढून दाखवा आजच्या घडिला... मग कळेल बालपण काय असते व तो काळ काय मस्त असतो]
पण तो काळच जबरदस्त.. होता..
आईच्या प्रेमावर कधी कधी बहीणीचे प्रेम देखील भारी पडायचे.. मार पडायच्या आधीच ताई मला बाहेर पाठवायची... तर बाबांचा मार पडणार असे लक्षण दिसताच अक्का माझ्या अभ्यासाची पिशवी व स्वतःचा गृहपाठ घेऊन बसायची... अक्काने मागीतले म्हणून जवळच्या आंबा.. चिंचा च्या बागेतून अंबे व चिंचा गोळा करुन तीच्या हाती द्यायचे व तीला च्या चेह-यावर एक अनामिक खुषी पाहत राहावे असे ते दिवस.. तीला माहीत असायचे अथवा माहीत होत असे की सगळे अंबे - चिंचा आंबट आहेत पण फक्त माझे मन राखा वे म्हणुन .. तीने लपवून बाजारातून अथवा आईने आणलेल्या चिंचा -अंबे मला द्यावयाची. ..शाळेत कधी अभ्यास पुर्ण न केल्या बद्द्ल तर कधी खोड्या केल्या बद्द्ल पडलेला मार रावलगाम च्या अथवा कुठल्याश्या तरी चॉकलेटीसाठी घरी न सांगणारी माझी शेजारीण... एक एक नमुने होते पण आज काल मी नमुना बनलो आहे... चॉकलेट तर रोजची बाब.. कच्चा अंबा.. चिंचा खाऊन देखील वर्षे उलटली आहेत.. खरंच मी हरवलो आहे... कधी पतंगासाठी जीव तोडून धावणारा मी.. आज जवळ एक साधा धागा देखील नाही.. पापाची टिकटी वर पतंगाच्या चार आण्या साठी मारामारी करणारा मी... आज पैसे देताना हे ही पाहत नाही की नोट कुठली आहे... समरोच्याने पैसे बरोबर परत दिले अथवा नाही.... खरोखर असे मला वाटत आहे मी हरवलो आहे... ... कधी कधी गरज म्हणून आई कडे चार पैसे मागताना केलेला आगतिक / निरागस / बेरकी / रडका चेहरा आठवला तर आज च्या जगण्याचे देखील अप्रुप वाटते... हजारोची उधारी मागण्यासाठी देखील वेळ नसलेला मी... कधी काळी सकाळ माझी राम मंदिराच्या आरतीने सुरु होत होती तर आता..कुठे ए.आर. रहमान च्या कुठल्याश्या गाण्याने तर कुठल्यातरी अनामिक गायकाच्या ओरडण्याने .... कधी काळी मित्रांच्या संगतीने दिवस सोडा महिने महिने कसे निघून गेले हेच कळायचे नाही...आज कामाच्या नादात वर्षांनू वर्ष कसे निघून गेले ह्याचा प्रत्येक क्षणाचा हिशोब आहे...कधी काळी मनसोक्त [कोल्हापुरी] शिव्या देत रस्तावरुन फिरुन झाले.... पण आज नेहमीचे बोलताना, कामाचे बोलताना देखील खोटा खोटा हसरा मुखवटा चेह-यावर ठेवा लागतो.... कधी नदी मध्ये तर कधी रंकाळ्यावर पोहताना ना पाण्याचा विचार केला न कधी वेळेचा पण आज आंघोळ करताना देखील वेळ व पाण्याचे बिल ह्याचा विचार करावा लागतो... कधी कट्यावर तर कधी गल्ली बोळात फिरताना मनात आले ते गाणे जोर जोरात ... भसड्या आवाजात गायले... पण आज स्वतः च्या घरामध्ये देखील गाताना भिती वाटते... लोक काय म्हणतील.... कधी असेच मित्रा बरोबर... पन्हाळा तर कधी जोतीबा...येथे कुलू मनाली अथवा जम्मू पटणीटोप वर जी सर येणार नाही ती तेथे येत असे, पण तेथे अंबा घाट पायी पालता घातला होता पण आज चार जिने चढावे लागलेच तर सर्वात प्रथम लिफ्टवाल्याला तर नंतर ईमारतीच्या मालकाला पन्नास शिव्या देत [मनातल्यामनात] चढतो... मित्राला भेटायचे आहे म्हणून कधी काळी.. बुधवार पेठ ते कळंबा सायकली वरुन फे-या मारल्या पण आज मोटर सायकली ला मायाने एक क्कीक मारण्याचा देखील दम नाही..आज पिताना देखील एक एक करुन मोजून पितो तर कधी तो काळ देखील होता... मित्राच्या भरोश्यावर बाटलीच्या बाटली गटवल्या होत्या... कधी तो काळ होता... एक हसली म्हणून महिनो महिने तीच्या घराच्या चकरा मारल्या व आज काळ आहे बाहेर साबण विकण्यासाठी आलेली युवती देखील हसत बोलते पण आमच्या चेह-यावर झक मारली व दरवाजा उघडला असे लिहले असते... काय करणार आम्ही पडलो सामान्य... पण दुनिये ने आम्हाला असामान्य बनवून ठेवले आहे.. कोणाला काय तर कोणाला काय... सर्वांनाच काहीना काही तरी विकायचे आहे.... पण मला स्वतःला एकदाच पुन्हा बघायचे आहे.. कसे समजवणार कोणाला.. माझ्यातला मी हरवला आहे...कधी खोड्या केल्या म्हणून तर कधी आळस केला म्हणून .... तर जरा वयात आल्यावर वाह्यातपणा केला म्हणून मार खाल्ला पण आज तसे दिलखोल मारणारे बाबा राहिले नाही ना तो मी खोडकर जैनाचे पोरं राहिलो नाही ह्याचेच दुखः जास्त आहे.... म्हणून म्हणतो आहे मी कोठे तरी हरवलो आहे...
राजे