other लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
other लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ जुलै, २०१०

श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

- पँडित नरेन्द्र शर्मा


radha


काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.



राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.


राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण...


राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.


आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......

पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.

( क्रमशः )

गुरुवार, १७ जून, २०१०

कबीर - सत्याचा आरसा

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.

ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥

कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥

माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥

साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥

जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥

उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥

सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥

साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥



काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.

*

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥



वाह !

इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !


*

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥


माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.

जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.

*


*

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥


कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.

*


सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥


गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका.


********

कबीर बाणी ...... Music for Soul !

एक सर्वांग सुंदर अल्बम !!!

राहूल देशपांडे ह्यांनी गायलेली कबीर बाणी ची सिडी ई-खरेदी विभागामध्ये उपलब्ध आहे.

सोमवार, २९ मार्च, २०१०

बंद मंदिरातील धर्म..

बंद मंदिरातील धर्म.. खरं हे हे शिर्षक चुकीचेच वाटत आहे मला तर येथे उघडा मंदिरे अथवा उघडदार देवा आता उघड दार असे काही शिर्षक द्यावे असे वाटत आहे त्याला कारण ही तसेच आहे हा जैन धर्म.. हो मी जैन धर्माविषयी बोलतो आहे ज्या धर्माचा शेवटचा तिर्थंकर, प्रवर्तक २५०० वर्षापुर्वी होऊन गेला व ज्याची जयंती आज भारतभरातील जैन बांधव उत्साहाने व आनंदाने साजरी करतात तो धर्म म्हणजे जैन धर्म. गेली हजारो वर्ष हा धर्म मंदिरात अडकून आहे. पराकोटीच्या अहिंसेचे समर्थन करणारा हा धर्म.

jain dharma

णमो अरिहंताणं।
णमो सिद्धाणं।
णमो आइरियाणं।
णमो उवज्झायाणं।
णमो लोए सव्वसाहूणं॥


अरिहंतांना नमस्कार, सिध्दीनां नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यांना नमस्कार व सर्व साधुनां नमस्कार अशी पाचं परमेष्ठींना नमस्कार करावयास सांगणारा जैन धर्म !

कधी काळी तिर्थंकारांनी जैन म्हणजे काय हे सांगितले, त्यांचे कर्तव्य काय हे सांगितले व अतिंम ध्येय मोक्ष कसा मिळवावा ह्याचे मार्गदर्शन केले. जैन म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा अथवा सर्वसाधारण ज्यांने मनावर विजय मिळवला तोच जैन ! ऋषभदेव पासून महावीरांपर्यंत सर्व २४ च्या २४ तिर्थिंकरांनी ह्याचेच सुतोवाच केले. अहिंसा हा धर्माचा मुल धर्म, मार्गदर्शन. नमोकार मंत्र म्हणजे जिवनात नम्र रहा ह्याची शिकवण व अतिंम ध्येय म्हणजे मोक्ष, ज्या जिवन मरण चक्रापासून मुक्ती व त्या परमशक्तीमान अश्या देवाच्या मध्ये एकरुप होऊन मुक्त होणे. एवढे साधेसोपे तत्वज्ञान असलेला हा धर्म बाकीच्यांना गुढ, विचित्र व वेगळा का वाटतो तर ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हा धर्म नेहमी मंदिरामध्येच बंधीस्त राहीला पुजारी व मुनी मंडळींनी त्याला कधी सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिला नाही अथवा तसा प्रयत्न केला नाही. सुरवातीच्या काळी ह्या धर्माला प्रचंडमोठ्या प्रमाणात राजश्रय मिळाला, रोज रोज होणारी युध्दे व अपरिमित मनुष्य व धन हानी ह्यापासून मुक्ती देणारा हा धर्म त्यामुळे हा शेवटपर्यंत पुर्ण राजश्रय मिळालेला धर्म ! शक्यतो ह्याचे कारण पण हेच असावे कि २४ च्या २४ तिर्थंकर हे राजकुमार अथवा राजा होते.

कधीकाळी जैन धर्मात मुर्तीपुजनास स्थान नव्हते पण जसा जसा धर्म वाढत गेला तस तसे ह्यात विभाग पडत गेले व दिगंबर जैन, श्वेतांबर जैन व तेरापंथी सारखे उपशाखा निर्माण झाल्या. ज्या तिर्थंकरांनी मोक्ष प्राप्तीसाठी घनदाट जंगलामध्ये अथक कष्ट घेऊन तप केले त्यांना ह्यांनी मंदिरात बसवले !

खुप सुंदर अश्या संगमरवर मंदिरात अतिशय देखणी जिन मुर्ती पाहण्याचे भाग्य हे फक्त जैनांनाच होते, व आज देखील आहे सर्व जागी नाही पण काही जागी नक्कीच सामान्य जनतेला प्रवेश नाही दोन उदाहरणे सांगतो एक खुप आधी जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

अयोध्या, जैनाच्या पाच तिर्थंकरांचे जन्मस्थान ! हो आमचे काही तिर्थंकर रामाचे पुर्वज तर काहीचा राम पुर्वज असे मानले जाते त्यामुळे हिंदु धर्मात जेवढे महत्व अयोध्येचे आहे तेवढेच महत्व जैन धर्मात देखील आहे. तर अश्या ह्या जैन धर्माच्या पंढरीमध्ये मी पाच वेगवेगळ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मला मी दिगंबर जैन आहे हे सांगून सुध्दा प्रवेश नाकारला शेवटी मला त्याला नमोकार मंत्र पठन करुन दाखवावा लागला व काही तिर्थंकरांची नावे सांगावी लागली नशीब माझे मी जैन हॉस्टेल मध्ये शिकलो होतो म्हणून तेवढे आठवत होते नाही तर मी जैन आहे हे सर्टिफिकेट घेऊन मला फिरावे लागले असते.

दुसरा अनुभव, माझे काही विदेशी मित्र भारतभ्रमणसाठी आले होते त्यावेळी त्यांना घेऊन मी मथुरा बघावयास गेलो होतो तर जाताना रस्त्यात एक जिनालय आहे थोडेसे आड वाटेला आहे पण सुरेख असे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे ते संदुर ठिकाण त्या मित्रांना देखील दाखवावे म्हणून तेथे घेऊन गेलो सर्व प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली व आम्ही आत गेलो तर मला सांगण्यात आले की बाकीच्यांना प्रवेश नाही फक्त तुम्ही जाऊ शकता. ती ट्रिप जैन मंदिर न बघताच पुर्ण झाली हे सांगणे गरजेचे नाही.

गुडगांव मध्ये दिगंबर जैनांचे मोठे स्वामी, मुनी बाहुबली स्वामी ह्यांचा आश्रम आहे व त्यांचे जन्मगाव हे माझे आजोळ त्यामुळे तेथे मला जरा प्रवेशाला अडचण नव्हती मी त्यांच्याकडे गेलो व वरील अनुभव सांगून म्हणालो असे का ? त्यांनी धर्म, पवित्रता अशी काही ठेवणीतील कारणे दिली तेव्हा मी त्यांना भारतीय राजघटनेने दिलेले अधिकार सांगितले तर ते म्हणाले की प्रवेश आम्ही नाकारतो असे नाही पण आमचे पुजेचे व मंदिराचे नियम खुप कडक आहेत ते पाळले जात नाही म्हणून आम्ही थांबवतो. मग त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व त्यांना विचारले की " टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे विष्लेशन करा कृपा करुन." हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण देऊन माझी बोळवणी करण्यात आली.


क्रमशः

शनिवार, २७ मार्च, २०१०

१ तास..

आज अर्थ अव्हर म्हणून आपण मी मराठी संकेतस्थळ एक तास ८.३० ते ९.३० बंद ठेवले व एका नव्या प्रयोगास सुरवात केली. हवे तर एखादे चित्र टाकून, मुखपृष्ठ सजवून आपण हा दिवस साजरा करु शकलो असतो पण काल मस्त कलंदर हिचा धागा व निखिल देशपांडे ह्यांनी अर्थ अव्हर मोड्युअल बद्दल सांगितले व मनात आले आपण हा प्रयोग करायचा. ह्यांने काय होईल, काय फरक पडेल सदस्य काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला व एका प्रयोगास हातभार लावल्याचा आनंद मिळाला.

काही ठिकाणी ह्या प्रयोगाची खिल्ली उडवली गेली व काही जणांनी सरळ विचारले काय मिळाले हे करुन ? तर वर म्हणालो तसे एका प्रयोगात सहभागी झालो ह्यांचा आनंद मिळालाच पण आपल्या संकेतस्थळावरील वाचक व सदस्य ह्यांना आपण वेळेवर आठवण करुन देण्यात देखील यशस्वी झालो. इनमीन ताशी २००-३०० पानं पाहीली जाणारी आपली साईट व ताशी १०० एक वाचक व सदस्य असलेली साईट ह्यांनी आपले संकेतस्थळ एक तास बंद ठेवला म्हणून काय फरक पडला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ?

'प्रत्येक गोष्टीची सुरवात ही लहानच असते, शुन्यातून विश्व निर्माण होते' ह्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे व हाच विचार डोक्यात घेऊन आपण हा प्रयोग केला. जर आपल्या सदस्यांपैकी / वाचकांपैकी एकाने जरी हा २०१० चा अर्थ अव्हर पाळला असेल तर तर आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत ह्या प्रयोगात व हीच आपली सुरवात आहे. भारतासारख्या जेथे वीजेचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच गंभीर आहे तेथे असले अर्थ अव्हर पाळून काय होणार असा देखील एक सुर समाजात जाणवतो पण अश्या प्रयोगामुळे समाजामध्ये जागृती येते, ठीक आहे आपल्याकडे वीजेची टंचाई आहे पण जी आहे ती तर आपण जपून वापरायला शिकू अश्या प्रयोगामुळे त्यासाठी हा सगळा अट्टाहास. आजच्या ह्या एका तासामुळे आपण किती वीज वाचवली हे महत्वाचे नाही आहे पण आपण कमीत कमी वीज वाचवण्यासाठी सुरवात तरी केली हे महत्वाचे. आजचा दिवस संपला म्हणजे प्रयोग संपला असे नाही आपण वेळोवेळी अश्या प्रकारच्या सामाजिक बदल घडवणार्‍या प्रयोगांना समर्थन देऊ व शक्य तेवढा त्याचा प्रचार देखील करु.

इतर फालतु डे आपण आनंदाने व उत्साहाने पाळतो त्याच उत्साहाने व त्यापेक्षा द्विगुणीत आनंदाने हे असे सामाजिक उत्सव आपण पाळले पाहीजेत जेणे करुन आपली येणारी पिढी सुखाने ह्या धरतीवर श्वास घेऊ शकेल.

http://www.earthhour.org/ ही संस्था ह्यावर कार्य करत आहे व ह्यांनी जे मोड्युअल तयार करुन दिले होते ते वापरुन हा मराठी संकेतस्थळावर नवीन प्रयोग यशस्वीपणे राबवला त्यांचे व ड्रुपल चे अनेकानेक धन्यवाद.


***

आपण कसा व कश्या पध्दतीने अर्थ अव्हर पाळला व इतरांना तो पाळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले ह्या बद्दल आपण जरुर लिहा.


धन्यवाद.

मी मराठी,
व्यवस्थापक.

बुधवार, २४ मार्च, २०१०

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता....

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !

रविवार, ७ मार्च, २०१०

कार्तिक कॉलिंग कार्तिक





एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली - असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो... घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो... व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे...... तो तोच आहे जो हा आहे... ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस... पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते... व चित्रपट एकदम बदलतो... सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते... हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

प्रतापगड - एक सुरेख सफर

महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड... चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना ;) महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो ;) तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली :( व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.






जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !





गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.



मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.



तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!










मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.





















* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.

रविवार, ३१ जानेवारी, २०१०

२३ वर्षात काय केले ?

एक सुरेख असा ब्लॊग वाचण्यात आला ज्योती बसूच्यावर बंगाल वर.
संयम श्रीवास्तव नावाच्या लेखकाने इंडिया टाईम्स ब्लॊग वर लिहला आहे.

नावाप्रमाणेच लेखणीचा संयम राखत एक अत्यंत चांगला लेख लिहला आहे ज्यामध्ये ज्योती बसू व कम्युनिस्ट पार्टी २३ वर्ष बंगाल वर राज्य करत होते त्या २३ वर्षात बंगालचा काय हाल झाला व ह्याला जबाबदार कोण ? लेख वाचल्यावर समजून चुकते की काय अवस्था असेल. लेखकाने जे आकडे वापरले आहेत गरिबे रेखेखालचे जिल्हा व इतर ते शक्यतो सरकारी आकडे असावेत व सत्य परिस्थीत अजून वेगळी असावी.

त्या लेखातील काही भाग.

" 23 साल का समय कुछ कम नहीं होता, इतने समय में तो एक देश या राज्य की पूरी तस्वीर बदली जा सकती है। बिहार में नीतिश कुमार ने तो एक टर्म भी पूरा नहीं किया, लेकिन तमाम विपरीत परिस्थितियों के बावजूद राज्य की तस्वीर बदलने में काफी हद तक कामयाब हो रहे हैं। हाल ही में एक सर्वे में यह बात सामने आई कि 2009 में मंदी के बावजूद बिहार की ग्रोथ 11 प्रतिशत से ऊपर रही। क्या कुछ ऐसा कर सके ज्योति बसु अपने राज्य में? तो इसका उत्तर होगा, नहीं। यह जानकर कि बंगाल के 18 जिलों में से 14 देश के सबसे गरीब जिलों में शुमार होते हैं और पुरुलिया में 79 प्रतिशत लोग गरीबी रेखा से नीचे हैं, कोई भी व्यक्ति आसानी से यह समझ सकता है कि वामपंथियों के नेतृत्व में इस राज्य का क्या हाल हो चुका है। "


त्या लेखाचा दुवा.

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ना पाक Vs आय पी एल

मागच्या आठवड्यात आय पी एल साठी खेळाडू खरेदी विक्री बाझार भरला होता व देश विदेशाचे खेळाडू आतुरतेने आपल्याला मिळणारा भाव / किंमत किती ह्याची वाट पाहत होते. अनेक विक्रमादित्यांबरोबर नवखे खेळाडू देखील स्वतःला विकण्यासाठी आतूर होते व त्यांना कुठली ना कुठली तरी कंपनी विकत घेत होती... अनेकांच्या चेहर्‍यावरुन आनंद ओसाडून वाहत होता...
पण एक ग्रुप मात्र अत्यंत अस्वस्थ दिसत होता पाकिस्तान च्या खेळाडूंचा ग्रुप. जवळ जवळ सर्व कंपन्यांच्या जागा भरल्या पण एक ही पाकी खेळाडू विकला गेला नव्हता... ! पाकिस्तानी संघातील ११ खेळाडू... पण एक ही विकला गेला नाही असे कसे झाले व का झाले ? ह्यामध्ये भारत सरकारचा हात आहे अशी बोंब पाकिस्तान त्याच क्षणापासून मारु लागला होताच.. पण परदेशी समिक्षकांना देखील हा धक्का पचला नाही असे त्यांच्या कमेंट वरुन वाटत आहे.. शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर सारखे महारथी असलेला संघ... पण एका ही खेळाडूला विकत कोणीच घेतले नाही... का ??

कारण ह्यामागे आहे शुध्द अर्थकारण !

येस.. पैसा बॉस.. !

आय पी एल मध्ये हजारो करोड रु. वाहतात.. कंपन्या करोडो रुं देऊन खेळाडू विकत घेते.. कश्यासाठी ? आपल्या फायद्या साठी. जर समजा मी एका कंपनीचा मालक आहे व मला लाख लाख रु देऊन शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर मिळणार असतील तर मी त्यांना घेईन का ? हो, पण ते पाकिस्तान सोडून इतर कुठला तरी देशाचे खेळाडू असते तर... थांबा थांबा येथे काही देशभक्तीचा उमाळा नाही आहे येथे पैसा आहे... पैश्याचा गेम आहे...

२६/११ नंतर आपल्या देशात पाकिस्तान विषयी जरा कटू भावना जास्तच वाढीला लागली आहे, त्यातच मागील दोन आठवड्यापुर्वी अमेरिकन सरकारचा एक रिपोर्ट पण प्रकाशीत झाला होता की जर भारतावर परत २६/११ सारखा हल्ला झाला तर युध्दाची शक्यता सर्वात जास्त असेल भारत-पाक युध्दाची शक्यता. पण आपण युध्द ही पायरी सोडू.. समजा हल्ला झालाच तर ? लगेच जनमत विरुध्द होईल व ज्या ज्या सामन्यामध्ये हे पाकिस्तानी खेळाडू असतील त्या त्या सामन्यावर एक तर बहिष्कार टाकला जाईल अथवा हुलडबाजी केली जाईल व त्यांच्या ( खेळाडूं च्या) सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहील व त्याचा खर्च त्या त्या कंपनीला उचलावा लागेल ज्यांने त्यांना विकत घेतले आहे खेळण्यासाठी. हा सर्वात मोठा मुद्दा.

आयपीएल ही शुध्द व्यापार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सगळ्यांना माहीत आहे, व येथे सर्व आपल्या फायद्यासाठी पैसे गुंतवत आहेत जर फायदा होण्याचा चान्स कमी असेल तर कोण लंगड्या घोड्यावर कोण पैसा लावणार ? आजच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट टिम किती ही चांगली असू दे पण त्यांचा देश पाकिस्तान खुप वाईट अवस्थेत आहे व त्यांच्या पंतप्रधानांचा देखील देशावर कंट्रोल नाही आहे जेथे आतंकवादी दररोज ब्लास्ट करत फिरत आहे व भारतावर हल्ला करण्याच्या रोज नवीन नवीन फतवे जारी होतात अश्या अवस्थेत पाकीस्तानी खेळाडूच्यावर पैसे लावणारा मुर्खच असेल म्हणून पाकिस्तानी खेळाडू आयपीएल मध्ये विकले गेले नाहीत. व सुरेक्षा कारणामुळेच दक्षिण आफ्रिकेने आपला दौरा रद्द केला , ह्याच कारणामुळे चॅम्पीयन ट्रोफी, वर्ल्ड कप च्या मॅचेस पाकिस्तान मधून बाहेर गेल्या...

पण वास्तवाकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानी खेळाडू व राजकर्ते ह्याला भारत विरुध्द पाकिस्तान असा रंग देत आहेत पण भारतीय सरकार ने सरळ शब्दात आयपीएल शी काही संबध नाही व ती व्यवसाईक संस्था आहे असे स्प्ष्ट केले.


रविवार, २४ जानेवारी, २०१०

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी




मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत.

तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे.
स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला rj.jain@gmail.com पाठवू शकता.

आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत.

सर्व मराठी मित्रांचे येथे स्वागत आहे, आपण येथे या व आपल्या मनातील विचार येथे मराठीतून व्यक्त करा.



सर्वांच्या सुचनांचे स्वागत आहे..


१. चुकीचे टाचण द्या - सुविधा.

ह्या सुविधेचा वापरत सर्व सदस्य करु शकतात.
ह्याचा वापर एखादा लेख / प्रतिसाद नियमबाह्य असेल तर काढू टाकण्यासाठी केला जातो.
२० पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे टाचण दिले तर तो लेख / प्रतिसाद आपोआप काढून टाकला जातो.
२ पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे असे टाचण दिले असेल तर व्यवस्थापकाकडे तो लेख / प्रतिसाद तपासणीसाठी येतो.
ह्या सुविधे मुळे व्यवस्थापनावरील त्रास कमी होईल व संकेतस्थळावरील वातावरण मुक्त राहील अशी आशा.


२. आजच्या बातम्या

ह्या दुव्यावर तुम्हाला मराठी मधील ठरावी वर्तमानपत्रांच्या महत्वाच्या बातम्या ह्याच संकेतस्थळावर वाचता येतील, अशी सुविधा आहे. ह्यामध्ये अजून काही वर्तमानपत्रांची भर घालण्याचे काम चालू आहे.


३. उघड झाप करणारा मार्गदर्शक व डाव्या बाजूचे ब्लॉक्स.


ह्याचा वापर सदस्य आपल्या सोयीनूसार शकतात.
तुम्ही एकदा केलेली ब्लॉक्स सेटिंग तशीच राहते ( कुकीज डिलिट करत नाही तो पर्यंत)
ह्याचा फायदा संकेतस्थळ वेगाने उघडणे व अनावश्यक माहीती / ब्लॉक्स न दिसणे ह्यासाठी होऊ शकतो.


४. उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यातील पानं

हे एक उपयोगी असे साधन आहे ज्याचा वापर महत्वाची माहीती / सण / बातमी प्रथम पानावर दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो.


५. फेसबुक वर मी मराठी

आता तुम्ही सरळ फेसबुक वर मी मराठी वर आलेले लेख वाचू शकता व तेथून मी मराठीवर परस्पर येऊ शकता.
लेख आल्यानंतर काही क्षणामध्येच फेसबुक वर अपडेट होतो.

येथे बघा

६. तुम्ही काय करताय ???

हि सुविधा म्हणजे एक प्रकारचा मायक्रो ब्लॉगिंग आहे, ह्याचा उपयोग तुम्ही तुम्हाला सार्वजनिक आपला संदेश देण्यासाठी करता येतो तसेच हलक्या फुलक्या गप्पासांठी देखील त्याचा वापर होऊ शकतो.




आपला मित्र,

राज जैन
http://www.mimarathi.net

******

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

शनीवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो, पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो, पुणे तर घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खुप वेळ हातात आहे असे वाटत होते फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला व एक कॉल केला व त्यांना विचारले येथे आहे का आसपास काही जागा बघण्यासारखी तर त्यांनी मला म्हसवे हे गाव सांगितले व म्हणाले जाऊन बघ बघण्यासारखं आहे तेथे. पाचवड मधून उजव्या हाताला वळालो चांगले दहा एक किलोमिटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या शेवटी एकाला थांबला व विचारले ते मोठे वडाचे झाड कुठे आहे तर तो म्हणाला उलट आला आहात सरळ परत पाचवडला जा व तेथून डाव्याबाजूने सरळ जाऊन पहीला उजवा कट तेथून दोन-तीन किलोमीटर नंतर म्हसवेचा कट. नेहमी प्रमाणेच कप्पाळ व हाताची गाठभेट घातली वर बाईक सरळ परत वळवली.

विराटगडाच्या पायथ्याशी हे हे म्हसवे गाव आहे जे जावळी तालुक्यामध्ये येते सातारा जिल्हात आहे. म्हसवे गावाच्या बाहेर एका जागेला कंपाउड घातलेले दिसते व तेथे एक भला मोठा सरकारी बोर्ड आहे ज्यावर वटवृक्षाची माहीती लिहलेली आहे व सरकारी कृपेमुळे तो बोर्ड एकदम सुव्यवस्थीत (?) आहे फक्त अक्षरे उडाली आहेत, रंग उडालेला आहे त्यामुळे काय लिहले आहे ह्यांची माहीती घेण्यासाठी कुटलिपी वाचक असा कोणी मिपाकर आहे का हे शोधावे लागेल असे लक्ष्यात आल्यावर सर्वात आधी त्या बोर्डचाच फोटो काढून घेतला. एका गावकराकडून कळालेली माहीती अशी,

म्हसवे गावात असलेला हा वटवृक्ष पुरातनकाळापासून आहे ह्याने जवळजवळ ६ एकर जागा व्यापली आहे एकाच वटवृक्षाच्या पारंब्यातून हे भले मोठे वटवृक्षांचे जंगल उभे राहीले आहे, जो मुळ वृक्ष होता तो काही वर्षापुर्वी पडला पण त्यांच्या पारंब्यातून जो वृक्ष तयार झाला होता त्याने आपला डोलारा संभाळून ठेवला आहे, सन १८८०-८५ च्या आसपास एका ली वॉर्नर या ब्रिटिश अधिका-याने ह्याचा सर्वात आधी उल्लेख केला आहे. आता सरकार ने हे संरक्षित स्थळ म्हणून घोषीत केले असल्या कारणाने त्या जागेत प्रवेश निषेध आहे व कोणी येत जात नसल्यामुळे प्रचंड झाडी वाढली आहे त्यामुळे आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही व जो गावकरी होता तो देखील इच्छूक दिसत नव्हता त्याचे कारण त्यांने आर्थिक दंड आहे असे सांगितले. बाहेरुन चक्कर मारल्यावर लक्ष्यात आले की खरोखर सरकारने किती प्रामाणिकपणे हा वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्यासाठी आत विहीर खोदली आहे, वट वृक्षाला देखील बाहेरुन पाणी लागते हा माझ्यासाठी नवीनच बातमी होती अहो जो वृक्ष येथे शेकडो वर्षापासून दिमाखात उभा आहे त्याच्यासाठी पाणी ? म्हणजे सुर्याला आपली टॉर्च देऊन म्हणावे अंधारात जपून रे. हा असा सरकारी खेळ. असो, तो आपला विषय नाही. जास्त माहीती घेतल्यावर असे कळाले की हा अशिया खंडातील दुस-यानंबरचा सर्वात मोठा वटवृक्ष आहे, ह्यापेक्षा थोडा मोठा वृक्ष बंगाल मध्ये आहे ( कलकत्ता मध्ये - गुगल सेवा) . तसेच ह्यापेक्षा लहान (तीन एकर मध्ये पसरलेला) वृक्ष हा म्हसवे गावातच आहे विराटवडाच्या पायथ्याजवळ. त्या सरकारी बोर्ड प्रमाणे हा भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे पण कलकत्तामधील ह्यापेक्षा थोडा मोठा आहे हा वैचारीक गोंधळ तिकडेपण ( त्या खात्यामध्ये) आहे हे पाहून थोडे हसू आले. खाली फोटो देत आहे.













म्हसवे

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

विरोधाभास..

खुप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दुर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदुर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आजचे पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामाजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मड्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..

उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवे मध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे, कोण जगावे व कोण मरावे ह्याचा निर्णय देखील आजकाल माणसं घेतात हे पाहून देखील नवल वाटते. कधी काळी ३५ रु. ला मिळणारा मॆकडीचा बर्गर आता २० रु. ला मिळतो, पिझा स्वत: झाला म्हणून कंपनीवाले टिव्हीवर, रेडिओवर, टॊयलेटच्या भिंतीवर बोंबलत आहेत. खरोखर सर्वकाही स्वस्त झाले आहे ? चार रु. किलो कांदा मिळायचा ह्यावर मुलांना विश्वासच नाही, तेल कधी तीस रु. किलो होते ह्या वाक्यावर तर मुले हसतात, खुप पुर्वीची गोष्ट नाही आताचीच काही वर्षापुर्वीचीच गोष्ट. भाव आकाशी भिडले हे वाक्य प्रचार आम्ही पुस्तकात वाचायचो.. आजकाल मुले ह्याची देही.. ह्याची डोळी पाहतात.. आकाश खुपच ठेगणे झाले आहे. हजारो टन भाजीपाला आपल्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे भाव मिळत नाही म्हणून व दुसरीकडे जेवायला एकवेळचे अन्न नाही म्हणून भुकबळी पडत आहेत ह्या किती मोठा विरोधाभास आहे.

एखादी बातमी, एखादा चित्रपट, एखादी डाक्युमेंट्री येते हलकेच आपल्याला हळवी करुन जाते व आपण परत निर्लजासारखे आपल्या सरावलेल्या जगात परत जातो, एखादा आत्महत्या करतो, एखादा स्व परिवार आपली यात्रा संपवतो, आपण हळहळतो व परत आपल्या जगात सराईतासारखे वावरतो. काही जणांना लाखो रु नाही पुरत काही महिना काढण्यासाठी, काहीजणांच्या घरामध्ये दिवसोदिवस चुल पेटत नाही त्यांचा विसर पडतो. कुठेतरी निसर्ग बचाव आंदोलन चालू असते कुठे तरी वन्यजीव बचाव.. पण कुठेच सामान्य माणूस बचाव हे आदोलन चालू आहे असे नाही पाहीले कधी. पाळीव कुत्र्याविषयी, बैलाविषयी माणसाला आपुलकी आहे पण आपल्यात जात बाधवावर जरा ही दया नाही... अशी विचित्र जात मानवाची.

कुठेतरी देव असेल व तो पहात असेल हे सर्वकाही. आपण चुकत आहोत, कुठे ना कुठे हे नक्की. सगळेच काही नेते मंडळी नाकर्ते आहेत असे नाही, नाही तर आपल्या देशाचा देखील पाकिस्तान होण्यासाठी खुप वेळ लागला नसताच. पण कुठे तरी आपण एक समाज म्हणून नक्की चुकतो आहोत. आज ना उद्या कधी ना कधी आपल्याकडे असलेले इंधन हे संपणार आहे, पर्यायी इंधनाचा अजून काहीच शोध लागला नाही आहे, सुर्य उर्जा हा एक विकल्प दिसत आहे समोर पण कोणीच त्यावर योग्य पध्दतीने कार्य करत नाही आहे, प्रगत देशामध्ये काय होत आहे माहीत नाही पण भारतासारख्या असामान्य देशात जो प्रगतशील आहे त्यामध्ये खुप मोठे अडथळे दिसत आहेत. शेती व्यवसायामध्ये खुप मोठी तफावत आहे, निसर्ग नेहमी प्रमाणे साथ देत नाही आहे जेव्हा पाऊस पडावयास हवा तेव्हा दुष्काळ व जेव्हा पाऊस नको तेव्हा महापुर अशी अवस्था होत आहे देशात सर्वत्र. अनिश्चित पाऊस हे दृष्य भारतासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या देशाला नक्कीच हानीकारक आहे. वीजेचे काय गुण गावावेत.. जेथे दिल्ली सारख्या राजधानी मध्ये पुर्ण २४ तास आपण विज देऊ शकत नाही तेथे सुदुर पसरलेल्या खेड्यांमध्ये आपण कशी वीज २४ तास देणार आहोत हेच मला अजून कळले नाही आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपला देश खरोखर सज्ज आहे ? हे मागेच आलेल्या वादळावरुनच समजते. माहीतीची देवाण-घेवाण मध्ये एवढी तफावत आहे की अनेकांचे जीव गेले तरी त्या संबधीत खात्याला त्याची आकडेवारीच नाही माहीत.

एकवीसावें शतक चालू होऊन पण आता नऊ वर्ष पुर्ण होत आलीत पण अजून पण आपण जाती व्यवस्था, आरक्षण व सबशिडीवर अवलंबून आहोत, रस्त्यावर चालणारे शेकडॊ हजारो व्यक्ती आपल्याला कुठल्या जातीचा माणूस टच करुन गेला हे पाहण्य़ासाठी वेळ नसताना फक्त फक्त आपल्यामध्ये राजकीय कारणामुळेच जातीव्यवस्था टिकून आहे, राहुल गांधी दलिताच्या घरात एका रात्री जेवला ही आपल्याकडे ब्रेकिंग न्युज असते तर भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष फक्त जातीय राजकारणामुळेच पोसले जातात. सबसिडी व्यवस्था / आरक्षण व्यवस्था ही देश आझाद झाल्यानंतर काही वर्षात मागे घेण्याची मागणी बाबासाहेबांनी केली असे कुठे तरी वाचले होते, पण देश आझाद होऊन ६० वर्ष झाली आपल्या खांद्यावर अजून ही आरक्षण / सबसिडी व्यवस्था आहेच उभी. आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत हे आपल्याला कळत आहे पण अभेद अशी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता व योग्य असा नेता नसल्यामुळे कुठेच काही फरक पडत नाही आहे.

काय होणार आहे काही कळत नाही आहे. निराशवादी मी नाही आहे पण समोर जे दिसत आहे, घडत आहे ते पाहून खरोखर मनामध्ये चलबिचल होत आहे. बघू काय घडतं ते.. महासत्ता होण्याच्या नादात आपण कुठेतरी आपली जाणीव हरवून बसलो नाही म्हणजे झाले.

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

... देवाचं घर !

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं...”देव सगळीकडे असतो”

’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.

कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!

आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...

गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.

जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.

दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.

भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.

उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.

आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?

बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.

मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.

सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.


*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर समक्ष्व.

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५

मैहरोलीला पोहचल्यावर सर्वात प्रथम काम केले ते कत्यानी मंदिर शोधण्याचे थोडीफार शोधा शोध करुन मंदिर शोधले व मंदिर कार्यालायात जाऊन सर्वात प्रथम पं. हरीकृष्णजीची माहीती विचारली तर तेथे एका सज्जन माणसाने सांगितले की हो पं. जी येतात पण सकाळ सकाळी. मी थोडा मनातून सुखावलो व म्हणालो ठीक कमीत कमी आपण येथे पर्यंत तरी पोहचलो व आता नाही तर कमीत कमी सकाळी तरी भेटतीलच, त्याच कार्यालयात विचारुन घेतले की जवळ पास राहण्याची सोय कुठे आहेत त्यांने समोरच असलेली कत्यानी धर्मशाला दाखवली व म्हणाला की जा तेथे रुम मिळेल. मी लगेच तेथे जाऊन कार्यालयात रुम साठी विचारणा केली, " भाई साब, एक रुम चाहिए था" समोरी व्यक्ती माझ्या कडे नखशिकांत पाहून म्हणाली " ठीक है, कहा से ? कितना समय के लीए रुम चाहीए ? " मी विचार केला की आज व उद्याचीच गरज आहे तेव्हा दोन दिवस असे सांगितले त्याने एक दिवशाचे १५०.०० रुपये घेतले व म्हणाला " कल का पैसा कल देना" मी धन्यवाद करुन रुम वर गेलो तर तेथे काहीच नव्हते, मी परत खाली कार्यलयात गेलो व बि़छाना तथा पाघंरुन ह्याची विचारना केली त्या ती दिली ही पण संगे ५०.०० रु. पण घेतले. सर्व सामान रुम वर पोहचवून तडक जवळच्या एसटीडी बूथ वर गेलो व सर्वात प्रथम दिवेदी जी नां फोन करुन सर्व कथा व कहाणी सांगितली व येथे दिल्ली ला आल्या बद्दलच माहीती दिली त्यांनी मला सांगितले की " राज बेटे, पत्ता नही कहा गलती है, पर तुम्ह निकल के दिल्ली पोहच चुके ही हो तो जहा रुके हो वही रुकना मै को देखता हूं कोई प्रबंध होता है क्या, तुम्ह मुझे कल फोन कर ना" ही रामगाथा सांगून फोन खाली ठेवला त्याच वेळी जाणिव झाली की जवळचे पैसे संपत आले आहेत व आता पैसे वाचवने गरजेचे आहे.

दिवस व रात्र कशीबशी निघून गेली व मी सकाळ सकाळी मंदिराच्या कार्यालयात जाऊन पुन्हा पंडीत जींची विचारणा केली तो म्हणाला की थोडा वेळ थांब येतीलचे, थोडा वेळ थोडा वेळ करत करत १०.०० वाजले पण ते काही आले नाहीत, माझ्या कडे पाहून तो म्हणाला " भाई, आज तो आए नहीं, तथा मेरे पास उन्हका कोई पत्ता तो भी नही है, यही मिलते थे रोज जरुरत नही पडी कभी पता जाणने की" मी हसून म्हणालो" कोई बात नहीं, आज नही तो कल सही" व परत धर्मशाळेत आलो व दिवेदींजींना फोन लावला पण ते फोन वर भेटले नाहीत आशा निराशा असा भावनिक खेळ चालू झाला होता पैसे झरझर करुन संपत होते व पंडित जी अथवा दिवेदी जी काय मला मिळायला तयार नव्हते अथवा देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते,

४ थ्या दिवशी मात्र पैसे संपले व मी हिशोब करु लागलो की कोठे कोठे खर्च केले व कीती पण त्याचा काहीच उपयोग नव्हता खिश्यामध्ये दमडी नव्हती तेव्हा हिशोब काय कामाचा. सकाळ पासून काही खाल्ले देखील नाही व संध्याकाळी धर्मशाळेने नियमाप्रमाणे पैसे मागितले त्यांना मी माझी अडचण सांगितली व म्हणालो की एक दिवसाचा मुक्काम राहू द्या, बेचारा तो देखिल नोकर माणूस पन त्याच्या मध्ये देव होताच त्यांने परवानगी दिली व म्हणाला" देखो भाई एक नही, दो दिन रुको यह तो धर्मशाला है ही, हम पैसे ईसलिए लेते है की थोडी साफ सफाई रहे तथा लोग आरामसे रह सकें " असे म्हणून तो पुढे निघून गेला. मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले व भुके पोटी विचार करु लागलो की आता काय ?

विचार करता करता बाहेर आलो तोच एक महाशय जे मंदिर कार्यालयात काम करायचे ते माझ्या जवळ आले व म्हणाले " भाई, अभी खबर मिली है की पंडीत जी बिमार थे इस वजह से व मंदिर नही आ रहे थे पर व कल सुबह यहा मिल जायेंगे" मी आनंदाने त्यांचे आभार मानले व म्हणालो " अब कोई फिकर नही रही काम हो ना हो कम से कम उन्हे मिलतो जाऊंगा ही"
सकाळ सकाळी मंदिरात गेलो व तर देवाप्रमाणे कार्यालयात पंडितजी बसले भेटले मी त्यांना ओळख तथा शर्माजींचा व माझा संबध ह्या विषयी माहीती दिली व म्हणालो की काही काम हवे आहे, पंडीत जी म्हणाले " हम्म, भाई देखो, शर्माजी तथा मै पुराने साथी रहे है तथा एक ही प्रांत के है, तुम कहा ठहरे हो ?वही आज भी रुक जायो मै तुम्हारे लिए किसी से बात करता हूं कल सुबह मिल लेना मुझे" मी त्यांचे आभार मानले व मंदिरात दर्शनासाठी गेले, तेथे पहिल्यांदा दिड दिवसानंतर अन्न प्रसादाच्या रुपाने माझ्या पोटात गेले व थोडा फार आराम भेटला."

दुस-या दिवशी सकाळी पंडित जीं माझ्या साठी बातमी घेऊन आले व म्हणाले की " बेटा, तुम्हारा काम हो गया है तथा तुम्ह यहा से झेंडावालान, करोल बाग जाओ तथा वहा ***** का कार्यालय है वहा तुम्हे श्री चारी जी मिलेंगे ठिक है, यह रहा पता तथा उन्ह का फोन नंबर,, मेरा नाम बता दे ना, जरुर तुम्हे काम देंगे वह मेरे बहोत अजीज स्नेही है" मी त्यांच्या चरणाला हात लावून नमस्कार केला व म्हणालो " पंडित जी, आपने जो मेरे लिए किया है, यह मै जिवन भर नहीं भुलुंगा" कार्यालयातील त्या व्यक्तीचे देखील आभार मानले व धर्मशाळेत जाऊन कपडे तथा पिशवी घेऊन कार्यालयात गेलो व त्यांना चावी हात देवून त्यांचे आभार मानले व म्हणालॊ की "मेरा काम हो गया है भाई साब, मैं अब यहांसे जा रहा हूं पर वापस जरुर आऊंगा आपसे मिलने" व तेथून सरळ मुख्य रोडवर आलो व एकाला विचारले की " भाई, करोल बागला रस्ता कुठला जातो ?" तो " अरे भाई, बसे जाओ बहोत दुर है " मी " नहीं भाई साब पैसे खत्म हो चूके है" मी हसलो.. पण ते हसू एकदम निराळे होते त्यामध्ये मला देखील एक निराशा जाणवली " तो म्हणाला " नये हो क्या ? रुक अभी तुम्हे बस मै बिठा देता हूं" व त्यांने जवळच उभी असलेल्या बसच्या चालकाशी बोलणी करुन मला बस मध्ये पाठवले मी त्याचे आभार मानले व म्हणालो देव अजून माझ्या बरोबरच आहे.

करोलबाग बाग पासून झेडावालान जवळच आहे, तेथे गेल्यावर मला ते कार्यालय तथा ती व्यक्ती देखील सापडली मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो " सर, मैं राज जैन, पंडीत जीं ने आपसे बात की होगी" ते आपल्या चष्मातून माझ्याकडे बघत म्हणाले " हम्म, क्या काम जाणते हो, यहा तो प्रेस का काम है, पंडीत जी बता रहे थे की तुम्हे Computer चलाना आता है" मी हो म्हणालो. ते म्हणाले " ठीक है, तुम्ह यही मेरे साथाआ काम करोगें तुम्हारे रहने का प्रबंध मै ने कही करोलबाग मे किंया है वहा अपने ही प्रेस का पुराना कार्यालय है फिलाल तुम वही रहना, पंडीत जी ने तुम्हारे बारे में बताया तो है सब लेकिन तुम फिर अपने बारे मैं बता दो" मी त्यांना सर्व राम कथा पुन्हा सांगितली व ते म्हणाले " अछा तो तुम महाराष्ट्र से हो, ठिक है सही जगह आये हो यहा बहोत सारे व्यक्ती मिलेंगे तुम्हे महाराष्ट्र के" व से म्हणून खिश्यातून ५००.०० रुं दिले व म्हणाले " यह रखना खर्चे के लिए तथा जरुरत हो तो मांग लेना ठिक है, अब तुम बाहर जो रामकिशन जी बैठे है उन्हे अंदर भेज तो मै उन्हे तुम्हे जहा रहना है बहा पोहचाने के लिए तथा वहा क्या कमी है यह देखने के लिए भेजता हूं"

थोड्या वेळाने चार-पाच अरुंद असे बोळ फिरत मी एका चागल्या बांधले गेलेल्या बिल्डींग समोर उभा राहिलो व रामकिशन जी आपले आत जाउन चावी घेऊन परत माझ्या कडे आले व म्हणाले " देखो वह उपर तीसरे माले पे दुसरा कमरा है ना उसकी यह चावी है, पहले वाले कमरे मे मै रहता हूं, जा, कुछ जरुरत हो तो बोलना मुझे, बिस्तर तथा बाकी जरुरत की चिजे देखील है उपर" मी त्याला म्हणालो" भाई, कमरा तो बाद मै भी देख लूंगा फले मुझे खाना खाना है दो दिन हो गए है अच्छा तथा सस्ता कोई हॊटेल बता दो जहा मैं खाना खा सकूं" तो हसला व मला संगे घेऊन गेला एका हॊटेल मध्ये मालकाशी माझी ओळख करुन दिली व माझे खाते तेथे चालू करुन म्हणाला " देखो, यहां सुबह, शाम खाना खा के यहा लिख देना पैसे महिने के आखिर में दे देना ठिक है"

मी जेवण करुन सरळ आपल्या खोली कडे आलो व दरवाजा उघडून आत प्रवेश केला...

क्रमशः

रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

भावना तीव्र आहेत....

हा हा हा !

एकदम हसु आलं !

भावना तीव्र आहेत.... हसतो आहे ह्याचे वाईट नका वाटून घेऊ..

जेव्हा ताजा घाव असतो ना तेव्हा वेदना पण तीव्र असतात...
दिवाळी जवळ आली की जीव घाबरतो..
किती जणांचे संसार रस्तावर येणार...
ह्या भितीने नाही..
किती जीव जाणार..
ह्या काळजीमुळे सुध्दा नाही..

कुठे तरी मार्केटमध्ये...
विस्फोट होईल..
कळत नकळत मी पण तेथे असेन..
कुठे हात.. कुठे पाय..
शरीराचे असंख्य तुकडे..
गोळा होतील का नाही ?
शव नाही राख तरी घरी पोहचेल...
ह्या काळजीने घाबरतो जीव ..

वेदना तीव्र आहेत...
पण त्याचे प्रतिबिंब..
सरकारी...मालमत्तेवर..
कुठे बस... कुठे रेल्वे..

पण जेव्हा मत देता तेव्हा..
कुठे जातात वेदना..
दोन ठेंब दारुचे...
चार नोटा गांधीच्या..
बस.. दावादारु..
दोन्ही हातात..

वीराची वेदना..
त्याच्या चार भींती..
मध्ये अर्धांगणीच्या..
पुसलेल्या कुंकु मध्ये..
पोराच्या डोळ्यातील..
सुकलेल्या आश्रुमध्ये..

खरोखर वेदना तीव्र आहेत..
पाठ फिरवून वेदना
लपवण्याची..
सवय आहे..

चार तुकड्यासाठी..
राबराब राबताना..
कुठली वेदना..
कुठले शल्य..

दिसली शहिद ज्योत..
सलाम मारला..
डोळ्याचे पाणी..
आटलेलेच.. आता
रक्त पण सुकलेलेच..

साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे

३०० नक्षलवाद्यांचा जमावडा ..
चार बाजूने हल्ला..
मर्यादित शस्त्रसाठा...
४० जणांच दल..
अंधाधुंद गोळीबार...
सगळेच जखमी...
मदतीसाठी हाक...
पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर..
राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये..
पाच तासाची तगमग...
दलातले १७ जण ठार....
चार हेलिकॉप्टर..
आहेत म्हणे सेवेसाठी..
सगळेच निकामी..
१७ जीव गेले ...
नेत्याची सभा पुर्ण झाली..

पोरगं पडलं बोरवेल मध्ये ..
मिडिया २४ तास जागी..
मिलेट्री लावली...
हेलिकॉप्टर ने मंत्री पोहचले..
१७ जीव गेले..
मिडिया ला बाईट ..
नाही मिळाली..
चार जाहिराती मध्ये..
थोडी जागा वाचली..

नेत्याची सभा..
राजनीती सर्वत्र...
प्रत्येक स्टार नेत्यासाठी...
हेलिकॉप्टर उभे खास..
तडपडून १७ जीव पडले..
मंत्री साहेब आले...
हेलिकॉप्टरने खास..
सलामी आखरी दिली..

जेव्हा देशाची सुरक्षा करण्या-या ह्या वीरांनाच आपण प्राथमिक सुविधा देऊ शकत नाही तेथे सामान्याची काय गत...

माझा मित्र म्हणतो मला
नेहमीच आपल्या DNA मध्येच लोच्या आहे... यार
साला आपण आपल्या लोकांसाठीच करत नाही..
राष्ट्रभक्ती नावाचा हिस्साच नाही आपल्यामध्ये..
नेत्याचे पाय चाटण्यासाठी लाखो खर्च..
एका १९४० मेड बंदुकीने लढण्या-या शिपाईसाठी..
पैसाच नाही.. बुलेट फ्रुफ सोड..
च्यामायला लाच फ्रुफ एक पण सिस्टम नाही !
कश्याला रहावे ह्या देशात..
जेथे आपल्या सैन्याचीच कदर नाही..
करोडोंचे पुतळे स्वतःचे उभे करतात..
पण पोलिसांसाठी थोडे चांगले...
हत्यार आपण मागवत नाही..
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
माणसाच्या जिवनापेक्षा ..
पशुच्याच जिवनाची काळजी जास्त आहे..
कुत्र्यासाठी उपोषण करणारे खुप आहेत आपल्या येथे
पण गेलेल्या जीवाचा जाब विचारणारी कोणीच नाही..
बेक्रिंग न्युज खुप आहेत...
तो दलिताच्या घरात जेवला
तो खुर्चीवरुन पडला..
ज्याच्या रक्ताचा सडा पडला..
मातीसाठी..
त्या मातीचा लाल रंग ह्या..
कॅमेरावाल्यांना कधी दिसलाच नाही...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
कधी दिवाळीला फुटतात फटाके..
बझारामध्ये दिल्लीच्या..
तर कधी सिरियल ब्लॉस्ट..
कधी महानगरच वेठीस ठेवतात..
चार कुत्री अधेमध्ये..
लढण्यासाठी.. चार बंदुका..
दोन कवच व बाकी...
निधडी छाती उघडी वीरांची...
लाकडाच्या काठ्या....
मोजलेल्या चार गोळ्या.. ३०३ च्या
करोडोचा निवडूणुक खर्च सगळ्यांचा..
तो देशी तो परदेशी...
ताकत सगळी तिकडे...
सुतळी वरती...
साप सोडला कधीच वा-यावरती...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार
ज्यांना मारायला आला तो भडवा..
त्याचीच राखण करतात हे चोर..
चार गोळ्या त्याच्या कमी पडल्या..
चार मारु दिले असते नेते यार..
मग संपवला असता त्याला तेथेच पार..
मजा आली असती.. चार शहीद पुतळ्यांची भर..
चार माजोरड्या लांडग्यांची गिनती कमी..
फाशी देऊन पण झाली वर्ष अनेक..
चिकन बिर्याणी तोडतो आहे..
त्याचा यार...
साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार

माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४

काल जे शर्माजींनी सांगितले होते ते खरे आहे का ? ह प्रश्नच मला टोचत होता, मी विचार केला की खरं खोटे आपण स्वत:च शोधायचे व त्या तयारीला लागलो, दुपारी कामावरुन आल्या आल्या प्रथम कुच केली ती त्या रोडवरील माझ्या माहीतीच्या पण तेथे पुर्वीपासून राहत असलेल्या रामावतार कांका कडे मी नमस्कार करुन त्यांच्या सोबत बोलत बसलो व गल्ली ते दिल्ली ह्या सर्व विषयांवर बोलून झाल्यावर मी मुळ मुद्द्यावर हात घातला,"काका, आप यहा शर्माजीं को कबसे जानते हो ?" काका " अरे अपने शर्माजी जो तुम्हारे साथ रहते है वहीं ना, उन्हे तो मै काफी अरसे से जाणता हूं ... कम से कम १० साल से, क्यूं क्या बात है ? कोई परेशानी है क्या उन्ह से ? अरे उन्ह की किसी भी बात का बुरा मत मान ना बेचारा सरल आदमी है, बस किस्मत का मारा है, नहीं तो यह भी आज संघटन मैं काफी उप्पर तक पोहच जाता" माझा विश्वास पक्का झाला व मी त्यांना अजून खोदुन विचारले की " क्या हूआ उन्ह के साथ ?"
काका " कुछ नहीं बेटा यह सब सत्ता तथा अधिकार की माया है बाकी कुछ नहीं, कुछ साल पहले यह कुमाऊं से यहा आया था, बडे बडे विचार तथा सपने मन में रखकर, खुद एक पेशे से शिक्षक था यह यही एक स्कुल में बच्चों को पढाता था, लेकिन एक दिन एक नेता की बातो में आ गया , तथा काम छोड के उस के आगे पीछे घुम ने लगा पर यह था होशियार इस कारण जल्दी ही ऊसने अपनी जगह बना ली थी, पर यहा प्रांत के कुछ लोगों कों यह रास नहीं आया तथा झुठेमुठे किस्से संघटन में इसके नाम से फैला दिए तथा एक दिन तो कुछ लोगोंने उसे पिटा भी. तब कही जा कर यह संघटन से बाहर हो गया खुद ही, यह तो अपने गांव वापस जाना चाहता था उसी समय पर राजींव जीं के गुरू तथा भाई प्रेमप्रकाश जीं ने उन्हे जाने नही दिया तथा उसे आगे कुछ काम देने का वादा कर कर अपने साथ यही धर्मशाले में जगह दी, पिछले ५ सालों में ना उसे काम दिया ना उसकी कोई सुध ली... दो टाईम का भोजन यही धर्मशाला में मिलता ही था तथा एक दिन उसकी बुढीं मां भी चल बसी वहा गांव मैं तो यह रह गया अकेला ब्रम्हचारी बनकर अपना जिवन निठ्ठलो कि तरह निकाल रहा है बचे हूंये जिंदगी के पल. अभी कुछ दिन पहले ही बता रहा था उसे यकीन ही नही तो विश्वास अभी है की प्रेमप्रकाश ही वह व्यक्ती था जीसने उसे पिटवाया तथा संघटन से बाहर करवा दिया... मुझे तो विश्वास था ही मै उसे भी अच्छी तरह जान ता हूं थोडा लालची किस्म का आदमी है यह प्रेमप्रकाश... पर बेटे तुम्हारा काम कैसा चल रहा है ? तनख्वा तो समय पर मिल रही है ना ?" मी म्हणालो हो सगळ व्यवस्थीत आहे, व तिथून बाहेर पडलो, व हरिद्वार ला आल्या पासून आज पर्यंत च्या घडामोडी वर पुन्हा पुन्हा विचार केला व संघटनेत माझी ओळख करुन देताना राजीव जीं तथा इतर व्यक्तीनीं केलेली माझी स्तुती मी जरा वेगळ्याच नजरे ने पाहण्याचा प्रयत्न केला व एक निश्चय करुन घरी परतो.

थोडी जास्त नसली तरी आनंद व माझी बोलचाल बंदच होती कधी कधीच एकमेकांशी बोलत असू पण ह्यावेळी मी स्वत: आनंद जवळ जाऊन क्षमा मागीतली व त्यांच्या संगे नेहमीच्या पध्दतीने बोलणी चालू केली व काही दिवसामध्येच तो ही पुर्वी प्रमाणे हसत-खेळत माझ्याशी राहू लागला व माझ्या बरोबर पुन्हा गंगेच्या किनारी येऊन तास तास भर बसू लागला त्याच वेळी मी त्याच्या बद्दलची माहीती त्याच्या कडुन काढून घेतली व कथा थोडीफार तशीच होती जी स्वप्ने शर्माजी तथा मला दाखवली गेली होती तीच स्वप्ने तो देखील आपल्या उराशी बाळगून बसला होता, तेव्हा मात्र मी पुन्हा पुन्हा विचार करु लागलो की काय करावे ? रस्ता शोधणे खुप गरजेचे व निकडीचे झाले होते मला माझे जिवन अश्या या धर्मशाळेत अथवा कोणाची जी हूजूरी करत घालवायचे नव्हतेच तेव्हा मी ठरवले की कामावर गेल्यानंतर ह्यांचा काय तो निकाल लावायचाच.

कामावर पोहचल्या पोहचल्या मी सर्व प्रथम जो व्यक्ती मला भेटण्यासाठी योग्य वाटला तो म्हणजे आमचे अकांन्टट श्री. जगराम सिंग जी त्यांना जाउन मी माझ्या हिशोबा बद्दल विचारले, माझा पगार हा कोणाच्या मार्फत राजीवजींच्या जवळ जातो व किती ? आता मात्र मला चक्कर येण्याचीच वेळ आली होती... कारण माझ्या हिशोबाने माझा पगार हा १८००.०० रु होता व तो नेहमी मला राजीवजींच्या मार्फत मीळत होता पण येथे तर मोठेच लफडे चालू होते.... माझा पगार हा कार्यालयातून आनंद मार्फत राजीवजींना मिळायचा ३८००.०० रु. व माझ्या हाती यायचे फक्त हजार रुपये तथा राजीवजी म्हणायचे की तुझे आठशे रु. हे माझ्या कडे जमा राहतील ज्यावेळी तुला गरज लागेल तेव्हा तु परत घे... झाले मी मात्र तेथेच मटकन बसलो व म्हणालो धोका, असला कसला हा धोका छे कोणावर भरोसा करुन फायदा नाही एकतर पुर्ण पगार नाही जे मीळत होता त्यातील देखील अर्धे हाती.... नकोच आज काहीतरी फायनल करुच. त्याच क्षणी परत हरिद्वारच्या बस मध्ये बसलो व तडक शर्माजींच्या जवळ गेलो व सर्व कहानी-कथा त्यांना सांगितली डोळ्यातून रागाने पाणी वाहू लागले होते व शर्माजी मला समजावून सांगत होते की अजून काही फरक नाही पडला आपला रस्ता बघ .. नवीन मार्ग शोध काही जास्त नुकसान झाले नाही उलट तु येथेच येऊन काही ना काही शिकला आहेस, माझ्या ही डोक्यात ही गोष्ट व्यवस्थीत बसली की चल काही हरकत नाही आपण मार्ग काढूच.

शर्माजीं आपल्यापरीने माझ्या साठी काही मार्ग निघतो का हे शोधत होते व एक दिवस त्यांनी मला सांगितले की जर तु दिल्ली ला गेलास तर काहीतरी तुझी व्यवस्था होईल बघ प्रयत्न करुन तेथील कार्यालयातील एका व्यक्तीचे नाव व पत्ता त्यांनी एका कागदावर लिहून दिले व म्हणाले बघ कधी जातोस ते. मी दिल्ली येथे जाण्याचा मार्ग शोधू लागलो पण काहीच कल्पना येत नव्हती की दिल्ली ला जाणार आहे हे राजीव जींना सांगावे की न सांगाता जावे ? विचार करुन करुन डोके पकले होते, रात्र रात्र भर जागे राहून मी विचार करायचो की कसे येथून बाहेर पडावे, काय मार्ग शोधावा.... व एक दिवस मी मनाचा पक्का इरादा करुन राजीव जीं समोर गेलो व म्हणालो " राजीव जीं, मै थोडा दिल्ली जाके आना चाहता हूं, वहा मेरे प्रांत के कुछ लोग रहते है उन्हे मिल के वापस आना चाहता हूं अगर आप जाने की इजाजत दे तो" राजीव जीं नी थोडा फार विचार केला व म्हणाले " ठीक है लेकिन वापस जल्दी आना नही तो काम पें बुरा असर पडेगा ठीक है, आनंद इसे कुछ रुपये दे दो "

दोन हजार रुपये व आपले सर्व कपडे घेउन मी शर्माजींच्या जवळ गेलो व त्यांना नमस्कार करुन म्हणलो " मैं जा रहा हूं शर्माजी आपने जो सहयोग तथा प्यार दिया उसके लिए मै पुरी जिंदगी आपका अहसानमंद रहूंगा" असे म्हणून मी लगेच तेथून बाहेर पडलो व बिर्ला मंदिर तथा गीता भवन वर जाऊन देवाचे दर्शन घेतले व गंगेचे पाणी डोक्याला लावून तडक रेल्वे स्टेशन वर जाऊन गाडीची वाट पाहू लागलो.

दिल्ली .... बाप रे देशाची राजधानी दिल्ली.... प्रचंड मोठे शहर व शहराचे नाव सोडले तर मला काहीच माहीत नाही नव्हते की कुठे उतरावे कुठे जावे व काय करावे ? शर्माजींनी जो पत्ता दिला होता तो मी जवळ जवळ पाठ करुन ठेवला होता, सकाळी सकाळी दिल्ली रेल्वे स्टेशन ला मी जेव्हा उतरलो तेव्हा मात्र मनाची धाक धूक वाढलीच होती मी एकटा ज्याच्या भरोश्यावर येथे आलो आहे त्याला कधी जिवनामध्ये देखील पाहीले नव्हते त्याला काय सांगायचे व कसे करायचे ह्याचाच विचार करत मी रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो व एका माणसाला विचार ले "भाई यह रोहीणी कहा है ? " तो मला म्हणाला " रिक्षावाले से पुछ" मी तडक एक रिक्षावाला पकडला व विचारले " भाई साब, यह रोहीणी कितनी दुर है ? " तो म्हणाला " अरे पास ही है, बोला कहां छोड दु" कोल्हापूर नंतर रिक्षात बसण्याचा हा माझा पहिला योग मी म्हणालो चल जवळच आहे म्हणतो आहे त जास्तीत जास्त ३०-४० रु घेईल व जाऊन रिक्षात बसलो, २ तासानंतर रिक्षा त्यांने एका रस्ताच्या बाजूला उभी करुन तो म्हणाला " हां भाई रोहीणी तो आगयी अब बता किस गली मकान मैं जाना है ? " मी त्याला थोडी फार माहीती दिल्यावर त्यांने त्या घरासमोर मला उभे केले व म्हणाला " हा भाई उतरो अब ३५०.०० रु. दो" मला चक्कर च आली व थोडे बहोत त्याच्याशी भांडलो देखील व आसपासच्या लोकांना बोलवून मी थोडा फार दंगा देखील केला तेव्हा मात्र तो रिक्षावाला नरमला व २५०.०० रु. वर तडजोड करुन निघून गेला., पण मला हा २५०.०० रु. फटका खुप मोठा पडला होता. मी घराची बेल जावली तर थोड्या वेळाने एक मुलाने दरवाजा उघडला व त्याच्या पाठोपाठ त्यांचे वडीले देखील बाहेर आले, मी त्यांना नमस्कार केला व विचारले की " पं. हरीकृष्णजी से मिलना था क्या वह घर पे है ? " ती व्यक्ती मला म्हणाली " भाई, यहा तो हरीकृष्णजी तो अब नही रहते कुछ साल पहले ही वह अपना यह मकान मुझे बेचकर कही मैहरोली रोड पे रहने चले गये है" माझ्या पायाखालची जमीनच खसकली व मी त्यांना पुन्हा विचारले " भाईसाब, क्या आप के पास उन्ह का पुरा पत्ता या फोन नंबर है, मेरा उन्हसे मिलना बहोत जरुरी है " पण हाय देवा ह्याच्या कडे त्यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हती पण एक मात्र गोष्ट त्यांने माझ्या कामाची सांगितली की ते सकाळ सकाळी मैहरोली रोड वरील कत्यानी मंदिरामध्ये जरुर येतात, मी त्यांचे आभार मानून मैहरोली जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो, थोड्यावेळाने कळाले की येथून प्रथम नेहरु प्लेस किंवा करोलबाग ला जावे लागेल व तेथून मैहरोली ला बस मिळेल. मी तडक करोलबाग बस मध्ये बसून मैहरोलीच्या रस्तावर आलो.

क्रमश:

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३

त्यानंतर मी व राजीव जी काही दिवसानंतर त्यांच्या हरिद्वार कार्यालयात आलो, व तेथे माझी राहण्याची व खाण्य़ापीण्याची व्यवस्था केली गेली तेथे माझ्या सम-वयाचा एक मुलगा "आनंद" तथा माझ्या पेक्षा वयाने कमीत कमी २० वर्षे मोठे शर्माजी होते, ह्यांचे नाव कधी विचारलेच नाही कारण सर्वजण त्यांना शर्माजी म्हणत व मी देखील त्या सर्वांसोबत त्यांना शर्माजींच म्हणू लागलो, हर की पॊडी पासून १ किंमी च्या अंतरावरच आमची धर्म शाळा होती व समोर च्या घरांची व दुकानांच्या ओळी मागे गंगा नदी वाहत होती, काही आठवडे तर मला हे देखील माहीत नव्हते कि आम्ही जे पाणी अंघोळी साठी व पीण्यासाठी वापरतो ते गंगेचे पाणी आहे जे पाणी शेकडो , लाखो नाही नाही करोडो लोक आपल्या जिवनाच्या शेवटच्या क्षणी उपयोगी पडावे म्हणून लहान लहान चंबूतून कोणी बाटल्यामधून आपल्या घरी ठेवतात, काय योगायोग असतो एकाच्या जिवनामध्ये नाही... लहान पणी आजोबा म्हणायचे की तु कुलदिपक, घराण्यातला एकुलता एक मुलगा.. तुच शेवटी गंगेचे पाणी माझ्या तोंडी खालशील. त्यांची ईच्छातर पुर्ण झाली नाही पण दिवसाचे २४ तास मी मात्र गंगेच्या सानिध्यात राहत होतो.

आनंद व माझी सुरवातीलाच चांगली मैत्री बनली व तो माझ्या बरोबर कधी गंगेच्या तीरावर तर कधी बिर्ला मंदिरामध्ये... तर कधी वेळ मिळालाच तर लक्ष्मण झुल्यावर फिरु लागला, शर्माजी व माझी आध्यात्मिक जोडी छान जमली व तेथेच पहील्यादां रामायण ही वाचले व महाभारत ही , तसेच अनेक.. कथा त्यांच्या सोबत वाचल्या, राजीव जी संस्थे मध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या आज ईकडे उद्या तिकडे अशा वा-या चालतच असत, माझा हरिद्वारचा स्नेह बंध असा बांधला गेलाच होता पण त्यावर मानाचा तुरा खोवला तो राजीव जींनी एक दिवस एक बातमी घेऊनच ते कार्यालयात आले व मला बोलवले " राज, कल से तु अपने एक स्नेही श्री निरंजन जैन जी के यहां जायोगे तथा उन का एक कॊलेज है यहा रुडकी में तुम वहा काम करना ठीक है कल मैं तुम्हे एक पत्र के साथ वहा भेजूंगा लेकिन सुबह जल्दी जाना होगा करीब ६.०० बजे तुम्हे वह अपने कार्यालय में मिलेंगे." वाह माझ्या तोंडातून दुसरे काहीच बाहेर पडले नाही व मी सकाळ सकाळी तयार होऊन जैन साहबांच्या कार्यालयात ५.५० लाच पोहचलो व त्यांचा फायदा देखील मला त्याच वेळी झाला व त्यांना माझ्या वेळेत कामावर येण्याबद्दल सागण्याची गरजच राहीली नाही. मी तेथे काम करु लागलो प्रथम प्रथम कार्यालयातीलच छोटे छोटे काम मला दिले गेले जसा एक चपराशी पण मी काही कुरकुर न करता काम करु लागलो दिवसामागून दिवस जात होते अशीच चार महिने गेली एक दिवस मी थोडा वेळ मोकळा होता म्हणून कार्यालयातल्याच संगणकावर बसून गेम खेळू लागलो कसा वेळ गेला कळालेच नाही पण त्याच वेळी जैन साहेब हे माझ्या पाठीमागे उभे राहीले होते, त्यांनी माझी गेम संपल्यावर मी जसा उठलो तसेच ते बोलले " राज जैन, आप मेरे साथ थोडी देर बात करोगें अभी" त्यांचा दरारा मला माहीतच होता मी नखशिखांत हादरलो होतो दरदरुन घाम फुटला होता व मी विचार करतो होतो आता काय उत्तर द्यायचे ह्यांना व नंतर काय सांगायचे राजीव जींना ज्यांनी आपला शब्द टाकून मला येथे कामावर लागले होते.

जैन साहेब " तुम्हे यह पीसी चला ना कबसे आता है ? "
मी : " जादा कुछ नही आता सर, पहले मै एक सेंटर चला ता था तब थोडा बहोत सिखाता पर उसे भी अब दो साल हो चूके है सिर्फ कभी कभी गेम खेलता था यही पर"
जैन साहेब : " ठीक है, कम से कम तुम्हे यह तो मालूम है ना की पीसी क्या होता है तथा काम कैसे करता है. तो कल से तुम अरविंद वर्माजी के साथ काम करोगे तथा computer Lab का रख्रखाव देखोगे" मी ठीक आहे म्हटलं व दुस-या दिवसापासून नवीन कामाला सुरवात देखील केली.

अरविंद वर्मा एक गुणी व अत्यंत आनंदी असणारा माणूस ह्याला हसण्यासाठी काही कारणाची गरज देखील लागत नसे व स्वभाव एकदम गरिब त्यामुळे त्यांची व माझी जोडी एकदमच मस्त जमली व त्यांनी मला संगणक व संगणकाचे काम ह्या बद्दल माहीती देण्यास सुरवात केली पहिल्या महिन्यात खुपच अवघड गेले कारण एक तर हिंदी व English दोन्ही बाजू माझ्या कुमकुवत होत्या व संगणकात ह्या शिवाय काहीच चालणार नव्हते तेव्हा मात्र गोची झाली मग मात्र अरविंद सरांनी माझी रोजच्या रोज इंग्रजी तथा हिंदीचा क्लास चालू केला रोज अर्धा एक तास ते मला दोन्ही भाषेतील महत्वाचे व रोज उपयोगी पडणारे शब्द तथा वाक्य शिकवू लागले व त्याच बरोबर मी त्यांच्या मदतीने संगणकावर हात फिरवू लागलो व काही दिवसामध्येच मी पत्रे प्रिंन्ट करणे व खर्चाच्या नोंदी ठेवण्यासारखे काम करु लागलो, त्यांना त्यांनी मला नवनवीन प्रणाली देखील संगणकावर वापरणे शिकवले.

दिवसामागून दिवस जात होते व मला हरिद्वार येथे येऊन ५-६ महिने झाले होते पण पगार अजून फिक्स झाला नव्हता व जो रोज खर्च मिळत होता तो राजीव जींकडून मिळत होता तेव्हा मी एकदा राजीव जींना ह्या बद्दल विचारले तर त्यांनी काळजी करु नकोस असे सांगितले, काही दिवसानंतर मात्र त्यांनी मला बातमी दिली की तुझा पगार हा १८००.०० रु. आहे व तो मला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळणार होता. मी खुपच आनंदलो आता येथे काम करण्याला एक सकारात्मक परिणाम मला भेटला होता व मी जीव तोडून संगणकाचे शिक्षण नेटाने चालू ठेवले, कधी कधी कार्यालयीन काम संपल्यावर देखील मी संगणकावर बसून असे तेव्हा ही बातमी चपराशीच्या मार्फत जैन साहबांना कळाली व त्यांनी अरविंदकडे ह्या विषयी विचार ना केली की कार्यालय बंद झाले असताना देखील राज कोणाच्या परवानगीने कार्यालयात उशिरापर्यंत थांबत आहे ? तेव्हा अरविंद सरांनी खुप प्रयत्न करुन माझी शिकण्याची ईच्छा व माझा पुढे संस्थेला होणारा फायदा ह्याबदल जैन साहबांना सांगितले तेव्हा मात्र मला एकदम कायदेशीर परवानगी मिळाली उशिरापर्यंत काम करण्याची तथा माझ्या साठी ग्रंथालय व संगणक खोली ही मी जाऊ पर्यंत खुल्ली ठेवण्याची परवानगी तसेच जाताना सर्व दरवाजे व खिडक्या बंद आहेत ह्याची खात्री करुन जाण्याची अट घातली गेली, ह्या सगळ्या गोष्टी बस मधून जाताना अरविंद सरांनी सागितल्या व माझ्याकडुन २००.०० रु. मागितले व म्हणाले " मै आप को कुछ जरुरी किताबे तथा सीडी ला के देता हूं जिसकी मदत से आप अपना काम जल्दी सिख सकोगे. " मी त्यांना सांगितले की मला पैसे राजीव जी कडे मागावे लागतील व मी ते शक्यतो उद्या देऊ शकेन व तो विषय तेथेच संपला पण मी घरी पोहचू पर्यंत विचार करत होतो की कुठल्या तोंडाने राजीव जींकडे पैसे मागू माझे राहणे , खाने, गाडी खर्च तर तेच देत होते व त्यांच्यावर आणखी किती ओझे टाकायचे ? मी विचार करता करता घरी पोहचलो व शर्माजींना माझी अडचण सांगितली तेव्हा मी शर्माजींना एक पार्ट-टाईम काम माझ्या साठी पाहण्याची विनंती करुन मी गंगे किनारी जाऊन बसलो.

माझ्या जवळच एक सज्जन व्यक्ती बसले होते व ते काहीतरी श्लोक तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते व मला ते श्लोक कुठेतरी वाचल्या सारखे अथवा कानावरुन गेल्या सारखे वाटले व मी त्याची पुजा संपल्यावर त्यांना त्या श्लोकासंबधी माहीती विचारली, ते एकदम खुश होऊन म्हणाले " अरे भाई यह श्लोक तो भगवत गीता अध्याय में से है " व त्यांनंतर माझ्याशी गप्पा मारता मारता ते म्हणाले " देखो वहां जो बिर्ला मंदिर है ना उसके पिछे ही गीता भवन है तुम्ह वहा आ जाना सुबह या शाम को, बहोत सारे भक्त आते है तथा भक्ती में गाते रहते है तुम्हे भी आनंद मिलेगा" मी म्हणालो " ठिक है, वैसे भी मै काम से ५.०० बजे तक फ्री हो जाता हूं मै अवश्य आ जाऊंगा"
मी तेथेच थॊडा वेळ बसलो व नंतर बिर्ला मंदिरात जाऊन बसलो हे जे बिर्ला मंदिर होते ते एक नितांत सुंदर मंदिर होते व ६ फूट मंदिर हे गंगेमध्ये होते, मला येथे खुप शांती मिळायची व मी विचार करायचो की बिर्ला जींनी हे मंदिर उभे करताना काय विचार केला असे व त्यांनी इतके पैसे मंदिरांसाठी का लावले असतील तर त्यांचे उत्तर मला तेथेच बसल्या बसल्या मिळायचे की मनाची शांती त्यासाठी मंदिर उभे करण्याचा खर्च काहीच नसेल त्यांच्यासाठी.
* हेच ते बिर्ला मंदिर जो भाग पाण्यामध्ये आहे तेथे बसण्याची व जाप करण्याची सुविधा आहे .


संध्याकाळी जरा वेळानेच ६.०० वाजता मी गीता भवन मध्ये गेलो व तेथे त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करु लागलो तर ती व्यक्तीच समोर आली व म्हणाली " आजा बेटे, देखो आज सारे लोग यहा समय पर आ गए है तुम्हारी ही कमी मुझे लग रही थी, जा ओ पहले मुरारी जीं के दर्शन कर के आ जाओ हम आज भजन यही बैठके करेंगे" मी मंदिरामध्ये जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व परत त्यांच्या बैठकीत आलो तर तेथे माझी ओळख करुन दिली व माझी देखील मी ओळख करुन दिली. काही काळ जवळ जवळ एक तास-दिड तासानंतर मी परवानगी घेऊन बाहेर आलो व माझ्या पाठीमागेच एक व्यक्ती बाहेर आला व म्हणाला " भाई, जरा सुनना मै रवी मुनराल हूं यही रहता हूं तथा मेरी छोटीसी दुकान है यही रोड पे आगे चल के, अभी तुम बता रहे थे की तुम कॊम्पूटर के जाणकार हो तथा तुम्हारे पास शाम का समय फ्री रहता है ? " मी म्हणालो " नहीं टाईम तो फ्री है लेकिन दुकान का अथवा आपके हिसाब किताब का काम नही देख सकता इतना भी मुझे अभी आता नही है" व मी त्यांच्या कडे पाहू लागलो व मनात विचार केला बघ लेका कसे लगेच लक्षात आले माझ्या की तू कामासाठीच विचारणार आहेस ते. पण तो विचार मनात येतो तोच ती व्यक्ती परत म्हणाली " नहीं नही मुझे दुकान के काम के लीए नही चाहीए आपका समय, मेरा एक बेटा है उसे मे सिखा ना चाहता हूं, तथा यहा आसपास कोई है नही सिखाने वाला मै दिल्ली से क कॊम्पूटर ले के घर में रखा है लेकिन उसे सिखा नही सकता मैं अगर आप अपना थोडा समय देतो वह भी कुछ सिख जाएंगा" मी त्यांना म्हणालो राजीव जींना विचारुन सांगतो व मी तडक आपल्या घराकडे निघालो तर वाटेत शर्माजी तथा राजीवजी भेटले व ते मलाच शोधत होते कासावीस होऊन.

राजीव जी " राज यह कोई तरीका है तुम पिछले चार घंटे से गायब हो किसी को अत्ता पता नहीं की कहा चले गये हो, हम तो परेशान हो गये थे, उस अरविंद का फोन आया था कि तूम पैसे को लेकर चिंतीत हो, तभी शर्माजी भी कह पडे की हा तुम परेशान हो हम ने सोचा की तुमने कही.... नहीं भगवान का लाख लाख शुक्र है की तुम सही सलाम हो कहा गये थे ? "
मला माहीतच नव्हते की माझ्यासाठी इतका गोंधळ तेथे कार्यलयात व घरामध्ये चालला आहे की ह्यांनी विचार केला की मी जीवाचे काही बरे वाइट करुन घेतले असावे व त्याच शंकेने ते गंगेचा तीरावर मला शोधण्यासाठी निघाले होते. मला हसू आवरले नाही व मी म्हणालो " राजीवजी मै आप को जान देने वालों में से लगता हूं क्या ? मै तो प्रथम बिर्ला मंदिर बाद में गंगा के किनारे तथा आखिर मैं गीता मंदिर चला गया था भजन करने... नहीं सुनने" त्या नंतर राजीव जीं शी मी रवी मुनराल ह्यांच्या विषयी सांगीतले तर ते लगेच म्हणाले " बेटा, जाना तुम्ह उनके पास अच्छे लोग है तथा तु किसी को सिखा दोगे तो तुम्हारे लिये भी अच्छा रहेगा तुम्हारा अभ्यास होता रहेगा ठीक है ना ? " मी त्यांना हो म्हणालो व आपल्या खोलीत जाऊन बसलो.

आज आनंदचा मुड खराब दिसत होता व तो राजीवजीं काही बोलत होते व मला असे वाटले की माझा विषय चालू आहे बाहेर म्हणून मी लगेच बाहेर आलो तर राजीव जीं आनंदला सांगत होते की " मै राज से बात करता हूं" व मी त्यांना विचार ले की काय झाले ? तर राजीव जींनी आनंदला बाहेर जाण्यासाठी सांगितले व मला आपल्या जवळ बसवून म्हणाले " बेटा, देखो यह आनंद भी तुम्हारे ही साथ का है वह हम सब के लिए खाना बनाता है, चाय बनाता है तुम भी कभी कभी समय मिले तो उसकी मदत किया करो वह यहि तो कह रहा था ओर कुछ नही, बस थोडासा काम बाटलो उसे भी सकुन मिलेगा व तुम्हे भी. क्या कहते हो ?" मी विचारातच पडलो म्हणालो " राजीव जी, अगर यहि बात थी तो वह मुझे भी तो कह सकता था, मै तो सुबह का अपना खाना खुद बना ता हूं तो शाम को भी मै उसकी मदत कर सकता हूं कोई बडी बात नहीं थी इसमें की आप को बताया जाये" व आनंद व माझ्यामध्ये पहीली धुसपुस येथे मी संपुष्टात आणली.

रोज सकाळी पाच वाजता उठून सकाळ सकाळी गंगेच्या बर्फासारख्या पाण्याने आंघोळ आवरुन , स्वत:चे जेवण व डब्बा तयार करुन मी ७.०० वाजता विध्यालयात पोहचत असे व दुपारी १.०० वाजता सुट्टी झाली की दोन तास संगणकावर प्रयोग करुन मी ३.०० / ३.३० च्या सुमारास घरी परतत असे व नंतर एक तास भर रवी जीच्या मुलाला संगणक शिकवत असे, व संध्याकाळी कधी बिर्ला मंदिर तर कधी हर की पैंडी तर कधी गीता मंदिर तास भर बसून येत असे व रात्री ८.३० च्या सुमारास आनंदला जेवण बनवण्यासाठी मदत करित असे.. असे एक दमच सुरळीत जिवन माझे चालू होते व असेच कधी वर्ष निघून गेले हेच कळाले नाही, व अचानक एक दिवस शर्माजी व मी बोलत असताना मला शर्माजी जींनी स्वत: बद्दल माहीती दिली जी मला आज पर्यंत त्यांनी सांगितली नव्हती तेव्हा मात्र मी विचार मग्न झालो वर रात्री झोपताना त्या बद्दल विचार करु लागलो की काय करावे ? व कसे ?

क्रमश:

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९

माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२

थोडी शोधा शोध केल्यावर विश्व हिंदू परिषद चे कार्यालय भेटले पण तेथे राजीव जी नव्हते अचानक कोणीतरी महत्वाचा व्यक्ती कानपुर येथे आलेला होता व त्याच्या बरोबर ते कानपुर ला कार्यशाळा घेत होते, माझे मन जरा घाबरलेच अरे यार आता काय करावे ? दुर-याला स्वत:ची अडचण सांगणे माझा स्वभाव नव्हताच त्यामुळे काही न बोलता बाहेर आलो मी मनात म्हटलं चला काही तरी देवाच्या मनात वेगळेच आहे जे होत आहे त्याला हो म्हण. ईकडे तीकडे जरा फिरण्याचा विचार करुन थोडे अयोध्या दर्शन घेण्याचे ठरवले व त्या नूसार राम मंदीराकडे निघालो, तेथे पोहचताच माझ्या एका विशाल व भव्य मंदीराची कल्पनाच अस्त-व्यस्त झाली, व चारी बाजूला पोलिसांचा गरडा, सैनिकांची धावपळ व मधोमध श्री राम मंदिर विराजमान. दर्शन झाले न झाले सगळच ठीक होते पोलिस कोणाला जाऊच देत नव्हते, तेव्हा पाच कोसाची प्रदिक्षणा पुर्ण केली व अयोध्या येथे स्थित जैन मंदिरांकडे मोर्चा वळवला. अयोध्या येथे ५ जैन तिर्थंकरांनी जन्म घेतला असे मी वाचून होतोच त्यानूसार सर्व प्रथम नेमीनाथ जैन मंदिराकडे गेलो व जाताच पहीला प्रश्न जो मला कधीच अपेक्षीत नव्हता, गेटवरच एक महाशय भेटले " अरे अंदर कहा जा रहे हो ? कोण हो ? कहा से आए ? काय काम है ? किस से मिलना है ? " मी चकित अरे मंदिरामध्ये लोक का जातात ? मी उत्तर दिली " मै राज जैन हूं कोल्हापूर से हूं, भगवान जी के दर्शन करने है " एवढ्यावर त्या बिचा-या व्यक्तीचे समाधान झाले नाही व व तो म्हणाला " अच्छा जैन हो, चलो नमोकार मंत्र तथा दर्शन मात्रे गा के दिखा " आता मात्र माझे डोके गरम झाले व त्याला मी म्हणालो " यह देखो साब, नमोकार मंत्र हो गा सकता हूं पर दर्शन मात्रे का एक भी मंत्र आरती याद नही है ... ना मै यह समजता हूं की इसकी कोई जरुरत है ? भारतीय कानून के मुताबीक कोई भी अंदर जा सकता है.. तथा मै तो खुद पैदायशी जैन हूं" आप मुझे महाराष्ट्र के किसी भी जैन महाराज या मंदिर के बारे मैं पुछ सकते हो" झाले इतके बोलल्यावर तो भडकलाच व मला धक्के मारुन मुख्य गेटच्या बाहेर उभे केले व म्हणाला "जा , अपने कानून के पास" अंहिंसेच्या देवाची पुजा करणा-या व्यक्तीने धक्के / मारामारी करत मला बाहेर काढले. मी विचार केला अरे बापरे मी तर हिंदू आहे तर हा माझा हाल जर चुकून कोणी मुसलमान वैगरा मंदिरामध्ये दर्शनासाठी आला तर त्याला हे लोक त्याला कापूनच काढतील. ह्या प्रकारानंतर ईतर जैन मंदिरांकडे जाण्याचा माझा विचार देखील रद्द झाला व मी आपला परत रेल्वे स्टेशन जवळ आलो तर कळाले की संध्याकाळी ७.०० वाजता रेल्वे आहे तेव्हा थोडाफार टाईम पास केला व रेल्वेची वाट पाहू लागलो, कधी नाही ते रेल्वे एकदम वेळे वर ७.५० वाजता आली व मी धावपळ करुन जनरल डब्ब्यात चडलो.

कानपुर मध्ये रात्री १२.०० / १.०० च्या दरमान पोहचलो व जो पत्ता अयोध्या येथे सांगितला होता तो विश्व हिंदू परिषद, लाल मंदिर मैदान, कानपूर बस इतकाच होता, एक दोन रिक्षा वाल्यांना विचारले तर कोणी २०.०० रुपये तर कोणी २५.०० रुपये मागीतले , खिश्यात तर फक्त पन्नास रुपये राहीले होते व मला जेवण ही करायचे होते तेव्हा रिक्षाने जाण्याचा विचार टाळला, व पायीच निघालो, २ / ३ किलोमीटर चालल्यावर समोर सर्कल मध्ये एक पोलिस गाडी व काही पोलिस उभे दिसले जिवनात कधीच चुकीचे काम {पोलिसांच्या हाती पडण्या ईतके}
केले नव्हते त्यामुळे भिती ही वाटली नाही व मी सरळ त्यांच्या जवळ गेलो पोलिसांच्या गाडी वर लिहले होते "आपके लिए, आप के साथ, हमेशा" मी थोडेस धाडस केले व त्यांना पत्ता विचार ला झाले पोलिसांना दोन तासासाठी मी टाईमपास ठरलो ,
पोलिस : " कहा से आया बे ?"
मी : "हूं तो कोल्हापुर महाराष्ट्र का पर अभी अयोध्या से आया हूं"
पोलिस : " यहा क्या करने आया बे ? तुम्हारे ईस थैले में क्या है? दिखा जल्दी, साले कही असला {दारु-गोळा} तो पार्सल नही कर रहा हैं ना ? "
मी जाम घाबरलो मी म्हणालो "नाही नाही देखो कुछ भी नही है मेरे थैले में "
थोडे फार शोधा शोध करुन {केल्याचे नाटक करुन} मला तो म्हणाला " देख अभी तो मै तुम्हे जाने नही दे सकता साब आने दे फिर देखेंगे"
मी तेथेच शेकोटी समोर बसलो व विचार करु लागलो की पुढे काय ?
तासाभराने त्यांचे साब आले व थोडी फार तीच कथा पुढे करित माझे कपडे व माझी त्यांच्या भाषेत तलाशी घेतली व मला पुढे जाण्याचा रस्ता सांगून जाऊ दिले. मी हुश करु लाल मंदिराजवळ पोहचलो तर कार्यालयामध्ये सर्वजन झोपले होते तेव्हा मी तेथेच गेटवर रात्र काढायची हे ठरवून बाहेर बसलो. जी लोक येथे दिल्ली बाजूला जानेवारी महिन्यात आली असतील तर त्यांना कल्पना असेल की येथील थंडी काय चीज असते त्यावेळी अंगावरचे कपडे सोडुन माझ्या जवळ अंगावर घेण्यासारखे काहीच नव्हते, तरी ही मी बाहेर बसलोच कसा हेच आज मला कळत नाही. सकाळ चे ५.३० वाजले असतील एक गुरखा जो रात्री गस्त घालत होता तो माझ्या जवळ आला व माझी विचार पुस केली मी जेव्हा त्याला राजीव जींचे नाव सांगितले तसा तो उडालाच व म्हणाला " क्या तुम राजीव जी के जाणकार हो , माफ करना भाई उन्हे मै अभी जगा हूं" असे बोलून तो पळतच आत गेला, पण तो पर्यंत थंडीमुळे माझे अंग आकडून आले व शक्यतो मी बेशुध्द देखील पडलो किंवा प्रचंड झोप आली असे काहीतरी झाले असावे, पण जेव्हा थोड्या वेळाने जाग आली तेव्हा दोन-चार जण माझ्या जवळ सोप्यावर बसले होते व मी एका बेड वर पडलो होतो मी लगेच उठलो तेव्हा एक व्यक्ती बोलला " अरे काई बात नही लेटे रहो, तो तुम ही राज जैन हो क्या दिवेदीजी का फोन तो आया था तुम्हारे बारे में, पर जब मेरा यहा आने का कार्यक्रम बना तो मैंने वापस फोन किया था पर तब तुम वहा से निकल चुके थे, चलो काई बात नही तुम सही जगह पोहच तो गये." थोडा नहा धो के तयार हो जायो हमे कही जाना है, आज से तुम्ह मेरे साथ ही रह ना ठीक है" मी देवाचे नाव घेतले व म्हणालो चल देवाची कृपा आहे अजून माझ्यावर.

थोड्या वेळाने मी तयार होऊन त्यांच्या समोर गेलो व विचारले की मला काय काम करावयाचे आहे ते सांगा त्यानूसार मी तयारी करतो त्यावर ते फक्त हसले व म्हणाले " अरे भाई, तुम्ह थके हूये अभी आये हो, थोडा ईधर उधर देख लो जो भी काम अच्छा लगे वही तुम करना " मी देखील थोडा हसलो व लगेच काम शोधावयास चालू केले तेव्हा मला समोरच पुस्तकांचा गठा पडलेला दिसला व एक कार्यकर्ता तेथे त्यावर पत्ते लिहीत होता त्याच्या जवळ गेलो व परवानगी घेऊन लगेच त्याच्या बरोबर पत्ते लिहू लागलो, तासाभराने राजीव जींनी मला बोलवले व म्हणाले चल तु माझ्या बरोबर . मी त्यांच्या बरोबर गाडीतून निघालो एक तास भरच्या प्रवासानंतर एका घरासमोर येऊन गाडी थांबली व राजीव जी व त्यांच्या पिशवी घेऊन मी त्यांच्या मागोमाग आत गेलो, आत जाताच मला धक्का बसला अरे हया व्यक्तीला कोठे तरी पाहिले आहे कोठे बरे.... तेव्हा आठवले जी पुस्तके बाबू घाटवर वाचली होती त्या पुस्तकांमध्ये ह्यांचा फोटो देखिल होता नाव ह्यांचे " श्री अशोक सिंघल " मी नमस्कार केला व बाजूला उभा राहीलो, ते दोघे काही तरी अर्धातास बोलत होते पण माझे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे सोडून दुसरे लक्षच नव्हते कोठे. ही अशोक सिंघल मी माझ्यावर पडलेली पहीली छाप होती, थोड्यावेळाने त्यांचे लक्ष माझ्या कडे गेले तेव्हा हसत राजीव जींना त्यांनी माझ्या बद्दल विचारले व राजीवजीं नी त्याना माझी माहीती पुरवली माझ्या कडे संगणकाचे शिक्षण आहे असे त्यांना समजताच ते राजीव जीनां म्हणाले " भाई राजीव, ईन्हे तो आप अपने आर. के. पुरम कार्यालय मै रखो" तेव्हा राजीवजीं नी त्यांना नम्र पणे नकार दिला व त्यांनी मला स्वत: संगेच ठेवणार असल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला.

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

अहिंसावादी - म्हणजे काय ?

मी जैन !

त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून.

आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट !

जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ? एखाद्याने एखादाचा जीव घेणे / विनाकारण जीव घेणे म्हणजे हिंसा हाच अर्थ मला माहीत आहे व शक्यतो तुम्हाला ही.

आपण खाण्यापासून ते कागदापर्यंत अनेक कारणांनी वनस्पती / झाडे ह्यांची हत्याच करत आलो आहोत की मग ? कारण जगदिश चंन्द्र बोस ह्यांचे संशोधन आपण मान्य करतो ( जगाने मान्य केले) म्हणजे आपण मानतो की वनस्पती सजीव आहे त्यानुसार आपण एखादी वनस्पती तोडली तर ती हत्याच ना ? मग आपण अहिंसावादी कसे ?

जर आपण स्वतःला अहिंसावादी म्हणतो तर आपण उठता बसता अनेक हत्या करतो हे कोणालाच माहीत नसावे ? अनेक प्रकारच्या केस्मेटीक क्रीम मध्ये व्हेल मासा पासून प्राप्त केलेले तेल (चरबी) वापरली जातेच की, मागे मॅड टिव्ही वर पाहीले जे ब्रेश आपण आपल्या मुलाला चित्रकलेची आवड लागावी म्हणून विकत आणून देतो त्या ब्रेश साठी अनेक छिछुंदर ( * मराठी शब्द) ह्या प्राणांची हत्या केली जाते ! एका छिछुंदर चा जीव घेतला तर फक्त दहा ब्रेश तयार होता आता बोला.

सर्वात सर्व जागी सहज पणे मिळणारे डिझेल / प्रेट्रोल व इतर त्यांचे उप पदार्थ हे पण जैविक इंधन आहे ... म्हणजे कोणाकडून तरी हत्या झालीच ना.. भले ती निसर्गाकडुन होऊ दे !

काही गोष्टी जश्या.. बुट / चपला / पर्स / वायरींगचे सामान / हिरे छाटणीचे काम लहान मुलांच्या कडून अत्यंत अत्याचार करुन करुन घेतले जातात... त्यांना मानसिक / शारिरिक इजा केली जाते म्हणजे ती देखील एक प्रकारची हिंसाच ना :?

आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो ! काही अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो ..



जर वर दिलेल्या उदाहरणांना तुम्ही गरज म्हणत असाल तर मग आपण हिंसेचेच समर्थन करतो असे वाटत नाही का ?

आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत असे तुम्हाला वाटतं का ?

जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो :?