शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

https://rajkiranjain.wordpress.com/

गणपती बप्पा मोरया !

आजच्या शुभमुर्ह्तावर मी माझा हा ब्लॉग " राज दरबार " नवीन पत्तावर हलवला आहे काय स्वरुपी.

https://rajkiranjain.wordpress.com/

सर्व मित्रांनी व वाचकांनी ह्यांची नोंद घ्यावी व आपल्या बुकमार्कमध्ये फेरबदल करुन घ्यावेत ही विनंती.


आपलाच मित्र,

राज जैन

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

पुणे-भिमाशंकर-शिवनेरी-लेण्याद्री-नाशिक-त्रिंबकेश्वर-मेटघर किल्ला- अंजनेरीगड-पुणे - भाग १

शनिवारीच बाईकवरुन कामानिमित्य पनवेलवारी ( २४० किमी येणे जाणे) करुन रात्री २ वाजता पोहचलो होतो घरी.

रवीवारी सकाळ सकाळी आई म्हणाली की नाशिकला जातोस का उद्या ( २१० किमी) ? पोर्णिमा आहे व एक पुजा करायची राहीली आहे तुम्ही नागबळी व त्रीपिंडीदान. हे राम ! हेच शब्द बाहेर पडले तरी म्हणालो बघतो विचार करुन. महाजालावर थोडीफार शोधाशोध केली तर तो भाग तर प्रचंड देखणा व निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आहे असे समजले. आईची इच्छा देखील पुर्ण होईल व थोडेफार जे ताप चालू आहेत ते देखील ह्या पुजेमुळे कमी होतात का हे पाहू असा उद्दात्त हेतू मनात ठेऊन आपले मित्रवर्य श्री पाषाणभेद ह्यांना फोन लावला व थोडक्यात विचार सांगितला. लगेच महाराजांनी इकडे तिकडे फोन करुन एक पंडित शोधला जो त्रिंबकेश्वर ( नाशिक पासून ३० किमी) मध्ये दोन्ही पुजा करुन देतो असा.

आईला ही माहिती दिली व म्हणालो उद्या सकाळी निघतो पहाटे उठव मला. सर्व तयारी सकाळीच करेन ;) झाले गजर लावले गेले, जबरदस्तीने दिवसाढवळ्या रात्री १० वाजता झोपा असा आदेश झाला, मन मोडून झोपी गेलो... सकाळी आईने ५ वाजता मला उठवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मग सहा वाजता मग सात वाजता शेवटी ७.३० वाजता मी उठलो. साहेबांचा फोन परत आला की निघालो की नाही असे विचारणारा.. मी लगेच धावपळ करुन तयारी सुरु केली अंघोळ इत्यादी छोटी मोठी कामे लगेच १० मिनिटात आवरुन ८ वाजता नाष्टा करुन सरळ ८.३० ला हायवेवर लागलो.

रम्य सकाळ होती, हिरवळच हिरवळ चोहीकडे, पक्षी-पक्षिणी गुलुगुलु बोलत आहेत असे दृष्य मला तरी कोठे नजरेस पडले नाही पण हा नाही म्हणायला दोनचार म्हशी व गायी सकाळचा नाष्टा करायला बाहेर पडलेल्या दिसल्या... चला तेवढेच निसर्ग सौंदर्य पहाण्याची सुरवात झाली..
हायवेवर गाडी सुसाट पळवायचा हा विचार करुन सगळे ब्रेक, केबली, चाके, इंजिन, हवा, पाणी, बॅटरी चेक करुन घेतले व सुरवात केली प्रवासाची.

तोच आठवले अरे नाशिकला जायचे कसे ? रस्ता ? अडला राजे मीमकरांचे पाय धरी ! पटापट दोनचार फोन केले व दोनचार वेगवेगळे रस्ते सांगितले गेले, हरी ओम म्हणत बाईक लावली सरळ मुंबई हायवेला. हिंजवडचा उड्डाणपुल मागे टाकून पहिल्याच वळणावर एकाला विचारले नाशिक फाटा ? त्यांने कसाबसा रस्ता सांगितला त्याचे आभार माणून गाडी त्या वळणावर घातली, मग वाकड, चिचवड, पिंपरी इत्यादी भागाला फेरी मारुन विमोच्या (विवेक मोडकांच्या) घराचा रस्त्याला गाडी आल्यावर मग डोक्यात आले आपण शक्यतो रस्त्ता चुकलो. परत एकाला विचारुन घेतले व मग नाशिक हायवेवर लागलो (टोटल ६० एक किमी अतिरिक्त फिरणे).

नाशिकचा बोर्ड दिसला २१० किमी. च्यामायला म्हणजे ह्या फाट्यापासून २१० किमी व घरापासून इथपर्यंतचा प्रवास कोण मोजणार ? सिस्टमला दोनचार शिव्या देऊन पुढे निघालो, चाकण मागे गेले व मंद पाऊस चालू झाला. मस्त पैकी थंड हवा थोंडाला लागत होती व सकाळ पासून रस्ता शोधताना झालेली चिडचिड आपोआप कमी कमी होत गेली. ८०-९० चा काटा कधी मागे पडला व १०० च्यावर स्पिडवर बाईक कधी धावू लागली काही कळले देखील नाही मार्ग दाखवणारे बोर्ड झर झर मागे पडत होते मंचर जवळ आल्याचा एक बोर्ड समोर दिसला भिमाशंकर ! हे नाव कुठेतरी वाचले होते आठवत नव्हते, परत एकदा पाषाणभेद यांना फोन लावला व विचारले अरे भिमाशंकर ला काय आहे ?

प्रश्नातच उत्तर होते, सरळ डावीकडे बाईक टर्न केली व भिमाशंकरच्या रस्त्याला लागलो. दैवी प्रवास ! ह्या एका शब्दात वर्णन होऊ शकते. वाटेतच्या दोन्ही बाजूने निसर्गांने अक्षरशः अदभुत खेळ मांडला होता ऊन-पाऊस व निसर्गरम्य असा व मंत्रमुग्ध होऊन पहात रहावे असा खेळ ! गडबडीने बाईक रस्ताच्या बाजूला लावली व फोन बाहेर काढून फोटो काढायची तयारी केली तेव्हाच समजले मोबाईल मेला आहे ते. रात्रभर चार्ज करायचाच राहून गेला होता. त्याक्षणी खुप असाह्य वाटले रे.. यार ! वाटले देऊ या भिरकावून दरीमध्ये नोकियाला ;) पण आता हाच एकमेव आधार असल्यामुळे व आमचा जिवापाड प्रिय सॅमसंग अतिदक्षता विभागात अ‍ॅडमीट असल्यामुळे नोकिया विषयी सध्या मला खुप ममत्व वाटले म्हणून पुन्हा खिश्यात ठेऊन दिला. मधी एक दोनहॉटेल मध्ये ट्राय केला पण लाईट नव्हती व संध्याकाळी ५ वाजता येणार होती :( , भिमाशंकर विषयी मी काही लिहावे एवढा चांगला लेखक नाही आहे पण पुन्हा एकदा मी नक्की भिमाशंकर ला जाईन लवकरच व चांगले शेकड्यानी फोटो काढेन व ते प्रकाशित करेन.

भटकणे हा उद्देश असल्यामुळे देवदर्शन इत्यादी फंदामध्ये पडलो नाही व मला लवकर नाशिक गाठायचे होते म्हणून भिमाशंकरची ही भेट थोडी लवकरच संपवली वर परतीच्या प्रवासास लागलो. दिड एकतासाच्या ड्राईव्ह नंतर एका हॉटेलात फोन चार्जिंगला लावला व मस्तपैकी वडापावावर दणका दिला फोन चार्ज होई पर्यंत मी इकडे तिकडे फिरावे म्हणून हॉटेलातून बाहेर पडलो तर समोर एक फाटा दिसत होता व तेथे बोर्ड लावला होता.. शिवनेरी २५ किमी... फक्त २५ किमी व शिवनेरी इकडे आहे ? आयला मी तर समजत होतो.. जाऊ दे. येथे पर्यत आलोच आहे तर जरा शिवनेरी जाऊन येऊ तसा ही हा भुईकोट किल्ला आहे असे शाळेतील पुस्तकात वाचले होतेच त्यामुळे चढाचढी करावी लागणार नाही व चालाचाली देखील असा विचार डोक्यात डोकाऊ लागला एक मन म्हणत होते जाऊ या एक म्हणत होते नको ! शेवटी माझा विजय झाला व दुष्ट दुसरे मन हरले.

नंतर च्या दहा मिनिटामध्ये मी शिवनेरीच्या रस्तावर वार्‍याशी शर्यत करत होतो.

अर्धा-पाऊण तासामध्येच शिवनेरीच्या पार्किंग लॉटमध्ये बाईक लावली ५ रु.चे टिकिट फाड्ले गेले व मस्त १० रु.चे लिंबू सरबत घेतले व गडाकडे जावयास निघालो पण गडाकडे बघिल्यावर लक्ष्यात आले की आपल्याला शाळेत शक्यतो चुकीचे शिकवले गेले आहे ;) शिवनेरी भुईकोट किल्ला नाही आहे चढावे लागनाराच व समोरचा गडाचा मॅप पाहून खात्रीच पटली की चालावे देखील प्रचंड लागणार आहे.... छत्रपती शिवाजी महाराज की ! असा एक घोष दिला तोच पाचपन्नास आवाज दुमदुमले जय !!!!!!!!!! आयला वर पायर्‍यावर खुप पब्लिक दिसत होते म्हणजे ह्या गडावर तरी मी नक्कीच एकटा भुतासारखा भटकणार नव्हतो तर... !

shivneri 1

पायथ्यावरुन शिवनेरीच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर

shivneri २


shivneri ३

गडाचा मुख्य दरवाजा !

shivneri ४


shivneri ५

आई शिवाई चे मंदिर आत फोटो काढू देत नाहीत.


shivneri ६


अंबरखाना

shivneri ७


shivneri ८

गडावरील मनमोहक दृष्य !

shivneri ९


shivneri १०


shivneri ११


shivneri १२


shivneri १३

शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ !

shivneri १४


shivneri १५




क्रमशः


( जेथे फोन चार्जिंगला लावला होता तेथून जेव्हा फोन काढला तेव्हा लक्ष्यात आले की फोनचा डिस्पले गंडला आहे :( पांढरा फटाक पडला होता. हे सर्व फोटो अंदाजाने घेतले आहेत त्यामुळे चांगले आले नाही आहेत समक्ष्व.)

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत खुप वजनी होती
काय खरं व काय खोटं
नशीबाची थट्टाच थोरं होती

वाहत जावे असेल ठरवले तरी
जमीनीचे वळण खुप वेगळे होते
तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते

माणूस म्हणून जगण्याची ही
किंमत जरा खरंच मोठी होती...
मेल्यावर तरी समाधान लाभेल
मुक्त होईन असे वाटले होते

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

एका साहित्यचोराचे धिंडवडे - जोर का झटका धीरे लगे ;)

साहित्यचोर – बोक्या सातबंडे

ब्लॉगर्सचे लेख चोरुन आपल्या नावावर खपवणार्‍या व डुप्लिकेट आयडी घेऊन धुमाकुळ घालणार्‍या ह्या बोक्याला कांचनने कसे पकडले व आपल्या ब्लॉगवर सर्व पुराव्यानिशी कसे सिध्द केले की बोक्या सातबंडे साहित्यचोरी करत होता.
त्यांनी पोलिसात सर्व पुराव्यानिशी तक्रार देखील केली आहे, कारण त्यांने फक्त साहीत्यचोरीच नाही केली तर त्यांचे फेसबुक व जीमेल चे आयडी देखील हॅक केले होते.


आपण आपले साहित्यचोरले की दुर्लक्ष करतो पण त्यांचा ते मंडळी कसा गैरफायदा घेतात हे खरोखर वाचा व आपला अभिप्राय द्या.

कांचन चे हे आवाहन लक्ष्यात ठेवा व त्यावर अमंल देखील करा ही विनंती.



मला सहकार्य हवं आहे तुमच्या सगळ्यांकडून. कृपा करून स्वत:ला अंडरएस्टीमेट करू नका. आमचं लेखन कुणी चोरावं इतकं चांगलं नाही असं म्हणू नका. तुमच्या लेखणीत काय ताकद आहे, हे वाचकांना जास्त माहित आहे. जी वेळ माझ्यावर आली, ती कुठल्याही ब्लॉगरवर येऊ शकते. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात, हे मला माहित आहे. पण जेव्हा कुणाचं लेखन चोरीला जातं आणि तो ब्लॉगरच लेखाचा मूळ लेखक आहे, हे माहित असतं, तेव्हा संघटीत होऊन चोर ब्लॉगरच्या त्या लिंकवर प्रतिक्रिया देत जा. रिपोर्ट अब्यूज वर क्लिक करत जा. ट्विटर आय.डी. असल्यास संदेश पाठवत जा. गुगल बझ्झसारख्या ठिकाणी विचित्र टोपण नावं धारण करणा-या व स्वत:ची खरी ओळख लपवणा-या प्रोफाईकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. शक्य असल्यास अशा प्रोफाईल्सना ब्लॉक करा. ज्यांना विचित्र टोपणनावं धारण करायला आवडतात त्यांनी आपल्या प्रोफाईलवर कृपया स्वत:चं खरं नाव देखील जाहिर करत जावं म्हणजे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणार नाही.

Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+mogaraafulalaa+%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%29#ixzz0xD6yDtyN
Under Creative Commons License: Attribution Share Alike

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

अरे दिवाळी साजरी करा..........

राम राज्य आले हो...
म्हणजे काय ?
अरे गरिबांपेक्षा श्रीमंताची संख्या वाढली म्हणजे रामराज्यच ना !,

सकाळ सकाळी डोक्यावर नाही पडलो आहे, खरोखर दिवाळी साजरी करा...

नैशनल काउंसिल ऑफ एप्लाइड इकॉनमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या रिसर्च (हाउ इंडिया अर्न्स, स्पेंड्स एंड सेव्स) प्रमाणे भारतात आता श्रींमतांची संख्या गरिबांपेक्षा जास्त झाली आहे.


रिपोर्ट के मुताबिक, पिछले तीन साल में इकनॉमिक स्लोडाउन के बावजूद मार्च 2010 तक देश में हाई इनकम परिवारों की संख्या 4 करोड़ 67 लाख हो जाने अनुमान लगाया गया है जबकि लो इनकम परिवारों की तादाद 4 करोड़ 10 लाख के आसपास मानी जा रही है। अगर यह सच है तो पिछले एक दशक में आया यह बहुत बड़ा बदलाव है। हाई इनकम ग्रुप का परिवार उसे माना जाता है, जिसकी सालाना आमदनी 2001-02 की महंगाई के आधार पर एक लाख 80 हजार से ज्यादा हो। जिस परिवार के सदस्य सालाना 45 हजार रुपये तक कमाते हों, उसे लो इनकम फैमिली माना जाता है।

सालाना 45 हजार रुपये से ज्यादा और एक लाख 80 हजार रुपये से कम कमाने वाले मिडल क्लास में आते हैं। एनसीएईआर का एस्टिमेट है कि मिडल इनकम हाउसहोल्ड्स की संख्या में भारी इजाफा हुआ है। एक दशक पहले लो इनकम परिवारों की तादाद 6 करोड़ 52 लाख थी। तब मिडल इनकम फैमिलीज़ की संख्या 10 करोड़ 92 लाख थी, जो अब 14 करोड़ 7 लाख होने का अनुमान है। रिपोर्ट में कहा गया है कि स्लोडाउन का सबसे ज्यादा असर मिडल क्लास परिवारों पर पड़ा। नंबरों के लिहाज से मिडल क्लास परिवारों की संख्या भले ही 2007-08 के 13 करोड़ 59 लाख से बढ़कर 2009-10 में 14 करोड़ 7 लाख हो गई हो, लेकिन पर्सेंटेज मंे यह घट गई है। 2007-08 में मिडल इनकम परिवार कुल परिवारों के जहां 62 पर्सेंट थे, वहीं 2009-10 में यह घटकर 61.6 पर्सेंट रह गए। दिलचस्प पहलू यह है कि हाई इनकम परिवारों की तादाद स्लोडाउन के दौरान भी बढ़ती रही। पिछले दो साल में यह 16.8 पर्सेंट से बढ़कर 20.5 पर्सेंट हो गई है। लो इनकम ग्रुप फैमिलीज़ की संख्या भी इस दौरान 21.1 पर्सेंट से घटकर 17.9 पर्सेंट रह गई।

2 लाख से 10 लाख रुपये सालाना कमाने वालों को वर्ल्ड बैंक मिडल क्लास मानता है। ऐसे लोगों की संख्या 2009-10 तक बढ़कर 2 करोड़ 84 लाख हो गई है। रिपोर्ट के मुताबिक, देश के मिडल क्लास में से दो-तिहाई परिवार शहरों में रहते हैं। यही नहीं, सेविंग करने में भी भारतीय आगे हैं। अनुमान है कि भारतीय परिवारों द्वारा की जाने वाली बचत की रकम जीडीपी के 36 पर्सेंट तक होती है।



खरं असेल बॉ !
गेल्या एक दोन महिन्यात एकापण शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही आहे.
गेल्या काही महिन्यात हॉस्पिटलमध्ये / हॉस्पिटलच्या बाहेर औषधाला पैसे नाहीत म्हणून कोणी मेलं नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून भारतात कुठे ही भुकबळी गेला नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून रोजगार नाही म्हणून कोणी भिक व चोर्‍या करायला चालू केले नसेल.
गेल्या काही दिवसापासून महागाई किती ही वाढू दे जनतेला काहीच फरक पडत नाही आहे..


अरे हेच हेच तर ते रामराज्य !!!!

बुधवार, २१ जुलै, २०१०

श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

- पँडित नरेन्द्र शर्मा


radha


काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.



राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.


राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण...


राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.


आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......

पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.

( क्रमशः )

गुरुवार, ८ जुलै, २०१०

श्री दिपलक्ष्मी (क्लासिक)

लेखक:
संपादक : ग. का. रायकर
प्रकाशक:
रायकर ब्रदर्स पब्लिशिंग हाऊस





१९५८ ते २००० या काळातील श्री दिपलक्ष्मी मासिक / दिवाळी अंक यांतील निवडक कथा, लेख, चित्रे, व्यंगचित्रे ह्यांचा हा संग्रह.


सुरवातच होते जयवंत दऴवी ह्यांच्या "एक गोड गोड माणूस" ह्या लेखाने व पुढे काय पंचपक्वान्न येणार आहेत त्यांची एक झलक मिळते. व नंतर अनुक्रमणिका, त्यातील लेखकांची नावे खालील प्रमाणे.


  • पु.ल. देशपांडे

  • आर. के. लक्ष्मण

  • चिं. वि. जोशी

  • श्याम जोशी

  • शिरीष पै

  • विजय तेंडुलकर

  • दत्तू बांदेकर

  • दुर्गा भागवत

  • द. ग. गोडसे

  • मारिओ मिरांडा

  • अंबरीश मिश्र

  • मंगेश कुलकर्णी

  • वसंत सबनीस

  • जयवंत दळवी

  • श्री. पु. भागवत

  • व. पु. काळे

  • गौतम राजाध्यक्ष

  • अनंत सामंत

  • व्यंकटेश माडगूळकर

  • द्वारकानाथ संझगिरी

  • वा. ल. कुळकर्णी

  • पं महादेवशास्त्री जोशी

  • गो. वि. करंदीकर

  • शिरीष कणेकर

  • सुशीलकुमार जोशी

  • डॉ. नरेंद्र जाधव

  • जयंत पवार

  • कुमार केतकर

  • अनिल धारकर

  • बिझिबी

  • रेखा आठल्ये / शहाणे

  • हेमंत कर्णिक

  • मधुकर तोरडमल

  • सेतुमाधवराव पगडी

  • पु.रा. बेहेरे

  • वि.आ.बुवा

  • मं.वि. राजाध्यक्ष

  • म.द. वैद्य

  • दिनकर गांगल

  • श्री. ज. जोशी

  • साने गुरुजी

  • अच्युत बर्वे

  • आनंद वर्टी

  • ना. धों. ताम्हणकर

  • वि.स. खांडेकर

  • गो.नी. दांडेकर

  • अरविंद गोखले

  • मधु मंगेश कर्णिक

  • शं.ना. नवरे

  • आनंद साधले

  • ह्मो. मराठे

  • अ.र. कुळकर्णी

  • लक्ष्मण लोंढे

  • अंजली कीर्तने

  • राजेंद बनहट्टी

  • रघुवीर मुळगांवकर



व ह्याच बरोबर


  • वसंत सरवटे

  • हरिश्चंद्र लचके

  • व.ल.हळबे

  • मंगेश तेंडुलकर

  • श्याम जोशी

  • गवाणकर

  • श्रीनिवास प्रभुदेसाई

  • विकास सबनीस

  • संजय मिस्त्री

  • शशिकांत गद्रे

  • चिं.ग. मनोहर

  • मनोज जोशी

  • विजय पराडकर

  • ज्ञानेश सोनार

  • प्रशांत कुळकर्णी

  • प्रशांता अष्टीकर



ह्यांची हास्यचित्रे.


पुर्ण (A4 साईझपेक्षा थोडा मोठा) आकाराचा पेपर, ५०० पानं व उत्कृष्ट बांधणी हे या पुस्तकाचे वैशिष्टय. ( ह्यामुळेच वजन १२५० ग्रॅम आहे )



खरेदीसाठी येथे क्लिक करा.

रविवार, ४ जुलै, २०१०

इंद्रधनुष्य - ई-अंक

सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच. तसाच प्रकारे हा ई-अंक देखील फिरेल व ज्यांना अजून आपले संकेतस्थळ व येथे लेखन माहिती नाही त्यांना आपल्या येथील ३०००+ असलेल्या लेखांची एक झलक मिळेल हा सरळ व साधा उद्देश ह्या अंकाचा आहे.

आपण प्रयत्न करुन प्रत्येक महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्ये असा अंक नियमित काढू व आपले लेखन त्या ९५% मराठी बांधवाजवळ पोहचवण्याचा प्रयत्न करु. ह्या कार्यासाठी ई-मासिकाच्या जून महिन्याच्या समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.

१. रमताराम
२. निर्मयी
३. डॉ. अशोक कुलकर्णी
४. सागर
५. विसुनाना
६. माया
७. पुष्करणी
८. सोना



_____

अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.


  • कोकणसय - शैलजा

  • अद्वितीय - विशाल कुलकर्णी

  • बाबा हरवलाय – अनुराग

  • मात्रा – गणपा

  • कोहम ! – अवलिया

  • शहीद दिवस - पुणेरी ( प्रसन्न कुमार केसकर )

  • मृत्यू आणि मी - पुण्याचे पेशवे

  • रेजकुत्रे – मधुकर

  • दहा वर्ष - ३_१४ अदिती

  • सिडनीपुराणम्॥ - मेघवेडा

  • सहज सुचल म्हणुन – जयपाल

  • जन्मा येण्या कारण तू.. – प्राजु

  • हताश औदुंबर - गंगाधर मुटे

  • उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी - आदिजोशी

  • मिल्कः एक चळवळ – ऋषिकेश

  • लेमन केक - स्वाती दिनेश

  • चिकन साते – गणपा

  • स्पर्श – सागर



काही चुका राहिल्या असतील तर त्या दाखवून द्या योग्य ते बदल लगेच केले जातील.


DOWNLOAD PDF


धन्यवाद.

व्यवस्थापक
मीमराठी.नेट

गुरुवार, १७ जून, २०१०

कबीर - सत्याचा आरसा

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.

ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥

कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥

माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥

साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥

जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥

उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥

सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥

साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥



काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.

*

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥



वाह !

इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !


*

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥


माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.

जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.

*


*

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥


कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.

*


सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥


गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका.


********

कबीर बाणी ...... Music for Soul !

एक सर्वांग सुंदर अल्बम !!!

राहूल देशपांडे ह्यांनी गायलेली कबीर बाणी ची सिडी ई-खरेदी विभागामध्ये उपलब्ध आहे.

रविवार, ६ जून, २०१०

ई- खरेदी

आज शुक्रवार, आई अंबाबाईचे नाव घेऊन आपण एक नवीन सुविधा मीमराठीच्या वाचकांसाठी / सदस्यांसाठी घेऊन येत आहोत.

खरेदी विभाग

ज्यामध्ये आपण आपल्याच सदस्यांनी लिहलेली / प्रकाशीत केलेली पुस्तके / कविता संग्रह / संगणक प्रणाली / सेवा व सुविधा व इतर वस्तू / साहित्य विक्रीस उपलब्ध करुन देत आहोत.

मी मराठी संकेतस्थळ व त्यांचे व्यवस्थापक सर्व व्यवहारामध्ये स्वतः लक्ष घालतील व येणारी / दिली जाणारी प्रत्येक वस्तू ही मी मराठी संकेतस्थळाकडूनच तुम्हाला मिळेल. सुविधा अजून प्राथ्रमिक स्वरुपात आहे, वेळोवेळी आपण त्यात योग्य ते बदल करत जाऊ. तुम्हाला ही काही अडचणी जाणवल्या तर त्या तुम्ही मला येथे सांगू शकता.


आपल्या प्रिय सदस्य श्री श्रावण मोडक ह्यांच्या कबीरबानी ह्या ध्वनीफीत संग्रहाद्वारे आपण आपल्या विभागाचे लोकार्पण करत आहोत. तेथे तुम्हाला शेअर मार्केट टिप्स. नावाचा एक विभाग दिसेल तो खास तुमच्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी बनवण्यात आला आहे त्याचा वापर करुन पहावा व अडचणी येथे सांगाव्यात जेणे करुन आपण एक उत्तम व सुरक्षित अशी एक प्रणाली तयार करु शकू. मी मराठी संकेतस्थळ आपले आभारी राहील.

( टेस्टिंग साठी फक्त तुम्हाला शेअर मार्केट टिप्स हेच वाप्परण्याची परवानगी आहे.)


ज्यांना आपले / आपल्या मित्रांचे / आपल्या ओळखीतील व्यक्तींचे साहित्य / वस्तू / प्रणाली येथे विक्रीसाठी उपलब्ध व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी मला संपर्क करावा.

योग्य ते बदल व सुचना येथे नियमीतपणे दिल्या जातील.
जय महाराष्ट्र !


व्यवस्थापक

बुधवार, २ जून, २०१०

मीम रॉक्स !!

mimarathi.net


३.१५ नंतर लाईट गेली होती ती सरळ ६.३० ला आली...

मध्ये एक दोन कॉल आले होते मित्रांचे की मीमवर पाहूणे सदस्य वाढत आहेत.... मला वाटले होते नेहमी प्रमाणे ६०-७० असतील, पण आधी एकाने १५० + चा आकडा दिला व नंतर एकाने सरळ ४०० + चा तेव्हा मात्र मी चक्रावलो... ;)

साईटवर अटॅ़क झाला असे म्हणत टिआरपी वाढवायला एक ईश्यु मिळाला =)) असे माझ्या मनात आले ( नाही ). ;)

पण जेव्हा लॉग चेक केले तर समजले अरे हे तर खरोखरचे हिट्स आहेत... पेज हिट्स नाहीत... युजर हिट्स... दिवसभरात ३५०० + लोकांनी मीम हिट केले होते, व सर्वात जास्त हिट्स फेसबुक व ट्विटर वरुन आल्या होता व त्या खालोखाल गुगलवरुन !!!!

आज दिवसभरात ७५००० + पेज पाहीले गेले मीमवर... व हा रेकॉर्ड आहे आपला तरी नक्कीच ;)


आज असे काय नवीन घडले ह्याचा विचार केला असता आपण केलेले काही बदल व पुरवलेल्या काही नवीन सुविधा खुप लोकांना आवडल्या आहेत असे त्यांच्या आलेल्या मेल्स व व्यनी मधून कळाले हे एक कारण असावे तुम्हाला दुसरे काय कारण वाटते की काय झाले असावे असे खास ???

पण खरोखर मनापासून आनंद झाला... ह्या सर्वाचे श्रेय येथे नियमित लिहणार्‍या व प्रतिसाद देणार्‍या सदस्यांचे आहे ज्यांच्यामुळे मीम आज नावारुपाला येत आहे आपली एक आगळी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे मराठी अंतरजालावर....


सर्वांचे अनेकानेक धन्यवाद... !

H) हॅट्स ऑफ..... मित्रांनो !

पाहूण्यांनो मीमवर आपले मनापासून स्वागत आहे...

सर्वांनी असाच लोभ ठेवावा. !!!!

शुक्रवार, २१ मे, २०१०

हॅप्पी बर्थ डे...Pac-Man ...

आताच गुगलचा नवीन लोगो पाहीला....

pak-man


व मन एकदम सुरवातीच्या काळात गेले, जेव्हा नकळत कसा बसा... संगणकाबरोबर जुडला गेलो होतो... ३८६ नंतर ४८६... मज्जा होती त्यावेळी... काळे-पांढरे पडदे व तो गेम.. Pac-Man !


जबरदस्त मज्जा येत असे त्याकाळी !

आज गुगलवर तो लोगो पाहीला...

आज Pac-Man चा ३० वा वाढदिवस.. ३० वा ? अरे तीसवर्ष झाली त्या गेमला ? काल परवा पर्यंत तर मोबाईलवर खेळताना देखील नवीनच वाटायचा तो मला.. Pac-Man !


असो,

ज्यांने तयार केला त्याला अनेकानेक धन्यवाद...
कारण हा एकच गेम होता ज्याच्यामुळे मी संगणकाच्या जवळ आलो...
व आज येथेवर... :)
मला ह्या गेमने खुप काही दिले... त्याचे आभारच मी ह्या छोटेखानी लेखाद्वारे व्यक्त करतो आहे... !


थॅक्यु !

Pac-Man

सोमवार, १७ मे, २०१०

फसवणूक

आपण वेगवेगळे फसवणूकीचे प्रकार नेहमी इकडे तिकडे पहात असतोच. असाच हा एक मस्त किस्सा ! कितपत खरा आहे माहीत नाही पण ज्यांने सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकतो कारण तो गुडगावं पोलिस मध्ये होता ;)
स्थळ : गुडगाव, बादशहापुर.
काळ : जेव्हा प्रॉपर्टी मार्केट बुस्टवर होते तेव्हाचा ;)

*****




गावामध्ये एक घर.
कर्ता पुरुष काही वर्षापुर्वीच वारलेला.
बाईच सगळे बघायची, त्या जवळ जवळ न शिकलेलीच.
कमाईचे साधन शेत व दुसरे घर भाड्याने देणे.
लग्नाच्या वयाच्या दोन मुली.
बाई तशी चालाख इत्यादी नव्हती एकदम साधीभोळी.
मुली पण तश्याच.
त्या घरचे सगळे व्यवहार त्या तीघी मिळूनच चालवायच्या.

*

घराचा भाडेकरु तडकाफडकीचे घर सोडून गेला.
तीन-चार दिवसामध्येच एक ३०-३५ च्या आसपासचा व्यक्ती आला व घर भाड्याने मागितले.
दोन रुम व किचन असलेले ते घर, तीने मागितलेले भाडे व डिपॉझीट न कुरकुर करता दिले.
तो, तीची बायको व आई असे तीघे.
दोन एक महिन्यातच चांगलेच रुळले घरामध्ये.
त्या बाईशी देखील त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते.

*

एके दिवशी त्या व्यक्तीच्या आईची तब्येत एकदम खालावली.
हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले व सरळ दोन दिवसांनी बातमी दिली आई गेली म्हणून.
१५-२० दिवसाने ती व्यक्ती एकटीच परत आली.
तीच्या जवळ बसून तिला सगळी राम कहानी सांगितली.
हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर तीला हार्ट अटॅक आला व ती गेली,मग गावी घेऊन गेलो, तिकडेच सगळे उरकले. इत्यादी.

*

दुसर्‍या तिसर्‍या दिवशी तो परत घरी आला व एक मदत मागीतली.
तीला तो म्हणाला की आई वारल्यामुळे सगळे कर्जदार मागे पडले आहेत व त्यांना पैसे द्याचे आहेत.
मी माझे शेत विकावे म्हणतो आहे पण शेत आईच्या नावे होते व अजून ट्रान्सफर झाले नाही आहे माझ्या नावावर. तुम्ही मदत करा.
ती गोंधळली तिला वाटले पैसे मागतो की काय !
पण नाही त्यांने पैसे मागितले नाहीत एवढंच म्हणाला की तुमचे नाव व माझ्या आईचे नाव सारखेच आहे, तुम्ही माझ्या बरोबर त्या कंपनीत चला जी ते शेत घेण्यास तयार आहे तिकडे व त्यानंतर बॅकेत मी तुम्हाला एक टक्का देईन सर्व व्हवहाराबद्दल रोख मध्ये, जवळ जवळ दोन लाख रु..
आधी ती नाही म्हणाली पण दोन लाख मोठी रक्कम म्हणून तयार झाली.


*


हा तिला घेऊन कंपनी मध्ये गेला.
सगळे कागदपत्रे समोर उभे राहून सही करुन घेतले.
ह्या सगळ्यामध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ गेला.
दुसर्‍या आठवड्यात त्यांने वायदाप्रमाणे दोन लाख तिच्या हातात ठेवले.
त्यांनतर मोठ्या बँकेत जाऊन पैसे काढून आणले व तो पैसे घेऊन गावी जाउन येतो म्हणून निघून गेला.


*

फक्त सही करण्याचे दोन लाख मिळाले हे पाहून त्या बाईने दिवाळी साजरी केली.
मुलीं साठी दागीने घेतले, कपडे घेतले.
अर्धा गावाला नवर्‍याच्या नावाने जेवण घातले.

*

३-४ दिवशी ग्रामिण बॅकेचा शिपाई धावत पळत तिच्या घरी.
तिला घेऊन बँकेत गेला.
बँक मॅनेजर जवळ जवळ पळत येऊनच तीला आत घेऊन गेला.
व तीला बातमी सांगितली की तीच्या अकाउंट मध्ये ३ करोड रु. आले आहेत म्हणून.
हिला काहीच कळेना. गावच्या सरपंचापर्यंत बातमी गेली होतीच तो पण आला.
सगळेच गोंधळून गेले होते हीच्या खात्यात एवढे पैसे आलेच कसे.

*

तिला खोदून खोदून विचारल्यावर तीने दोन लाखाची कमाई कशी केली ते सांगितले.
सरपंचाला काहीतरी घोळ वाटला व तो तिला घेऊन साताबारा उतारा पाहण्यासाठी गेला.
तिथे पोहचल्यावर सगळे कळाले.
व सरपंचाने डोक्याला हात लावला व बाई ने तेथेच भोकांड पसरले....

*


तीची १० एकर जमीन त्यावेळी असलेल्या १ करोड प्रत्येक एकर भावाने तीनेच विकून टाकली होती त्या ठगाच्या फसवणूकीमुळे. तो ठग १० करोड घेऊन पळून पण गेला ! पण जाता ना त्याच्या मनात काय आले काय माहीत शक्यतो दया म्हणून तो ३ करोड तीच्या खात्यात भरुन निघून गेला.

*

पोलिसांची तपास चक्रे फिरली, सगळीकडे माहीती काढण्यात आली पण तो जो कर्ता होता तो कधीच ती बाई सोडून कोणाच्या समोर ही गेला नाही.
कंपनी मध्ये पण जेव्हा तो गेला होता तेव्हा गॉगल / दाढी व मोठी टोपी घालून गेला होता.
बँकेत देखील तसाच गेला त्यामुळे कोणीच त्यांची निट कल्पना देऊ शकत नव्हता.
त्या आधीच्या घरभाडेकरुला त्यांनेच धमकावले होते व पैसे दिले होते घर सोडण्यासाठी.
त्यांची बायको, आईच पत्ता नाही, शक्यतो त्या पण नकलीच.. असा पोलिसांचा कयास.
ह्यावरुन पोलिस फक्त एवढ्याच निर्णयावर आले की त्यांने खुप मोठा प्लॉन करुन ही फसवणूक केली.
फक्त त्या बाईचे नशीब की त्यांने जाताना ३ करोड तरी सोडले.. नाहीतर...

शुक्रवार, १४ मे, २०१०

बुडीत खाते

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.


**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.


त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता ;) त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते :D


मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी... ;) लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला " बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर......." मी म्हणालो " कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा."

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म ;) ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला " उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. " मामा म्हणाला "ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. " रात्रभर त्याला फुल्लपार्टी ;)


दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब ;) ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला "जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले" व म्हणाला "मी बघतो काय करता येईल ते." मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला "बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही." त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला " मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते "

मामाचे डोके फारच फिरले होते... त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला " बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार" असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला " काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल" तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला " चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही" मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला " आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते "


तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो " कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? " मामा ताडकन म्हणाला " धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे " मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला " दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत." मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला " राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. " मी म्हणालो " मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे" त्यावर माझा लगेच म्हणाला " ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस." आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.


मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले "मोजलेस का ? " मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले " मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या... " व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले....

" झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. " मामा ओरडला. मला काहीच कळेना... मी म्हणालो " म्हणजे ? " मामा म्हणाला " अरे टॉवरचे काम झाले" मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष... सगळेच खुष. ;)

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो...
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते....
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला " तु ते पॅकेट का नाही बघितलेस "
मी गोंधळलो मी म्हणालो " कुठले पॅकेट ??? "
मामा म्हणाला " अरे ते त्या बिहारीने दिले होते ते... "
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो " मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले... मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. "
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला " *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. "


मग कळली खरी हकीकत.... ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते...
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती...
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही...
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.



काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता...

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा... बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच... !

मामाने कप्पाळावरचा हात काढत... आमच्याकडे पहात म्हणाला " सात लाखाचे अजून एक बुडीत खाते.... "


आम्ही ओरडलो " काय ? अजून एक ? म्हणजे ? "

तो म्हणाला.... " सांगतो.... काय झाले माहीत आहे का.... "

मंगळवार, ११ मे, २०१०

स्पर्श ...

तुझे केस..तुझे ते गाल..
स्पर्शाने मोहरुन जाणे तुझे
वेडावलेला भारावलेला मी
डोळ्यांची हालचाल थोडी वेगळी
मनात हुरहुर वेगळी
स्पर्श तनाचा तो क्षणिक
होठांची थरथर मीठीत धुंद
शब्दांपेक्षा जास्त बोलले डोळे
मिठीत सुखावले दुखः सारे
माया ही क्षणीक
क्षणीक नाते स्पर्शाचे
तुझ्या व माझ्या मनाचे
नाते हे जन्मजन्मातरीचे

सोमवार, १० मे, २०१०

सय.....

असेच काहीतरी आठवले म्हणून.....

खुप दिवसानंतर फेसबुक लॉगईन केले, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं म्हणून बसून पुन्हा पुन्हा सगळे चेक केले, सर्व काही जसेच्या तसेच होते २-३ नवीन मित्र झाले होते, माझा वॉल मित्रांच्या मॅसेजने भरुन वाहत होता, पण नक्कीच कुठेतरी काहीतरी हरवले होते म्हणून परत एकदा चेक केले तर एक नाव मिसिंग निघाले. काहीच वाटले नाही, अपेक्षित नव्हते पण धक्कादायक ही नक्कीच नव्हते. मनात आले एकदा जीमेल तरी चेक करु, माहीत आहे एखादा फॉरवर्ड मेल, एखादी अ‍ॅड मेल व इतर फालतू मेल हे सोडून त्या आयडीवर काहीच येत नाही तरी न चुकता दररोज चेक करतोच. का ? माहीत नाही, बोटांना सवय झाली आहे शक्यतो. पण,

काही क्षण काहीच वाटले नाही, जवळ जवळ सगळे मेल डिलिट केले व ज्या निर्विकार मनाने लॉगईन केले होते त्याच निर्विकार मनाने लॉग ऑफ केले. मन निर्विकार होते, एकदम शांत जसे दुरवर परसरलेले वाळवंट. दुरदुर पर्यंत कसलीच छाया नाही ना कसला गोंधळ, सर्वकाही शांत. एक अनामिक चिर शांतेतेच हुडपलेल्या त्या वाळवंटासारखे माझे मन देखील असेच शांत होते.

एखादा चलचित्रपट समोर चालत असावा व आपण फक्त दर्शक होऊन त्याच्याकडे पहात रहावे व समोर झरझर गोष्टी घडत रहाव्या व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा हदयाने. एवढेच काहीतरी चालू होते बाकी सगळे शांत, त्या काही काळ आधी असलेल्या निरभ्र आकाशासारखे.


तुच तुच तुच... आठवतात त्या ओळी अजून मला, कित्येक दिवस समजवले होते की नको वेड्या पाऊसाच्या मागे लागू, पण नाही तुला समजवण्यात अर्थच नव्हता, तुझ्याबरोबर वाहत वाहत कुठवर आलो बघ ना, ना पुढे कोणी आपले ना मागे कोणी, फक्त एक अशांत अशी शांतता जशी वाळवंटात असते, एकदम अबोल, पण आत प्रचंड उलाघाल चालू असते तशीच. नको नको म्हणत असताना देखील सर्वकाही दिलेस मला. कधीकाळी हसणे विसरुन गेलो होतो व ध्येय नावाची कुठलीतरी भावना असते हे देखील. पण तुझ्या अस्तित्वामुळे कुठेतरी भरकटलेला हा जीव, मार्गस्थ झाला, जिवनाला नवीन दिशा मिळाली म्हणूपर्यंत काळरात्र आली व होत्याचे नव्हते झाले. माझ्यावरच अशी का वेळ येते प्रत्येक वेळी असा विचार करत बसलो, शुन्यासारखा.

किती वेळ, कुठे, का ? असले प्रश्न आमच्या सारख्या मुर्खांना कधीच पडत नाहीत. तळपता सुर्य असो व वेड्या सारखा कोसळणारा पाऊस अथवा रम्य चांदणी रात्र, सगळेच सारखे. मग ते रखरखते उंन्ह व तेवढ्याच त्वेषाने कोसळणारा तो पाऊस दोन्ही सारखेच. त्या समोर असलेल्या सरोवरासारखे आम्ही एकदम तटस्थ. भावनाच मेल्या तेथे बाकीच्या गोष्टींची काय तमा ? होते असे कधी कधी. प्रेमाने जवळ घेतलेले व आपल्या हदयाजवळ ठेवलेल्या फुलाचे काटे आपलेच हात करतात कधी कधी रक्तबंबाळ. चालायचेच जगाचा नियम.

उभ्या असलेल्या बाईकला किक मारणे व रस्ता दिसेल तसे हवे सारखे भरकटणे. वाटलेच थांबावे तर थांबायचे, बाईक कडेला उभी करुन कधी डोंगरमाथ्यावर तर कधी एखाद्या तळाच्या समोर वेड्यासारखं शुन्यात बघत उभे राहायचे व एखादी वेडी झुळूक आतपर्यंत स्पर्श करुन गेली तर भानावर आल्या सारखं इकडे तिकडे पाहायचे व कळत नकळत डोळ्याचा ओल्या कडा पुसत स्वतःशीच हसायचे, ते देखील चोरुन, मनमोकळेपणाने हसून देखील खुप दिवस झाले. किती दिवस झाले ह्याचा हिशोब पण नाही, व त्याची काळजीपण नाही.


एकदम संधीप्रकाशासारखी तु गायब झालीस.. आहेस आहेस म्हणूपर्यंत गायब. का कुठे, कशी ? काही माहीत नाही, छोटी मोठी वादळे आली होती पण ती वादळे तुला असे नजरेआड करतील असे मला आज ही वाट नाही. कारण नक्कीच काहीतरी वेगळे असेल अशी भाबडी आशा मनास होती. पण काही दिवसांनी ती पण चकनाचूर झाली, तु समोर येतेस पण एक ही शब्द न बोलता निघून जातेस, बाकी जगाशी बोलतेस, हसतेस पण मी ? तुझ्या त्या विश्वात कुठेच नाही ? तुझी वाट पाहत डोळ्यांना कधी स्वप्नांची सवय लागली तेच कळाले नाही, तुला आठवत असेल मी म्हणत असे तुला मला स्वप्ने कधीच येत नाहीत, माझे डोळे स्वप्न पाहूच शकत नाहीत.. ते पण बेचारे आता थकले म्हणून आजकाल मला स्वप्नात ही तुच दिसतेस. तुझ्या असतील नसतील त्या खाणाखुणा मी पुसून टाकल्या माझ्या जिवनातून पण हदयातून अजून तुला काढणे जमलेच नाही.

काळ रात्री येतात जातात माणसे बदलतात, मित्र बदलतात रात्री गणिक नाती बदलतात, पण तुझे व माझे नाते देखील बदलेल असे खरोखर कधीच वाटले नव्हते. दुखः कश्याचे करावे तेच कळत नाही म्हणून माझी जास्त ओढताण होत असावी, तु अचानक न सांगता गायब झालीस ह्याचे ? मी कुठे चुकलो हेच कळाले नाही ह्याचे ? की जे नियतीत होते ते अचानक नकळत घडले त्याचे ? तुटका फुटका ग्लास देखील चालत नाही लोकांना वापरायला तेथे जिवंत माणसाची कथा काय ! व जर हेच कारण असेल तर जा केले माफ तुला. वादळासारखी आलीस जिवनामध्ये व वादळासारखी गेलीस ही. काय बोलावे ? वादळे कधी कोणाचे भले करत नाहीत असा समज होता तो तुझ्यामुळे काहीकाळ तरी खोट ठरला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे मात्र नक्कीच समजले. कुवती बाहेर कधीच उडी मारु नये ही एक खुणगाठ बांधली गेली तुझ्यामुळे, भले किती ही समोरील देखावा तुम्हाला भुरळ पाडत असला तरी.

काय आहे माहीत आहे का, रणरणत्या उन्हामध्ये अचानक पावसाचा शिडकाव झाला व तो सुगंधीत मृदगंध सर्वत्र पसरला तर पाऊस सर्वांनाच हवा हवासा वाटतो, त्याच्या बरोबर आपण ही मनसोक्त भिजावे अशी आशा पल्वित होऊ लागते पण तोच जर पाऊस वेड्या सारखा कोसळू लागला व सर्वत्र चिखल व पाण्याचे साम्राज्य उभे करु पाहू लागला की लगेच त्याचा तिटकारा येतो.. किळसवाणा वाटतो, नकोसा होतो. होतं असे कधी कधी पण हेच सत्य आहे.

तरी ही, काही नावे माझ्या बरोबर जिवनभर माझ्या श्वासाबरोबर माझ्यासोबतीला असतील त्यातीलच एक तुझे देखील असेल, कृष्णाने म्हणे द्वारकेमध्ये सोपान बांधले होते त्याच्या जिवनात प्रत्येक्ष अप्रत्येक्षपणे त्याला घडवण्यात ज्याचा ज्याचा हात होता त्यांच्या नावाने. त्यात राधा ही होती व त्यात रुक्मणी देखील तसेच जरासंध देखील व तसाच कंस देखील. माहीत नाही स्वतःची कधी वीट देखील असेल की नाही ते पण माझ्या मनात एक सोपान तयार नक्कीच आहे त्यामध्ये एका पायरीवर तुझे नाव एखाद्या माझ्या आवडत्या फुलासारखं अढळ आहे.

दिवा मिणमिणतो आहे ह्याचा अर्थ तो विझला असा नाही, कधीतरी पुन्हा तेजाने झळाळू लागेल अथवा एकदम त्वेषाने जळून काही क्षणामध्ये बंद देखील होईल पण त्याचे अस्तित्व संपेल असे नाही, कुठे तरी तुझ्या मनामध्ये नक्कीच जळत राहील व तु त्याला कधी विझवू शकणार नाहीस व कधी विसरुपण.. तेवढे खरं प्रेम मी तुझ्यावर नक्कीच केले आहे. तुझा स्वभाव मला माहीत आहे, तु कधीच मागे वळून पाहणार नाहीस हे देखील तरी ही कुठेतरी असाच जिवनाच्या एखाद्या वळणावर भेटलोच तर, तुझे ते हास्य परत पहावयास मिळो हीच प्रार्थना त्या ईश्वराचरणी ज्याच्या इच्छेमुळे हे सगळे घडत गेले.

कधी तरी असेच आठवले म्हणून... हे वेड्यागत लिहीत गेलो... हे तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहीत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाला पुन्हा साद घालेल की नाही ते ही माहीत नाही, पण असे वेडे मेघ जागा बघून बरसतात का गं ? कुठेतरी हदयात कळ आली म्हणून हे शब्द उमटत गेले, अर्थ वेगळे संदर्भ वेगळे, तु वेगळी व ही कहानी वेगळी तरी कुठेतरी तुला स्पर्श करेल सुदुरवर पसरलेल्या त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबला मी केलेला स्पर्श, तुझ्या स्पर्शाला आसुसलेल्याप्रमाणे असाच अशांत वाहत राहील... ह्या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर.. तुझा स्पर्श झालाच तर वेड्यासारखा बरसेल माझ्या आश्रुतुन नाहीतर त्या वेड्या मेघातून व असाच एखाद दिवशी मुक्त होईल... कुणाच्या ही नकळत लाखो अरब थेंबाप्रमाणे....



( काल्पनीक : - नेहमी प्रमाणेच एक कशीच कथा, सुचली म्हणून लिहीत गेलो व पुर्ण झाली, कुठल्या ही जिवित व्यक्तीशी / कथेशी साम्य आढळले तर तो निवळ योगायोग समजावा. वादळामध्ये चिरतारुण्य लाभलेल्या आवेशामध्ये उभं असलेलं मनमोहक वट वृक्ष देखील मुळापासून उन्मळून पडतो तेथे सर्व सामान्याची काय गत, अश्याच एका उन्मळून पडलेल्या पण स्वतःची मुळे जपून असलेल्या, नवीन पालवी फुटण्याची वाट पाहत असलेल्या प्रेमीचे हे आत्मकथन. वेगवेगळ्या भावनिक कोल्होळातून जाताना त्याच्या मनाची अवस्था काय असू शकते हे जाणुन घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. )

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

होते असे कधी कधी !!!

होते असे कधी कधी
स्पर्शातून देखील बोल व्यक्त होतात
हात हतात धरुन देखील
कळत नकळत प्रेम व्यक्त होते..
शब्दांची गरज नसते कधी कधी
नकळत नजर बोलून जाते

होते असे कधी कधी..
मीठीत तुझ्या विरघळून जातो मी
जसे नभ विरघळावे बरसल्यावर आकाशी..
घुसमटलेल्या मातीतून जसा
वेडा मृदगंध पसरावा
अंग अंग शहारुन यावे
जसा तुझा स्पर्श जाणवावा

होते असे कधी कधी...
बंध सारे तुटूनी वाहते पाणी
ह्या धारेतून त्या धारेतून
जसा धरबंध नसावा कुठला
शब्दांना कुठलाच अर्थ नसावा

होते असे कधी कधी
नियम तुटतात तर कधी
शब्द मोकाट सुटतात
शब्दांना जे जमले नाही ते
स्पर्श व्यक्त करुन जातात..
डोळ्यांची भाषा डोळ्यास कळून जाते
होते असे कधी कधी....

रविवार, १८ एप्रिल, २०१०

शनिवार, १७ एप्रिल, २०१०

बंगलौर में स्टेडियम के बाहर धमाका

ख़बर आ रही है कि बंगलौर में चिन्नास्वामी स्टेडियम के बाहर बम धमाका हुआ है. यहाँ मुंबई इंडियंस और रॉयल चैलेंजर्स बंगलौर के बीच मैच होना है.


BBC NEWS

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

.........

स्वतःवर हसतो मी कधी कधी
वेडा होऊन खिडकीतून
बाहेर डोकावतो मी
स्वप्नवत जगातून बाहेर
पडण्याचा प्रयत्न करतो मी
पण दलदलीत
फसलेल्या जीवाप्रमाणे
जेवढा प्रयत्न करतो
तेवढाच तुझ्या आठवणीत
पुन्हा पुन्हा धसतो मी

रविवार, ११ एप्रिल, २०१०

प्रवास !

तु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो ? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड... एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे " ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे ". मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.

कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.

धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब ! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.

हर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार ?

तयारी ? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस !



क्रमशः

सोमवार, २९ मार्च, २०१०

बंद मंदिरातील धर्म..

बंद मंदिरातील धर्म.. खरं हे हे शिर्षक चुकीचेच वाटत आहे मला तर येथे उघडा मंदिरे अथवा उघडदार देवा आता उघड दार असे काही शिर्षक द्यावे असे वाटत आहे त्याला कारण ही तसेच आहे हा जैन धर्म.. हो मी जैन धर्माविषयी बोलतो आहे ज्या धर्माचा शेवटचा तिर्थंकर, प्रवर्तक २५०० वर्षापुर्वी होऊन गेला व ज्याची जयंती आज भारतभरातील जैन बांधव उत्साहाने व आनंदाने साजरी करतात तो धर्म म्हणजे जैन धर्म. गेली हजारो वर्ष हा धर्म मंदिरात अडकून आहे. पराकोटीच्या अहिंसेचे समर्थन करणारा हा धर्म.

jain dharma

णमो अरिहंताणं।
णमो सिद्धाणं।
णमो आइरियाणं।
णमो उवज्झायाणं।
णमो लोए सव्वसाहूणं॥


अरिहंतांना नमस्कार, सिध्दीनां नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यांना नमस्कार व सर्व साधुनां नमस्कार अशी पाचं परमेष्ठींना नमस्कार करावयास सांगणारा जैन धर्म !

कधी काळी तिर्थंकारांनी जैन म्हणजे काय हे सांगितले, त्यांचे कर्तव्य काय हे सांगितले व अतिंम ध्येय मोक्ष कसा मिळवावा ह्याचे मार्गदर्शन केले. जैन म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा अथवा सर्वसाधारण ज्यांने मनावर विजय मिळवला तोच जैन ! ऋषभदेव पासून महावीरांपर्यंत सर्व २४ च्या २४ तिर्थिंकरांनी ह्याचेच सुतोवाच केले. अहिंसा हा धर्माचा मुल धर्म, मार्गदर्शन. नमोकार मंत्र म्हणजे जिवनात नम्र रहा ह्याची शिकवण व अतिंम ध्येय म्हणजे मोक्ष, ज्या जिवन मरण चक्रापासून मुक्ती व त्या परमशक्तीमान अश्या देवाच्या मध्ये एकरुप होऊन मुक्त होणे. एवढे साधेसोपे तत्वज्ञान असलेला हा धर्म बाकीच्यांना गुढ, विचित्र व वेगळा का वाटतो तर ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हा धर्म नेहमी मंदिरामध्येच बंधीस्त राहीला पुजारी व मुनी मंडळींनी त्याला कधी सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिला नाही अथवा तसा प्रयत्न केला नाही. सुरवातीच्या काळी ह्या धर्माला प्रचंडमोठ्या प्रमाणात राजश्रय मिळाला, रोज रोज होणारी युध्दे व अपरिमित मनुष्य व धन हानी ह्यापासून मुक्ती देणारा हा धर्म त्यामुळे हा शेवटपर्यंत पुर्ण राजश्रय मिळालेला धर्म ! शक्यतो ह्याचे कारण पण हेच असावे कि २४ च्या २४ तिर्थंकर हे राजकुमार अथवा राजा होते.

कधीकाळी जैन धर्मात मुर्तीपुजनास स्थान नव्हते पण जसा जसा धर्म वाढत गेला तस तसे ह्यात विभाग पडत गेले व दिगंबर जैन, श्वेतांबर जैन व तेरापंथी सारखे उपशाखा निर्माण झाल्या. ज्या तिर्थंकरांनी मोक्ष प्राप्तीसाठी घनदाट जंगलामध्ये अथक कष्ट घेऊन तप केले त्यांना ह्यांनी मंदिरात बसवले !

खुप सुंदर अश्या संगमरवर मंदिरात अतिशय देखणी जिन मुर्ती पाहण्याचे भाग्य हे फक्त जैनांनाच होते, व आज देखील आहे सर्व जागी नाही पण काही जागी नक्कीच सामान्य जनतेला प्रवेश नाही दोन उदाहरणे सांगतो एक खुप आधी जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

अयोध्या, जैनाच्या पाच तिर्थंकरांचे जन्मस्थान ! हो आमचे काही तिर्थंकर रामाचे पुर्वज तर काहीचा राम पुर्वज असे मानले जाते त्यामुळे हिंदु धर्मात जेवढे महत्व अयोध्येचे आहे तेवढेच महत्व जैन धर्मात देखील आहे. तर अश्या ह्या जैन धर्माच्या पंढरीमध्ये मी पाच वेगवेगळ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मला मी दिगंबर जैन आहे हे सांगून सुध्दा प्रवेश नाकारला शेवटी मला त्याला नमोकार मंत्र पठन करुन दाखवावा लागला व काही तिर्थंकरांची नावे सांगावी लागली नशीब माझे मी जैन हॉस्टेल मध्ये शिकलो होतो म्हणून तेवढे आठवत होते नाही तर मी जैन आहे हे सर्टिफिकेट घेऊन मला फिरावे लागले असते.

दुसरा अनुभव, माझे काही विदेशी मित्र भारतभ्रमणसाठी आले होते त्यावेळी त्यांना घेऊन मी मथुरा बघावयास गेलो होतो तर जाताना रस्त्यात एक जिनालय आहे थोडेसे आड वाटेला आहे पण सुरेख असे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे ते संदुर ठिकाण त्या मित्रांना देखील दाखवावे म्हणून तेथे घेऊन गेलो सर्व प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली व आम्ही आत गेलो तर मला सांगण्यात आले की बाकीच्यांना प्रवेश नाही फक्त तुम्ही जाऊ शकता. ती ट्रिप जैन मंदिर न बघताच पुर्ण झाली हे सांगणे गरजेचे नाही.

गुडगांव मध्ये दिगंबर जैनांचे मोठे स्वामी, मुनी बाहुबली स्वामी ह्यांचा आश्रम आहे व त्यांचे जन्मगाव हे माझे आजोळ त्यामुळे तेथे मला जरा प्रवेशाला अडचण नव्हती मी त्यांच्याकडे गेलो व वरील अनुभव सांगून म्हणालो असे का ? त्यांनी धर्म, पवित्रता अशी काही ठेवणीतील कारणे दिली तेव्हा मी त्यांना भारतीय राजघटनेने दिलेले अधिकार सांगितले तर ते म्हणाले की प्रवेश आम्ही नाकारतो असे नाही पण आमचे पुजेचे व मंदिराचे नियम खुप कडक आहेत ते पाळले जात नाही म्हणून आम्ही थांबवतो. मग त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व त्यांना विचारले की " टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे विष्लेशन करा कृपा करुन." हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण देऊन माझी बोळवणी करण्यात आली.


क्रमशः

शनिवार, २७ मार्च, २०१०

१ तास..

आज अर्थ अव्हर म्हणून आपण मी मराठी संकेतस्थळ एक तास ८.३० ते ९.३० बंद ठेवले व एका नव्या प्रयोगास सुरवात केली. हवे तर एखादे चित्र टाकून, मुखपृष्ठ सजवून आपण हा दिवस साजरा करु शकलो असतो पण काल मस्त कलंदर हिचा धागा व निखिल देशपांडे ह्यांनी अर्थ अव्हर मोड्युअल बद्दल सांगितले व मनात आले आपण हा प्रयोग करायचा. ह्यांने काय होईल, काय फरक पडेल सदस्य काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला व एका प्रयोगास हातभार लावल्याचा आनंद मिळाला.

काही ठिकाणी ह्या प्रयोगाची खिल्ली उडवली गेली व काही जणांनी सरळ विचारले काय मिळाले हे करुन ? तर वर म्हणालो तसे एका प्रयोगात सहभागी झालो ह्यांचा आनंद मिळालाच पण आपल्या संकेतस्थळावरील वाचक व सदस्य ह्यांना आपण वेळेवर आठवण करुन देण्यात देखील यशस्वी झालो. इनमीन ताशी २००-३०० पानं पाहीली जाणारी आपली साईट व ताशी १०० एक वाचक व सदस्य असलेली साईट ह्यांनी आपले संकेतस्थळ एक तास बंद ठेवला म्हणून काय फरक पडला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ?

'प्रत्येक गोष्टीची सुरवात ही लहानच असते, शुन्यातून विश्व निर्माण होते' ह्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे व हाच विचार डोक्यात घेऊन आपण हा प्रयोग केला. जर आपल्या सदस्यांपैकी / वाचकांपैकी एकाने जरी हा २०१० चा अर्थ अव्हर पाळला असेल तर तर आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत ह्या प्रयोगात व हीच आपली सुरवात आहे. भारतासारख्या जेथे वीजेचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच गंभीर आहे तेथे असले अर्थ अव्हर पाळून काय होणार असा देखील एक सुर समाजात जाणवतो पण अश्या प्रयोगामुळे समाजामध्ये जागृती येते, ठीक आहे आपल्याकडे वीजेची टंचाई आहे पण जी आहे ती तर आपण जपून वापरायला शिकू अश्या प्रयोगामुळे त्यासाठी हा सगळा अट्टाहास. आजच्या ह्या एका तासामुळे आपण किती वीज वाचवली हे महत्वाचे नाही आहे पण आपण कमीत कमी वीज वाचवण्यासाठी सुरवात तरी केली हे महत्वाचे. आजचा दिवस संपला म्हणजे प्रयोग संपला असे नाही आपण वेळोवेळी अश्या प्रकारच्या सामाजिक बदल घडवणार्‍या प्रयोगांना समर्थन देऊ व शक्य तेवढा त्याचा प्रचार देखील करु.

इतर फालतु डे आपण आनंदाने व उत्साहाने पाळतो त्याच उत्साहाने व त्यापेक्षा द्विगुणीत आनंदाने हे असे सामाजिक उत्सव आपण पाळले पाहीजेत जेणे करुन आपली येणारी पिढी सुखाने ह्या धरतीवर श्वास घेऊ शकेल.

http://www.earthhour.org/ ही संस्था ह्यावर कार्य करत आहे व ह्यांनी जे मोड्युअल तयार करुन दिले होते ते वापरुन हा मराठी संकेतस्थळावर नवीन प्रयोग यशस्वीपणे राबवला त्यांचे व ड्रुपल चे अनेकानेक धन्यवाद.


***

आपण कसा व कश्या पध्दतीने अर्थ अव्हर पाळला व इतरांना तो पाळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले ह्या बद्दल आपण जरुर लिहा.


धन्यवाद.

मी मराठी,
व्यवस्थापक.

हरवलेली पानं.... भाग - १

प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-

मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख " एक सोडून.... " लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल... असे नक्कीच नसते.... अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही... भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको... !

काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला... त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक...

*************

कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.

माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा... लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..

लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्‍याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर... नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्‍याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.

आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर....

हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते... !

काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे... एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.

एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.

शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम... पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र... हिशोब नाही !

आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा... त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.

दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे... जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच... सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.

पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो... पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे... व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्‍याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती...

क्रमशः

बुधवार, २४ मार्च, २०१०

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता....

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !

सोमवार, ८ मार्च, २०१०

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! - भाग १

१. http://translate.google.com/translate_t#
गुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.



२. http://www.vuvox.com/
फोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create



३. http://www.scribd.com/
येथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून... काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.



४. http://www.qipit.com/
सर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा ;)



५. https://mozy.com/home
सगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली ! तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं !



६. www.howstuffworks.com/
कुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल ... असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे ! जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे ;)



७. http://www.zamzar.com/
वर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे... अथवा ईतर प्रकारामध्ये ? तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी ! कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.





अजून खुप काही आहे महाजालावर !
अजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच !

* पुर्वप्रकाशीत : - २००८

रविवार, ७ मार्च, २०१०

कार्तिक कॉलिंग कार्तिक





एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली - असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो... घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो... व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे...... तो तोच आहे जो हा आहे... ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस... पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते... व चित्रपट एकदम बदलतो... सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते... हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !

गुरुवार, ४ मार्च, २०१०

पंचगंगेच्या तीरावर....

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.



































बुधवार, ३ मार्च, २०१०

( रॉड )

आता जुळला आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज मला म्हणून ' रॉड तू ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून रॉड तू मध्ये अचानक तुटू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
धातूचे मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक पाऊलात तुझी गरज भासत असेल
जन्मभर झेपेल इतकं भरून वजन तुझ्यावर मी टाकत असेन

तुझ्याच भरवश्यावर मी उभा , कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

झेपेल तितकं वजन घेत रहा, जमेल तितकी साथ देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा कळा देत रहा..

समाधानात जोडतोड असते...फक्त जरा समजून घे
'रॉड ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घेतले..

विश्वासाचे दोन शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक मी तुला जपतो , मध्येच माघार घेऊ नकोस...!

उलटा पडलो तरी, साथ सोडू नकोस
तुझ्यावीना मी व माझ्यावीना तु कवडीमोल ठरवू नकोस...



****

प्रेरणा : दुवा

मंगळवार, २ मार्च, २०१०

माझी सफर....आई... १८

तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

तो दिवस पुर्ण रडारडी मध्येच संपला, अक्काला कसे बसे सर्व काही समजावून मी परत मावशीच्या घरी आलो.. दोन दिवसामध्ये त्याना माझे ईतक्या वर्षाचे जिवनचक्र माहीत झाले व मला आई-वडीलांचे... माझ्या सारखा कमनशीबी कोणीच नसावे ह्या दुनियामध्ये... घराच्या वाईट अवस्थे मध्येच मी माझ्या घरासोबत नव्हतो.. ह्याचे दुखः जास्त होते..
पण कालचक्र सर्व दुखःवर उपाय ! अठवड्यानंतर फोन करुन विभा व ईतर मित्रमंडळीना बातमी सांगतली की मी घरी पोहचलो आहे.. पण आई प्रवासासाठी बाहेर आहे व दोन महीने लागतील तीला परत येण्यासाठी... व तोपर्यंत मी येथेच राहणार की परत दिल्लीला येणार ह्याचा निर्णय दोन एक दिवसामध्ये घेऊन फोन करेन.
तात्या व मी असेच शेतामध्ये फिरत होतो व बोलता बोलता तात्या म्हणाले.. " राजा, तुला माहीत नसेल पण दोन एक दिवसामध्ये मुर्हत काढून पंडीताकडून तुझी शुध्दी करुन घ्यावी अशी तुझ्या मावशीचा व माझी ईच्छा आहे"
मी " माझी शुध्दी ? का ? "
तात्या " कसे सांगू....तु ईतकी वर्ष बाहेर राहीलास.. ना तुझा अता ना पत्ता ! ..तुला जाऊन देखील त्यावेळी १० वर्ष झाली होती... तेव्हा आम्ही तुझे श्राध्द घातले होते... "
मी त्यांना बघतच राहीलो.... व एकदमच हसलो.. व म्हणालो "जेव्हा मी हरिद्वारमध्ये होतो.. तेव्हा माझ्या मनात नेहमी येत असे की मला काही बरे वाइट झालेच तर माझे क्रियाक्रम कोण करणार.. येथे माझे श्राध्द कोण घालणार.. तुम्ही सर्व माझे श्राध्द घालाल अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती मला ... चला काही हरकत नाही.. मला नाही फरक पडत ह्या गोष्टीमुळे... पण तुम्ही माझा मृत्यूदाखला तर घेतला नाही ना ???"
तात्या " अरे नाही.. गरजच नाही पडली.. राशन कार्ड वर तुझे अजून नाव आहे"
मी " धन्यवाद...!" व आम्ही घरी परतलो... पण दोन महीने काम न करता येथे राहणे मला चालणार नव्हेते.. तेव्हा मी परत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला व मावशीकडे माझा पत्ता व फोन नंबर लिहून दिला व दुस-या दिवशी मी सरळ पुण्यात आलो ... पुणा ते दिल्ली परत !

कामावर पुन्हा रुजू झालो व दोन दिवसातून एकदा मावशी कडे फोन करणे चालु झाले... पण ह्या सर्व लफड्यात मी व विभा जवळ जवळ... भेटेनासे झालो व कळत नकळत संपर्क देखील कमी होऊ लागला होता... त्यातच एक दिवस संजनाचा फोन आला ती म्हणाली.. " राज अभी के अभी घर पें आ जाओ !!"
मी तीला समजवण्याचा पर्यंत केला की काम करतो आहे..व सुट्टी झाली की येतो.. ती ठीक आहे म्हणाली व मी काम संपवून संध्याकाळी तीच्या घरी गेलो...
संजना " देखो राज... एक काम का प्रपोजल है ... पढो !" तीने काही पेपर हाती दिले व मी ते वाचू लागलो... चीन मधून काही संगणक सामान आयात करण्याबद्दल ते प्रपोजल होते.. मी म्हणालो .." अच्छा, काम है... कमाई हो सकती है.. ! " संजना " राज, तुम्हा रे नेहरु प्लेस में अच्छे जाणकार है... तुम अगर चाहो तो.. हमारे साथ पाटर्नरशीप में काम कर सकते हो..." मी म्हणालो " नही.. यार.. मेरे पास ईतना सारा पैसा कहा से आयेगा !" संजना " पैसे पुछे तुझे हमने ??.... वर्कीग पाटर्नरशीप ३०% तुम्हारा.. बाकी हमारा..!" मी म्हणालो.." हम्म ! मुझे दिक्कत नही है.. पर दो एक दिन तु पहले सोचो.. अपने पतीसे बात करो फिर !"
असे म्हणून मी जाण्याची तयारी करु लागलो व बाईक ची चावी शोधू लागलो !.. चावी कोठे गेली यार ... " संजना, चाबी देखी है... " संजना " नहीं... रुक जा, चाय तयार है.. पीके जाना !" मी ठीक आहे म्हणून.. सरळ समोर असलेल्या पीसीवर जाऊन बसलो.. डिस्कटॉप वर काही फोल्डर होते तेथे विभा नावाचा देखील एक फोल्डर होता.. हे घर.. मला काही नवीन नाही.. सगळेच मला ओळखतात.. विभा तर आपली.. तीचा फोल्डर उघडला तर काय फरक .. असा विचार करुन मी फोल्डर उघडला..त्यात विना व अना ने घरीच खेचलेले काही विभाचे फोटो होते.. मी ते फोटो पाहण्यात ईतका गुंग होतो.. की संजनाने चहा समोर ठेवलेला देखील मला जाणवले नव्हते....
संजना " जिसे फोटो में देख रहे हो.. व इस रुम में कम से कम १५ मिनिट से बैठी है..." मी दचकलोच.. व फटाफट तो फोल्डर बंद करण्यासाठी धडपडलो.. जवळच ठेवलेले स्पीकर व ईतर वस्तू माझ्या धडपडीमुळे खाली पडल्या.. व मी जरा हलकाच हसत... म्हणालो " बच्चोंने फोटो अच्छे खिचे है !... अरे विभा तुम कब आयी ? " सोप्यावर बसलेल्या पाहून मी विचारले.
मी असे विचारताच रागाने पाय आपटत ती सरळ संजनाच्या मुलीच्या रुम कडे निघून गेली.. व मला संजनाने तीच्या पाठीमागे पाठवले...
मी "विभा.. बात सूनो.." पण ती आपल्या रागातच होती.. मी दोन तीनदा प्रयत्न केला व सरळ बाहेर येऊन संजना बरोबर.. कामाची बोलणी चालू केली... अर्धा एकतास आमची मिटींग झाली व कामाचे स्वरुप लक्षात आले.. व मी काम करने नक्की केले.. तो पर्यंत विभाचा राग उतरला होता.. ती बाहेर आली.. " तुम्हे यहा वापस आ के... हप्ता हो गया है.. ना तुमने फोन कीया ना मिलने आहे.. क्या समजते हो अपने आप को" - विभा.
हम्म मॅडम ह्या रागात आहे तर.. मी तीला समोर बसवले व माझ्या सर्व प्रवासाची तीला माहीती व्यवस्थीत दिली व म्हणालो.." यार.. थोडा परेशान था.. ईन दिनों में... उस में ऑफिस का सारा काम रुका पडा था..टाईम नही था.. संजना के घर भी में आज ही आया हूं.. पुछो ! " ती जरा शांत झाली व म्हणाली.. " अपनी मम्मी से मिलने कब जाओगे?... जब मिलोगे ना तब उन्हे यही लेके आना... अपने साथ रहेगी ऑन्टी !" मी हसलो व म्हणालो.." ठीक है..प्लान कुछ मेरा भी यही था' थोड्यावेळाने मी पुन्हा जाण्यासाठी उठलो तेव्हा मात्र विभाने चावी माझ्या हातात दिली व हसली ! मी म्हणालो.." अच्छा इस वजह से मुझे पहले चाबी नहीं मिली थी" व मी विभाला तीच्या घरी सोडून सरळ रुम वर आलो !!!

मी दिल्लीला परत येऊन एक महीना झाला होता... व संजनाच्या नवीन कामासाठी मला आपली पहली जॉब सोडावी लागणार होती.. व कंपनीने दिलेली रुम वजा घर देखील ! त्याची तयारी करुन मी कंपनी मध्ये वर्मासरांकडे मी जॉब सोडणार आहे ह्याचा उल्लेख केला.. त्यांनी प्रचंड समजावून पाहीले व नंतर परवानगी दिली व मी संजना सोबत पाटर्नर म्हणून काम चालू केले... पण सामान आणण्यासाठी चीन ला जाणे गरजेचे होते.. व टेकनीकल माहीती मला जास्त होती म्हणून माझे ही जाणे गरजेचे होते... पण संजना व तीचे पती म्हणत होते की ह्या महीन्यामध्येच जाऊ.. पण आई देखील यात्रेवरुन परत येणार होती ते ह्याच महीन्यात कसे करावे ह्या विचारामध्ये मी मावशी कडे फोन लावला ..." मावशी, आईची काही खबर कधी येणार आहे परत .. फोन आला होता का ? " मावशी " अरे .. ह्याच आठवड्यात येणार आहे.. परत... तीचा फोन आला होता.. तु पण ये !" मी हो म्हणालो व फोन ठेवला.. मी संजनाला कल्पना दिली व म्हणालो... जाण्याची तयारी चालू करा टीकीट बूक करा मी घरी जाऊन लगेच परत येतो..!

मी सरळ दिल्ली एयरपोर्टवर जाऊन शुक्रवारची पुण्याची टीकीट बूक केली व परत येण्यासाठी बुधवारची !! शनीवारी आई घरी येणार होती !!
बझार मध्ये जाऊन.. अक्कासाठी एक तोळ्याची सोन्याची चेन व आई साठी देखील एक चेन घेतली व रुमवर जाऊन जाण्याची तयारी केली व संध्याकाळी निवांत बसून विभाला फोन करुन सर्व कल्पना दिली.. !

मी पुण्यामार्गे... सरळ कोल्हापुर व घरी पोहचलो... शनीवारी दुपारी !.....मावशीच्या घरात तर एकदम गर्दी झालेली होती... सर्व प्रवासी मंडळी देखील काही वेळापुर्वीच पोहचली होती व आई देखील...!
मी बाहेर ऊभा होतो.. व तात्या आले व मला आत घेऊन गेलो.. आई शी कसे भेटावे ह्याचा मनात विचार करत होतो.. काय सांगायचे.. कसे सांगायचे... माफी मागावी तर कशी ... डोळे पाण्याने सारखे सारखे भरुन येत होते... व मी सरळ घराचा पाठीमागील अंगणात पोहचलो... तेथे आई व मावशी बोलत बसली होती व मावशीने माझ्याकडे पाहीले व आईला म्हणाली " अक्का... राजा आला बघ ! " आई पळत माझ्या जवळ आली व मला छातीशी धरुन ओसाबोस्की रडू लागली.. व पाच दहा मिनीटे अशीच गेली.. ! मावशीने तीला धीर देऊन खाली बसवले व मी म्हणालो.." यऊ.. मी आलो आहे ना ... " व मी देखील डोळे पुसू लागलो व तात्या माझ्याकडे आले व मला बाजूला बसवले व पिण्यासाठी पाणी देऊन म्हणाले " राजा.. लेका रडतोस काय... आता तु मोठा झालेला आहेस.. आता काही काळजी नाही आम्हाला देखील.... मला देखील तीन मुलीच होत्या.. सगळ्या पाहूण्यामध्ये तु एकुलता एक मुलगा.. आम्ही मेलास असे समजून होतो पण देवाच्या कृपेने तु परत आला ... !! गप्प बस आता रडू नकोस.."
तासादोनतासाने सर्व वातावरण निवळले.. तात्या जाऊन अक्काला देखील घेऊन आला... तात्याच्या मुली.. माझा मावस बहीणी देखील आपल्या सासर हून परत आल्या होत्या....मला भेटायला !!!!.... राजा दादाला भेटायला... वर्षानू वर्ष राखी बाधण्यासाठी हक्काचा त्यांना दादा परत आला होता ना !
पुर्ण शनीवार.. रवीवार गप्पा मारण्यात व माझी सफर ह्याच मध्ये संपले ! मी हलकेच तात्यांना सूचना दिली की मला मंगळवारी संध्याकाळी जावयास हवे कारण ह्यामहीन्याच्या शेवटी मी चीनला जाणार आहे... ! तात्या ठिक आहे म्हणाले !
मला बेसनलाडू लहानपणी खुप आवडत असत व आईला तर विश्वासच बसला नाही की मी घर सोडल्यापासून बेसनलाडू साधा चाखूनपण बघीतला नाही ईतक्यावर्षात... खास माझ्यासाठी संध्याकाळी बेसनलाडू तयार करण्यात आले व माझी आवड्ती वाम्ग्याची भाजी !!!
ईतक्यावर्षाने घरचे आईच्या हातचे जेवण खाऊन मी तृप्त झालो होतो...! सोमवारी सकाळ्सकाळी मला जवळच्या देवस्थानावर घेउन गेले व आईने आपले सर्व नवस फेडले !!!
तीचा राजा परत आला होता.... ज्याला सर्व नातेवाईक नावे ठेवत होते की कोणी त्याला हॉटेलात सफाईकामाला देखील ठेवणार नाही.. असे छाती ठोक सांगणारे होते... त्याच्या.. विरुध्द जाऊन तीचा मुलगा यश घेऊन आला होता.. मोठया कंपनी मध्ये चांगले हजारो मध्ये पगार मिळवत होता.. तीचा नवस पुर्ण झाला !! तीने माझ्याकडे एक मागणे मागीतले म्हणाली जाण्याआधी तू गाव जेवण घाल ! बस. मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!

क्रमशः