शुक्रवार, २१ मे, २०१०

हॅप्पी बर्थ डे...Pac-Man ...

आताच गुगलचा नवीन लोगो पाहीला....

pak-man


व मन एकदम सुरवातीच्या काळात गेले, जेव्हा नकळत कसा बसा... संगणकाबरोबर जुडला गेलो होतो... ३८६ नंतर ४८६... मज्जा होती त्यावेळी... काळे-पांढरे पडदे व तो गेम.. Pac-Man !


जबरदस्त मज्जा येत असे त्याकाळी !

आज गुगलवर तो लोगो पाहीला...

आज Pac-Man चा ३० वा वाढदिवस.. ३० वा ? अरे तीसवर्ष झाली त्या गेमला ? काल परवा पर्यंत तर मोबाईलवर खेळताना देखील नवीनच वाटायचा तो मला.. Pac-Man !


असो,

ज्यांने तयार केला त्याला अनेकानेक धन्यवाद...
कारण हा एकच गेम होता ज्याच्यामुळे मी संगणकाच्या जवळ आलो...
व आज येथेवर... :)
मला ह्या गेमने खुप काही दिले... त्याचे आभारच मी ह्या छोटेखानी लेखाद्वारे व्यक्त करतो आहे... !


थॅक्यु !

Pac-Man

सोमवार, १७ मे, २०१०

फसवणूक

आपण वेगवेगळे फसवणूकीचे प्रकार नेहमी इकडे तिकडे पहात असतोच. असाच हा एक मस्त किस्सा ! कितपत खरा आहे माहीत नाही पण ज्यांने सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकतो कारण तो गुडगावं पोलिस मध्ये होता ;)
स्थळ : गुडगाव, बादशहापुर.
काळ : जेव्हा प्रॉपर्टी मार्केट बुस्टवर होते तेव्हाचा ;)

*****




गावामध्ये एक घर.
कर्ता पुरुष काही वर्षापुर्वीच वारलेला.
बाईच सगळे बघायची, त्या जवळ जवळ न शिकलेलीच.
कमाईचे साधन शेत व दुसरे घर भाड्याने देणे.
लग्नाच्या वयाच्या दोन मुली.
बाई तशी चालाख इत्यादी नव्हती एकदम साधीभोळी.
मुली पण तश्याच.
त्या घरचे सगळे व्यवहार त्या तीघी मिळूनच चालवायच्या.

*

घराचा भाडेकरु तडकाफडकीचे घर सोडून गेला.
तीन-चार दिवसामध्येच एक ३०-३५ च्या आसपासचा व्यक्ती आला व घर भाड्याने मागितले.
दोन रुम व किचन असलेले ते घर, तीने मागितलेले भाडे व डिपॉझीट न कुरकुर करता दिले.
तो, तीची बायको व आई असे तीघे.
दोन एक महिन्यातच चांगलेच रुळले घरामध्ये.
त्या बाईशी देखील त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते.

*

एके दिवशी त्या व्यक्तीच्या आईची तब्येत एकदम खालावली.
हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले व सरळ दोन दिवसांनी बातमी दिली आई गेली म्हणून.
१५-२० दिवसाने ती व्यक्ती एकटीच परत आली.
तीच्या जवळ बसून तिला सगळी राम कहानी सांगितली.
हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर तीला हार्ट अटॅक आला व ती गेली,मग गावी घेऊन गेलो, तिकडेच सगळे उरकले. इत्यादी.

*

दुसर्‍या तिसर्‍या दिवशी तो परत घरी आला व एक मदत मागीतली.
तीला तो म्हणाला की आई वारल्यामुळे सगळे कर्जदार मागे पडले आहेत व त्यांना पैसे द्याचे आहेत.
मी माझे शेत विकावे म्हणतो आहे पण शेत आईच्या नावे होते व अजून ट्रान्सफर झाले नाही आहे माझ्या नावावर. तुम्ही मदत करा.
ती गोंधळली तिला वाटले पैसे मागतो की काय !
पण नाही त्यांने पैसे मागितले नाहीत एवढंच म्हणाला की तुमचे नाव व माझ्या आईचे नाव सारखेच आहे, तुम्ही माझ्या बरोबर त्या कंपनीत चला जी ते शेत घेण्यास तयार आहे तिकडे व त्यानंतर बॅकेत मी तुम्हाला एक टक्का देईन सर्व व्हवहाराबद्दल रोख मध्ये, जवळ जवळ दोन लाख रु..
आधी ती नाही म्हणाली पण दोन लाख मोठी रक्कम म्हणून तयार झाली.


*


हा तिला घेऊन कंपनी मध्ये गेला.
सगळे कागदपत्रे समोर उभे राहून सही करुन घेतले.
ह्या सगळ्यामध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ गेला.
दुसर्‍या आठवड्यात त्यांने वायदाप्रमाणे दोन लाख तिच्या हातात ठेवले.
त्यांनतर मोठ्या बँकेत जाऊन पैसे काढून आणले व तो पैसे घेऊन गावी जाउन येतो म्हणून निघून गेला.


*

फक्त सही करण्याचे दोन लाख मिळाले हे पाहून त्या बाईने दिवाळी साजरी केली.
मुलीं साठी दागीने घेतले, कपडे घेतले.
अर्धा गावाला नवर्‍याच्या नावाने जेवण घातले.

*

३-४ दिवशी ग्रामिण बॅकेचा शिपाई धावत पळत तिच्या घरी.
तिला घेऊन बँकेत गेला.
बँक मॅनेजर जवळ जवळ पळत येऊनच तीला आत घेऊन गेला.
व तीला बातमी सांगितली की तीच्या अकाउंट मध्ये ३ करोड रु. आले आहेत म्हणून.
हिला काहीच कळेना. गावच्या सरपंचापर्यंत बातमी गेली होतीच तो पण आला.
सगळेच गोंधळून गेले होते हीच्या खात्यात एवढे पैसे आलेच कसे.

*

तिला खोदून खोदून विचारल्यावर तीने दोन लाखाची कमाई कशी केली ते सांगितले.
सरपंचाला काहीतरी घोळ वाटला व तो तिला घेऊन साताबारा उतारा पाहण्यासाठी गेला.
तिथे पोहचल्यावर सगळे कळाले.
व सरपंचाने डोक्याला हात लावला व बाई ने तेथेच भोकांड पसरले....

*


तीची १० एकर जमीन त्यावेळी असलेल्या १ करोड प्रत्येक एकर भावाने तीनेच विकून टाकली होती त्या ठगाच्या फसवणूकीमुळे. तो ठग १० करोड घेऊन पळून पण गेला ! पण जाता ना त्याच्या मनात काय आले काय माहीत शक्यतो दया म्हणून तो ३ करोड तीच्या खात्यात भरुन निघून गेला.

*

पोलिसांची तपास चक्रे फिरली, सगळीकडे माहीती काढण्यात आली पण तो जो कर्ता होता तो कधीच ती बाई सोडून कोणाच्या समोर ही गेला नाही.
कंपनी मध्ये पण जेव्हा तो गेला होता तेव्हा गॉगल / दाढी व मोठी टोपी घालून गेला होता.
बँकेत देखील तसाच गेला त्यामुळे कोणीच त्यांची निट कल्पना देऊ शकत नव्हता.
त्या आधीच्या घरभाडेकरुला त्यांनेच धमकावले होते व पैसे दिले होते घर सोडण्यासाठी.
त्यांची बायको, आईच पत्ता नाही, शक्यतो त्या पण नकलीच.. असा पोलिसांचा कयास.
ह्यावरुन पोलिस फक्त एवढ्याच निर्णयावर आले की त्यांने खुप मोठा प्लॉन करुन ही फसवणूक केली.
फक्त त्या बाईचे नशीब की त्यांने जाताना ३ करोड तरी सोडले.. नाहीतर...

शुक्रवार, १४ मे, २०१०

बुडीत खाते

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.


**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.


त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता ;) त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते :D


मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी... ;) लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला " बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर......." मी म्हणालो " कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा."

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म ;) ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला " उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. " मामा म्हणाला "ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. " रात्रभर त्याला फुल्लपार्टी ;)


दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब ;) ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला "जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले" व म्हणाला "मी बघतो काय करता येईल ते." मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला "बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही." त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला " मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते "

मामाचे डोके फारच फिरले होते... त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला " बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार" असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला " काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल" तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला " चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही" मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला " आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते "


तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो " कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? " मामा ताडकन म्हणाला " धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे " मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला " दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत." मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला " राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. " मी म्हणालो " मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे" त्यावर माझा लगेच म्हणाला " ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस." आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.


मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले "मोजलेस का ? " मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले " मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या... " व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले....

" झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. " मामा ओरडला. मला काहीच कळेना... मी म्हणालो " म्हणजे ? " मामा म्हणाला " अरे टॉवरचे काम झाले" मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष... सगळेच खुष. ;)

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो...
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते....
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला " तु ते पॅकेट का नाही बघितलेस "
मी गोंधळलो मी म्हणालो " कुठले पॅकेट ??? "
मामा म्हणाला " अरे ते त्या बिहारीने दिले होते ते... "
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो " मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले... मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. "
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला " *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. "


मग कळली खरी हकीकत.... ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते...
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती...
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही...
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.



काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता...

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा... बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच... !

मामाने कप्पाळावरचा हात काढत... आमच्याकडे पहात म्हणाला " सात लाखाचे अजून एक बुडीत खाते.... "


आम्ही ओरडलो " काय ? अजून एक ? म्हणजे ? "

तो म्हणाला.... " सांगतो.... काय झाले माहीत आहे का.... "

मंगळवार, ११ मे, २०१०

स्पर्श ...

तुझे केस..तुझे ते गाल..
स्पर्शाने मोहरुन जाणे तुझे
वेडावलेला भारावलेला मी
डोळ्यांची हालचाल थोडी वेगळी
मनात हुरहुर वेगळी
स्पर्श तनाचा तो क्षणिक
होठांची थरथर मीठीत धुंद
शब्दांपेक्षा जास्त बोलले डोळे
मिठीत सुखावले दुखः सारे
माया ही क्षणीक
क्षणीक नाते स्पर्शाचे
तुझ्या व माझ्या मनाचे
नाते हे जन्मजन्मातरीचे

सोमवार, १० मे, २०१०

सय.....

असेच काहीतरी आठवले म्हणून.....

खुप दिवसानंतर फेसबुक लॉगईन केले, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं म्हणून बसून पुन्हा पुन्हा सगळे चेक केले, सर्व काही जसेच्या तसेच होते २-३ नवीन मित्र झाले होते, माझा वॉल मित्रांच्या मॅसेजने भरुन वाहत होता, पण नक्कीच कुठेतरी काहीतरी हरवले होते म्हणून परत एकदा चेक केले तर एक नाव मिसिंग निघाले. काहीच वाटले नाही, अपेक्षित नव्हते पण धक्कादायक ही नक्कीच नव्हते. मनात आले एकदा जीमेल तरी चेक करु, माहीत आहे एखादा फॉरवर्ड मेल, एखादी अ‍ॅड मेल व इतर फालतू मेल हे सोडून त्या आयडीवर काहीच येत नाही तरी न चुकता दररोज चेक करतोच. का ? माहीत नाही, बोटांना सवय झाली आहे शक्यतो. पण,

काही क्षण काहीच वाटले नाही, जवळ जवळ सगळे मेल डिलिट केले व ज्या निर्विकार मनाने लॉगईन केले होते त्याच निर्विकार मनाने लॉग ऑफ केले. मन निर्विकार होते, एकदम शांत जसे दुरवर परसरलेले वाळवंट. दुरदुर पर्यंत कसलीच छाया नाही ना कसला गोंधळ, सर्वकाही शांत. एक अनामिक चिर शांतेतेच हुडपलेल्या त्या वाळवंटासारखे माझे मन देखील असेच शांत होते.

एखादा चलचित्रपट समोर चालत असावा व आपण फक्त दर्शक होऊन त्याच्याकडे पहात रहावे व समोर झरझर गोष्टी घडत रहाव्या व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा हदयाने. एवढेच काहीतरी चालू होते बाकी सगळे शांत, त्या काही काळ आधी असलेल्या निरभ्र आकाशासारखे.


तुच तुच तुच... आठवतात त्या ओळी अजून मला, कित्येक दिवस समजवले होते की नको वेड्या पाऊसाच्या मागे लागू, पण नाही तुला समजवण्यात अर्थच नव्हता, तुझ्याबरोबर वाहत वाहत कुठवर आलो बघ ना, ना पुढे कोणी आपले ना मागे कोणी, फक्त एक अशांत अशी शांतता जशी वाळवंटात असते, एकदम अबोल, पण आत प्रचंड उलाघाल चालू असते तशीच. नको नको म्हणत असताना देखील सर्वकाही दिलेस मला. कधीकाळी हसणे विसरुन गेलो होतो व ध्येय नावाची कुठलीतरी भावना असते हे देखील. पण तुझ्या अस्तित्वामुळे कुठेतरी भरकटलेला हा जीव, मार्गस्थ झाला, जिवनाला नवीन दिशा मिळाली म्हणूपर्यंत काळरात्र आली व होत्याचे नव्हते झाले. माझ्यावरच अशी का वेळ येते प्रत्येक वेळी असा विचार करत बसलो, शुन्यासारखा.

किती वेळ, कुठे, का ? असले प्रश्न आमच्या सारख्या मुर्खांना कधीच पडत नाहीत. तळपता सुर्य असो व वेड्या सारखा कोसळणारा पाऊस अथवा रम्य चांदणी रात्र, सगळेच सारखे. मग ते रखरखते उंन्ह व तेवढ्याच त्वेषाने कोसळणारा तो पाऊस दोन्ही सारखेच. त्या समोर असलेल्या सरोवरासारखे आम्ही एकदम तटस्थ. भावनाच मेल्या तेथे बाकीच्या गोष्टींची काय तमा ? होते असे कधी कधी. प्रेमाने जवळ घेतलेले व आपल्या हदयाजवळ ठेवलेल्या फुलाचे काटे आपलेच हात करतात कधी कधी रक्तबंबाळ. चालायचेच जगाचा नियम.

उभ्या असलेल्या बाईकला किक मारणे व रस्ता दिसेल तसे हवे सारखे भरकटणे. वाटलेच थांबावे तर थांबायचे, बाईक कडेला उभी करुन कधी डोंगरमाथ्यावर तर कधी एखाद्या तळाच्या समोर वेड्यासारखं शुन्यात बघत उभे राहायचे व एखादी वेडी झुळूक आतपर्यंत स्पर्श करुन गेली तर भानावर आल्या सारखं इकडे तिकडे पाहायचे व कळत नकळत डोळ्याचा ओल्या कडा पुसत स्वतःशीच हसायचे, ते देखील चोरुन, मनमोकळेपणाने हसून देखील खुप दिवस झाले. किती दिवस झाले ह्याचा हिशोब पण नाही, व त्याची काळजीपण नाही.


एकदम संधीप्रकाशासारखी तु गायब झालीस.. आहेस आहेस म्हणूपर्यंत गायब. का कुठे, कशी ? काही माहीत नाही, छोटी मोठी वादळे आली होती पण ती वादळे तुला असे नजरेआड करतील असे मला आज ही वाट नाही. कारण नक्कीच काहीतरी वेगळे असेल अशी भाबडी आशा मनास होती. पण काही दिवसांनी ती पण चकनाचूर झाली, तु समोर येतेस पण एक ही शब्द न बोलता निघून जातेस, बाकी जगाशी बोलतेस, हसतेस पण मी ? तुझ्या त्या विश्वात कुठेच नाही ? तुझी वाट पाहत डोळ्यांना कधी स्वप्नांची सवय लागली तेच कळाले नाही, तुला आठवत असेल मी म्हणत असे तुला मला स्वप्ने कधीच येत नाहीत, माझे डोळे स्वप्न पाहूच शकत नाहीत.. ते पण बेचारे आता थकले म्हणून आजकाल मला स्वप्नात ही तुच दिसतेस. तुझ्या असतील नसतील त्या खाणाखुणा मी पुसून टाकल्या माझ्या जिवनातून पण हदयातून अजून तुला काढणे जमलेच नाही.

काळ रात्री येतात जातात माणसे बदलतात, मित्र बदलतात रात्री गणिक नाती बदलतात, पण तुझे व माझे नाते देखील बदलेल असे खरोखर कधीच वाटले नव्हते. दुखः कश्याचे करावे तेच कळत नाही म्हणून माझी जास्त ओढताण होत असावी, तु अचानक न सांगता गायब झालीस ह्याचे ? मी कुठे चुकलो हेच कळाले नाही ह्याचे ? की जे नियतीत होते ते अचानक नकळत घडले त्याचे ? तुटका फुटका ग्लास देखील चालत नाही लोकांना वापरायला तेथे जिवंत माणसाची कथा काय ! व जर हेच कारण असेल तर जा केले माफ तुला. वादळासारखी आलीस जिवनामध्ये व वादळासारखी गेलीस ही. काय बोलावे ? वादळे कधी कोणाचे भले करत नाहीत असा समज होता तो तुझ्यामुळे काहीकाळ तरी खोट ठरला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे मात्र नक्कीच समजले. कुवती बाहेर कधीच उडी मारु नये ही एक खुणगाठ बांधली गेली तुझ्यामुळे, भले किती ही समोरील देखावा तुम्हाला भुरळ पाडत असला तरी.

काय आहे माहीत आहे का, रणरणत्या उन्हामध्ये अचानक पावसाचा शिडकाव झाला व तो सुगंधीत मृदगंध सर्वत्र पसरला तर पाऊस सर्वांनाच हवा हवासा वाटतो, त्याच्या बरोबर आपण ही मनसोक्त भिजावे अशी आशा पल्वित होऊ लागते पण तोच जर पाऊस वेड्या सारखा कोसळू लागला व सर्वत्र चिखल व पाण्याचे साम्राज्य उभे करु पाहू लागला की लगेच त्याचा तिटकारा येतो.. किळसवाणा वाटतो, नकोसा होतो. होतं असे कधी कधी पण हेच सत्य आहे.

तरी ही, काही नावे माझ्या बरोबर जिवनभर माझ्या श्वासाबरोबर माझ्यासोबतीला असतील त्यातीलच एक तुझे देखील असेल, कृष्णाने म्हणे द्वारकेमध्ये सोपान बांधले होते त्याच्या जिवनात प्रत्येक्ष अप्रत्येक्षपणे त्याला घडवण्यात ज्याचा ज्याचा हात होता त्यांच्या नावाने. त्यात राधा ही होती व त्यात रुक्मणी देखील तसेच जरासंध देखील व तसाच कंस देखील. माहीत नाही स्वतःची कधी वीट देखील असेल की नाही ते पण माझ्या मनात एक सोपान तयार नक्कीच आहे त्यामध्ये एका पायरीवर तुझे नाव एखाद्या माझ्या आवडत्या फुलासारखं अढळ आहे.

दिवा मिणमिणतो आहे ह्याचा अर्थ तो विझला असा नाही, कधीतरी पुन्हा तेजाने झळाळू लागेल अथवा एकदम त्वेषाने जळून काही क्षणामध्ये बंद देखील होईल पण त्याचे अस्तित्व संपेल असे नाही, कुठे तरी तुझ्या मनामध्ये नक्कीच जळत राहील व तु त्याला कधी विझवू शकणार नाहीस व कधी विसरुपण.. तेवढे खरं प्रेम मी तुझ्यावर नक्कीच केले आहे. तुझा स्वभाव मला माहीत आहे, तु कधीच मागे वळून पाहणार नाहीस हे देखील तरी ही कुठेतरी असाच जिवनाच्या एखाद्या वळणावर भेटलोच तर, तुझे ते हास्य परत पहावयास मिळो हीच प्रार्थना त्या ईश्वराचरणी ज्याच्या इच्छेमुळे हे सगळे घडत गेले.

कधी तरी असेच आठवले म्हणून... हे वेड्यागत लिहीत गेलो... हे तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहीत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाला पुन्हा साद घालेल की नाही ते ही माहीत नाही, पण असे वेडे मेघ जागा बघून बरसतात का गं ? कुठेतरी हदयात कळ आली म्हणून हे शब्द उमटत गेले, अर्थ वेगळे संदर्भ वेगळे, तु वेगळी व ही कहानी वेगळी तरी कुठेतरी तुला स्पर्श करेल सुदुरवर पसरलेल्या त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबला मी केलेला स्पर्श, तुझ्या स्पर्शाला आसुसलेल्याप्रमाणे असाच अशांत वाहत राहील... ह्या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर.. तुझा स्पर्श झालाच तर वेड्यासारखा बरसेल माझ्या आश्रुतुन नाहीतर त्या वेड्या मेघातून व असाच एखाद दिवशी मुक्त होईल... कुणाच्या ही नकळत लाखो अरब थेंबाप्रमाणे....



( काल्पनीक : - नेहमी प्रमाणेच एक कशीच कथा, सुचली म्हणून लिहीत गेलो व पुर्ण झाली, कुठल्या ही जिवित व्यक्तीशी / कथेशी साम्य आढळले तर तो निवळ योगायोग समजावा. वादळामध्ये चिरतारुण्य लाभलेल्या आवेशामध्ये उभं असलेलं मनमोहक वट वृक्ष देखील मुळापासून उन्मळून पडतो तेथे सर्व सामान्याची काय गत, अश्याच एका उन्मळून पडलेल्या पण स्वतःची मुळे जपून असलेल्या, नवीन पालवी फुटण्याची वाट पाहत असलेल्या प्रेमीचे हे आत्मकथन. वेगवेगळ्या भावनिक कोल्होळातून जाताना त्याच्या मनाची अवस्था काय असू शकते हे जाणुन घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. )