रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

ती व मी !

***
अशीच एक सुस्त संध्याकाळ होती व अचानक माझा फोन वाजला !
अनोळखी नंबर होता, पण आला महाराष्ट्रातुनच होता, दोन एक क्षण विचार करुन मी फोन उचलला !
समोरुन हॆलो झाले व मी लगेच म्हणालो " बोल, कशी आहेस !"
ती. " अरे तुला कसं कळाले की मीच आहे ते ?"
मी " ह्म्म ! अजून स्मरणशक्ती चांगली आहे माझी, व तुझा आवाज तर माझ्या... ते राहू दे कशी आहेस"
ती " माझा आवाज तर तुझ्या ?? पुढे"
मी " राहु दे तुला माहीत आहे काय... हजार वेळा एकले असशील माझ्या कडून तु"
ती "ठीक, मी एकदम मजेत आहे तु कसा आहेस"
मी " मी ! एकदम मजेत तुला माहीतच आहे.. नावातच राज आहे.. तर ! मी नावाप्रमाणेच राजा माणूस काय"
ती " हुं ! खुप बोलायला ही शिकला आहेस"
मी " ह्या जगात राहून हेच तर एक शिकलो आहे"
ती " म्हणजे?"
मी " तुला नाही कळायचं ! ते सोड, तु सांग काय चालू आहे"
ती " काही नाही... सगळं व्यवस्थीत चालू आहे, तुला माहीत आहे मी किती वर्षानंतर तुझ्याशी बोलत आहे ते ?"
मी " तु वर्ष विचारत आहेस ? मी तुला वर्षे, महीने, दिवस व तास देखील सांगू शकतो.. "
ती " म्हणजे तु विसरला नाहीस अजून तर "
मी " छे ! विसरलो कधीचाच आहे.."
ती " हो दिसत चांगलच विसरला आहेस.. माझा आवाज ओळखलास तेव्हाच कळाले होते "
मी " ह्म्म ! मुलंबाळ काय करत आहेत सध्या ?"
ती "एक मुलगा आहे तो.. अजून शाळेत जातो.. आता नववी मध्ये आहे.... तु नाही लग्न केलसं"
मी " हा हा हा ! मस्त जोक आहे ! एक भेटली होती... लग्न ही केलं असतं.. पण दैवाला मंजुर नव्हतं"
ती " राज, तो जोक नव्हता... तुला एकदम मनानं विचारलेला प्रश्न देखील जोक वाटला ? "
मी " काही गोष्टी सुप्त अवस्थेत राहू देने चांगल असतं ! बरोबर ना"
ती " म्हणजे तु उत्तर देणार नाहीस तर"
मी " तसं काही नाही आहे.. पैशाच्या मागे पळता पळता आपलं घर कधी मागं राहीले हे कळालंच नाही, जेव्हा कळालं तेव्हा खुप उशीर झाला होता"
ती " असं कोड्यात नको रे बोलू , तुला माहीत आहे मला काहीच कळत नाही"
मी " चांगलं आहे.. काही गोष्टी नकळालेल्या चांगल्या "
ती " काय करतोस सध्या "
मी " तुला जेव्हा मी पहीले प्रेमपत्र दिले होते तेव्हा त्यात एक ओळ होती... माझ्या वर विश्वास ठेव.. तुला कोठेच काहीही कमी पडू देणार नाही जिवनामध्ये.. जिद्द आहे माझ्या अंगात एकदा गोष्ट मनावर घेतली तर ती मी पुर्ण करतोच... आठवतं तुला ? "
ती " हो.. खुप दिवस माझ्या जवळ होतं ते पत्र ! एके दिवशी तुझ्या वरील रागाने मी ते जाळलं होतं"
मी " तो राग का आला होता आठवतं तुला "
ती " अंधुकसं ! मी सगळे विसरले आहे राज ! माझं लग्न झालं आहे "
मी " ओह ! माफ कर... तुला माहीत आहे तु व तुझा विषय म्हणजे मी कुठे थांबावे हेच विसरतो"
ती "हरकत नाही, तुझा स्वभाव मला माहीत आहे !"
मी " तुला तुझ्या मैत्रीणीने सांगितलेच असेल मी दिल्लीत असतो ते , बाकी एक छोटासा बिझनेस आहे , वर्षाकाठी.. दोन-एकदा फिरायला जातो, कधी कधी गाडी घेऊन मस्त पैकी हायवे वर फिरतो... हे माझं लाईफ !"
ती " लग्न का नाही केलंस"
मी "तुझी गाडी परत माझ्या लग्नावर का ?"
ती " तुझी काळजी वाटते आहे"
मी " जेव्हा गरज होती तेव्हा काळजी घेणारं कोणीच नव्हतं गं, एक एक सण, एक एक उत्सव मी कोणाची तरी वाट बघत घालवले.. कुणाच्या लग्नाला जाऊन देखील वर्षानु वर्ष झाली आहेत... खास मित्राच्या लग्नाला न जाता नंतर काही दिवसानंतर त्यांना गिफ्ट देतो.. हा हाल झाला आहे.. एकलंकोडा झालो होतो ! तेव्हा कोणीच नव्हतं जवळ काळजी घेणारं ! "
ती " राज, I am really Sorry ! जे काही घडलं त्यात माझा काहीच दोष नाही रे !"
मी " ये वेडी, मी तुला कधीच दोष दिला नाही व देणार ही नाही ... कमी पणा तर साला माझ्या नशीबात होता.. चल सोड ना ! "
ती " नाही रे, मला निर्णय घ्यायला घरच्यांनी वेळच नाही रे दिला"
मी " सोड ना यार.. चांगलीच वर्षे निघून गेली त्या गोष्टीला... एक गोष्ट सांग तु घरी आली आहेस का सध्या ? "
ती " हो, बाबांनी नवीन घर घेतलं आहे.. जुनं घर विकलं त्यांनी !"
मी " अरे रे ! माझ्या कडे असलेल्या अनेक आठवणी मधलं ते घर विकलं. चल ठीक आहे तुझ्या बाबांनी काही विचार करुनच विकलं असावे"
ती" राज, तुला आठवतं तु सकाळ सकाळी बाईक वरुन आमच्या घरा समोरुन फेर-या मारायचास ? "
मी " हा.. तो काळ जबरदस्त होता यार... एक विचारु "
ती " बोल"
मी " एकदा भेटु शकतो आपण ?"
ती " काय ? कधी ? "
मी " उद्याच ? "
ती " पण तु तर दिल्ली मध्ये मी येथे "
मी " पाच तासाच्या आत पोहचेन "
ती " पण... घरी येशील ?"
मी " हो, तुझ्या बापाला मी आता पुर्वी सारखा घाबरत नाही गं "
ती " राज, माझे वडील आहेत ते"
मी " ठिक आहे, तुझ्या वडीलांना"
ती " ठिक आहे ये भेटूच आपण"
मी " thanks "
ती " अरे हा नवीन शब्द कधी शिकलास तु.. "
मी " अरे चुकन बोललो.. नियम विसरलो होतो मी पण..."
ती " किती वाजतो पोहचशील तु"
मी " उद्या चार वाजु पर्यंत"
ती " ठीक आहे ये मग. उद्याच बसून बोलु "
मी " ठीक आहे"

फोन कट झाला !
बाय बाय करायची सवय तीला आधी पण नव्हती व आज देखील नाही ! सुधरणार नाही कधीच !
मी दुसरा फोन लावला yatra.com ला ! "मला आताच्या आता मुंबई जाणे आहे कुठली फ्लाईट उपलब्ध आहे ?"
यात्रावाला " सर, रात्री ९.४५ ची आहे , जेटची"
मी " बुक कर ! "
यात्रावाला " सर फेयर चार्जेस "
मी " हरकत नाही जो रेट आहे काहीच हरकत नाही.. जरुरी आहे जानं"
यात्रावाला " कार्ड नंबर सर"

टिकीट तर मीळालेच .. प्रिंन्टं काढून हाती तयार.. कपडे काय घालू ? दोन भर ना बॆंग जो हाती येईल तो भर.. नंतर हॊटेल मध्ये बदलू !
"अंकल कुठ चालला गडबडीत ?"
च्या मायला हा कोण माझ्या घरी येऊन मला अंकल म्हणतो आहे ?
मी मागे वळालो व पाहून दचकलोच !

**********************

एक अनोळखी मुलगा माझ्या घरात... तेरेस वर माझ्या समोर उभा होता....
एक १०-११ वर्षाच्या लहान मुलगा हस माझ्या कडे पाहत उभा होता मी आठवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ओळखीचा वाटलाच नाही.
मी " कोण है बेटा.. कहा से"
तो " काका मी अवधुत "

च्यामायला हा मराठी पण बोलतो !

मी "अवधुत ?"
तो " काका असे काय करताय मी तुमचा छकुला.. फोन व किती बोलता माझ्याशी"
मी " अरे छकुल्या तु ? येथे कसा काय आलास रे , घरातून पळुन तर आला नाहीस ना ? कोणाबरोबर आला आहेस ?"
तो " काका, असे काय करताय तुम्हीच तर बोलवलं होतो मम्मी पप्पा व मला .. दिल्ली दाखवतो म्हणून"
मी " अरे देवा, तुझी मम्मी पण येथेच आली आहे काय ?"
तो " हो खाली अंगणात बसली आहे पप्पा बरोबर.. तुम्हाला शोधून शोधून दमलो मी "
मी " अरे माझ्या बाळा.. मी विसलोच होतो रे तुम्ही येणार आहात ते , चल खाली चल !"
तो " ह्म्म्म, माझे चॉकलेट ? "
मी " अरे हा चल देतो"

त्याला चॉकलेट देऊन मी त्याच्या बरोबर बाहेर आलो तर लॉन मध्ये मनिषा व विवेक बसले होते !
मला पाहताच मनिषा पळतच आली व पाया पडत म्हणाली " दादा कधी पासून फोन वाजवतो आहे कुठ होतास "
मी "अगं पाया काय पडतेस... मी अजून म्हातारा झालो नाही बाई... बरं झालं आजूबाजुला कोणी पाहणारं नाही.. ... मी वर टेरेस वर बसलो होतो "
ती " तुझी सवय अजून गेली नाही.. संध्याकाळी नेहमी टेरेस वर जातोस काय करतोस रे वर टेरेस वर "
मी " एकटा खाली बसून काय करु म्हणून वर बसतो.. आजूबाजुच्या टेरेसवर जवळपासची लहान मुलं खेळतात च्या खेळ बघत बसतो"
ती "असं ! माझ्या लग्ना नंतर तु आज भेटतो आहेस आम्हाला "
तो पर्यंत विवेक ही जवळ येऊन बसला होता.. नमस्कार करुन म्हणाला " राज, तुम्हाला भेटण्याचा योग आज आला गेली पंधरा वर्ष आपण फोनवरच बोलतो आहे..."
मी " अरे हो यार.. हा बघ ना छकुला रोज बोलतो माझ्याशी पण मी हा कधी विचारच केला नाही की हा कधी समोर आला तर ओळखेन कसा .. विश्वासच बसत नाही मनिषाच लग्न होऊन १५ वर्षे झाली... शाळेतील दोस्ती.. आमची कुठल्या कुठं नातं जुळलं !... काय म्हणत आहे.. तुमचं विजयवाडा ?"
तो " छान आहे.. तुम्ही देखील या कधी तरी"
मनिषा पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली " म्हणजे अजून तु मला मैत्रीणच मानतोस..."
मी " अगं तसं नव्हे ! तु तर माझी सख्खी बहीणीच !"
ती " विवेक म्हणाला होता की राज ने दिल्लीला बोलवलं आहे आधी मला विश्वासच नाही बसला.. पण हा टिकीट घेऊन आला तेव्हा खुप आनंद झाला..."

तोच छकुला बोलला " मम्मी, काका कुठे तरी बाहेर चालले आहेत कपडे पॅक करत होते "
मी " अरे, नाही असंच कपडे भरुन ठेवतं होतो.. बँगे मध्ये.. "
ती " कुठ चालला आहेस ? काही काम आहे का जरुरी ? "
मी " अगं काही नाही.. असंच कपडे पॅक करत होतो"
मी "चल आत चला... फ्रेश व्हा !"
ती " तुझा गडी कुठे गेला "
मी " पळुन गेला आहे.. येईल दोन एक दिवसामध्ये.. त्याला पण महीन्या दोन महीन्यातून पळण्याची सवय आहे"
ती " मग जेवण कोण तयार करतोय ? तु ? "
मी " होय... मी तयार केलं असतं तर तुला येथे भेटलो असतो का ? सरळ हॉस्पिटल मध्ये नाही का आली असतीस भेटायला"
ती " म्हणजे हॉटेलचे जेवण चालू आहे तर... चल ह्या आठवड्यात तु माझ्या हातचंच खा ! "
मी " अरे वा ! म्हणजे आमची आठवडाभर दिवाळी तर "

मी " अरे विवेक, काय घेणार तु ? "
तो " मी , मी नाही घेत हो.."
मी " अरे मी आहे ना... हिला नको घाबरुस तु"
तो " मग बियर घेईन"
मी " हा हा हा.... चल वर तेरेस वर.. फ्रेश होऊन ये बसू.. खुप बोलायचं देखील आहे यार"
ती " दादा, कश्याला उगाच त्या पेक्षा मी मस्त पैकी ज्युस तयार करते ते पी.. बीयर पीण्यापेक्षा "
तो " जे काम कर... तु ज्युसच तयार कर "
मी " अरे, लगेच सुधरलास की बायको म्हणाली व तु नंदीबैला सारखा मान डोलवलीस "
तो " तसे नव्हे काका.. आपण कॉकटेल करु "
मी " बढिया "
ती " तुम्ही पुरुष लोक ना कधीच नाही सुधरणार.. "
मी "चल, जा बाळ तयारी कर लवकर .. व मस्त पैकी देशी जेवण तयार कर... जे सामान नाही आहे.. ते मला सांग दुकानदार येथेच देऊन जाईल "
ती " ठीक आहे.. "

तासाभरामध्ये आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो व मी एक चपातीचा तुकडा मोडलाच होता... तोच फोन वाजला.. मी उठ्णार तोच मनिषा म्हणाली "एक मिनिट , मी बघते कोण आहे.. जेवताना उठू नकोस "

ती " कोण "
समोरुन " मॅम, सर का फ्लाईट टाईम ९:४५ है.. ३५ मिहै..बाकी है.. सर पोहचे नही है एयर पोर्ट पे "
ती " किस के नाम पे है तिकीट "
समोरुन "मीस्टर राज जैन ! "
ती " ठिक है.. पोहच जायेंगे ! "
फोन ठेऊन परत आली व म्हणाली " दादा, तु टिकीट बुक केले आहेस , तुझ्या फ्लाईटचा टाईम झाला आहे त्यांचाच फोन आला होता "
मी " अरे, राहू दे.. मी प्लान रद्द केला आहे .. चल जेऊन घे "
ती " पण तु आताच कुठे चला होतास रात्री... "
मी " कुठ नाही "
ती " काही लपवत तर नाही आहेस ना "
मी " अगं काही नाही.."
ती " दादा.."
मी " मनिषा... जेव आता "

पाच-दहा मिनिटामध्ये जेवण उरकलं व आम्ही वर टेरेस वर आलो !

ती " दादा, तुझा मोबाईल दे पाहू.. घरी फोन करते "
मी " खाली रुम मध्ये आहे बघ चार्जिंगला "

काही मिनिटे निघून गेली !

ती " दादा, तु तिला भेटायला जाणार होतास उद्या ? "
मी उडालोच... !
मी " तुला कोणी सांगितलं ? "
ती " खाली तीचाच फोन वाजत होता जेव्हा मी खाली गेले होते"
मी " मग ? तु काय म्हणालीस "
ती " त्या सटवीला दिल्या चांगल्या चार ठेवणीतल्या कोल्हापुरी शिव्या .. व म्हणाले की पुन्हा फोन नको करुस"
मी कपाळाला हात मारुन घेतला व म्हणालो " ३० मिनिटामध्ये.. तु ही एकच ओळ बोललीस ? शक्यच नाही.. ! इतके वर्ष ज्या वेळेची तु वाट पाहत होतीस झालं ! समाधान झालं तुझं ! "
ती " जे काही हाल झाले तुझे हे सगळे तीच्यामुळे... तु अजून लग्न केलं नाहीस हे तीच्यामुळे... मग काय मी तीची आरती ओवाळू ? " असे म्हणत... ती रडू लागली..!
मी तीच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणालो.. " बाळ, दुस-याला कधीच दोष देऊ नये.. कर्म व त्याचे फळ आपलंच ! त्याचा उत्तराधिकारी कोणीच नाही.. चल तु तुझ्या मनातील बोललीस ना तीला.. तुझा राग गेला मनातून.. आता शांत हो.. ! "
ती " मला नाही जमत तुझ्या सारखं नेहमी शांत राहणं ... तीच्या बरोबर झालेल्या प्रेमाची गोष्ट देखील तु शांत पणेच सांगितलीस... तीच्या लग्नाची गोष्ट पण तु शांत पणेच सांगितलीस.. व विभाची..पण.. मला नाही रे जमत "
मी "नको काळजी करुस ! बस ! जे होत आहे ते होऊ दे ! आता तु तीला शिव्या दिल्यास, काही बोललीस म्हणून का मी तुला रागवेन ? नाही ना.. मग ! तीच्या आधीचा माझ्यावर हक्क तुझा बाळ... देन डॉन्ट वरी.. ! चुप बस आता... विवेक हिला घेऊन जा रुम मध्ये.... सकाळी बोलु आपण... "

ह्म्म! आता ?
पुढे काय ?
त्या बिचारीचा देखील काही दोष नाही.. ना मनिषाचा... !
तीला समजवावे लागेल.. नाहीतर कुठेतरी मनाला घाव लागेल !

************

मी " हलो !"
समोरुन " हलो, कोण ?"
मी "राज, राज जैन. आपण कोण ? "
तो "माणिक बोलतोय मी, राज"
मी "अरे माणिक.. कसा आहेस लेका ?"
तो " मी मजे में . तु कुठे आहेस .. कसा आहेस ?"
मी "अरे मी पण मजेत... दिल्लीतच आहे ! तुझ्या दिदीला फोन दे पाहू जरा"
तो "थांब हं.. देतो.. ( " दिदी.. राज को फोन छे.. रुममांसे उठाले").... राज.. एक मिनिट हं !"
ती " हलो,... राज !"
मी " माणिक फोन ठेव आता..."
तो " ठिक ठिक.."
मी " लेकाची अजून सवय नाही गेली तर "
ती " तुझी गेली ? "
मी " ते सोड.. काल रात्री मनिषा... तीच्या वतीने मी माफी मागतो.. रियली.. "
ती " राहु दे राज, पण खुप टिखट बोलली ती त्याचंच दुखः झालं "
मी " अरे मला माहीतच नव्हतं की तुझा फोन आला आहे.. मी टेरसवर होतो"
ती " पण तीचा हक्कच काय मला बोलायचा "
मी " हक्क ! तुला नाही कळायचं.. "
ती " का ? मला का नाही कळणार ?"
मी " काही नाती जपावी लागतात... ते तीला कळतं"
ती " म्हणजे, मला नाही कळत ? "
मी " मी असे नाही म्हणालो "
ती " मग ?"
मी " अरे ! ते सोड.. काय म्हणाली ती तुला ?"
ती " बापरे... किती तरी बोलली ! काही वेळ मलाच कळाले नाही काय म्हणाली ते"
मी " ह्म्म ठीक झालं नाही कळालं ते.. ती खास कोल्हापुरी भाषा आहे तुला नाही कळायची "
ती "अरे पण तीला झालं काय होतं ? ठीक आहे.. तुझ्या माझ्यात जे नातं आहे ते आपलं पर्सनल आहे ना त्यामध्ये ती कुठे आली ?"
मी " हे बघ, ती मला भाऊ मानते व मी तीला बहीण... तीच्या सुखः-दुखः मध्ये... मी जशी साथ दिली तशीच तीने देखील दिली"
ती " कुठे होती ती ? तु जेव्हा.. महाराष्ट्र सोडून भारतभर भटकत होतास तेव्हा कोठे होती ? मीच तुझ्याशी बोलत असे .. तुला धीर देत असे"
मी "अहमं !"
ती " अहमं ? म्हणजे ? "
मी " काही नाही... जशी तु संपर्कात होतीस तशीच ती देखील होती .. ती लग्न झालानंतर देखील संपर्कात होती व तू ?"
ती "तुला माझं सासरं माहीत आहे ना कसे आहे ते ! "
मी " तिचे सासरे.. देखील तुझ्या सार-यापेक्षा जास्तच कट्टर आहेत... सासू देखील खाष्ट आहे.. फोनला हात लावू देत नव्हते लग्नानंतर कित्येक महीने"
ती " तु मला हे का सांगतो आहेस ? "
मी " तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं ते"
ती " आपण पुन्हा भांडणार आहोत का ह्या विषयाला घेऊन ?"
मी " मला नाही वाटत की आपण भांडत आहोत.. पण नेहमी प्रमाणे तुझा आवाज चढत आहे.. बस इत्येकच "
ती "...... ठिक ! सोड हा विषय !"
मी " ठीक !"
ती " तु येणार होतास ? काय झालं "
मी " मनिषा जो पर्यंत येथे आहे तो पर्यंत तर नाही "
ती "राज, मी काही दिवसात परत जाणार आहे... मग माहीत नाही पुढे मागे भेट होईल की नाही ! "
मी " हो माहीत आहे... "
ती " तरी ही तू .. "
मी "एक स्पष्ट बोलू ? "
ती " बोल."
मी " आपल्या भेटीतून काय प्राप्त होईल ?... सरळ सरळ हे म्हणतो आहे.. आपण का भेटावे असे तुला वाटतं ?"
ती " तुला वाटतं आहे .."
मी " प्रथम इच्छा तु व्यक्त केली होतीस"
ती " म्हणजे सरळ सांग तुला नाही भेटायचं आहे ?"
मी "मी असे नाही म्हणालो.. पण एक उगाच डोक्यात आलेला प्रश्न तुला विचार ला का भेटायचं आहे ? "
ती " दोस्ती म्हणून.. एक मैत्रींच नातं म्हणून तरी भेटूच शकतो ना ?"
मी " देन... माझ्या जुन्या मित्रा... जरा तुला वाट पहावीच लागेल.. माझी बहीण लग्नानंतर प्रथमच माझ्या घरी आली आहे...."
ती " ठिक आहे.. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा भेट... फोन जरुर कर आधी !"
मी " ठिक"

*****
मनिषा "दादा, चहा देऊ का ?"
मी " ह्म्म, हा दे ! विवेक कुठ आहे ?"
ती " झोपलाय अजून.. तू तीलाच फोन केला होतास ना आता ?"
मी " हो यार.."
ती " तू.. कश्याला तीच्या मागे आहेस अजून.."
मी "तुला कोण म्हणालं की मी तीच्या मागे आहे म्हणून ? "
ती " मग हा फोन का ? तीला भेटण्याचं प्रयोजन काय ? कुठल्या नात्यानं भेटणार आहेस ? मित्र म्हणून ? शक्य आहे ते ? "
मी "माहीत नाही... पण कधी वेळ मिळालाचं तर.. तीला फोन करतच असतो मी ... काही तरी ईकडेचे तिकडचे बोलुन मोकळा होत होतो... पण तीच लग्न झाल्या पासुन बोललंच नव्हतो.. हा तीचा माझा दुसरा-तीसरा संपर्क असावा सध्याच्या दिवसातील बस.."
ती " पण ह्यात माझ्या प्रश्नांच उत्तर कुठे आहे.. "
मी " देईन.. योग्य वेळी देईन."

****
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: