गुरुवार, ११ सप्टेंबर, २००८

चिंतन


अहिंसो परमो धर्म - महावीर स्वामी ने जगाला दिलेला मंत्र, ते ज्या काळात होते तो काळ एकदम वेगळा होता, पण आज समाज मानस एकदम वेगळे आहे, जेथे पाहावे तेथे खुन, मारामा-या, विस्फोट व आतंकवादी हल्ले ह्या सर्वांवर मी सामान्य माणुस म्हणून कसा विचार करतो आहे ? खुन का बदला खुन असा एक कायदा चंबल च्या घाटी मध्ये चालतो तसे वागावे तर तो धाडशी पणा माझ्याकडे नाही, मुंगी मारावी की न मारावी ह्याचा देखील विचार करणारा मी समोरचा शत्रु आहे हे उमजुन ही त्याला मारु शकेन .. ह्याची मलाच खात्री नाही, पहावे कोणाकडे राजकीय नेते मंडळी ह्यांना तर भ्रष्टाचार व स्वतःची स्तुती करण्यापासून वेळच मिळत नाही ते काय रक्षा करणार ह्या शत्रु पासून.. पोलिस नावाची एक व्यवस्था आहे असे म्हणतात आम्ही पोलिसांना नावे ठेवतो ते राजकीय मंडळींना नावे ठेवतात.. जावे कुठे मग ?मग काय त्या होणा-या कलीच्या अवताराची वाट पाहत बसावे ह्यावर ?

चिंतन जरुरी आहे ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: