शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत खुप वजनी होती
काय खरं व काय खोटं
नशीबाची थट्टाच थोरं होती

वाहत जावे असेल ठरवले तरी
जमीनीचे वळण खुप वेगळे होते
तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते

माणूस म्हणून जगण्याची ही
किंमत जरा खरंच मोठी होती...
मेल्यावर तरी समाधान लाभेल
मुक्त होईन असे वाटले होते

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

एका साहित्यचोराचे धिंडवडे - जोर का झटका धीरे लगे ;)

साहित्यचोर – बोक्या सातबंडे

ब्लॉगर्सचे लेख चोरुन आपल्या नावावर खपवणार्‍या व डुप्लिकेट आयडी घेऊन धुमाकुळ घालणार्‍या ह्या बोक्याला कांचनने कसे पकडले व आपल्या ब्लॉगवर सर्व पुराव्यानिशी कसे सिध्द केले की बोक्या सातबंडे साहित्यचोरी करत होता.
त्यांनी पोलिसात सर्व पुराव्यानिशी तक्रार देखील केली आहे, कारण त्यांने फक्त साहीत्यचोरीच नाही केली तर त्यांचे फेसबुक व जीमेल चे आयडी देखील हॅक केले होते.


आपण आपले साहित्यचोरले की दुर्लक्ष करतो पण त्यांचा ते मंडळी कसा गैरफायदा घेतात हे खरोखर वाचा व आपला अभिप्राय द्या.

कांचन चे हे आवाहन लक्ष्यात ठेवा व त्यावर अमंल देखील करा ही विनंती.



मला सहकार्य हवं आहे तुमच्या सगळ्यांकडून. कृपा करून स्वत:ला अंडरएस्टीमेट करू नका. आमचं लेखन कुणी चोरावं इतकं चांगलं नाही असं म्हणू नका. तुमच्या लेखणीत काय ताकद आहे, हे वाचकांना जास्त माहित आहे. जी वेळ माझ्यावर आली, ती कुठल्याही ब्लॉगरवर येऊ शकते. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात, हे मला माहित आहे. पण जेव्हा कुणाचं लेखन चोरीला जातं आणि तो ब्लॉगरच लेखाचा मूळ लेखक आहे, हे माहित असतं, तेव्हा संघटीत होऊन चोर ब्लॉगरच्या त्या लिंकवर प्रतिक्रिया देत जा. रिपोर्ट अब्यूज वर क्लिक करत जा. ट्विटर आय.डी. असल्यास संदेश पाठवत जा. गुगल बझ्झसारख्या ठिकाणी विचित्र टोपण नावं धारण करणा-या व स्वत:ची खरी ओळख लपवणा-या प्रोफाईकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. शक्य असल्यास अशा प्रोफाईल्सना ब्लॉक करा. ज्यांना विचित्र टोपणनावं धारण करायला आवडतात त्यांनी आपल्या प्रोफाईलवर कृपया स्वत:चं खरं नाव देखील जाहिर करत जावं म्हणजे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणार नाही.

Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+mogaraafulalaa+%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%29#ixzz0xD6yDtyN
Under Creative Commons License: Attribution Share Alike

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

अरे दिवाळी साजरी करा..........

राम राज्य आले हो...
म्हणजे काय ?
अरे गरिबांपेक्षा श्रीमंताची संख्या वाढली म्हणजे रामराज्यच ना !,

सकाळ सकाळी डोक्यावर नाही पडलो आहे, खरोखर दिवाळी साजरी करा...

नैशनल काउंसिल ऑफ एप्लाइड इकॉनमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या रिसर्च (हाउ इंडिया अर्न्स, स्पेंड्स एंड सेव्स) प्रमाणे भारतात आता श्रींमतांची संख्या गरिबांपेक्षा जास्त झाली आहे.


रिपोर्ट के मुताबिक, पिछले तीन साल में इकनॉमिक स्लोडाउन के बावजूद मार्च 2010 तक देश में हाई इनकम परिवारों की संख्या 4 करोड़ 67 लाख हो जाने अनुमान लगाया गया है जबकि लो इनकम परिवारों की तादाद 4 करोड़ 10 लाख के आसपास मानी जा रही है। अगर यह सच है तो पिछले एक दशक में आया यह बहुत बड़ा बदलाव है। हाई इनकम ग्रुप का परिवार उसे माना जाता है, जिसकी सालाना आमदनी 2001-02 की महंगाई के आधार पर एक लाख 80 हजार से ज्यादा हो। जिस परिवार के सदस्य सालाना 45 हजार रुपये तक कमाते हों, उसे लो इनकम फैमिली माना जाता है।

सालाना 45 हजार रुपये से ज्यादा और एक लाख 80 हजार रुपये से कम कमाने वाले मिडल क्लास में आते हैं। एनसीएईआर का एस्टिमेट है कि मिडल इनकम हाउसहोल्ड्स की संख्या में भारी इजाफा हुआ है। एक दशक पहले लो इनकम परिवारों की तादाद 6 करोड़ 52 लाख थी। तब मिडल इनकम फैमिलीज़ की संख्या 10 करोड़ 92 लाख थी, जो अब 14 करोड़ 7 लाख होने का अनुमान है। रिपोर्ट में कहा गया है कि स्लोडाउन का सबसे ज्यादा असर मिडल क्लास परिवारों पर पड़ा। नंबरों के लिहाज से मिडल क्लास परिवारों की संख्या भले ही 2007-08 के 13 करोड़ 59 लाख से बढ़कर 2009-10 में 14 करोड़ 7 लाख हो गई हो, लेकिन पर्सेंटेज मंे यह घट गई है। 2007-08 में मिडल इनकम परिवार कुल परिवारों के जहां 62 पर्सेंट थे, वहीं 2009-10 में यह घटकर 61.6 पर्सेंट रह गए। दिलचस्प पहलू यह है कि हाई इनकम परिवारों की तादाद स्लोडाउन के दौरान भी बढ़ती रही। पिछले दो साल में यह 16.8 पर्सेंट से बढ़कर 20.5 पर्सेंट हो गई है। लो इनकम ग्रुप फैमिलीज़ की संख्या भी इस दौरान 21.1 पर्सेंट से घटकर 17.9 पर्सेंट रह गई।

2 लाख से 10 लाख रुपये सालाना कमाने वालों को वर्ल्ड बैंक मिडल क्लास मानता है। ऐसे लोगों की संख्या 2009-10 तक बढ़कर 2 करोड़ 84 लाख हो गई है। रिपोर्ट के मुताबिक, देश के मिडल क्लास में से दो-तिहाई परिवार शहरों में रहते हैं। यही नहीं, सेविंग करने में भी भारतीय आगे हैं। अनुमान है कि भारतीय परिवारों द्वारा की जाने वाली बचत की रकम जीडीपी के 36 पर्सेंट तक होती है।



खरं असेल बॉ !
गेल्या एक दोन महिन्यात एकापण शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही आहे.
गेल्या काही महिन्यात हॉस्पिटलमध्ये / हॉस्पिटलच्या बाहेर औषधाला पैसे नाहीत म्हणून कोणी मेलं नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून भारतात कुठे ही भुकबळी गेला नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून रोजगार नाही म्हणून कोणी भिक व चोर्‍या करायला चालू केले नसेल.
गेल्या काही दिवसापासून महागाई किती ही वाढू दे जनतेला काहीच फरक पडत नाही आहे..


अरे हेच हेच तर ते रामराज्य !!!!