बुधवार, २५ मार्च, २००९

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ३

आता शाळेचा व हॉस्टेलचा चांगलाच सराव झालेला होता, रोज सकाळी न चुकता मार खाऊन मी उठत असे, कसरत तथा आंघोळ इत्यादी करुन व्यवस्थीत पुजा करुन , पोट पुजा करुन व्यवस्थीत शाळेत जात असे, शाळेचे पाच तास मला खुप आवडायचे.. मार तेथे पण पडायचा पण वळ येण्याएवढा नाही त्यामुळे शाळेचा व माझा एक ऋणांनूबंध तयार झाला होता

असाच एके रवीवारी मी आपल्या हॉल मध्ये बसून गप्पा मारत होतो व बरोबर बुध्दीबळाचा खेळ देखील चालू होता माझ्या समोर निल बसला होता व तो थोडाफार चिटिंग करुन जिंकत होता असे मला वाटत होतं व मी जरा चिढल्यावर आवाज चढवून ओरडलो व थोड्या वेळात तेथे लढाई सुरु झाली .. व आमचा दंगा अण्णाच्या कानापर्यंत पोहचला व अण्णा तेथे पोहचले.. मी म्हणालो झालं.. पुन्हा मार ! जसे त्यांना माझ्या मनातील भावना कळालीच असावी त्यांनी सरळ मला पकडला व धुतला व निलला तोंडी चेतावणी दिली व निघून गेले..

मी निलवर चिढलोच होतो पण त्यांनी फक्त मलाच मारले ह्याचा खुप राग आला होता व मी रागाने सरळ डोंगरावरील मंदिराकडे जाण्यासाठी पाय-या चढू लागलो.. थोडा फार पुढे गेलोच असेन डोक्यात एक आयडीया आली व विचार केला पाय-या सोडून आडवाटेने वर जाऊ.. (आजकाल त्याला ट्रकिंग म्हणतात) व एकटाच व कधीकाळी तेथे चांगलेच जंगल वाटावे अशी परिस्थीती पण मी बिनधास्त होऊन वर चढत होतो व जरा वाईट रस्ता भेटला की रस्ता बदलत असे.. असा मी चांगला अर्धा एक तास चालत होतो पण माथा काही येत नव्हता त्यामुळे मी जरा थांबून मागे वळून पाहीले की आपण बरोबर रस्त्यावर आहोत की नाही.. पण खाली ना मंदिर दिसे ना मी समजलो, चढण चुकवण्यासाठी मी जो आडराणाचा रस्ता पकडला होता डोगराचे चक्कर घालण्यासाठी तयार झालेला होता व मी त्या रस्त्याबरोबर डोंगराच्या एकदम विरुध्द बाजुला आलो होतो.. व समोर पाहीले तर दुरवर हायवे दिसत होता... मी विचार केला की किती दुर असेल हायवे ? एक तासाचा रस्ता अथवा दोन ? येथून सरळ चालत गेलो तर ? कोणाला सापडणार पण नाही व सरळ मेन रोड.. कोणाकडून मदत घेऊन शिरोली नाका व तेथून कोल्हापुरात.. रेल्वे स्टेशन पासून सरळ चालत गेलं की दसरा चोक व सरळ पुढे गेले की बुधवार पेठ.. बस आलं घर !

डोक्यात कल्पना आली म्हणजे त्यावर लगेच अमंल केला पाहीजे ह्या मताचा मी.. सरळ उलट्या बाजूने चालत मी डोंगर उतरलो व त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो... शेतातुन.. आड रस्त्याने.. चालत चालत... सुखलेले ओढे पार करत मी हातकलंगडे रस्त्यावर आलो ना मध्ये गाव आलं ना कोणी पकडणारं ! मी एकदम खुशीत जवळ जवळ पळतच बस स्टन्ड वर आलो पण खिश्यात पैसे नव्हते.. बस ने कसे जावे ह्या विचार होतो व तेथेच बाकावर बसलो...

चार एक वाजत आले होते म्हणजे मी जवळ जवळ पाच तास हॉस्टेलच्या बाहेर होतो व कोणालाच पत्ता नव्हता .. पण माझ्या डोक्यात एक शंका आली.. साडेचार च्या प्रार्थेनेला मी दिसलो नाही की मग ते शोधायला सुरवात करतील व येथे देखील पोहचतील.. आई-बाबा आपल्याला पण रेल्वेनेच घेऊन आले होते येथे आपण पण रेल्वेनेच जाऊ या.. टिकीट घेण्याची पण गरज नाही... व लगेच पोहचू.. मी स्ट्न्डच्या मागेच असलेल्या रेल्वे स्थानकावर गेलो व कोल्हापुरला जाणारी रेल्वे विचारली !

तेथे कळाली की ५.४५ ला आहे ट्रेन.. मी तेथेच एका बाकावर बसलो... ५.३० लाच ट्रेन आली व मी ट्रेन वर कोल्हापुर नाव वाचले व बसलो ! पाच एक मिनिटानी गाडी सुटली .. पाऊण तासात थांबली देखील व आजु बाजूची लोक आपले सामान उचलून बाहेर जाऊ लागली त्यातील एक म्हणाला, मिरजेचे स्टेशन लई मोठं हाय नाही ! मी चमकलो... व खिडकीतून बाहेर बघीतलं तर कोल्हापुरचं स्टेशन वाटतच नव्हतं बाहेर... मी बाहेर आलो व बोर्ड बघीतला मिरज जंग्शन !

मनात एकदम गोंधळ चालू झाला ... कोल्हापुरची गाडी मिरजेला कशी आली ? की आपण चुकीच्या गाडीमध्ये बसलो ? परत कोल्हापुरच्या गाडीची वाट बघावी व कोणाला तरी विचारुन मग ट्रेन मध्ये बसावे ह्या विचाराने मी आजू बाजूला बघीतले तर तेथे एक आजोबा बसले होते आहात पुस्तके व बॅग घेऊन.. मी त्यांना विचारलं " आजोबा, कोल्हापुरला जाणारी गाडी कधी आहे ? " त्यांनी मला बघीतलं व म्हणाले... " येत आहे .. पाच मिनिटामध्ये.. आज लेट झाली नाही तर मिळाली नस्ती ही गाडी ... तु कोणा बरोबर आहेस बाळा ? " मी म्हणालो " एकटाच आहे.. चुकुन मिरजेला आलो.." ते गालातल्या गालात हसले ! दहा एक मिनिटानी गाडी आली व ते माझ्या बरोबरच गाडीत चढले... ! इकडचे तिकडे विचारल्यावर त्यांनी विचारलं " कुठल्या शाळेत शिकतोस " मी म्हणालो " बाहुबली हॉस्टेल मध्ये" ते म्हणाले " ठिक आहे"

थोड्या वेळाने अंधार पडला होता बाहेर... गाडी थांबली व आजोबा आपले सामान घेऊन उभे राहीले व म्हणाले " बाळा, जरा मदत कर ही पिशवी घेऊन बाहेर ये माझ्या बरोबर " मी सरळ त्यांची पिशवी उचलली व त्यांच्या बरोबर बाहेर आलो... जसा मी बाहेर आलो तसाच त्यांनी मला पकडला... व दोन कानाखाली वाजवल्या व जवळच असलेल्या हातकलंगडे स्टेशन मास्टरच्या केबीन मध्ये ओढत नेलं व त्यांना म्हणाले " हॉस्टेल वरुन कोणी मुलगा पळाल्याची खबर आहे काय ? " तो म्हणाला " हो आहे, एक सकाळ पासून गायब आहे.." त्यांनी मला त्याच्या हावाली करत म्हणाले " हाच तो, कळवा हॉस्टेला, बरं झालं मला मिरजेत सापडला.. स्टेशन वरच " माझं तोंड एकदम चिमणी एवढं बारीक झालं व पुन्हा मार पडणार ह्या विचाराने मी थरथर कापु लागलो.

स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !

क्रमशः

मंगळवार, २४ मार्च, २००९

( मदिराभक्ती )


मज ध्यास पिण्याचा रे, ना कसलीही सक्ती
अंतरात माझ्या वसते, व्हिस्की रमची मस्ती


मी तुझ्या मस्ती मध्ये गुणगुणतो
बाकी म्हणे जणू गाढव रेकतो
स्वप्नात ही माझ्या मी करतो व्हिकी रम ची मस्ती


मी गेलो वरती, तन ना-राही जरी संसारी
पिंडा बरोबर ठेवा एक बोतल छपरावरी
सिगरेट पण जर ठेवली मी अनुभवेन विरक्ती आणि मुक्ती


दिवस मनाला ग्रासे
तर ड्राय डे शापच भासे
तुजवाचून कसे जगावे उरली ना इच्छाशक्ती
सर्वस्व तुझ्यासाठी खर्चावे
पैसा ठेक्यावरी संपवावे
तुझसाठी पुन्हा कमवाया, उद्या मिळे पुन्हा शक्ती !


दारु मुक्त राहण्याचा निर्णय (नाखुशीने) घेतल्यामुळे आज हे दारुवरील शेवटचे विडंबन, क्रांति ह्यांच्या ह्या कवितेवर केलेली. क्रांति मॅडम आम्हाला माफ करतीलच ही आशा मनी धरून मी माझ्या आवडत्या सिग्नेचर ब्रन्डला वाहतो हे विडंबन.


रविवार, १५ मार्च, २००९

ए-दिले-नादान

कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं
वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है
यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है
यही होता है तो आखिंर यही होता क्युं है !


असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ? नाही गं तु वेडी व मी वेडा त्यामुळे आपण त्याची काळजी केली कारण तोच एक होता जो आपल्या सुख: दुख: चा साथी होता तो माझ्यापेक्षा जास्त तुझ्याजवळ होता, हजारो किलोमिटर दुरवर त्याच्या पासून मी तर तु काहीच पावलावर होतीस, पण जेवढे दुख: तुला झालं तेवढंच मला ही झालं, ते झाड नष्ट झालं, पण त्या बरोबरच आपल्या ही काही आठवणी ..तु त्याच्या पाठीमागेच विसावली होतीस कधी झाडाच्या माझ्या छातीवर डोकं ठेऊन... विसावली होतीस कधी आपल्या जगापासून अलिप्त राहून.. आपल्या प्रेमाचा अंकुर देखील तेथेच उमलला होता कधी, आज ते झाड आठवायचं तसं काहीच कारण नाही पण माझा नाईलाज. जुन्या आठवणी आल्या की ते झाड आपसूकच डोळ्यासमोर येतं व कळत न कळत अश्रु कधी गालावरुन ओघाळतात कळत ही नाही.

ए-दिले-नादान आरजु क्या है जुस्तजु क्या है ।
क्या कयामत है क्या मुसिबत है,
कह नही सकते किस का अरमां है
जिंदगी जैसे खोई खोई है, हैरा हैरा है ।


किती तर गोष्टी आपल्या जिवनाचे अविभाज्य अंग होत्या पण अचानक एक एक करुन सर्व गायब झाल्या जश्या वळवाचा पाऊस कधी आला व कधी गेला कळालंच नाही, नाही तुझ्या बद्दल मनात जराही किंतू परंतू नाही आहे पण तरी ही आज असचं सर्व आठवलं, वळवाच्या पावसावरुन आठवलं, तुला आठवतं का एकदा असाच मार्च मध्ये वळवाचा जोरदार पाऊस पडत होता व तु बाहेर मनसोक्तपणे भिजत आपल्या मैत्रिणी बरोबर पावसाचा आनंद घेत होतीस त्या चिंचेच्याच झाडाखाली मी उभा राहून तुला निहाळत होतो, तुझ्या डोळ्यातून तो मिश्कलीपणा मला अजून ही आठवतो, प्रत्येक सरी बरोबर तुझं ते गिरक्या घेणं व तुझ्या केसांच्या बटातून ते ठेंब ठेंब पाणी तुझ्या गालावरुन ओघाळणं, काहीच पावलांवर तर उभा होतो मी तुझ्या पासून, आज ही दिसतं आहे मला माझ्या डोळ्यासमोर तो क्षण, अरे हो तुझ्यासाठी ती काही मिनिटे होती माझ्या साठी तर ते क्षणच नाही का जे मी जपून ठेवले आहेत, माझ्यासाठी असे अनंत क्षण आहेत माझ्याकडे पण आजकाल ते क्षण देखील अपूरे पडता आहेत, असं नाही की काही कमी आहे पण मी पुर्ण नाही आहे हे मला जाणवतं आहे फक्त तुझ्यामुळे, असं का व्हावे, मी तुला का नेहमी आठवावे, कधी कधी वाटतं तु आपल्या जिवनामध्ये किती आनंदी आहेस का मी नजर लावावी, त्यामुळेच तर मी त्या दिशेला पाहणं सोडलं आहे कधीच.

कभी किसी को मुकमील जहां नही मिलता
कही जमीं यो कहीं आसमां नहीं मिलता ।


माझ्या समोर पर्याय नाही आहे मला कधी कधी जावसं वाटतं त्या शहरामध्ये, त्या गल्ली मध्ये त्या घरासमोर जेथे तु कधी राहत होतीस, आजकाल तुझी आई-वडील राहतात, तुझी आई मला ओळखत नाही कशी ओळखेल ती मला खुप वर्ष झाली मला भेटून पण तिला, पण मी वेडा जातो कधी कधी व त्या चिंचेच्या झाडाच्या जागेवर आजकाल छोटेखानी मंदिर आहे अगदी तुझ्या घरासमोरच, पण कधी काळी येथे बाग होती व समोर मोकळी जागा पण आज काल येथे उंच इमारती उभ्या आहेत एका कोप-यातून हलकचं तुझं घर दिसतं, ते गेत, तुझं अगंण दिसतं, तेथेच बाहेर बसतो वाटतं की तु अशीच धावत येणार व मला म्हणणार कुठे होतास तु ! पण त्याच वेळी मी भानावर येतो व मला आठवतं की आता तु येथे नाही आहेस. तुच काय तुझी ओळख दाखवणारं काहीच येथे नाही आहे, ना आजकाल कोणी तुझ्या घरासमोर पाणी शिंपडतं ना त्यावर रांगोळी काढतं.. ना कोणी त्या सुखलेल्या झाडांना पाणी घालतं, बिचारी ती झाडं... तुझ्या विना एकदम वाळली आहेत... माझ्यासारखी.

तुझं से नाराज नही जिंदगी हैराण हू मैं ।
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मै ।


आयपॊड वर गाणं वाजतं आहे, कधी कधी वाटतं का मी एवढा परेशान आहे का मी कुणाच्या प्रश्नाचं उत्तर देणं लागतो पण मला माहीत आहे प्रश्न माझेच आहेत पण उत्तरे माझ्याकडे नाही आहेत, उत्तरे मलाच शोधायची आहेत पण प्रयत्न अपूरे पडत आहे, तुझ्या शिवाय राहणं एक वेगळी गोष्ट पण तू आपली होणारचं नाही हे माहीत असून पण जगणं ही एक वेगळी वेदना, कधी तुला माझी आठवण येते का नाही माहीत नाही पण मी मात्र नेहमी अश्वथाम्याप्रमाणे आपली भळभळती जख्म घेऊन फिरत आहे, उरावर काही प्रश्न व त्या प्रश्नांची न सापडलेली काही सापडलेली उत्तरे घेऊन. तुझ्या नंतर ही कोणीतरी आलं होतं माझ्या जिवनामध्ये, अशीच तुझ्या सारखी हसतं खेळतं, कधी माझ्या जवळ आली मला कळालंच नाही, मला ती तुझ्यासंगे आपलं म्हणत होती पण दैव माझं नेहमी प्रमाणेच निष्ठूर, मला जे हवं ते मिळायलाचं नको हे ते नेहमी पाहत आलं आहे, दुख: खुप झालं, तु माझ्यापासून दुर जाणं मला जेवढ्या जख्मा देऊन नाही गेलं त्या पेक्षा अगणीत जखमा मला तीचं अवेळी जाणं देऊन गेलं, कधी कधी वाटतं तीच्या जागी आपण का नाही गेलो, तेथेच होतो ना मी पण. दैवाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं, मी एकटाचं होतो त्यामुळे त्यानं सोबतीला तुझ्या आठवणी बरोबर तीच्या आठवणी देखील कपाळी लिहल्या माझ्या जन्मभराच्या सोबतीला.

जिने के लिए सोचा ही नही, दर्द सभालने होंगे... ।
मुस्काराये तो मुस्कारानें के कर्ज उतारने होंगे ।


बरोबर, तेच करतो आहे, पण का ? ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे तुझ्याकडे आहे काय ? तु मला एकदा विचारलं होतसं की तु माझी जर झाली नाहीस तर, मी काय करेन. त्यावेळी ही माझ्याकडे उत्तर नव्हते व आज ही नाही आहे, तुझं स्वप्न आपलं म्हणून जगत आलो, सर्व विसरलो, शहरच्या शहरं बदलली, काय कमवले काय गमवले त्यांची तर किंमतच नाही पण ते स्वप्न पुर्ण झालं, पण त्या पुर्ण झालेल्या स्वप्नामध्ये कोण राहणार आहे, मी एकटाच. तुझ्याशीवाय जगणं शिकलो आहे पण तुझ्याशीवाय माझं अस्तित्वच नाही हे मी कसे विसरु. दिवस जातो गं कसातरी कामामध्ये, तक्रारी मध्ये, अडचणीमध्ये, हसतं, खेळत, लढत पण रात्र, जिवावर येतं कधी कधी जगणं देखील, मला माहीत आहे तु सप्तपदी घातली आहेस त्याच्या बरोबर्, प्रत्येक पावलावर एक जिवनाचं वचन, सात जन्माचं वचन तु दिलं आहेस, तुझ्या त्या वचनासाठी का होई ना पण मला तुझी सात जन्म वाट पाहावी लागेल त्याचं काय ? तु कधी विचार केला नसशील नाही, आस्तिक तर मी पण नाही एवढा पण फक्त तुझे शब्द पाळावेत म्हनुन जगतो आहे, नाही तर ह्या श्वासांची काय हिंमत तुझ्या विना एकक्षण देखील माझ्या बरोबर राहू शकतील. जीव देण्याचा भ्याडपणा मी कधीच करणार नाही हे तुला देखील माहीत आहे मला लढणं आवडतं पण समोर आलेल्या मृत्यला पण मी तेवढ्याच प्रेमाणे आलिंगन देईन हे नक्की.

हम भुल गये रे सारी बात पर तेरा प्यार नही भुले
क्या क्या हुवा दिल के साथ मगर तेरा प्यार नही भुले ।


मोठी माणसं म्हणतात मला, मी अडाणी आहे, मला भाषा कळत नाही, लिहता येत नाही, मी गांवढळ आहे, ना धड मराठी येत नाही ना धड कन्नड, हिंन्दी अथवा इग्रजी, काही शब्द माझे पण चुकतात, कोणी म्हणतं मी खुप वेगानं बोलतो, तर काही ना मी बोललेलेच कळत नाही , काही ना माझे शब्द कळत नाही तर काही ना माझी भावना, काही ना मी उथळ वाटतो तर कुणाला वाहतं पाणी, काही मला मित्र समजतात काही शत्रु तर काही मला ग्रहितच धरत नाहीत.. पण मला आता ह्या बद्दल काहीच वाटत नाही, कोण काय म्हणतो आहे, मी आहे तो असाच आहे, मी म्हणतो ती लोक वेड्याला शहाणं का समजता, माझ्यातला मी तर तेव्हाच गेला, जेव्हा ती गेली आता तर बस हा देह, ओझे वाहतो आहे वाहतो आहे कधी तरी मी पण मुक्त होईन, जेव्हा मी मुक्त होईन ना तेव्हा नक्कीच तुझ्या घरासमोरुन एक चक्कर मारेन, चुकून तु पुन्हा दिसशील, सकाळ सकाळी पाण्याचा सडा अंगणात घालताना, रांगोळी घालताना व चुकून तु बाहेर गेटकडे पाहशील तर तेथेच मी कुठे तरी कोप-यात उभा असेन तुला निहाळत , तेव्हा ना बंध असतील ना दैव. अशीच एक झुळुक तुझ्या गालाला स्पर्श करुन जाईल विश्वास ठेव तो स्पर्श माझाच असेल तुझ्या गालावर शेवटचा.

***

मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.