<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss'><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834</id><updated>2009-11-08T10:40:22.343+05:30</updated><title type='text'>राज दरबार.....</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default?start-index=26&amp;max-results=25'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>68</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-4562301313539989665</id><published>2009-10-24T11:50:00.002+05:30</published><updated>2009-10-24T11:51:07.341+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>... देवाचं घर !</title><content type='html'>माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून.  माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं. त्यावेळेस शेजारच्या चरणकर आजींनी सांगितलेलं एकच वाक्य राहूनराहून आठवायचं...”देव सगळीकडे असतो”&lt;br /&gt; &lt;br /&gt;’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता.  तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र,  देखण्या, रेखीव मूर्ती काय,  तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी! &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे?  लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील  तसंच थंड, शांत वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे,  त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे  आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां? &lt;br /&gt;&lt;br /&gt;बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग. &lt;br /&gt;मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर समक्ष्व.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-4562301313539989665?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/4562301313539989665/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=4562301313539989665&amp;isPopup=true' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4562301313539989665'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4562301313539989665'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_24.html' title='... देवाचं घर !'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-4810996383154417091</id><published>2009-10-18T13:40:00.000+05:30</published><updated>2009-10-18T13:42:03.487+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><title type='text'>माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६</title><content type='html'>दिल्ली मध्ये कामाची, राहण्याची व खाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती तसेच जे चारी जी होते ते एक सदगृहस्थ, सरळ मार्गी जिवन व तसेच त्यांचे कुटूंब. काही दिवसामध्येच मी देखील त्यांच्या कार्यालयीन जिवनाचाच एक महत्वाचा भाग बनलो, त्यांच्या मुळे किती तरी प्रयोग करुन करुन मी संगणक दुरुस्ती देखील शिकलोच. कधी बोर्ड बदल कधी विंडॊज बदल, कधी प्रिंटर वर काम करुन बघ , तर कधी नेट वर. वेगळ वेगळ्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाबद्दलची माहीती आपल्याकडे जमा करणे व त्यांचे रात्री बसून अभ्यास करणे ह्यावरच काही महीने माझा जोर होता, चारी जींनी देखील धाडस करुन कधी मला आपला संगणक तर कधी स्वत:चा Laptop दुरुस्ती साठी दिला व मी देखील त्यांच्या विश्वासला तडा जाऊ न देता त्यांचे काम व्यवस्थीत करुन देऊ लागलो, तेव्हा मात्र त्यांनी माझी शिफारीश वेग-वेगळ्या व्यक्ती समोर करणे चालू केले व एखाद दुसरे बाहेरील काम देखील मला ते करण्यासाठी पाठवू लागले, ते नेहमी म्हणायचे "राज , देखो तुम्हे यह काम सिखना पडेगा क्यूं की यह काम तुम्हे पुरी जिंदगी रोटी देगा.. यहा तुम कहा से कहा तक पोहच सकते हो.. बहोत बहोत ३०००.०० से ८०००.०० रु. ही कमा सकोगे... पर यह जो काम है एक दिन तुम्हे दिन के ५०००.०० रु. कमा के देगा देखना..." व मी हसून हो म्हणत असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असेच एक दिवस चारीजींनी मला बोलवले व म्हणाले " तुम्हे यही करोलबाग में जैन साब के यहा जाना है, वह टी,टी. गार्मेंट के मालिक है... जाणते हो ना टी.टी. ?" मी हो म्हणालो व त्यांची परवानगी घेऊन जैन साहबांकडे गेलो दरवाजावर परवानगी घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहचलो तर समोर जैन साहेब बसले होते व मी जाताच त्यांना अभिवादन करुन म्हणालो की " सर, मै राज जैन, मुझे चारीजींने आपके पास भेजा है, आप को कुछ काम है" ते हो म्हणाले व मला एका संगणकाकडे बोट दाखऊन म्हणाले " बेटा, देखो इसे कुछ हुआ है, तथा इस मे मेरे काम की बहोत सारी चीजे है तथा वह मेरी सारी चीजे जरुरत की है" मी हो म्हणालो व त्यांच्या संगणकाकडे वळलो, थोडेफार काम केल्यावर मी त्यांना सांगितले की काही वस्तूंची गरज आहे व मला ती विकत आणावी लागेल. त्यांनी लगेच किती पैसे लागतील विचारुन घेतले व पैसे मला दिले , काही वेळानंतर मी त्यांचा संगणक चालू करुन त्यांना दाखवला व त्यांच्या सर्व महत्वाच्या फाईली त्यांना दाखवून मी त्यांना सांगितले की काय अडचण होती व किती पैसे खर्च झाले, व वाचलेले पैसे मी त्यांना परत दीले व त्यांची परवानगी घेऊन चारीजीच्या कडे परत आलो तो पर्यंत चारीजी व जैन साहेब ह्यांचे फोन वर बोलणे चालू होते मी गेल्यावर चारीजींनी फोन खाली ठेवला व म्हणालो " वा, राज आज तो तुमने बडा ही काम कर दिया" मी हसत म्हणालो " नही सर, इतना बडा भी नही था यह काम, बस कुछ सामान खराब था, बदल दिया तथा चालू करके उन्हे दे दिया" ते म्हणाले " नही, छोटा नही था काम , वहा जो आदमी आता था उसने तो नया पीसी लेने के लिये कहा था तथा वह लुटने के चक्कर में था पर तुम्हारी वजह से उन्ह के पैसे बच गये तथा उन्होने तुम्हे १०००.०० रु. देने के लिए मुझे कहा है तथा शाम के समय उन्ह के यहा जाना व तुम्हे कुछ गिफ्ट भी करना चाहते है" मी हसलो व म्हणालो " नही सर इसकी क्या जरुरत है, आप उन्हे मना कर दो कृपा कर के" पण त्यांनी जे उत्तर दिले ते मात्र माझ्यासाठी एकदम जिवनमार्गच ठरले, ते म्हणाले " राज, जिवन में कभी पैसे को ना मत कह ना तथा जो तुम ने काम किया है उसका मुल्य जरुर लेना, शर्म पैसे की कभी नही हो नी चाहीए" मी हसत मान डोलावली व आपल्या कामाला लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चारी जींच्या कृपेने तथा माझ्या काही करण्याच्या इच्छेला मान देऊन काही महत्वाच्या व्यक्ती तथा संस्था मला संगणकाच्या कामासाठी बोलवू लागल्या व रोजचा कामाचा व्याप वाढू लागला. तेव्हा चारी जीं नी माझ्या साठी खोली वर एक फोन लावून दिला व म्हणाले की ह्याचा उपयोग आजच्या घडीला सर्वात जास्त होऊ शकतो तेव्हा सर्वांना हा नंबर दे. माझे रोज बस मधून फिरणे तथा पायी चालणे ह्यामुळे तथा काही हवामानाचा फरक असेल त्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा मात्र चारी जींनी विचारले " राज, कितना पैसा जोडा है ? " मी म्हणालो की जास्त नाही १५०००.०० एक हजार रु. आहेत तेव्हा चारी जीं नी आपल्या जवळचे ५०००.०० रू. दीले व म्हणाले की एखाद दुसरी मोटर-सायकल पाहून खरेदी करुन टाक आजच, शुभ दिवस आहे आज. मी हो म्हणालो व तेथून सरळ दिनेश जवळ आलो, दिनेश तेथेच त्या गल्ली मध्ये राहत होता माझ्या खोली च्या जवळच जेथे मी जेवण करतो ते त्यांच्या काकाचे हॊटेल. मी दिनेशला एक बाईक हवी आहे असे सांगताच तो मला म्हणाला " अरे राज सर, क्या बात है, अच्छे टाईम पें बोला है आपने, अभी रुको दो बाईक दिखा देता हूं जो चाहिए वह ले लेना" मी तेथेच थांबलो व म्हणालो "ठीक है, जल्दी वापस आना प्लीज मुझे कही जाना है" तो लगेच गेला व दोन मित्रांच्या बरोबर लवकरच दोन बाईक घेऊन परत आला, दोन्ही RX-100 यामाहा होत्या, एकाची किमंत त्याने २५०००.०० रु. व एकाची १८०००.०० रु सागितली, दोन्हीचा वापर करुन पाहिला व चारीजींना फोन केला व त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला काही त्यातले कळत नाही तुच बघ म्हणून फोन ठेवला. मी जास्त विचार न करता १८०००.०० वाली गाडी घेतली व म्हणालो " पैसा अभी ले के जाना भाई, लेकिन नाम करा के आज ही देना मुझे" तो म्हणाला की सेल नोट देइन व ट्रान्स्फर दोन दिवसामध्ये करुन देइन. मी हो म्हणालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाईक झाली, काम देखील व्यवस्थीत चालू झाले, नोकरी तर होतीच, व राहण्याची देखील अडचण जवळ जवळ संपलीच होती तेव्हा चारी जींच्या सांगण्यावरुन मी एका छोट्याश्या जागी दुकान काढण्याचे नक्की केले पण चारी जीचे एक मित्र व मोठे चित्रपट निर्माते श्री.......... जींनी मला सांगितले की करोलबाग मध्ये एका जागीची बिल्डींग आहे तेथे त्यांच्या शेयर मार्केटचे काम त्यांचा छोटा मुलगा पाहतो तेथे काम चालू कर व तेथेच पुर्वी त्यांच्या मुलाने संगणकाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा नाव व फोन नंबर सगलेच तयार मिळेल, मी त्यांच्या ह्या सल्ल्याला हो म्हणून तेथेच काम चालू केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चारी जीची आर्थिक मदत व माझ्या कामावर माझा असलेला विश्वास ह्यामुळे कामामध्ये माझा व्यवस्थित नफा चालू झाला व मी त्यातील काही शेयर चारी जीं तथा तो चित्रपट निर्माता ह्यांना देऊ लागलो.&lt;br /&gt;एक दिवस चारीजीं नी मला कार्यालयात बोलावले व एका व्यक्तीशी भेट घालून दिली व म्हणाले " राज, यह जिंदल भाई साब है, इन्ह का बहोत बडा कारोबार है तथा यह तुम्हे अपने साथ रखना चाहते है, तुम जाना चाहोगे ?" मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो " चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है ? " चारी जींच्या चेह-यावर एक समाधानाचे हसू मी पाहीली व मी त्यांच्या विश्वासानूसारच बोललो हे मला खुप आनंद देऊन गेले. दोन-चार दिवसानंतर मी जिंदल ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व त्यांची भेट घेऊन व्यवस्थीत कामाविषयी माहीती घेतली व त्यांच्या कडुन दोन एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश :&lt;br /&gt;&lt;br /&gt;* काही व्यक्ती तथा संस्थेची नावे काळजीपुर्वक येथे लिहलेली नाही आहेत क्षमा असावी, काहीतरी अनुबंध असल्यामुळे अथवा त्यांचे व्यक्तीगत जिवन येथे महाजालावर येऊ नये ह्या उद्देशाने.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-4810996383154417091?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/4810996383154417091/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=4810996383154417091&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4810996383154417091'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4810996383154417091'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_18.html' title='माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-2560283007037109851</id><published>2009-10-16T08:28:00.001+05:30</published><updated>2009-10-16T08:39:37.258+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><title type='text'>दिवाळी...</title><content type='html'>काल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कप्डे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले... मी डोळे पुसत बाहेरची वाट धरली व मार्केटच्या बाहेर आलो...समोर बसण्यासारखी जागा पाहून तेथे बसलो...  काही वर्षापुर्वीची दृष्य एक चलचित्रपटाप्रमाणे माझ्या नजरे समोर फिरु लागली...&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजा, लेका उठ, सकाळ झाली रे, तुला बाबा बरोबर दुकानावर जायचे आहे ना.. उठ लवकर.&lt;br /&gt;दिवाळीच्या १५ दिवस आधी पासून आमच्या घरातली सकाळ जवळजवळ रोज ह्याच वाक्याने होत असायची.&lt;br /&gt;आई घरात आलेले कपड्यांचे गठ्ठे उसवायला बाबांची मदत करत असे व अक्का ते साईज वाईज लावत असे व बाबा ते आपल्याजवळ असलेल्या बिलावरुन माल बरोबर आहे की नाही हे नोंद करत असत, मी डोळे चोळत उभा राहूपर्यंत त्यांचे अर्धे काम झाले असायचे, व मला बाबा म्हणायचे राजा तयार हो लवकर साडे-सातच्या आत साफसफाई करुन दुकान उघडू आपण.. बोहनी चांगली होईल आवर पटापटा. मी जरा अनिच्छेनेच अंघोळ इत्यादी करुन तयार होतं असे व तो पर्यंत बाबा आपले नाष्टाकरुन पुढे गेलेपण असायचे मागे माझ्यासाठी दोन पिशव्या माल ठेऊन जायचे. मी नाष्टा करुन तयार होऊपर्यंत अक्का दुसरा गठ्ठा सोडवून त्यातला माल मोजायला बसायची.. तीला पाहून कधी हसू येत असे तर कधी राग.  हसू ह्यासाठी की ती मोजता मोजता चुकायची.. माझ्या पेक्ष्यालहान वयाने  व राग ह्यासाठी की हिच्यामुळे मला शिव्या बसायच्या कारण ही लहान असूनपण काम करायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी पिशव्या घेऊन दुकानात पोहचूपर्यंत बाबा रोडवर पाणी मारुन झाडून मारुन साफसफाई आवरलेली असायची व कपडे लटकवण्याचे लोखंडी स्टॆन्ड लावून मोकळे झालेले असायचे व नवीन आलेला माल साईजप्रमाणे एका जागी जमा करत बसलेले दिसायचे,  दुकान... दुकान कसले ज्याला ना शटर ना कुलुप.. महाद्वाररोडवर  ड्रेसलॆन्ड दुकानासमोर ची ५ बाय ५ फुटाची जागा, कधी बाबा ह्याच ड्रेसलॆन्ड दुकानामध्ये २५० महिना पगारीवर नोकरी करत पण स्वत:च काम चालू करु म्हणून नोकरी सोडून मालकाच्या परवानगीने ड्रेसलॆन्डच्या बाहेरच दुकान थाटले..  १०-१० चे प्लॆस्टिकची चटाई व कधीमधी पाऊस पडला तर एक्स्ट्रा हिस्सा झाकायला कामी यावा म्हणून..  आधी गांधीनगर मधून माल आणत पण जरा स्वस्त मिळते म्हणून स्वत: मुंबईला जाऊन आता माल घेऊन येत असत.. बाबा एक वर्षाच्या लहान मुलीपासून १४-१५ वर्षाच्या मुलीचे ड्रेस विकत असतं व मला ह्याचा खुप राग.... कारण वर्गात मुले चिडवायची.. कधीमधी... आला लेडिज ड्रेसवाला म्हणून..&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान एकदम नटून थटून तयार होत असे.. व आता वाट बघायची ती फक्त बोहनीची... बोहनी होत नाही तो पर्यंत बाबाजवळच्या मित्राजवळ बसून नवाकाळ वाचायचे व चहा चालू असायचा कधीमधी ग्राहक आले की लगेच उठून येत असत व ग्राहकाने खरेदी केली तर ठीक नाही तर परत मित्राच्या दुकानात.. त्यांना वाटायचे ग्राहकाची वाट बघितली तर ते येणारच नाही. मग कधीकधी दहा साडे दहाच्या आसपास बोहणी होत असे व मग बाबा खुष, एकदा बोहणी झाली की मग काही हरकत नाही कधीकधी बोहणीसाठी बाबा आपल्याला पडलेल्या किमतीला पण कपडे विकत व स्वत: मागून एक रुपया त्या ग्राहकाकडून घेत व म्हणत " ताई, हीच गं आजची दिवसाची कमाईची सुरवात." व ती बै हसून तो एक रुपया आनंदाने देऊन जात असे व बाबा तो एक रुपये आपल्या जवळ्या ड्ब्बात आई आंबाबाईच्या फोटोवर ठेवत व म्हणत... आई तुच बघ गं... तुझ्यासाठीच ही सुरवात. तो पर्यंत आई व अक्का घरातले काम संपवून आमचे डब्बे घेऊन हजर होत असतं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;जसाजसा दिवस चढत जाई तसे तसे खरेदीदार वाढत जात... मी साईजनूसार कपडे काढून देणे व ग्राहकांनी विसकटलेल्या कपड्यांची घडी घालणे हे काम करत असे व जेव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा गल्यातील पैसे क्रमवार लावत असे तेव्हा बाबा म्हणायचे राज्या लेका तु दहादा मोजलेस तरी पैसे तेवढेच राहणार ... मी त्यांना म्हणत असे बाबा असेच कपडे विकत राहिले तर आपण दिवाळीच्या दिवशी काय विकणार माल कमी पडेल ना.... मग ते म्हणायचे राजा लेका तुझ्या तोंडात साखर पडो... माझ्यामुळे पण आमच्या दुकानात जरा खरेदी जास्त होत असे असे मला वाटायचे तसे बाबांना पण वाटायचे कारण माझ्या शाळेतील सर्व मुली आमच्याकडेच ड्रेस घ्यायला येत असतं दिवाळीच्या... डिस्काउंटसाठी.  अक्का व मी एकाच शाळेत असल्यामुळे माझ्या वर्गमैत्रीणी चांगल्या अक्काला माहीत होत्या.. एखादी आली खरेदीला की मी लगेच पुढे होत असे व ती म्हणायची मागून.. आली सटवाई.. हे येडं गेले बघ...तिच्यामागे.. मी डोळे वटारुन बघायच्या आधीच बाबा तीच्याकडे बघायचे व खुद करुन हसायचे...व स्वत: मागे जाऊन बसायचे व मला पुढे करायचे.... मी तिला आवडेल असे ड्रेस काढून दाखवत असे व तिच्याकडे बघत.. काही तरी भलाताच भाव सांगायचो.. जर जास्त सांगितला तर तिच्या बरोबर असलेली आई-मावशी-आजी बोलायच्या आत बाबा बोलायचे राजा लेका भाव तो नाही आहे... तो आहे.  व कधी कमी सांगितला तर काहीच बोलायचे नाहीत व जेव्हा तीची खरेदारी संपत असे व ती निघून गेली असे तेव्हा ते मला म्हणायचे... राजा तुझ्या खात्यात ते २० रु. तीला तु खरेदी दरापेक्षा दहा रु कमी दर लावलास व दहा रु फायद्याचे... ते पण तुझ्याखात्यात.... आई व अक्का फिस्स करुन हसायच्या व मी बाबांच्या मागे बाबा मी घेईन त्यांच्याकडून ते पैसे...  कारण दिवाळीच्या फटाकामध्ये व कपड्यामधून ते वजा होणार हे मला पण माहीत असत असे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसामागून दिवस जात होते.. दिवाळी सहा दिवसावर होती मला आठवतं... माल जवळजवळ संपत आला होता... बाबा खुष होते...  पण अजून विक्री झाली असती व फायदा अजून झाला असता असे त्यांना राहून राहून वाटत होते...त्यांच्या मनात काय आले काय माहीत व चार वाजताच मला म्हणाले... राजा तु मुंबईला जा रातच्या गाडीने. झाले आई एकदम म्हणाली..... असे काय करत आहात हा एवढासा.. वर त्याला मुंबईला पाठवत आहात... कुठे हरवला तर... ?  तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या..  बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे ? पण मी हो म्हणालो व बाबा जाम खुष... माझ्याकडे पैसे दिले... २४००० रु. सगळे पाचशेच्या नोटा.. कुठल्यातरी सेठ कडून लहान नोटा बदलून मोठ्या नोटा घेऊन आले होते बाबा.. त्या बरोबर माझ्या खर्चासाठी व गाडी भाड्यासाठी पाचशे रु सुट्टे.. जिवनात पहिल्यांदा मुंबई... !&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबांनी मला रात्रीच्या कोल्हापुर मुंबई बस मध्ये चढवलं व कंडेक्टरला सांगितले की न विसरता ह्याला दादरला उतरवा. जवळ असलेल्या पैसे व त्याच्या काळजीमुळे मी एक मिनिट झोपलो नाही... ना काही खाण्यासाठी उतरलो... बरोबर दादरला मी उतरलो व बाबानी सांगितलेले काम पुर्ण करुन मी सरळ कोल्हापुरच्या गाडीत बसलो.... सकाळी साडे पाचलाच बस कोल्हापुर मध्ये आली जवळ जवळ दिड तास आधी.. कपड्यांची भले मोठी चार-चार गठ्ठडे व मी चिमुरडा पोरं... एक दोन प्रवासी व कंडेक्टर ने मदत करुन सगळे गठडे गाडीवरुन खाली उतरवून दिली, मी आता काय करावे ह्याचा विचार करत उभा होतो तोच समोर एक रिक्षा दिसली. मी त्याला बोलवले व म्हणालो मला बुधवार पेठेत जायचे आहे, हे सामान आहे बरोबर.. त्याने मला वरुन खाली पर्यंत बघीतले व म्हणाला चल.. कसेबसे मागील सिटवर सर्व गठडे त्यांने दाबून दाबून भरले वर मला आपल्या सिटजवळ बसून सरळ टाऊन हॉल मार्गे बुधवारपेठेत रिक्षा उभी केली व म्हणाला घर सांग रे बाळा.. तेथेच पोहचवतो. नाही तर तू हे सामान कसे घेऊन जाणार.. मी त्याला बोळा बोळातून घेऊन घरासमोर रिक्षा उभी केली.... व पळतच वर गेले.. तेव्हा आम्ही दुस-या माळ्यावर राहत असू.. आतातून आवाज येत होता..... बाबांचा आवाज होता... अगं पावणेसात झाले पोरं आलं असे स्टेन्डवर.. एवढं वझं त्याच्याजवळ असेल व त्यातून थकलं पण असेल ते... नाष्टा राहू दे मी जातो...... दरवाजा उघडला व मी बाबाच्या𐑪समोर... मी गच्च्च मिठी मारली बाबांना व म्हणालो.... मला नाही जायचे आहे परत कधी मुंबईला.. !&lt;br /&gt;&lt;br /&gt;रिक्षावाल्याचे पैसे देऊन बाबांनी सर्व गठ्ठडी उतरवली व त्या रिक्ष्यावाल्या बरोबर वर आले व आईला म्हणाले अगं चहा टाक दोन कप. मी आपला आईच्या पदराबरोबर खेळत म्हणालो... आई भुक लागली आहे.. आई ने माझ्याकडे बघितले व म्हणाली.... बस. तोपर्यंत हे बेसनचे लाडू  खा व मी करते तुझ्यासाठी काही.... जास्त वेळ नाही फक्त २८-३० एक तास घरातून बाहेर होतो मी.... गेलो व आलो... कुठेच सामान सोडून उतरलो नाही...  अन्नाचा एक कण माझ्या पोटात नव्हता... रिक्ष्यावाला गेला तेव्हा मी बाबाच्याकडे गेलो व मी त्यांना त्या सेठ ने दिलेले बिल व मालाची रिसीट दिली व वाचलेले सर्व पैसे बाबांना परत दिले व म्हणालो... मी झोपू... !  बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे...  आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे ?  तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... !&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीच विसरु शकणार नाही अशी ही माझी दिवाळी.... शेवटची दिवाळी....त्यानंतर कधीच वेळच नाही आली दिवाळी साजरी करण्याची.... बाबांचे काम कधी व कसे बिघडले व कधी मी दुरदुर होत एवढा दुर झालो की... शेवटं दर्शनपण दुर्लभ झाले... का हा प्रश्न मला तर नेहमी पडतो... अल्लडपणा.. नादानपणा ह्या नादात मी खुप काही गमवले... आज ही आठवतं.... घराबाहेर कंदिल उभा करणे... आई व अक्काची रांगोळीसाठी चाललेली तयारी.. व मी गोळा केलेले फटाके.... बाबांची दिवाळी तर तेव्हापण रोडवरच... आपल्या दुकानाबरोबर...! उन्हातान्हात...! संध्याकाळी... घरी.. थकलेले .... सावकाराचे घेतलेले पैसे कसे परत करावे ह्या चिंतेत... त्यांचा बॅगपायपर व चार मिनारचे पॅकेट... मी व अक्का बाहेर फटाके सोडत असू व बाबा... असेच एकटे... ग्लास हातात घेऊन...... ह्याला नशीब म्हणावे की नियती मला माहीत नाही पण ती दिवाळी व आजची दिवाळी मी घरात आपल्या माणसांच्याबरोबर कधीच साजरी करु शकलो नाही बुक केलेली टिकीटे मी स्वत: रद्द करावी अशी अवस्था येते.... कधी कधी.... ह्यावेळी पण... कुठेतरी जगातल्या कोप-यात बसून एकटे.. बाहेर चालू असलेली आतिशबाजी बघत.... व समोर चालत असलेली गर्दी बघत.....  माझी दिवाळी नेहमी प्रमाणेच संपेल... !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-2560283007037109851?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/2560283007037109851/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=2560283007037109851&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/2560283007037109851'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/2560283007037109851'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_16.html' title='दिवाळी...'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-9146206377703873002</id><published>2009-10-14T09:06:00.001+05:30</published><updated>2009-10-14T09:06:33.054+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५</title><content type='html'>मैहरोलीला पोहचल्यावर सर्वात प्रथम काम केले ते कत्यानी मंदिर शोधण्याचे थोडीफार शोधा शोध करुन मंदिर शोधले व मंदिर कार्यालायात जाऊन सर्वात प्रथम पं. हरीकृष्णजीची माहीती विचारली तर तेथे एका सज्जन माणसाने सांगितले की हो पं. जी येतात पण सकाळ सकाळी. मी थोडा मनातून सुखावलो व म्हणालो ठीक कमीत कमी आपण येथे पर्यंत तरी पोहचलो व आता नाही तर कमीत कमी सकाळी तरी भेटतीलच, त्याच कार्यालयात विचारुन घेतले की जवळ पास राहण्याची सोय कुठे आहेत त्यांने समोरच असलेली कत्यानी धर्मशाला दाखवली व म्हणाला की जा तेथे रुम मिळेल. मी लगेच तेथे जाऊन कार्यालयात रुम साठी विचारणा केली, " भाई साब, एक रुम चाहिए था" समोरी व्यक्ती माझ्या कडे नखशिकांत पाहून म्हणाली " ठीक है, कहा से ? कितना समय के लीए रुम चाहीए ? " मी विचार केला की आज व उद्याचीच गरज आहे तेव्हा दोन दिवस असे सांगितले त्याने एक दिवशाचे १५०.०० रुपये घेतले व म्हणाला " कल का पैसा कल देना" मी धन्यवाद करुन रुम वर गेलो तर तेथे काहीच नव्हते, मी परत खाली कार्यलयात गेलो व बि़छाना तथा पाघंरुन ह्याची विचारना केली त्या ती दिली ही पण संगे ५०.०० रु. पण घेतले. सर्व सामान रुम वर पोहचवून तडक जवळच्या एसटीडी बूथ वर गेलो व सर्वात प्रथम दिवेदी जी नां फोन करुन सर्व कथा व कहाणी सांगितली व येथे दिल्ली ला आल्या बद्दलच माहीती दिली त्यांनी मला सांगितले की " राज बेटे, पत्ता नही कहा गलती है, पर तुम्ह निकल के दिल्ली पोहच चुके ही हो तो जहा रुके हो वही रुकना मै को देखता हूं कोई प्रबंध होता है क्या, तुम्ह मुझे कल फोन कर ना" ही रामगाथा सांगून फोन खाली ठेवला त्याच वेळी जाणिव झाली की जवळचे पैसे संपत आले आहेत व आता पैसे वाचवने गरजेचे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवस व रात्र कशीबशी निघून गेली व मी सकाळ सकाळी मंदिराच्या कार्यालयात जाऊन पुन्हा पंडीत जींची विचारणा केली तो म्हणाला की थोडा वेळ थांब येतीलचे, थोडा वेळ थोडा वेळ करत करत १०.०० वाजले पण ते काही आले नाहीत, माझ्या कडे पाहून तो म्हणाला " भाई, आज तो आए नहीं, तथा मेरे पास उन्हका कोई पत्ता तो भी नही है, यही मिलते थे रोज जरुरत नही पडी कभी पता जाणने की" मी हसून म्हणालो" कोई बात नहीं, आज नही तो कल सही" व परत धर्मशाळेत आलो व दिवेदींजींना फोन लावला पण ते फोन वर भेटले नाहीत आशा निराशा असा भावनिक खेळ चालू झाला होता पैसे झरझर करुन संपत होते व पंडित जी अथवा दिवेदी जी काय मला मिळायला तयार नव्हते अथवा देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते, &lt;br /&gt;&lt;br /&gt;४ थ्या दिवशी मात्र पैसे संपले व मी हिशोब करु लागलो की कोठे कोठे खर्च केले व कीती पण त्याचा काहीच उपयोग नव्हता खिश्यामध्ये दमडी नव्हती तेव्हा हिशोब काय कामाचा. सकाळ पासून काही खाल्ले देखील नाही व संध्याकाळी धर्मशाळेने नियमाप्रमाणे पैसे मागितले त्यांना मी माझी अडचण सांगितली व म्हणालो की एक दिवसाचा मुक्काम राहू द्या, बेचारा तो देखिल नोकर माणूस पन त्याच्या मध्ये देव होताच त्यांने परवानगी दिली व म्हणाला" देखो भाई एक नही, दो दिन रुको यह तो धर्मशाला है ही, हम पैसे ईसलिए लेते है की थोडी साफ सफाई रहे तथा लोग आरामसे रह सकें " असे म्हणून तो पुढे निघून गेला. मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले व भुके पोटी विचार करु लागलो की आता काय ? &lt;br /&gt;&lt;br /&gt;विचार करता करता बाहेर आलो तोच एक महाशय जे मंदिर कार्यालयात काम करायचे ते माझ्या जवळ आले व म्हणाले " भाई, अभी खबर मिली है की पंडीत जी बिमार थे इस वजह से व मंदिर नही आ रहे थे पर व कल सुबह यहा मिल जायेंगे" मी आनंदाने त्यांचे आभार मानले व म्हणालो " अब कोई फिकर नही रही काम हो ना हो कम से कम उन्हे मिलतो जाऊंगा ही"&lt;br /&gt;सकाळ सकाळी मंदिरात गेलो व तर देवाप्रमाणे कार्यालयात पंडितजी बसले भेटले मी त्यांना ओळख तथा शर्माजींचा व माझा संबध ह्या विषयी माहीती दिली व म्हणालो की काही काम हवे आहे, पंडीत जी म्हणाले " हम्म, भाई देखो, शर्माजी तथा मै पुराने साथी रहे है तथा एक ही प्रांत के है, तुम कहा ठहरे हो ?वही आज भी रुक जायो मै तुम्हारे लिए किसी से बात करता हूं कल सुबह मिल लेना मुझे" मी त्यांचे आभार मानले व मंदिरात दर्शनासाठी गेले, तेथे पहिल्यांदा दिड दिवसानंतर अन्न प्रसादाच्या रुपाने माझ्या पोटात गेले व थोडा फार आराम भेटला."&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुस-या दिवशी सकाळी पंडित जीं माझ्या साठी बातमी घेऊन आले व म्हणाले की " बेटा, तुम्हारा काम हो गया है तथा तुम्ह यहा से झेंडावालान, करोल बाग जाओ तथा वहा ***** का कार्यालय है वहा तुम्हे श्री चारी जी मिलेंगे ठिक है, यह रहा पता तथा उन्ह का फोन नंबर,, मेरा नाम बता दे ना, जरुर तुम्हे काम देंगे वह मेरे बहोत अजीज स्नेही है" मी त्यांच्या चरणाला हात लावून नमस्कार केला व म्हणालो " पंडित जी, आपने जो मेरे लिए किया है, यह मै जिवन भर नहीं भुलुंगा" कार्यालयातील त्या व्यक्तीचे देखील आभार मानले व धर्मशाळेत जाऊन कपडे तथा पिशवी घेऊन कार्यालयात गेलो व त्यांना चावी हात देवून त्यांचे आभार मानले व म्हणालॊ की "मेरा काम हो गया है भाई साब, मैं अब यहांसे जा रहा हूं पर वापस जरुर आऊंगा आपसे मिलने" व तेथून सरळ मुख्य रोडवर आलो व एकाला विचारले की " भाई, करोल बागला रस्ता कुठला जातो ?" तो " अरे भाई, बसे जाओ बहोत दुर है " मी " नहीं भाई साब पैसे खत्म हो चूके है" मी हसलो.. पण ते हसू एकदम निराळे होते त्यामध्ये मला देखील एक निराशा जाणवली " तो म्हणाला " नये हो क्या ? रुक अभी तुम्हे बस मै बिठा देता हूं" व त्यांने जवळच उभी असलेल्या बसच्या चालकाशी बोलणी करुन मला बस मध्ये पाठवले मी त्याचे आभार मानले व म्हणालो देव अजून माझ्या बरोबरच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;करोलबाग बाग पासून झेडावालान जवळच आहे, तेथे गेल्यावर मला ते कार्यालय तथा ती व्यक्ती देखील सापडली मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो " सर, मैं राज जैन, पंडीत जीं ने आपसे बात की होगी" ते आपल्या चष्मातून माझ्याकडे बघत म्हणाले " हम्म, क्या काम जाणते हो, यहा तो प्रेस का काम है, पंडीत जी बता रहे थे की तुम्हे Computer चलाना आता है" मी हो म्हणालो. ते म्हणाले " ठीक है, तुम्ह यही मेरे साथाआ काम करोगें तुम्हारे रहने का प्रबंध मै ने कही करोलबाग मे किंया है वहा अपने ही प्रेस का पुराना कार्यालय है फिलाल तुम वही रहना, पंडीत जी ने तुम्हारे बारे में बताया तो है सब लेकिन तुम फिर अपने बारे मैं बता दो" मी त्यांना सर्व राम कथा पुन्हा सांगितली व ते म्हणाले " अछा तो तुम महाराष्ट्र से हो, ठिक है सही जगह आये हो यहा बहोत सारे व्यक्ती मिलेंगे तुम्हे महाराष्ट्र के" व से म्हणून खिश्यातून ५००.०० रुं दिले व म्हणाले " यह रखना खर्चे के लिए तथा जरुरत हो तो मांग लेना ठिक है, अब तुम बाहर जो रामकिशन जी बैठे है उन्हे अंदर भेज तो मै उन्हे तुम्हे जहा रहना है बहा पोहचाने के लिए तथा वहा क्या कमी है यह देखने के लिए भेजता हूं"&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळाने चार-पाच अरुंद असे बोळ फिरत मी एका चागल्या बांधले गेलेल्या बिल्डींग समोर उभा राहिलो व रामकिशन जी आपले आत जाउन चावी घेऊन परत माझ्या कडे आले व म्हणाले " देखो वह उपर तीसरे माले पे दुसरा कमरा है ना उसकी यह चावी है, पहले वाले कमरे मे मै रहता हूं, जा, कुछ जरुरत हो तो बोलना मुझे, बिस्तर तथा बाकी जरुरत की चिजे देखील है उपर" मी त्याला म्हणालो" भाई, कमरा तो बाद मै भी देख लूंगा फले मुझे खाना खाना है दो दिन हो गए है अच्छा तथा सस्ता कोई हॊटेल बता दो जहा मैं खाना खा सकूं" तो हसला व मला संगे घेऊन गेला एका हॊटेल मध्ये मालकाशी माझी ओळख करुन दिली व माझे खाते तेथे चालू करुन म्हणाला " देखो, यहां सुबह, शाम खाना खा के यहा लिख देना पैसे महिने के आखिर में दे देना ठिक है"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी जेवण करुन सरळ आपल्या खोली कडे आलो व दरवाजा उघडून आत प्रवेश केला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमशः&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-9146206377703873002?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/9146206377703873002/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=9146206377703873002&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/9146206377703873002'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/9146206377703873002'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_14.html' title='माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-1723577249569405247</id><published>2009-10-11T16:35:00.002+05:30</published><updated>2009-10-11T16:41:38.620+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='photos'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता / विडंबन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Love'/><title type='text'>भावना तीव्र आहेत....</title><content type='html'>हा हा हा !&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदम हसु आलं !&lt;br /&gt;&lt;br /&gt;भावना तीव्र आहेत....  हसतो आहे ह्याचे वाईट नका वाटून घेऊ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा ताजा घाव असतो ना तेव्हा वेदना पण तीव्र असतात...&lt;br /&gt;दिवाळी जवळ आली की जीव घाबरतो..&lt;br /&gt;किती जणांचे संसार रस्तावर येणार...&lt;br /&gt;ह्या भितीने नाही..&lt;br /&gt;किती जीव जाणार..&lt;br /&gt;ह्या काळजीमुळे सुध्दा नाही..&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुठे तरी मार्केटमध्ये...&lt;br /&gt;विस्फोट होईल..&lt;br /&gt;कळत नकळत मी पण तेथे असेन..&lt;br /&gt;कुठे हात.. कुठे पाय..&lt;br /&gt;शरीराचे असंख्य तुकडे..&lt;br /&gt;गोळा होतील का नाही ?&lt;br /&gt;शव नाही राख तरी घरी पोहचेल...&lt;br /&gt;ह्या काळजीने घाबरतो जीव ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेदना तीव्र आहेत...&lt;br /&gt;पण त्याचे प्रतिबिंब..&lt;br /&gt;सरकारी...मालमत्तेवर..&lt;br /&gt;कुठे बस... कुठे रेल्वे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण जेव्हा मत देता तेव्हा..&lt;br /&gt;कुठे जातात वेदना..&lt;br /&gt;दोन ठेंब दारुचे...&lt;br /&gt;चार नोटा गांधीच्या..&lt;br /&gt;बस.. दावादारु..&lt;br /&gt;दोन्ही हातात..&lt;br /&gt;&lt;br /&gt;वीराची वेदना..&lt;br /&gt;त्याच्या चार भींती..&lt;br /&gt;मध्ये अर्धांगणीच्या..&lt;br /&gt;पुसलेल्या कुंकु मध्ये..&lt;br /&gt;पोराच्या डोळ्यातील..&lt;br /&gt;सुकलेल्या आश्रुमध्ये..&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरोखर वेदना तीव्र आहेत..&lt;br /&gt;पाठ फिरवून वेदना&lt;br /&gt;लपवण्याची..&lt;br /&gt;सवय आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;चार तुकड्यासाठी..&lt;br /&gt;राबराब राबताना..&lt;br /&gt;कुठली वेदना..&lt;br /&gt;कुठले शल्य..&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिसली शहिद ज्योत..&lt;br /&gt;सलाम मारला..&lt;br /&gt;डोळ्याचे पाणी..&lt;br /&gt;आटलेलेच.. आता&lt;br /&gt;रक्त पण सुकलेलेच..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-1723577249569405247?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/1723577249569405247/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=1723577249569405247&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1723577249569405247'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1723577249569405247'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_7047.html' title='भावना तीव्र आहेत....'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7900347236688302798</id><published>2009-10-11T15:34:00.002+05:30</published><updated>2009-10-11T15:34:57.654+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='news'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे</title><content type='html'>३०० नक्षलवाद्यांचा जमावडा ..&lt;br /&gt;चार बाजूने हल्ला..&lt;br /&gt;मर्यादित शस्त्रसाठा...&lt;br /&gt;४० जणांच दल..&lt;br /&gt;अंधाधुंद गोळीबार...&lt;br /&gt;सगळेच जखमी...&lt;br /&gt;मदतीसाठी हाक...&lt;br /&gt;पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर..&lt;br /&gt;राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये..&lt;br /&gt;पाच तासाची तगमग...&lt;br /&gt;दलातले १७ जण ठार....&lt;br /&gt;चार हेलिकॉप्टर..&lt;br /&gt;आहेत म्हणे सेवेसाठी..&lt;br /&gt;सगळेच निकामी..&lt;br /&gt;१७ जीव गेले ...&lt;br /&gt;नेत्याची सभा पुर्ण झाली.. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पोरगं पडलं बोरवेल मध्ये ..&lt;br /&gt;मिडिया २४ तास जागी..&lt;br /&gt;मिलेट्री लावली...&lt;br /&gt;हेलिकॉप्टर ने मंत्री पोहचले..&lt;br /&gt;१७ जीव गेले..&lt;br /&gt;मिडिया ला बाईट ..&lt;br /&gt;नाही मिळाली..&lt;br /&gt;चार जाहिराती मध्ये..&lt;br /&gt;थोडी जागा वाचली..&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेत्याची सभा..&lt;br /&gt;राजनीती सर्वत्र...&lt;br /&gt;प्रत्येक स्टार नेत्यासाठी...&lt;br /&gt;हेलिकॉप्टर उभे खास..&lt;br /&gt;तडपडून १७ जीव पडले..&lt;br /&gt;मंत्री साहेब आले...&lt;br /&gt;हेलिकॉप्टरने खास..&lt;br /&gt;सलामी आखरी दिली..&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा देशाची सुरक्षा करण्या-या ह्या वीरांनाच आपण प्राथमिक सुविधा देऊ शकत नाही तेथे सामान्याची काय गत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा मित्र म्हणतो मला&lt;br /&gt;नेहमीच आपल्या DNA मध्येच लोच्या आहे... यार&lt;br /&gt;साला आपण आपल्या लोकांसाठीच करत नाही..&lt;br /&gt;राष्ट्रभक्ती नावाचा हिस्साच नाही आपल्यामध्ये..&lt;br /&gt;नेत्याचे पाय चाटण्यासाठी लाखो खर्च..&lt;br /&gt;एका १९४० मेड बंदुकीने लढण्या-या शिपाईसाठी..&lt;br /&gt;पैसाच नाही.. बुलेट फ्रुफ सोड..&lt;br /&gt;च्यामायला लाच फ्रुफ एक पण सिस्टम नाही !&lt;br /&gt;कश्याला रहावे ह्या देशात..&lt;br /&gt;जेथे आपल्या सैन्याचीच कदर नाही..&lt;br /&gt;करोडोंचे पुतळे स्वतःचे उभे करतात..&lt;br /&gt;पण पोलिसांसाठी थोडे चांगले...&lt;br /&gt;हत्यार आपण मागवत नाही..&lt;br /&gt;साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार&lt;br /&gt;माणसाच्या जिवनापेक्षा ..&lt;br /&gt;पशुच्याच जिवनाची काळजी जास्त आहे..&lt;br /&gt;कुत्र्यासाठी उपोषण करणारे खुप आहेत आपल्या येथे&lt;br /&gt;पण गेलेल्या जीवाचा जाब विचारणारी कोणीच नाही..&lt;br /&gt;बेक्रिंग न्युज खुप आहेत...&lt;br /&gt;तो दलिताच्या घरात जेवला&lt;br /&gt;तो खुर्चीवरुन पडला..&lt;br /&gt;ज्याच्या रक्ताचा सडा पडला..&lt;br /&gt;मातीसाठी..&lt;br /&gt;त्या मातीचा लाल रंग ह्या..&lt;br /&gt;कॅमेरावाल्यांना कधी दिसलाच नाही...&lt;br /&gt;साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार&lt;br /&gt;कधी दिवाळीला फुटतात फटाके..&lt;br /&gt;बझारामध्ये दिल्लीच्या..&lt;br /&gt;तर कधी सिरियल ब्लॉस्ट..&lt;br /&gt;कधी महानगरच वेठीस ठेवतात..&lt;br /&gt;चार कुत्री अधेमध्ये..&lt;br /&gt;लढण्यासाठी.. चार बंदुका..&lt;br /&gt;दोन कवच व बाकी...&lt;br /&gt;निधडी छाती उघडी वीरांची...&lt;br /&gt;लाकडाच्या काठ्या....&lt;br /&gt;मोजलेल्या चार गोळ्या.. ३०३ च्या&lt;br /&gt;करोडोचा निवडूणुक खर्च सगळ्यांचा..&lt;br /&gt;तो देशी तो परदेशी...&lt;br /&gt;ताकत सगळी तिकडे...&lt;br /&gt;सुतळी वरती...&lt;br /&gt;साप सोडला कधीच वा-यावरती...&lt;br /&gt;साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार&lt;br /&gt;ज्यांना मारायला आला तो भडवा..&lt;br /&gt;त्याचीच राखण करतात हे चोर..&lt;br /&gt;चार गोळ्या त्याच्या कमी पडल्या..&lt;br /&gt;चार मारु दिले असते नेते यार..&lt;br /&gt;मग संपवला असता त्याला तेथेच पार..&lt;br /&gt;मजा आली असती.. चार शहीद पुतळ्यांची भर..&lt;br /&gt;चार माजोरड्या लांडग्यांची गिनती कमी..&lt;br /&gt;फाशी देऊन पण झाली वर्ष अनेक..&lt;br /&gt;चिकन बिर्याणी तोडतो आहे..&lt;br /&gt;त्याचा यार...&lt;br /&gt;साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7900347236688302798?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7900347236688302798/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7900347236688302798&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7900347236688302798'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7900347236688302798'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/dna.html' title='साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-4249213434034877004</id><published>2009-10-11T10:49:00.000+05:30</published><updated>2009-10-11T10:50:28.272+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४</title><content type='html'>काल जे शर्माजींनी सांगितले होते ते खरे आहे का ? ह प्रश्नच मला टोचत होता, मी विचार केला की खरं खोटे आपण स्वत:च शोधायचे व त्या तयारीला लागलो, दुपारी कामावरुन आल्या आल्या प्रथम कुच केली ती त्या रोडवरील माझ्या माहीतीच्या पण तेथे पुर्वीपासून राहत असलेल्या रामावतार कांका कडे मी नमस्कार करुन त्यांच्या सोबत बोलत बसलो व गल्ली ते दिल्ली ह्या सर्व विषयांवर बोलून झाल्यावर मी मुळ मुद्द्यावर हात घातला,"काका, आप यहा शर्माजीं को कबसे जानते हो ?" काका " अरे अपने शर्माजी जो तुम्हारे साथ रहते है वहीं ना, उन्हे तो मै काफी अरसे से जाणता हूं ... कम से कम १० साल से, क्यूं क्या बात है ? कोई परेशानी है क्या उन्ह से ? अरे उन्ह की किसी भी बात का बुरा मत मान ना बेचारा सरल आदमी है, बस किस्मत का मारा है, नहीं तो यह भी आज संघटन मैं काफी उप्पर तक पोहच जाता" माझा विश्वास पक्का झाला व मी त्यांना अजून खोदुन विचारले की " क्या हूआ उन्ह के साथ ?"&lt;br /&gt;काका " कुछ नहीं बेटा यह सब सत्ता तथा अधिकार की माया है बाकी कुछ नहीं, कुछ साल पहले यह कुमाऊं से यहा आया था, बडे बडे विचार तथा सपने मन में रखकर, खुद एक पेशे से शिक्षक था यह यही एक स्कुल में बच्चों को पढाता था, लेकिन एक दिन एक नेता की बातो में आ गया , तथा काम छोड के उस के आगे पीछे घुम ने लगा पर यह था होशियार इस कारण जल्दी ही ऊसने अपनी जगह बना ली थी, पर यहा प्रांत के कुछ लोगों कों यह रास नहीं आया तथा झुठेमुठे किस्से संघटन में इसके नाम से फैला दिए तथा एक दिन तो कुछ लोगोंने उसे पिटा भी. तब कही जा कर यह संघटन से बाहर हो गया खुद ही, यह तो अपने गांव वापस जाना चाहता था उसी समय पर राजींव जीं के गुरू तथा भाई प्रेमप्रकाश जीं ने उन्हे जाने नही दिया तथा उसे आगे कुछ काम देने का वादा कर कर अपने साथ यही धर्मशाले में जगह दी, पिछले ५ सालों में ना उसे काम दिया ना उसकी कोई सुध ली... दो टाईम का भोजन यही धर्मशाला में मिलता ही था तथा एक दिन उसकी बुढीं मां भी चल बसी वहा गांव मैं तो यह रह गया अकेला ब्रम्हचारी बनकर अपना जिवन निठ्ठलो कि तरह निकाल रहा है बचे हूंये जिंदगी के पल. अभी कुछ दिन पहले ही बता रहा था उसे यकीन ही नही तो विश्वास अभी है की प्रेमप्रकाश ही वह व्यक्ती था जीसने उसे पिटवाया तथा संघटन से बाहर करवा दिया... मुझे तो विश्वास था ही मै उसे भी अच्छी तरह जान ता हूं थोडा लालची किस्म का आदमी है यह प्रेमप्रकाश... पर बेटे तुम्हारा काम कैसा चल रहा है ? तनख्वा तो समय पर मिल रही है ना ?" मी म्हणालो हो सगळ व्यवस्थीत आहे, व तिथून बाहेर पडलो, व हरिद्वार ला आल्या पासून आज पर्यंत च्या घडामोडी वर पुन्हा पुन्हा विचार केला व संघटनेत माझी ओळख करुन देताना राजीव जीं तथा इतर व्यक्तीनीं केलेली माझी स्तुती मी जरा वेगळ्याच नजरे ने पाहण्याचा प्रयत्न केला व एक निश्चय करुन घरी परतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडी जास्त नसली तरी आनंद व माझी बोलचाल बंदच होती कधी कधीच एकमेकांशी बोलत असू पण ह्यावेळी मी स्वत: आनंद जवळ जाऊन क्षमा मागीतली व त्यांच्या संगे नेहमीच्या पध्दतीने बोलणी चालू केली व काही दिवसामध्येच तो ही पुर्वी प्रमाणे हसत-खेळत माझ्याशी राहू लागला व माझ्या बरोबर पुन्हा गंगेच्या किनारी येऊन तास तास भर बसू लागला त्याच वेळी मी त्याच्या बद्दलची माहीती त्याच्या कडुन काढून घेतली व कथा थोडीफार तशीच होती जी स्वप्ने शर्माजी तथा मला दाखवली गेली होती तीच स्वप्ने तो देखील आपल्या उराशी बाळगून बसला होता, तेव्हा मात्र मी पुन्हा पुन्हा विचार करु लागलो की काय करावे ? रस्ता शोधणे खुप गरजेचे व निकडीचे झाले होते मला माझे जिवन अश्या या धर्मशाळेत अथवा कोणाची जी हूजूरी करत घालवायचे नव्हतेच तेव्हा मी ठरवले की कामावर गेल्यानंतर ह्यांचा काय तो निकाल लावायचाच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कामावर पोहचल्या पोहचल्या मी सर्व प्रथम जो व्यक्ती मला भेटण्यासाठी योग्य वाटला तो म्हणजे आमचे अकांन्टट श्री. जगराम सिंग जी त्यांना जाउन मी माझ्या हिशोबा बद्दल विचारले, माझा पगार हा कोणाच्या मार्फत राजीवजींच्या जवळ जातो व किती ? आता मात्र मला चक्कर येण्याचीच वेळ आली होती... कारण माझ्या हिशोबाने माझा पगार हा १८००.०० रु होता व तो नेहमी मला राजीवजींच्या मार्फत मीळत होता पण येथे तर मोठेच लफडे चालू होते.... माझा पगार हा कार्यालयातून आनंद मार्फत राजीवजींना मिळायचा ३८००.०० रु. व माझ्या हाती यायचे फक्त हजार रुपये तथा राजीवजी म्हणायचे की तुझे आठशे रु. हे माझ्या कडे जमा राहतील ज्यावेळी तुला गरज लागेल तेव्हा तु परत घे... झाले मी मात्र तेथेच मटकन बसलो व म्हणालो धोका, असला कसला हा धोका छे कोणावर भरोसा करुन फायदा नाही एकतर पुर्ण पगार नाही जे मीळत होता त्यातील देखील अर्धे हाती.... नकोच आज काहीतरी फायनल करुच. त्याच क्षणी परत हरिद्वारच्या बस मध्ये बसलो व तडक शर्माजींच्या जवळ गेलो व सर्व कहानी-कथा त्यांना सांगितली डोळ्यातून रागाने पाणी वाहू लागले होते व शर्माजी मला समजावून सांगत होते की अजून काही फरक नाही पडला आपला रस्ता बघ .. नवीन मार्ग शोध काही जास्त नुकसान झाले नाही उलट तु येथेच येऊन काही ना काही शिकला आहेस, माझ्या ही डोक्यात ही गोष्ट व्यवस्थीत बसली की चल काही हरकत नाही आपण मार्ग काढूच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शर्माजीं आपल्यापरीने माझ्या साठी काही मार्ग निघतो का हे शोधत होते व एक दिवस त्यांनी मला सांगितले की जर तु दिल्ली ला गेलास तर काहीतरी तुझी व्यवस्था होईल बघ प्रयत्न करुन तेथील कार्यालयातील एका व्यक्तीचे नाव व पत्ता त्यांनी एका कागदावर लिहून दिले व म्हणाले बघ कधी जातोस ते. मी दिल्ली येथे जाण्याचा मार्ग शोधू लागलो पण काहीच कल्पना येत नव्हती की दिल्ली ला जाणार आहे हे राजीव जींना सांगावे की न सांगाता जावे ? विचार करुन करुन डोके पकले होते, रात्र रात्र भर जागे राहून मी विचार करायचो की कसे येथून बाहेर पडावे, काय मार्ग शोधावा.... व एक दिवस मी मनाचा पक्का इरादा करुन राजीव जीं समोर गेलो व म्हणालो " राजीव जीं, मै थोडा दिल्ली जाके आना चाहता हूं, वहा मेरे प्रांत के कुछ लोग रहते है उन्हे मिल के वापस आना चाहता हूं अगर आप जाने की इजाजत दे तो" राजीव जीं नी थोडा फार विचार केला व म्हणाले " ठीक है लेकिन वापस जल्दी आना नही तो काम पें बुरा असर पडेगा ठीक है, आनंद इसे कुछ रुपये दे दो "&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन हजार रुपये व आपले सर्व कपडे घेउन मी शर्माजींच्या जवळ गेलो व त्यांना नमस्कार करुन म्हणलो " मैं जा रहा हूं शर्माजी आपने जो सहयोग तथा प्यार दिया उसके लिए मै पुरी जिंदगी आपका अहसानमंद रहूंगा" असे म्हणून मी लगेच तेथून बाहेर पडलो व बिर्ला मंदिर तथा गीता भवन वर जाऊन देवाचे दर्शन घेतले व गंगेचे पाणी डोक्याला लावून तडक रेल्वे स्टेशन वर जाऊन गाडीची वाट पाहू लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिल्ली .... बाप रे देशाची राजधानी दिल्ली.... प्रचंड मोठे शहर व शहराचे नाव सोडले तर मला काहीच माहीत नाही नव्हते की कुठे उतरावे कुठे जावे व काय करावे ? शर्माजींनी जो पत्ता दिला होता तो मी जवळ जवळ पाठ करुन ठेवला होता, सकाळी सकाळी दिल्ली रेल्वे स्टेशन ला मी जेव्हा उतरलो तेव्हा मात्र मनाची धाक धूक वाढलीच होती मी एकटा ज्याच्या भरोश्यावर येथे आलो आहे त्याला कधी जिवनामध्ये देखील पाहीले नव्हते त्याला काय सांगायचे व कसे करायचे ह्याचाच विचार करत मी रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो व एका माणसाला विचार ले "भाई यह रोहीणी कहा है ? " तो मला म्हणाला " रिक्षावाले से पुछ" मी तडक एक रिक्षावाला पकडला व विचारले " भाई साब, यह रोहीणी कितनी दुर है ? " तो म्हणाला " अरे पास ही है, बोला कहां छोड दु" कोल्हापूर नंतर रिक्षात बसण्याचा हा माझा पहिला योग मी म्हणालो चल जवळच आहे म्हणतो आहे त जास्तीत जास्त ३०-४० रु घेईल व जाऊन रिक्षात बसलो, २ तासानंतर रिक्षा त्यांने एका रस्ताच्या बाजूला उभी करुन तो म्हणाला " हां भाई रोहीणी तो आगयी अब बता किस गली मकान मैं जाना है ? " मी त्याला थोडी फार माहीती दिल्यावर त्यांने त्या घरासमोर मला उभे केले व म्हणाला " हा भाई उतरो अब ३५०.०० रु. दो" मला चक्कर च आली व थोडे बहोत त्याच्याशी भांडलो देखील व आसपासच्या लोकांना बोलवून मी थोडा फार दंगा देखील केला तेव्हा मात्र तो रिक्षावाला नरमला व २५०.०० रु. वर तडजोड करुन निघून गेला., पण मला हा २५०.०० रु. फटका खुप मोठा पडला होता. मी घराची बेल जावली तर थोड्या वेळाने एक मुलाने दरवाजा उघडला व त्याच्या पाठोपाठ त्यांचे वडीले देखील बाहेर आले, मी त्यांना नमस्कार केला व विचारले की " पं. हरीकृष्णजी से मिलना था क्या वह घर पे है ? " ती व्यक्ती मला म्हणाली " भाई, यहा तो हरीकृष्णजी तो अब नही रहते कुछ साल पहले ही वह अपना यह मकान मुझे बेचकर कही मैहरोली रोड पे रहने चले गये है" माझ्या पायाखालची जमीनच खसकली व मी त्यांना पुन्हा विचारले " भाईसाब, क्या आप के पास उन्ह का पुरा पत्ता या फोन नंबर है, मेरा उन्हसे मिलना बहोत जरुरी है " पण हाय देवा ह्याच्या कडे त्यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हती पण एक मात्र गोष्ट त्यांने माझ्या कामाची सांगितली की ते सकाळ सकाळी मैहरोली रोड वरील कत्यानी मंदिरामध्ये जरुर येतात, मी त्यांचे आभार मानून मैहरोली जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो, थोड्यावेळाने कळाले की येथून प्रथम नेहरु प्लेस किंवा करोलबाग ला जावे लागेल व तेथून मैहरोली ला बस मिळेल. मी तडक करोलबाग बस मध्ये बसून मैहरोलीच्या रस्तावर आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-4249213434034877004?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/4249213434034877004/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=4249213434034877004&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4249213434034877004'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4249213434034877004'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_11.html' title='माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7347200956998197413</id><published>2009-10-06T08:38:00.000+05:30</published><updated>2009-10-06T08:39:08.982+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३</title><content type='html'>त्यानंतर मी व राजीव जी काही दिवसानंतर त्यांच्या हरिद्वार कार्यालयात आलो, व तेथे माझी राहण्याची व खाण्य़ापीण्याची व्यवस्था केली गेली तेथे माझ्या सम-वयाचा एक मुलगा "आनंद" तथा माझ्या पेक्षा वयाने कमीत कमी २० वर्षे मोठे शर्माजी होते, ह्यांचे नाव कधी विचारलेच नाही कारण सर्वजण त्यांना शर्माजी म्हणत व मी देखील त्या सर्वांसोबत त्यांना शर्माजींच म्हणू लागलो, हर की पॊडी पासून १ किंमी च्या अंतरावरच आमची धर्म शाळा होती व समोर च्या घरांची व दुकानांच्या ओळी मागे गंगा नदी वाहत होती, काही आठवडे तर मला हे देखील माहीत नव्हते कि आम्ही जे पाणी अंघोळी साठी व पीण्यासाठी वापरतो ते गंगेचे पाणी आहे जे पाणी शेकडो , लाखो नाही नाही करोडो लोक आपल्या जिवनाच्या शेवटच्या क्षणी उपयोगी पडावे म्हणून लहान लहान चंबूतून कोणी बाटल्यामधून आपल्या घरी ठेवतात, काय योगायोग असतो एकाच्या जिवनामध्ये नाही... लहान पणी आजोबा म्हणायचे की तु कुलदिपक, घराण्यातला एकुलता एक मुलगा.. तुच शेवटी गंगेचे पाणी माझ्या तोंडी खालशील. त्यांची ईच्छातर पुर्ण झाली नाही पण दिवसाचे २४ तास मी मात्र गंगेच्या सानिध्यात राहत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आनंद व माझी सुरवातीलाच चांगली मैत्री बनली व तो माझ्या बरोबर कधी गंगेच्या तीरावर तर कधी बिर्ला मंदिरामध्ये... तर कधी वेळ मिळालाच तर लक्ष्मण झुल्यावर फिरु लागला, शर्माजी व माझी आध्यात्मिक जोडी छान जमली व तेथेच पहील्यादां रामायण ही वाचले व महाभारत ही , तसेच अनेक.. कथा त्यांच्या सोबत वाचल्या, राजीव जी संस्थे मध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या आज ईकडे उद्या तिकडे अशा वा-या चालतच असत, माझा हरिद्वारचा स्नेह बंध असा बांधला गेलाच होता पण त्यावर मानाचा तुरा खोवला तो राजीव जींनी एक दिवस एक बातमी घेऊनच ते कार्यालयात आले व मला बोलवले " राज, कल से तु अपने एक स्नेही श्री निरंजन जैन जी के यहां जायोगे तथा उन का एक कॊलेज है यहा रुडकी में तुम वहा काम करना ठीक है कल मैं तुम्हे एक पत्र के साथ वहा भेजूंगा लेकिन सुबह जल्दी जाना होगा करीब ६.०० बजे तुम्हे वह अपने कार्यालय में मिलेंगे." वाह माझ्या तोंडातून दुसरे काहीच बाहेर पडले नाही व मी सकाळ सकाळी तयार होऊन जैन साहबांच्या कार्यालयात ५.५० लाच पोहचलो व त्यांचा फायदा देखील मला त्याच वेळी झाला व त्यांना माझ्या वेळेत कामावर येण्याबद्दल सागण्याची गरजच राहीली नाही. मी तेथे काम करु लागलो प्रथम प्रथम कार्यालयातीलच छोटे छोटे काम मला दिले गेले जसा एक चपराशी पण मी काही कुरकुर न करता काम करु लागलो दिवसामागून दिवस जात होते अशीच चार महिने गेली एक दिवस मी थोडा वेळ मोकळा होता म्हणून कार्यालयातल्याच संगणकावर बसून गेम खेळू लागलो कसा वेळ गेला कळालेच नाही पण त्याच वेळी जैन साहेब हे माझ्या पाठीमागे उभे राहीले होते, त्यांनी माझी गेम संपल्यावर मी जसा उठलो तसेच ते बोलले " राज जैन, आप मेरे साथ थोडी देर बात करोगें अभी" त्यांचा दरारा मला माहीतच होता मी नखशिखांत हादरलो होतो दरदरुन घाम फुटला होता व मी विचार करतो होतो आता काय उत्तर द्यायचे ह्यांना व नंतर काय सांगायचे राजीव जींना ज्यांनी आपला शब्द टाकून मला येथे कामावर लागले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जैन साहेब " तुम्हे यह पीसी चला ना कबसे आता है ? "&lt;br /&gt;मी : " जादा कुछ नही आता सर, पहले मै एक सेंटर चला ता था तब थोडा बहोत सिखाता पर उसे भी अब दो साल हो चूके है सिर्फ कभी कभी गेम खेलता था यही पर"&lt;br /&gt;जैन साहेब : " ठीक है, कम से कम तुम्हे यह तो मालूम है ना की पीसी क्या होता है तथा काम कैसे करता है. तो कल से तुम अरविंद वर्माजी के साथ काम करोगे तथा computer Lab का रख्रखाव देखोगे" मी ठीक आहे म्हटलं व दुस-या दिवसापासून नवीन कामाला सुरवात देखील केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरविंद वर्मा एक गुणी व अत्यंत आनंदी असणारा माणूस ह्याला हसण्यासाठी काही कारणाची गरज देखील लागत नसे व स्वभाव एकदम गरिब त्यामुळे त्यांची व माझी जोडी एकदमच मस्त जमली व त्यांनी मला संगणक व संगणकाचे काम ह्या बद्दल माहीती देण्यास सुरवात केली पहिल्या महिन्यात खुपच अवघड गेले कारण एक तर हिंदी व English दोन्ही बाजू माझ्या कुमकुवत होत्या व संगणकात ह्या शिवाय काहीच चालणार नव्हते तेव्हा मात्र गोची झाली मग मात्र अरविंद सरांनी माझी रोजच्या रोज इंग्रजी तथा हिंदीचा क्लास चालू केला रोज अर्धा एक तास ते मला दोन्ही भाषेतील महत्वाचे व रोज उपयोगी पडणारे शब्द तथा वाक्य शिकवू लागले व त्याच बरोबर मी त्यांच्या मदतीने संगणकावर हात फिरवू लागलो व काही दिवसामध्येच मी पत्रे प्रिंन्ट करणे व खर्चाच्या नोंदी ठेवण्यासारखे काम करु लागलो, त्यांना त्यांनी मला नवनवीन प्रणाली देखील संगणकावर वापरणे शिकवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसामागून दिवस जात होते व मला हरिद्वार येथे येऊन ५-६ महिने झाले होते पण पगार अजून फिक्स झाला नव्हता व जो रोज खर्च मिळत होता तो राजीव जींकडून मिळत होता तेव्हा मी एकदा राजीव जींना ह्या बद्दल विचारले तर त्यांनी काळजी करु नकोस असे सांगितले, काही दिवसानंतर मात्र त्यांनी मला बातमी दिली की तुझा पगार हा १८००.०० रु. आहे व तो मला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळणार होता. मी खुपच आनंदलो आता येथे काम करण्याला एक सकारात्मक परिणाम मला भेटला होता व मी जीव तोडून संगणकाचे शिक्षण नेटाने चालू ठेवले, कधी कधी कार्यालयीन काम संपल्यावर देखील मी संगणकावर बसून असे तेव्हा ही बातमी चपराशीच्या मार्फत जैन साहबांना कळाली व त्यांनी अरविंदकडे ह्या विषयी विचार ना केली की कार्यालय बंद झाले असताना देखील राज कोणाच्या परवानगीने कार्यालयात उशिरापर्यंत थांबत आहे ? तेव्हा अरविंद सरांनी खुप प्रयत्न करुन माझी शिकण्याची ईच्छा व माझा पुढे संस्थेला होणारा फायदा ह्याबदल जैन साहबांना सांगितले तेव्हा मात्र मला एकदम कायदेशीर परवानगी मिळाली उशिरापर्यंत काम करण्याची तथा माझ्या साठी ग्रंथालय व संगणक खोली ही मी जाऊ पर्यंत खुल्ली ठेवण्याची परवानगी तसेच जाताना सर्व दरवाजे व खिडक्या बंद आहेत ह्याची खात्री करुन जाण्याची अट घातली गेली, ह्या सगळ्या गोष्टी बस मधून जाताना अरविंद सरांनी सागितल्या व माझ्याकडुन २००.०० रु. मागितले व म्हणाले " मै आप को कुछ जरुरी किताबे तथा सीडी ला के देता हूं जिसकी मदत से आप अपना काम जल्दी सिख सकोगे. " मी त्यांना सांगितले की मला पैसे राजीव जी कडे मागावे लागतील व मी ते शक्यतो उद्या देऊ शकेन व तो विषय तेथेच संपला पण मी घरी पोहचू पर्यंत विचार करत होतो की कुठल्या तोंडाने राजीव जींकडे पैसे मागू माझे राहणे , खाने, गाडी खर्च तर तेच देत होते व त्यांच्यावर आणखी किती ओझे टाकायचे ? मी विचार करता करता घरी पोहचलो व शर्माजींना माझी अडचण सांगितली तेव्हा मी शर्माजींना एक पार्ट-टाईम काम माझ्या साठी पाहण्याची विनंती करुन मी गंगे किनारी जाऊन बसलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या जवळच एक सज्जन व्यक्ती बसले होते व ते काहीतरी श्लोक तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते व मला ते श्लोक कुठेतरी वाचल्या सारखे अथवा कानावरुन गेल्या सारखे वाटले व मी त्याची पुजा संपल्यावर त्यांना त्या श्लोकासंबधी माहीती विचारली, ते एकदम खुश होऊन म्हणाले " अरे भाई यह श्लोक तो भगवत गीता अध्याय में से है " व त्यांनंतर माझ्याशी गप्पा मारता मारता ते म्हणाले " देखो वहां जो बिर्ला मंदिर है ना उसके पिछे ही गीता भवन है तुम्ह वहा आ जाना सुबह या शाम को, बहोत सारे भक्त आते है तथा भक्ती में गाते रहते है तुम्हे भी आनंद मिलेगा" मी म्हणालो " ठिक है, वैसे भी मै काम से ५.०० बजे तक फ्री हो जाता हूं मै अवश्य आ जाऊंगा"&lt;br /&gt;मी तेथेच थॊडा वेळ बसलो व नंतर बिर्ला मंदिरात जाऊन बसलो हे जे बिर्ला मंदिर होते ते एक नितांत सुंदर मंदिर होते व ६ फूट मंदिर हे गंगेमध्ये होते, मला येथे खुप शांती मिळायची व मी विचार करायचो की बिर्ला जींनी हे मंदिर उभे करताना काय विचार केला असे व त्यांनी इतके पैसे मंदिरांसाठी का लावले असतील तर त्यांचे उत्तर मला तेथेच बसल्या बसल्या मिळायचे की मनाची शांती त्यासाठी मंदिर उभे करण्याचा खर्च काहीच नसेल त्यांच्यासाठी.&lt;br /&gt;* हेच ते बिर्ला मंदिर जो भाग पाण्यामध्ये आहे तेथे बसण्याची व जाप करण्याची सुविधा आहे .&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी जरा वेळानेच ६.०० वाजता मी गीता भवन मध्ये गेलो व तेथे त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करु लागलो तर ती व्यक्तीच समोर आली व म्हणाली " आजा बेटे, देखो आज सारे लोग यहा समय पर आ गए है तुम्हारी ही कमी मुझे लग रही थी, जा ओ पहले मुरारी जीं के दर्शन कर के आ जाओ हम आज भजन यही बैठके करेंगे" मी मंदिरामध्ये जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व परत त्यांच्या बैठकीत आलो तर तेथे माझी ओळख करुन दिली व माझी देखील मी ओळख करुन दिली. काही काळ जवळ जवळ एक तास-दिड तासानंतर मी परवानगी घेऊन बाहेर आलो व माझ्या पाठीमागेच एक व्यक्ती बाहेर आला व म्हणाला " भाई, जरा सुनना मै रवी मुनराल हूं यही रहता हूं तथा मेरी छोटीसी दुकान है यही रोड पे आगे चल के, अभी तुम बता रहे थे की तुम कॊम्पूटर के जाणकार हो तथा तुम्हारे पास शाम का समय फ्री रहता है ? " मी म्हणालो " नहीं टाईम तो फ्री है लेकिन दुकान का अथवा आपके हिसाब किताब का काम नही देख सकता इतना भी मुझे अभी आता नही है" व मी त्यांच्या कडे पाहू लागलो व मनात विचार केला बघ लेका कसे लगेच लक्षात आले माझ्या की तू कामासाठीच विचारणार आहेस ते. पण तो विचार मनात येतो तोच ती व्यक्ती परत म्हणाली " नहीं नही मुझे दुकान के काम के लीए नही चाहीए आपका समय, मेरा एक बेटा है उसे मे सिखा ना चाहता हूं, तथा यहा आसपास कोई है नही सिखाने वाला मै दिल्ली से क कॊम्पूटर ले के घर में रखा है लेकिन उसे सिखा नही सकता मैं अगर आप अपना थोडा समय देतो वह भी कुछ सिख जाएंगा" मी त्यांना म्हणालो राजीव जींना विचारुन सांगतो व मी तडक आपल्या घराकडे निघालो तर वाटेत शर्माजी तथा राजीवजी भेटले व ते मलाच शोधत होते कासावीस होऊन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजीव जी " राज यह कोई तरीका है तुम पिछले चार घंटे से गायब हो किसी को अत्ता पता नहीं की कहा चले गये हो, हम तो परेशान हो गये थे, उस अरविंद का फोन आया था कि तूम पैसे को लेकर चिंतीत हो, तभी शर्माजी भी कह पडे की हा तुम परेशान हो हम ने सोचा की तुमने कही.... नहीं भगवान का लाख लाख शुक्र है की तुम सही सलाम हो कहा गये थे ? "&lt;br /&gt;मला माहीतच नव्हते की माझ्यासाठी इतका गोंधळ तेथे कार्यलयात व घरामध्ये चालला आहे की ह्यांनी विचार केला की मी जीवाचे काही बरे वाइट करुन घेतले असावे व त्याच शंकेने ते गंगेचा तीरावर मला शोधण्यासाठी निघाले होते. मला हसू आवरले नाही व मी म्हणालो " राजीवजी मै आप को जान देने वालों में से लगता हूं क्या ? मै तो प्रथम बिर्ला मंदिर बाद में गंगा के किनारे तथा आखिर मैं गीता मंदिर चला गया था भजन करने... नहीं सुनने" त्या नंतर राजीव जीं शी मी रवी मुनराल ह्यांच्या विषयी सांगीतले तर ते लगेच म्हणाले " बेटा, जाना तुम्ह उनके पास अच्छे लोग है तथा तु किसी को सिखा दोगे तो तुम्हारे लिये भी अच्छा रहेगा तुम्हारा अभ्यास होता रहेगा ठीक है ना ? " मी त्यांना हो म्हणालो व आपल्या खोलीत जाऊन बसलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज आनंदचा मुड खराब दिसत होता व तो राजीवजीं काही बोलत होते व मला असे वाटले की माझा विषय चालू आहे बाहेर म्हणून मी लगेच बाहेर आलो तर राजीव जीं आनंदला सांगत होते की " मै राज से बात करता हूं" व मी त्यांना विचार ले की काय झाले ? तर राजीव जींनी आनंदला बाहेर जाण्यासाठी सांगितले व मला आपल्या जवळ बसवून म्हणाले " बेटा, देखो यह आनंद भी तुम्हारे ही साथ का है वह हम सब के लिए खाना बनाता है, चाय बनाता है तुम भी कभी कभी समय मिले तो उसकी मदत किया करो वह यहि तो कह रहा था ओर कुछ नही, बस थोडासा काम बाटलो उसे भी सकुन मिलेगा व तुम्हे भी. क्या कहते हो ?" मी विचारातच पडलो म्हणालो " राजीव जी, अगर यहि बात थी तो वह मुझे भी तो कह सकता था, मै तो सुबह का अपना खाना खुद बना ता हूं तो शाम को भी मै उसकी मदत कर सकता हूं कोई बडी बात नहीं थी इसमें की आप को बताया जाये" व आनंद व माझ्यामध्ये पहीली धुसपुस येथे मी संपुष्टात आणली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रोज सकाळी पाच वाजता उठून सकाळ सकाळी गंगेच्या बर्फासारख्या पाण्याने आंघोळ आवरुन , स्वत:चे जेवण व डब्बा तयार करुन मी ७.०० वाजता विध्यालयात पोहचत असे व दुपारी १.०० वाजता सुट्टी झाली की दोन तास संगणकावर प्रयोग करुन मी ३.०० / ३.३० च्या सुमारास घरी परतत असे व नंतर एक तास भर रवी जीच्या मुलाला संगणक शिकवत असे, व संध्याकाळी कधी बिर्ला मंदिर तर कधी हर की पैंडी तर कधी गीता मंदिर तास भर बसून येत असे व रात्री ८.३० च्या सुमारास आनंदला जेवण बनवण्यासाठी मदत करित असे.. असे एक दमच सुरळीत जिवन माझे चालू होते व असेच कधी वर्ष निघून गेले हेच कळाले नाही, व अचानक एक दिवस शर्माजी व मी बोलत असताना मला शर्माजी जींनी स्वत: बद्दल माहीती दिली जी मला आज पर्यंत त्यांनी सांगितली नव्हती तेव्हा मात्र मी विचार मग्न झालो वर रात्री झोपताना त्या बद्दल विचार करु लागलो की काय करावे ? व कसे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7347200956998197413?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7347200956998197413/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7347200956998197413&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7347200956998197413'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7347200956998197413'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post_06.html' title='माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-3128208598063493639</id><published>2009-10-02T09:58:00.001+05:30</published><updated>2009-10-02T09:58:51.292+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२</title><content type='html'>थोडी शोधा शोध केल्यावर विश्व हिंदू परिषद चे कार्यालय भेटले पण तेथे राजीव जी नव्हते अचानक कोणीतरी महत्वाचा व्यक्ती कानपुर येथे आलेला होता व त्याच्या बरोबर ते कानपुर ला कार्यशाळा घेत होते, माझे मन जरा घाबरलेच अरे यार आता काय करावे ? दुर-याला स्वत:ची अडचण सांगणे माझा स्वभाव नव्हताच त्यामुळे काही न बोलता बाहेर आलो मी मनात म्हटलं चला काही तरी देवाच्या मनात वेगळेच आहे जे होत आहे त्याला हो म्हण. ईकडे तीकडे जरा फिरण्याचा विचार करुन थोडे अयोध्या दर्शन घेण्याचे ठरवले व त्या नूसार राम मंदीराकडे निघालो, तेथे पोहचताच माझ्या एका विशाल व भव्य मंदीराची कल्पनाच अस्त-व्यस्त झाली, व चारी बाजूला पोलिसांचा गरडा, सैनिकांची धावपळ व मधोमध श्री राम मंदिर विराजमान. दर्शन झाले न झाले सगळच ठीक होते पोलिस कोणाला जाऊच देत नव्हते, तेव्हा पाच कोसाची प्रदिक्षणा पुर्ण केली व अयोध्या येथे स्थित जैन मंदिरांकडे मोर्चा वळवला. अयोध्या येथे ५ जैन तिर्थंकरांनी जन्म घेतला असे मी वाचून होतोच त्यानूसार सर्व प्रथम नेमीनाथ जैन मंदिराकडे गेलो व जाताच पहीला प्रश्न जो मला कधीच अपेक्षीत नव्हता, गेटवरच एक महाशय भेटले " अरे अंदर कहा जा रहे हो ? कोण हो ? कहा से आए ? काय काम है ? किस से मिलना है ? " मी चकित अरे मंदिरामध्ये लोक का जातात ? मी उत्तर दिली " मै राज जैन हूं कोल्हापूर से हूं, भगवान जी के दर्शन करने है " एवढ्यावर त्या बिचा-या व्यक्तीचे समाधान झाले नाही व व तो म्हणाला " अच्छा जैन हो, चलो नमोकार मंत्र तथा दर्शन मात्रे गा के दिखा " आता मात्र माझे डोके गरम झाले व त्याला मी म्हणालो " यह देखो साब, नमोकार मंत्र हो गा सकता हूं पर दर्शन मात्रे का एक भी मंत्र आरती याद नही है ... ना मै यह समजता हूं की इसकी कोई जरुरत है ? भारतीय कानून के मुताबीक कोई भी अंदर जा सकता है.. तथा मै तो खुद पैदायशी जैन हूं" आप मुझे महाराष्ट्र के किसी भी जैन महाराज या मंदिर के बारे मैं पुछ सकते हो" झाले इतके बोलल्यावर तो भडकलाच व मला धक्के मारुन मुख्य गेटच्या बाहेर उभे केले व म्हणाला "जा , अपने कानून के पास" अंहिंसेच्या देवाची पुजा करणा-या व्यक्तीने धक्के / मारामारी करत मला बाहेर काढले. मी विचार केला अरे बापरे मी तर हिंदू आहे तर हा माझा हाल जर चुकून कोणी मुसलमान वैगरा मंदिरामध्ये दर्शनासाठी आला तर त्याला हे लोक त्याला कापूनच काढतील. ह्या प्रकारानंतर ईतर जैन मंदिरांकडे जाण्याचा माझा विचार देखील रद्द झाला व मी आपला परत रेल्वे स्टेशन जवळ आलो तर कळाले की संध्याकाळी ७.०० वाजता रेल्वे आहे तेव्हा थोडाफार टाईम पास केला व रेल्वेची वाट पाहू लागलो, कधी नाही ते रेल्वे एकदम वेळे वर ७.५० वाजता आली व मी धावपळ करुन जनरल डब्ब्यात चडलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कानपुर मध्ये रात्री १२.०० / १.०० च्या दरमान पोहचलो व जो पत्ता अयोध्या येथे सांगितला होता तो विश्व हिंदू परिषद, लाल मंदिर मैदान, कानपूर बस इतकाच होता, एक दोन रिक्षा वाल्यांना विचारले तर कोणी २०.०० रुपये तर कोणी २५.०० रुपये मागीतले , खिश्यात तर फक्त पन्नास रुपये राहीले होते व मला जेवण ही करायचे होते तेव्हा रिक्षाने जाण्याचा विचार टाळला, व पायीच निघालो, २ / ३ किलोमीटर चालल्यावर समोर सर्कल मध्ये एक पोलिस गाडी व काही पोलिस उभे दिसले जिवनात कधीच चुकीचे काम {पोलिसांच्या हाती पडण्या ईतके}&lt;br /&gt;केले नव्हते त्यामुळे भिती ही वाटली नाही व मी सरळ त्यांच्या जवळ गेलो पोलिसांच्या गाडी वर लिहले होते "आपके लिए, आप के साथ, हमेशा" मी थोडेस धाडस केले व त्यांना पत्ता विचार ला झाले पोलिसांना दोन तासासाठी मी टाईमपास ठरलो ,&lt;br /&gt;पोलिस : " कहा से आया बे ?"&lt;br /&gt;मी : "हूं तो कोल्हापुर महाराष्ट्र का पर अभी अयोध्या से आया हूं"&lt;br /&gt;पोलिस : " यहा क्या करने आया बे ? तुम्हारे ईस थैले में क्या है? दिखा जल्दी, साले कही असला {दारु-गोळा} तो पार्सल नही कर रहा हैं ना ? "&lt;br /&gt;मी जाम घाबरलो मी म्हणालो "नाही नाही देखो कुछ भी नही है मेरे थैले में "&lt;br /&gt;थोडे फार शोधा शोध करुन {केल्याचे नाटक करुन} मला तो म्हणाला " देख अभी तो मै तुम्हे जाने नही दे सकता साब आने दे फिर देखेंगे"&lt;br /&gt;मी तेथेच शेकोटी समोर बसलो व विचार करु लागलो की पुढे काय ?&lt;br /&gt;तासाभराने त्यांचे साब आले व थोडी फार तीच कथा पुढे करित माझे कपडे व माझी त्यांच्या भाषेत तलाशी घेतली व मला पुढे जाण्याचा रस्ता सांगून जाऊ दिले. मी हुश करु लाल मंदिराजवळ पोहचलो तर कार्यालयामध्ये सर्वजन झोपले होते तेव्हा मी तेथेच गेटवर रात्र काढायची हे ठरवून बाहेर बसलो. जी लोक येथे दिल्ली बाजूला जानेवारी महिन्यात आली असतील तर त्यांना कल्पना असेल की येथील थंडी काय चीज असते त्यावेळी अंगावरचे कपडे सोडुन माझ्या जवळ अंगावर घेण्यासारखे काहीच नव्हते, तरी ही मी बाहेर बसलोच कसा हेच आज मला कळत नाही. सकाळ चे ५.३० वाजले असतील एक गुरखा जो रात्री गस्त घालत होता तो माझ्या जवळ आला व माझी विचार पुस केली मी जेव्हा त्याला राजीव जींचे नाव सांगितले तसा तो उडालाच व म्हणाला " क्या तुम राजीव जी के जाणकार हो , माफ करना भाई उन्हे मै अभी जगा हूं" असे बोलून तो पळतच आत गेला, पण तो पर्यंत थंडीमुळे माझे अंग आकडून आले व शक्यतो मी बेशुध्द देखील पडलो किंवा प्रचंड झोप आली असे काहीतरी झाले असावे, पण जेव्हा थोड्या वेळाने जाग आली तेव्हा दोन-चार जण माझ्या जवळ सोप्यावर बसले होते व मी एका बेड वर पडलो होतो मी लगेच उठलो तेव्हा एक व्यक्ती बोलला " अरे काई बात नही लेटे रहो, तो तुम ही राज जैन हो क्या दिवेदीजी का फोन तो आया था तुम्हारे बारे में, पर जब मेरा यहा आने का कार्यक्रम बना तो मैंने वापस फोन किया था पर तब तुम वहा से निकल चुके थे, चलो काई बात नही तुम सही जगह पोहच तो गये." थोडा नहा धो के तयार हो जायो हमे कही जाना है, आज से तुम्ह मेरे साथ ही रह ना ठीक है" मी देवाचे नाव घेतले व म्हणालो चल देवाची कृपा आहे अजून माझ्यावर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळाने मी तयार होऊन त्यांच्या समोर गेलो व विचारले की मला काय काम करावयाचे आहे ते सांगा त्यानूसार मी तयारी करतो त्यावर ते फक्त हसले व म्हणाले " अरे भाई, तुम्ह थके हूये अभी आये हो, थोडा ईधर उधर देख लो जो भी काम अच्छा लगे वही तुम करना " मी देखील थोडा हसलो व लगेच काम शोधावयास चालू केले तेव्हा मला समोरच पुस्तकांचा गठा पडलेला दिसला व एक कार्यकर्ता तेथे त्यावर पत्ते लिहीत होता त्याच्या जवळ गेलो व परवानगी घेऊन लगेच त्याच्या बरोबर पत्ते लिहू लागलो, तासाभराने राजीव जींनी मला बोलवले व म्हणाले चल तु माझ्या बरोबर . मी त्यांच्या बरोबर गाडीतून निघालो एक तास भरच्या प्रवासानंतर एका घरासमोर येऊन गाडी थांबली व राजीव जी व त्यांच्या पिशवी घेऊन मी त्यांच्या मागोमाग आत गेलो, आत जाताच मला धक्का बसला अरे हया व्यक्तीला कोठे तरी पाहिले आहे कोठे बरे.... तेव्हा आठवले जी पुस्तके बाबू घाटवर वाचली होती त्या पुस्तकांमध्ये ह्यांचा फोटो देखिल होता नाव ह्यांचे " श्री अशोक सिंघल " मी नमस्कार केला व बाजूला उभा राहीलो, ते दोघे काही तरी अर्धातास बोलत होते पण माझे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे सोडून दुसरे लक्षच नव्हते कोठे. ही अशोक सिंघल मी माझ्यावर पडलेली पहीली छाप होती, थोड्यावेळाने त्यांचे लक्ष माझ्या कडे गेले तेव्हा हसत राजीव जींना त्यांनी माझ्या बद्दल विचारले व राजीवजीं नी त्याना माझी माहीती पुरवली माझ्या कडे संगणकाचे शिक्षण आहे असे त्यांना समजताच ते राजीव जीनां म्हणाले " भाई राजीव, ईन्हे तो आप अपने आर. के. पुरम कार्यालय मै रखो" तेव्हा राजीवजीं नी त्यांना नम्र पणे नकार दिला व त्यांनी मला स्वत: संगेच ठेवणार असल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-3128208598063493639?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/3128208598063493639/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=3128208598063493639&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3128208598063493639'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3128208598063493639'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-246680489073292236</id><published>2009-09-30T18:41:00.000+05:30</published><updated>2009-09-30T18:42:05.815+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Share Market'/><title type='text'>आज मार्केट १७०००</title><content type='html'>आज मार्केट १७००० च्यावर गेले....&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण..  असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली...  मज्जा आली !&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता काही प्रश्न !&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी  मार्केट वर आलेच ना ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....  पण हे मार्केट पडणार म्हणून बोंबलणारे कुठे गेले आज काल    ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जरा या ह्या धाग्यात व कुठे चुकला ते सांगा....  ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरवात माझ्यापासून.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे ही मत होते की जेव्हा मार्केट १६००० -१६४०० च्या आसपास येऊल तेव्हा एक करेक्शन होईल व मार्केट परत १५०००-१५००० च्या आसपास जाईल पण  FII's ने फुल्ल खरेदी केली व त्यामुळे...  बाकीच्यांनी पण.. व मार्केटला चांगलाच सपोर्ट दिला त्यात आपले काही चांगले मुद्दे पण होते जसे.. काही कंपण्यांनी चांगला रिझर्ट पण दिला... व सामान्य गुंतवणूकदार मार्केटमध्ये खरेदीवरच जोर देऊन राहिला व त्यामुळे  मार्केट वरच राहिले !&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा अंदाज येथे चुकला मला वाटलं होते की FII's आपली गुंतवणूक  १६००० नंतर काढुन घेतील... व नंतर खरेदी करतील पण त्यांनी स्पेशल जबरा खरेदीच केली  :(  &lt;br /&gt;पण चांगलेच झाले !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-246680489073292236?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/246680489073292236/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=246680489073292236&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/246680489073292236'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/246680489073292236'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_1947.html' title='आज मार्केट १७०००'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-5083678405982602640</id><published>2009-09-30T09:26:00.000+05:30</published><updated>2009-09-30T09:30:03.119+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>माझी सफर... भाग १</title><content type='html'>घर तर सोडलेच होते, काय करावे काय नको हेच कळत नव्हते, कसा बसा प्रावास करत मुंबई रेल्वे स्टेशन वर पोहचलो, व विचार करत एके जागी बसलो, काहीच कळत नव्हते तेव्हाच अचानक एक १४-१५ वर्षाचा मुलगा चाय चाय असे ओरडत माझ्या समोरुन गेला मी विचार केला अरे यार जगात काही ही काम करुन जगता येते आपण तर थोडेफार शिकलो देखील आहोत काही हरकत नाही करु काही ही काम करु पण घरी परत जायचे नाही हा ठाम निश्चय. हा विचार केल्या वर समोर जाण्यासाठी तयार रेल्वे पाहीली व त्यात जाऊन बसलो ना टिकीट ना टिकीटाची काळजी. ईकडे तीकडे पाहीले जी जागा मिळाली तेथे जाऊन बसलो जरनल चा डबा तो गर्दी खचाखच, रेल्वे सुटली कोठे जात आहे कोठे जाऊन थांबेल काहीच माहीत नाही, जसावेळ गेला तसे ईतरांच्या बोलण्यातून लक्षात आले की ही ट्रेन तर कलकत्ताला चाललेली आहे.&lt;br /&gt;तीन दिवसाच्या थकलेल्या , उपाशी प्रवासानंतर हावडा स्टेशनवर गाडी थांबली... टिकीट कोणी विचारलेच नाही ह्या खुशीत बाहेर पडणार ईतक्यात टिकीट तपासणारा माझ्या समोर&lt;br /&gt;तो . - "टिकीट दिखा"&lt;br /&gt;मी . - " नाही आहे"&lt;br /&gt;तो. - "क्या.. शहर में नया है क्या छोरे.. चल बडे बाबू के पास चल"&lt;br /&gt;मी थोड्या फार गयावया केला माफी मागीतली पण तो बिचारा काय करणार त्याला कळायला हवे ना मी काय बोलतो आहे ते ? ना धड मराठी ना धड हिंदी... चित्रपट पाहून पाहून जेवढे हिंदी येत होते त्यावर त्याचे समाधान झाले नाही... बडे बाबू जवळ गेलो तर तो बिचारा रात्री होणा-या पार्टीची काळजी करत फोन वर बोलणी करत होतो, टिकीट तपासणा-याने माझ्या कडे बोट दाखवले व म्हणाला "टिकीट नही है इस के पास" बाबू ला काय झाले काय माहीत व त्या टिकीट तपासणा-याला बंगाली मध्ये काहीतरी सांगीतले व चक्क मला जाऊ दिले.. मी देवाचे आभार मानले व रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो, इकडे तीकडे पाहीले काहीच समजेना नवीन जागा, नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा.. कोणाला विचारावे तर काय विचारावे हा देखील प्रश्न पडला होता, गेट मधून बाहेर आलो ईकडे तीकडे फिरत हुगली नदीच्या फुलावरुन {ब्रीजवरुन} जाताना लक्षात आले की अरे हा तर लोखंडाने तयार केलेला आहे {हाच तो जग प्रसिध्द हावडा ब्रिज}, तेथेच जरा बाजूला बाकड्यावर बसलो व वरुन खाली वाहणा-या पाण्याकडे तर कधी तेथून जाणा-या गाड्याकडे पाहत विचार करु लागलो आपण येथे आलोतर आहोत पण ना कोणी ओळखीचे ना जाणकार ना काही माहीती कसे करावे ? काय करावे ? तो समोरून एक संतांचा दल जाताना दिसला व मी नकळत त्याच्या पाठी मागे चालू लागलो माझ्या सारखे असंख्य लोक त्यांचा पाठीमागे चालले होते त्यात मी एकदम मिसळून गेलो कोणाला काहीच गरज नव्हती की मी कोण , येथे का व ह्या संताच्या मागे कुठे चललो आहे... त्यांना सोडा मलाच खबर नव्हती की मी कुथे चाललो आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती संतांची टोळी प्रवास करत कलकत्ताच्या बाबू घाटावर विसावली, तेथेच शेकडॊ मंडप लागले होते , असंख्य लोक, साधू महाराज ह्यांचा जमावडा लागलेला होता कोणी मोठमोठ्या आवाजात श्री श्री ह्यांचा विजय घोष करत होता तर कोणी आरती ... मी थोडा विचार केला तर ल़क्षात आले की हा तर एक जत्रेचा प्रकार दिसतो आहे मी इकडे तीकडे पाहत त्या जत्रेमध्ये घुसलो.... एक दोन फलक व बोर्ड लावले होते त्यातून असे लक्षात आले की ही सर्व मंडळी गंगासागर यात्रेसाठी येथे जमली आहेत व येथून गंगासागर -८०-९० किलोमीटर वर आहे तेव्हा हा त्यांचा पडाव आहे, साधू , सन्यांशी व महाराजांच्या तसेच भक्तांच्या जेवणाची सोय देखील अनेक मंडळांनी, संस्थेनी व मोठ मोठ्या कंपन्यानी केलेली होती.&lt;br /&gt;फिरता - फिरता एकदमच एका मांडवाचे नाव वाचून थबकलो "विश्व हिंदू परिषद -कलकत्ता" अरे हे नाव तर कुठेतरी वाचलेले आहे... ह्म्म अरे कोल्हापूर ला नेहरु बागेत सकाळ सकाळी काही मंडळी येत नव्हती का फिरायला त्यातले जगताप काका परिषद वालेच ना... मी सरळ आत गेलो व समोर पांढ-या शुभ्र कपड्यामध्ये बसलेल्या वडिलधारी मानसाला नमस्कार केला व म्हणालो " बाबू जी थॊडा भुकां हूं कुछ काम मीलेगा ? काम के बाद खा ना देना " तो एकदम विचित्र नजरे ने माझ्याकडे पाहू लागला व किंचित सा हसतच बोलला " अरे बेटा, यहा तो सबको खाना बट रहा है जा तु भी खा ले , खाने के बाद मेरे पास आना" &lt;br /&gt;&lt;br /&gt;जेवण झाले व मी त्यांच्या जवळ जाऊन आभार प्रकट केले, त्यांनी आपुलकी ने माझी माहीती विचारुन घेतली व एक फोन लावला थोड्यावेळा ने फोन ठेवत म्हणाले "कोई बात नही बेटा, ले फोन , पहले अपने घर फोन करो तथा घरवालोंको बता कि तु ठीक ठाक है तथा यहा विश्व हिंदू परिषद के कार्यालय मै रह रहा है".. मी त्यांना कसेबसे समजावले व म्हणालो जो पर्यंत काही बनत नाही तो पर्यंत घरी फोन नाही करणार. त्यांनी जास्त ओढावे न घेता तो विषय सोडुन दिला व म्हणाले " बेटा, तुम यही रहो हमारे साथ कुछ दिन यह गंगासागर यात्रा खत्म होणे के बाद तुम्हारी व्यवस्था कर देंगे कही ना कही.. मेरा नाम विजय दिवेदी है... तुम मुझे विजय जी कह सकते हो या फिर दिवेदी जी तुम्हारी मर्जी " व हसत आपले काम करु लागले.&lt;br /&gt;तो दिवस होता ३ जानेवारी चा व १४ जानेवारी पर्यंत यात्रा संपणार होती तो पर्यंत मी मनपूर्वक दिवेदी जी सांगतील ते काम करु लागलो त्यांनी थोडे फार प्रयत्न करुन माझ्या साठी एका दुकानातून काही शर्ट व काही कपडे आणले व तेथेच एका बाजूला माडवात माझी राहण्याची व्यवस्था करुन दिली. जेवण देण्याचे व खास खास साधू महाराजांना आवश्य असे फलाहार देण्याचे काम मी पाहू लागलो, पण जे साधू संत माझ्या वाटणीला आले ते नागा साधू { हे प्रचंड कडक पध्दतीने व अवघड अशी तपस्या करतात व हे हिमालयातून फक्त गंगासागर यात्रेसाठी च शहरी वस्तीवर येतात} ह्यांना जास्त काही लागतच नव्हते काही केळी व सफरचंद दिले की माझे काम संपले, तर मग फावल्या वेळेत कुठे पाचजन्य मासीक वाच तर कूठे दिवेदीजीं ना विनंती करुन काही वर्तमानपत्रे वाच हे करु लागलो, माझी वाचण्याची आवड पाहून दिवेदी जी आपल्या ग्रंथ संग्रहातून काही पुस्तके माझ्या हाती दिली त्यातूनच मी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करुन घेतली व मला ही ह्यांच्या कार्यामध्ये ओढ वाटू लागली दिवेदी जी च्या जवळ मोकळा वेळ भेटला तर हूगली नदीच्या तीरावर बागेत फिरता फिरता ते मला असंख्य गोष्टी सांगत ज्यामध्ये हेगडेवार जी, सावकर जी व सध्याची देशाची गरज हे विषय प्रमुख असत, मी बोलता बोलता एक दिवस त्यांना एकल विधालया विषयी विचारले व त्यांनी मला त्यावर त्यांच्या कडे उपलब्ध असलेली पुस्तके व कात्रणे वाचण्यासाठी मला दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसामागून दिवस गेले व यात्रा संपली { १४ जानेवारी संक्रातीचा दिवस} गंगासागरच्या तिरावर मी दिवेदी जी जेव्हा शेवटी पोहचलो तेव्हा ते मला म्हणाले "राज बेटा, आज स्नान कर ना यहा, बहोत पुन्य मिलेगा, तुम्हारे सातो जन्म सफल हो जायेंगे, जो कुलपुरुष भगवान द्वार गये है उन्हे भी आज तु नहा कर मुक्ती कर देगा..... सात धाम बार बार गंगासागर जिवन मैं एक बार ... लोग यहा आने के लिये तरसते है मन्नते मांगते है लेकिन तुम भगवान की दया से अपने आप यहां आ गये हो...जा नहा ले " एक दम भारावलेल्या अवस्थेत मी गंगा नदी व सागर ह्यांचे मिलन संगमाला आपल्या डोळ्यात साठवून घेतले व गंगेचे पाणी डोक्यावर घेता ना एकदम स्वर्ग सुखाचा आनंद भेटला, ज्या नदी विषयी शालेय जिवनात, आजीच्या गोष्टीमध्ये, महाभारतामध्ये वाचले त्या नदीचे पाणी आज आपल्या भाग्यामध्ये देखील आहे हा विचार करुन सुखावलो पण पुढील काय माहीत होते की ह्याच नदीच्या सानिध्यात मला माझ्या जिवनातील अत्यंत महत्वाचे वर्ष काढायचे आहे... देवाची करणी कोल्हापूरातील एक गल्ली मधून देखील एकटा कधीच बाहेर न पडलेला मुलगा ईतक्या दुर देशाच्या दुस-या टोकाला येथे गंगासागर पर्यंत पोहचला. शक्यतो दिवेदी जी नी माझ्या मनातील विचार ओळखले व हळुच माझी पाठ थोपटत म्हणाले " बेटा, जिवन तो अभी शुरु होगा तुम्हारा.... चल परसो तुम्हे ... जहा जाना है वहा का नाम सुनते ही तुम्हारे शरीर पे रोंगटे खडे हो जांयेंगे .... पता है तुम्हे कहा जाना है ? तुम परसो की ट्रेन से "अयोध्या" जाओगें वहा तुम्हे श्री राजीव शर्मा मिलेंगे कार्यालय में ठीक है "&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८ जानेवारी ला मी दिवेदींजी च्या परवानगीने कलकत्ता च्या काली मंदीराचे दर्शन घेऊन आलो व संध्याकाळी त्यांचे आशिर्वाद घेऊन कानपुर ला जाणा-या गाडीमध्ये बसलो.... कोल्हापुर ते मुंबई ते कलकत्ता ते फैजाबाद हा माझा सफर .... पण ह्या सफरीने माझा जिवनाला एक वेगळाचा अर्थ प्राप्त करुन दिला. २० तारखेला फैजाबाद रेल्वे स्टेशन वर उतरलो व जवळच असलेल्या अयोध्या नगरी साठी वाटचाल करु लागलो... जेव्हा प्रथम पाय अयोध्येमध्ये ठेवला तेव्हाच दिवेदींचे वाक्य आठवले " शरीर पें रोंगटे खडे हो जायेंगें" व खरोखर अंगावर काटे उभे झाले होते... मी अयोध्या नगरीमध्ये पोहचलो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-5083678405982602640?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/5083678405982602640/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=5083678405982602640&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5083678405982602640'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5083678405982602640'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_30.html' title='माझी सफर... भाग १'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-5377087515781401042</id><published>2009-09-28T08:56:00.000+05:30</published><updated>2009-09-28T09:06:22.807+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लहानपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Love'/><title type='text'>माझं कोल्हापुर - भाग १</title><content type='html'>एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;क्रमशः&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-5377087515781401042?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/5377087515781401042/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=5377087515781401042&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5377087515781401042'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5377087515781401042'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_28.html' title='माझं कोल्हापुर - भाग १'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-3058016815252611332</id><published>2009-09-27T14:16:00.001+05:30</published><updated>2009-09-27T14:16:24.393+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='news'/><title type='text'></title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;span style="color: #FF6600;"&gt;आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस !&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.bhaskar.com/2009/09/27/images/bs1.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ह्या वीराला शत शत नमन !&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;* &lt;br /&gt;सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !&lt;br /&gt;ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-3058016815252611332?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/3058016815252611332/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=3058016815252611332&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3058016815252611332'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3058016815252611332'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_9119.html' title=''/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-365500585516933980</id><published>2009-09-27T11:25:00.000+05:30</published><updated>2009-09-27T15:15:10.960+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='photos'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><title type='text'>भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६</title><content type='html'>&lt;strong&gt;दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद.&lt;/strong&gt;  हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या. दिल्ली-६ चित्रपटात दाखवलेला भाग हा दिल्ली-६ चा नाहीच आहे, पोलिसांनी व सरकारने सुरक्षतेचे कारण करुन दिल्ली-६च्या टिमला शुटिंग करुच दिलेले नव्हते, त्यांनी दिल्ली पासून दुर राजस्थानमधील एका लोकेशनवर ते शुटींग केले आहे काही भागाचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;***&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://www.shubhyatra.com/gifs/chandni-chock.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;चांदणी चौकचा परिसर&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Chandni_Chowk,_Delhi,_1863-67.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;strong&gt;जुन्या काळातील चांदणी चौकचा परिसर&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लाल किल्याच्या लाहोरी गेटच्या समोरील भाग म्हणजेच दिल्ली-११०००६. &lt;br /&gt;दिल्लीतील सर्वात प्रसिध्द असा चांदणी चौकचा परिसर. जवळ ३०० वर्षापुर्वी वसलेला हा दिल्लीचा भाग एक महत्वपुर्ण भाग. भारतातील प्रमुख धर्म तुम्हाला येथे प्रामुख्याने पहायला मिळतात,  हिंदु, जैन, मुसमान, ख्रिच्चन व सिख. येथे ह्या धर्माची श्रध्दास्थाने देखील जवळ जवळच आहेत. शंकर मंदिर, रामलिला मैदान,  जैनांचे लाल मंदिर, जामा मसजिद व सिखांचे सिसगंज गुरुद्वारा , ख्रिच्चनांचा चर्च, हे मुख्य नाही तर दोन किलोमिटरच्या परीसरातील मंदिरे व धर्मस्थळे ह्यावर लिहायला बसले तर एक चांगला  मोठा लेख तयार होइल इतकी त्यांची संख्या. &lt;br /&gt;ज्यांना दिल्लीची गर्दी अनुभवांची आहे त्यांनी येथे एक चक्कर जरुर मारावी, प्रचंड गर्दी, गोंधळ व धावपळ, मध्येच सायकल रिक्षावाले.. बाजूला ओरडणारे फेरीवाले.. मंदिरातून.. येणारा घंटानाद, मसजिद मधून येणारी प्रार्थनेची बांग, गुरुद्वारातून येणार एक ओंकार.. सगळे एकसाथ एक वेळ चालू असतं, सकाळी  ७ वाजल्या पासून येथील रस्ते भरुन जातात ते मध्य रात्रीपर्यंत हलचल चालूच असते.&lt;br /&gt;ह्या भागाचं एक वेगळे पण म्हणजे ज्या धर्माचा सण आहे त्या धर्माच्या रंगात हा भाग नाहून निघतो.. शिवरात्री असो वा दिवाळी.. सगळी कडे त्या दिवसाच्या निमित्याने व्यापार होतो... ईद असो वा गुरु दिन तोच रंग तुम्हाला दिसेल.  भरीस भर म्हणून जगप्रसिध्द २६ जानेवारीची परेड चा रुट देखील येथून जातो. समोरच असलेला लाल किल्ला व धर्मस्थळे ह्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या अफाट असते. मी कधी ही तीकडे गेलो तर मला नेहमीच त्या जागेचे काही ना काही तरी वेगळे पण जाणवतं, येवढ्या धर्माचे, भारतातील कानाकोप-यातून आलेला समुदाय ह्या इवल्याश्या जागे मध्ये कसा समावला असेल, अरुंद बोळ, गल्ल्या, एकदम शतकापुर्वीच्या पध्दतीचे दोन-तीन  मंजीली इमारती, त्या इमारतीवर असलेल्या बरसाती, गल्ली बोळातून लोंबकळणा-या तारा.. आडवे तीडवे खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेले फेरीवाले.. छोटे दुकानदार, खाण्यापिण्यांची असंख्य दुकाने, पराठेवाली गल्ली,  नटराज दहि-भल्ले, सर्वत्र पसरलेला अतराचा सुगंध.. सगळं विचित्र वाटतं तरी ही कुठंतरी आपण पण त्याच गर्दीचा , त्याच वातावरणाचा भाग झालेलो असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://photos.igougo.com/images/p84526-Delhi-Chandni_Chowk.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहाजहानची सर्वात मोठी मुलगी जहांआरा साठी निर्माण करण्यात आलेला हा सराय  (परिसर)  सुंदर गार्डन व एतिहासिक वास्तूनीं नटलेला हा भाग  खरं तर लाहोरी गेट पासून फतेपुर मसजीद पर्यंत जाण्यासाठी तयार केलेला मार्ग. हा चार भागामध्ये विभाजित केलेला आहे  &lt;strong&gt;१. उर्दु बझार, २. फुल मंडी ३. जैहरी बझार / असर्फि बझार ४. चादंणी चौक. &lt;/strong&gt; येथे इंग्रजांनी बांघलेला एक ११० फुट घंटाघर (घड्याळ टॉवर) बांधलेला होता तो  १९५१ मध्ये पाडून मार्केट साठी जागा वाढवली गेली.  हा भाग मला वाटतं भारतीय इतिहासाचा एक मुक साक्षीदार आहे,  मुघल राजांनी केलेल्या हत्या, गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे केलेले सिर-कलम व अनेक गोष्टी ह्या भागात घडल्या, पण तसाच हा भाग भारतीय स्वातंत्र्यातील अनेक मोठ मोठ्या घडामोडीला देखील साक्षीदार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://www.sanskrititours.com/images/old-delhi.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे काय नाही मिळत, कपड्यापासून ते इलेक्टॉनिक वस्तू पर्यंत, चादरी पासून ते मखमली  कालिन पर्यंत सगळे विकले जाते, खाण्यापिण्याच्या वस्तूची तर येथे रेलचेल आहे, पण येवढं सगळं असताना ह्या भागाचा विकास का नाही झाला, माझ्या नजरेने जे पाहीले त्यानुसार ह्या ला जबाबदार काही अंशी सरकार जरी असले तरी देखील  येथील गर्दी व तंग रस्ते ह्यामुळे सरकारला काही ही  करायला तयार होत नसावी, मी एकदोन जणांशी जेव्हा ह्या बद्दल बोललो ते ते म्हणाले "राज,  दिल्ली का दिल है यह.. एक दिन भी यहा काम रुक गया तो समजो दिल्ली रुक गई."  एका अंशी हे खरं वाटतं. खरोखर दिल्ली -६ हे दिल्लीचे दिलच आहे, जर दिल्ली जाणून घ्यायची असेल तर एकदा का होईना दिल्ली-६ ला भेट दिलीच पाहीजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://www.delhilive.com/system/files/images/Gurudwara_Sisganj_Sahib.thumbnail.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;सिसगंज गुरुद्वारा&lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://img.timeinc.net/time/daily/2008/0805/over_population_0509.jpg" alt="" /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;* सर्व फोटो महाजालावरून सभार.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-365500585516933980?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/365500585516933980/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=365500585516933980&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/365500585516933980'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/365500585516933980'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_6866.html' title='भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7887177766988655767</id><published>2009-09-27T11:21:00.001+05:30</published><updated>2009-09-27T11:21:57.440+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='photos'/><title type='text'>रम्य सकाळ !</title><content type='html'>&lt;img src="http://lh5.ggpht.com/_y6HMSB7yvoU/SdwyZ40BVBI/AAAAAAAAAGw/g1osQpRfKwg/s640/PICT0002.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh3.ggpht.com/_y6HMSB7yvoU/SdwyaPLqtKI/AAAAAAAAAG4/V2Q9ISc3jSs/s640/PICT0003.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_y6HMSB7yvoU/SdwyadieCcI/AAAAAAAAAHA/JS_qW8j-x18/s640/PICT0005.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_y6HMSB7yvoU/SdwybLVTcQI/AAAAAAAAAHQ/HG9RIiJqF-8/s640/PICT0007.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_y6HMSB7yvoU/Sdw6Ak3PawI/AAAAAAAAAHg/FBaYg2j4ZZk/s640/PICT0012.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh4.ggpht.com/_y6HMSB7yvoU/Sdw6BBHnrQI/AAAAAAAAAHw/R2USx3Rg11M/s640/PICT0014.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_y6HMSB7yvoU/Sdw6BV9oZfI/AAAAAAAAAH4/26J_bOZ1Nj8/s640/PICT0015.JPG" alt="" /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7887177766988655767?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7887177766988655767/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7887177766988655767&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7887177766988655767'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7887177766988655767'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_27.html' title='रम्य सकाळ !'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh5.ggpht.com/_y6HMSB7yvoU/SdwyZ40BVBI/AAAAAAAAAGw/g1osQpRfKwg/s72-c/PICT0002.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-2606680762295398341</id><published>2009-09-26T09:35:00.000+05:30</published><updated>2009-09-26T09:37:30.883+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>हत्या !!!</title><content type='html'>खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती . &lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;"फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर.. निपचित पडलेले होते म्हणून मी घाबरुन फोन केला तुम्हाला."- शेजारी म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहराच्या पॉश एरिया मध्ये राजकिय व व्यवसायी मंडळी मध्ये उठबैस असलेल्या अरविंद ची हत्या झाली होती, बाहेर प्रेसवाले / टिव्ही वाले हल्लाकोळ करत होते व पोलिस अधिकारी आपले काम करत होते, अरविंद चे शव डाव्या बाजूला कललेल्या अवस्थेमध्ये सोफ्यावर होतं, जवळच मोबाईल, सिगरेटचे पॉकिट व समोर टेबलावर दारुची बाटली एक ग्लास गाडीची चावी व टिव्हीचा रिमोट पडलेला होता, ग्लास मध्ये थोडी दारु होती अजून . जवळच एक स्कार्प पडला होता व शक्यतो त्याचा वापर करुनच अरविंदा गळा दाबला गेला असावा. जवळ पास झटापटीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. वयाने अडतीस-चाळीस च्या दरम्यान असलेल्या व शरिराने ताकतवर असलेल्या अरविंद ने कसा काय वाचण्याचा प्रयत्न केला नसेल हा विचार करत असताना पोलिस अधिकारी इकडे तिकडे पाहू लागले होते त्यांना जी गोष्ट हवी होती ती दिसत नव्हती, पाण्याचा जग अथवा सोड्याची बाटली, म्हणजे काय अरविंद डायरेक्ट पॅग घेत होते व जास्त झाल्यामुळे त्यांच्या कडे आपल्या बचावाची ताकतच राहिली नसावी, हा विचार करत असताना त्या अधिका-याने जेथे ग्लास ठेवला होता तेथे जरा निरखून पाहीले व म्हणाले " येथे अजून एक ग्लास असला पाहीजे, ह्याचा अर्थ ह्यांच्या बरोबर दुसरा कोणी तरी होता जो दारु पण पीत होता व ती शक्यतो शेवटची व्यक्ती होती ज्यांने अरविंदला जिवंत पाहिले असेल. त्यांनी रुमालानेच मोबाईल उचलला, चांगल्या कंपनीचा मोबाईल होता, शेवटची कॉल कुणातरी शर्माची होती जी चाळिस एक सेकंदाची होती पण त्याच्या आधीची कॉल सतिशची होती जी जवळ जवळ अर्धातास चालू होती जी ८ च्या सुमारास आली होती व डॉक्टरांच्या टिम ने सांगितले की हत्या रात्री साडे नऊ ते दहा च्या आसपास झालेली असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही विचार करत पोलिस अधिका-याने सर्व घर व्यवस्थीत पाहून घेतले जवळ जवळ प्रत्येक वस्तू जागेवरच होती, त्यामुळे चोरी हा उद्देश नव्हताच हत्येचा, परत ते किचन मध्ये आले व शोधक नजरेने काही तरी शोधू लागले व त्यांच्या चेह-यावर एक अस्पष्ट असे समाधान दिसले, ते समोरील ग्लासच्या रॅक कडे पाहत होते, १२ ग्लास पैकी एक ग्लास बाहेर टेबलावर होता व एक गायब होता. तो सेट पुर्ण नव्हता, पण शक्यतो एकाद दुसरा ग्लास फुटला असेल कधी तरी हा विचार करुन त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर प्रत्येक वस्तूचा बरोबर सेट होता, १२ प्लेट, १२ बाऊल्स, चमचे सर्व काही १२ च्या संख्ये मध्ये. ह्यांच्या घराचा नंबर पण डी-१२ होता, तेव्हा शक्यतो अरविंद आपल्या स्वतःसाठी बारा नंबर लकी समजत असावेत, तेव्हा जरी ग्लास फुटला असेल तर त्यांनी तो सेट नक्कीच पुर्ण केला असेल मग. आता तो ग्लास शोधणे गरजेचे होते कारण तो शक्यतो तो हत्या-याला पकडण्यासाठी मदत करेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाहेर गार्डन मध्ये, मागे सर्विस कॉटर मध्ये, गॅरेज मध्ये सर्वत्र शोधा सोध करुन झाली पण काहीच सापडले नाही ज्याच्या द्वारे हत्या करणा-याची ओळख होऊ शकेल, अरविंद एकटाच राहत असे व जवळ जवळ तो रोजच पार्टी ला बाहेर जात असे त्यामुळे फक्त सकाळी घरकाम करण्यासाठि एक गडी होता जो घर स्वच्छ करणे, कपडे धुणे इत्यादी करुन २ वाजता निघून जात असे, घराची एक चावी त्याच्या कडे व एक अरविंद कडे होती, व्हिआयपी एरिया असल्यामुळे सर्वत्र गार्ड फिरत असतचं त्यामुळे समोरच्या घराचा गार्डच अरविंदच्या घरावर ही लक्ष ठेऊन असे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;गार्ड कडे थोडी फार माहीती मिळाली पण जरा ही कामाची नव्हती, सात-आठ जणे वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले होते व थोड्या थोड्या अतंराने निघून गेले होते पण रात्री एक गाडी परत आली होती, व लगेच पाच मिनिटात गेली होती, पण काही कारणामुळे गार्ड त्या गाडिचा नंबर सांगू शकत नव्हता.. नाही तो गोंधळला होता, त्यांचे म्हणणे होते की अरविंद हे १२ च्या आसपास गाडी घेऊन बाहेर गेले होते व १२.४५ च्या आसपास परत आले पण डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार हत्या साडे नऊ च्या आसपास झाली आहे, व सर्वात महत्वाचे गाडी तर आत गॅरेज मध्ये उभी आहे व हा म्हणतो आहे गाडी बाहेर गेली .. तर मग हे गाडीचे काय लफडे .. हा विचार करत पोलिस अधिकारी पुन्हा गॅरेज कडे आला व येथे असलेली स्विफ्ट गाडी ला एक चक्कर मारली व विचार करु लागले. त्यांनी काही तरी नक्की ठरवले व जी फिंगर प्रिंन्ट ची टिम आत ठस्से घेत होती त्यांना ह्या गाडीचे पण ठस्से घेण्यासाठी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;"यु आर अंडर अरेस्ट मीस्टर सतिश "- पोलिस अधिकारी म्हणाला, " तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते " - सतिश जरा गुर्मीतच म्हणाला, " हम्म, हो मला माहीत आहे तुमचे कनेक्शन खुप वर पर्यंत आहेत पण सबळ पुरावा माझ्या हाती आहे की तुम्हीच अरविंदचा खुन केला आहे व तुमचे हाताचे ठस्से व सर्वात मोठा पुरावा अरविंदचा मोबाईल आहे, ज्या मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे."&lt;br /&gt;सतिशचा चेहरा पडला व तो मटकन आपल्या खुर्ची वर बसला. " मिस्टर सतिश, तुम्ही अरविंदशी फोन वर अर्धा तास बोललात, काही तरी तुमचा वाद झाला व तु सरळ अरविंदच्या घरी आलात, अरविंद आधी पासून दारु पीत होताच, त्याच्या बरोबर तुम्ही ही दारु पिली व जेव्हा तुम्हाला असे वाटले कि आता अरविंद प्रतिकार करु शकणार नाही तेव्हा त्याच्याच गळ्यातील स्कार्प ने त्याचा गळा आवळला व आपल्या काहीच खाणाखुणा राहू नयेत ह्यासाठी तुम्ही तो ग्लास पण आपल्या बरोबर घेतलात, सरळ गाडीत बसून घरी निघून गेलात, पण येथे तुम्ही एक मोठी चुक केली होती, अरविंद कडे व तुमच्या कडे एकाच कंपनीची , एकाच रंगाची व एकाच मॉडेलची गाडी होती व तुम्ही दोघांनी एकाच दिवशी घेतली होती, व पळून जाण्याच्या गडबडी मध्ये तुम्ही चुकून अरविंदची गाडी घेऊन गेलात, शक्यतो तुम्ही घरी पोहचला असाल तेव्हा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली, तुम्ही ती आपली चुक सुधारण्यासाठी परत अरविंदच्या घरी आलात, त्याची गाडी जी तुम्ही घेऊन गेला होता त्याला तुम्ही गॅरेज मध्ये उभी केले, येथेच तुम्ही चुकला, अरविंद गाडी गॅरेज मध्ये कधीच उभी करत नसे, हे गॅरेज मध्ये असलेल्या धुळीमुळे आम्हाला समजलेच होते व आजू बाजूला विचारणा केल्यावर पण सर्वांनी घेच सांगितले की गाडी कधीच गॅरेज मध्ये उभी नसते. त्यांनतर तुम्ही अजून चुक केलीत जो ग्लास तुम्ही टेबला वरुन घेऊन आला होता तो नष्ट न करता तुम्ही त्या गाडी मध्येच ठेवला जी गाडी तुम्ही आपली गाडी समजून घेऊन गेला होता, दुसरी चुक तुम्ही केली अरविंदच्या गाडीची चावी तुम्ही परत आत जाऊन अरविंदच्या प्रेता जवळ ठेवली पण त्यावेळी तुम्ही त्यावरचे ठस्से पुसणे विसरलात, घरात तुम्ही सर्व जागी आपले ठस्से साफ केले पण त्या चावी वर व गाडी वर तुमचे ठस्से राहीलेच, आम्ही तुमच्या नकळत तुमच्या हाताचे ठस्से तुमच्या ऑफिस व घरातून घेतले व त्यांची खातर जमा झाल्यावरच तुम्हाला पकडण्यासाठी आलो आहोत वारंट घेऊन. व हत्येचे कारण ही आम्हाला अरविंदच्या मोबाईल मध्येच मिळाले "&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;" अरविंद, हा नेहमी राजकिय नेते व इतर व्यवसायीक लोकांच्या पार्टि मध्ये मला भेटायचा, माझा पण स्वतःचा बिझनेस होता व त्याला वाढवण्यासाठी मी देखील अरविंदच्या ओळखीचा फायदा घेत असे, पण तो पर्यंत मला माहीत नव्हते की अरविंद हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याच्या बरोबर मी पार्टीमध्ये असताना कधी कधी त्यांने मला कॉल गर्ल्स पुरवल्या व हारामखोराने त्यांचे मोबाईल वर शुटींग केले हे त्यांने मला एकदा दाखवले व म्हणाला की माझ्या गरजापुर्ण करत रहा मी हे प्रेसला देणार नाही पण जेव्हा तु मला पैसे नाही देणार तेव्हा मात्र मी ते प्रेसला व आधी तुझ्या बायकोला दाखवणार म्हनून." सतिश बोलत बोलत थांबला व पाणी पिऊन पुन्हा बोलू लागला " त्यांने आधी गाडी मागीतली मी पण घेणार होतो गाडी, उगाच आपली अब्रु रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्याला गाडी घेऊन दिली व त्यांने माझ्या गाडीला व्हिआयपी नंबर दिला व स्वतःच्या गाडीला पण १२ नंबर घेतला, असे तो नेहमीच करु लागला कधी पन्नास हजार तर कधी लाख... अशी त्यांची पैशाची हवस वाढूच लागली होती, मी बरबाद होत होतो, धंद्याचा पैसा त्याला देऊन देऊन माझा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला व शेवटचा पर्याय म्हनून मी त्याला एक करोड ची ऑफर दिली व म्हणालो की ते क्लिप्स मला दे. पण त्या हारामखोराला मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होतो त्यामुळे त्यांने त्याला नकार दिला व शेवटचा उपाय म्हनून मी त्याला मारण्याचा प्लान तयार केला मला माहीत होतं की हा रोज संध्याकाळी घरी बसून दारु पितो व फुल्ल टल्ली होऊ पर्यंत पितो व त्या नंतर रात्री १ - दिडच्या आसपास क्लब मध्ये जातो नाचायला. पण तो मरायला एवढा तयार झाला होता की त्या दिवशी त्यांने परत माझ्या कडे दोन लाखाची मागणी केली तेव्हा मात्र मी त्याच्या शी फोन वर भांडलो व पैसे द्यायला येतो म्हणुन त्याच्या घरी गेलो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच सर्व." असे म्हणून सतिश शुन्यामध्ये डोळे लावून बसला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;काय बोलावं हेच त्या पोलिस अधिका-याला समजले नाही पण तो म्हणाला " सतिशराव, तुमच्या विरुध्द पुरावे सबळ आहेत, पण तुम्ही असा हत्येचा मार्ग शोधावयास नको होता जर तुम्ही आधीच पोलिसांच्या कडे आला असता तर, जी आब्रु वाचवण्यासाठी तुम्ही हत्या केली तीच आबरु कोर्ट व प्रेस समोर उघडी होणारच ना. ठीक आहे तो दोषी होता पण तुम्ही ही कमी दोषी नाही आहात. तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चुकिचा मार्ग वापरलाच व त्याचा फायदा अरविंद सारखे लोक घेतात.. चला, तुम्हाला आपल्या कबुली जबाबावर सही करायाची आहे आता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;** समाप्त ***&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-2606680762295398341?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/2606680762295398341/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=2606680762295398341&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/2606680762295398341'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/2606680762295398341'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_26.html' title='हत्या !!!'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-4898935943062086814</id><published>2009-09-25T09:18:00.001+05:30</published><updated>2009-09-25T09:19:36.572+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>अहिंसावादी - म्हणजे काय ?</title><content type='html'>मी जैन !&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला)  एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट !&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी  १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की  वनस्पती व  झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते  सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ? एखाद्याने एखादाचा जीव घेणे / विनाकारण जीव घेणे म्हणजे हिंसा हाच अर्थ मला माहीत आहे व शक्यतो तुम्हाला ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण  खाण्यापासून ते  कागदापर्यंत अनेक कारणांनी वनस्पती / झाडे ह्यांची हत्याच करत आलो आहोत की मग ?  कारण जगदिश चंन्द्र बोस ह्यांचे संशोधन आपण मान्य करतो ( जगाने मान्य केले)  म्हणजे आपण मानतो की वनस्पती सजीव आहे त्यानुसार आपण एखादी वनस्पती तोडली  तर ती हत्याच ना ? मग आपण अहिंसावादी कसे ?  &lt;br /&gt;&lt;br /&gt;जर आपण स्वतःला अहिंसावादी  म्हणतो तर आपण उठता बसता अनेक हत्या करतो हे कोणालाच माहीत नसावे ?  अनेक प्रकारच्या केस्मेटीक क्रीम मध्ये व्हेल मासा पासून प्राप्त केलेले तेल (चरबी) वापरली जातेच की,  मागे मॅड टिव्ही वर पाहीले  जे ब्रेश आपण आपल्या मुलाला चित्रकलेची आवड लागावी म्हणून विकत आणून देतो त्या ब्रेश साठी अनेक  छिछुंदर ( * मराठी शब्द)  ह्या प्राणांची हत्या केली जाते ! एका छिछुंदर चा जीव घेतला तर फक्त दहा ब्रेश तयार होता आता बोला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वात सर्व जागी सहज पणे मिळणारे डिझेल / प्रेट्रोल  व इतर त्यांचे उप पदार्थ हे पण जैविक इंधन आहे ... म्हणजे कोणाकडून तरी हत्या झालीच ना.. भले ती निसर्गाकडुन होऊ दे !&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही गोष्टी जश्या.. बुट / चपला / पर्स /  वायरींगचे सामान / हिरे छाटणीचे काम  लहान मुलांच्या कडून अत्यंत अत्याचार करुन करुन घेतले जातात... त्यांना मानसिक / शारिरिक इजा केली जाते म्हणजे ती देखील एक प्रकारची हिंसाच ना :?   &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो  ! काही  अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो .. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर वर दिलेल्या उदाहरणांना तुम्ही गरज म्हणत असाल तर मग आपण हिंसेचेच समर्थन करतो असे वाटत नाही का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत  असे तुम्हाला वाटतं का ? &lt;br /&gt;&lt;br /&gt;जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो  :?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-4898935943062086814?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/4898935943062086814/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=4898935943062086814&amp;isPopup=true' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4898935943062086814'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4898935943062086814'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_25.html' title='अहिंसावादी - म्हणजे काय ?'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7905989863687217518</id><published>2009-09-24T09:09:00.000+05:30</published><updated>2009-09-27T15:15:10.960+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='photos'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><title type='text'>भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)</title><content type='html'>&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://img2.travelblog.org/Photos/4820/18532/f/84235-Green-evergreen-scenery-Manali-0.jpg" alt="" width="600" height="449" /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;दिल्ली पासून&amp;nbsp;रोड ने&amp;nbsp;५०० किलोमीटर अंतरावर असलेले एक नितातं सुंदर थंड हवेचे ठीकाण, रेल्वे ने जायचे असेल तर तुम्हाला शिमला किंवा कालका जावे लागेल व तेथून मनाली बस ने.&amp;nbsp; खोल वर पसरलेल्या द-या व आकाशाला गाठण्याची स्पर्धा करत असलेली हिमशिखरे हेच मनालीचे दैवत.&lt;br /&gt;जाण्याचा कालावधी जानेवारी ते जुन पर्यंत कधी ही... पण जानेवारी मध्ये गेला तर बर्फाचा आनंद भेटु शकतो..&amp;nbsp; मी मागील दोन वर्ष सलग मनालीला गेलो माझ्या आवडत्या ठिकाणा मध्ये ह्याचा नंबर सगळ्यात पहिलाच येतो !&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://www.himachal.us/wp-content/uploads/2008/02/manali-forests1-3feb08-compressed.JPG" alt="" width="500" height="378" /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;हॉटेल्स घेउन का तेथे गेला तर गेस्ट हाऊस चा शोध घ्या...&amp;nbsp; गेस्ट हाऊस मध्ये सर्विस चांगली भेटते व स्थानिक लोकच गेस्ट हाऊस चालवत असल्यामुळे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळू शकते, तेथे दोन प्रकारचे वाटाडे भेटतात एक तुम्हाला मुर्ख बनवणारे व एक तुम्हाला खरोखर नितांत सुंदर असे मनाली फिरवणारे.. तुम्ही जेथे राहण्यासाठी उतरला असाल त्याच्या आजू बाजुला जरा चक्कर मारा एखादा कोणीतरी स्थानिक पकडा... ( आम्ही धुम्रपान करतो त्यामुळे आम्हाला लगेच कोणी ना कोणी भेटतच .. फक्त एकच प्रश्न माचिस है क्या ? लगेच गप्पा चालू)&amp;nbsp; त्याच्याशी गप्पा मारा व त्याला हलकेच विचारुन घ्या वाटाड्या कोण चांगला आहे व योग्य पैशात कोण फिरवेल.. ;)&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;मनालीला गेल्यावर खर्च करु नका अफाट महाग वस्तू भेटतात तेथे.. आपल्या कॅमराची बॅटरी, खाण्यासाठी स्नॅक व बाकीच्या गरजेच्या वस्तु मनालीला येण्यापुर्वीच विकत घेऊन ठेवा.. दोष त्यांचा नाही आहे त्यांना काही सामान विकण्यासाठी आणने म्हणजे १०० किलोमिटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे वस्तु महाग मिळतात व पर्यटनस्थळ म्हणाले की वस्तु तश्याच जरा महाग होतात.. शाल भेटते... हाताने विनलेल्या शॉल एकदम&amp;nbsp; सुंदर कलाकुसरी असलेल्या शॉल !&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;२२०० मिटर उंची वर..&amp;nbsp;व्यास नदीच्या काठावर वसलेले हे छोटे शहर सर्व बाजूने सुंदर आहे,&amp;nbsp; जास्त करुन नवविवाहीत जोडपी येथे आपला हनिमुन अविस्मरणीय बनवण्यासाठी येतात व त्यासाठीच जोडी(कपल) साठी&amp;nbsp; येथे विविध डिस्काऊट लावलेले दिसतात जागोजागी&amp;nbsp; ;)&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://lh5.ggpht.com/_Apk1qnEwLOg/SYa1eJYWRhI/AAAAAAAAAms/v_XGoWyaUv0/s640/IMG_1349.JPG" alt="" width="350" height="250" /&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://lh6.ggpht.com/_Apk1qnEwLOg/SYa1ejI5D5I/AAAAAAAAAm0/oVn3bG7TGmk/s640/IMG_1351.JPG" alt="" /&gt;&lt;br /&gt;दोन्ही फोटो आपले मिपा सदस्य  &lt;a href="http://www.misalpav.com/user/1081"&gt;सुचेल तसं&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;मनाली मध्ये पाहण्यासारखं हिडंम्बा मंदीर&amp;nbsp;(महाभारतील भिमाची पत्नी) आहे एकदम सुंदर शिल्पकला तुम्हाला येथे पाहता येइल मंदिराचा परिसर देखील पाहण्यासारखा आहे.. त्यानंतर तिब्बती गुफा देखील पाहण्यासारखी आहे.. येथे बुध्दाची मोठी मुर्ती पाहण्यालायक आहे तसेच बैध्द साधु.. लामा ह्यांची जिवनचर्या जवळून पाहता येते. जर कोणाला झरे / पाण्याचे गरम कुंड पाहण्याची आवड असेल तर त्याने जवळच असलेल्या वसिष्ठ गावात जायला विसरुच नका..&amp;nbsp; अत्यंत उपयोगी व मेडीकल उपयोगासाठी ह्यांचे पाणी निरनिराळ्या रोगात वापरले जाते... त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी पाणी तेथील आहे असे मानले जाते.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p style="text-align: center;"&gt;&lt;img src="http://www.yogeshsarkar.com/trips/manali04/on-road-to-rohtang-pass-05.jpg" alt="" width="640" height="480" /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;रोहतांग दर्या..&lt;/strong&gt;&amp;nbsp; मनाली पासून लद्&amp;zwj;दाख रोड वर पाच-सात किलोमिटर दुरवर असलेले ठीकाण.... आह... एकदम.. सुंदर.. ज्या बद्दल तुम्ही कल्पनासुध्दा करु शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो.. ह्याला दर्या का म्हणतात माहीत आहे ? येथे गेल्यावर तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत...&amp;nbsp; :)&amp;nbsp; अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग दर्या जरुर पहावा.. येथे वर्ष भर बर्फ जमेलेलीच असते.. त्यामुळे कधी ही जा.. ! तसेच मनाली पासून दर्या पर्यत चालतच यावे लागते (खेचर /घोडी&amp;nbsp;मिळतात पण आपण चालतच जाव लै मजा)&amp;nbsp; ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही ... अगदी पट्टणीटोपला सुध्दा नाही&amp;nbsp; ;)&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;तीनचार दिवस फिरण्यासाठी एकदम मस्त ठीकाण.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात.&lt;br /&gt;गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ !&lt;br /&gt;जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी) जेवण थोडं महाग आहे व कमी शिजलेले मिळण्याची शक्यता जास्त.. कारण उंच जागेचे ठीकाण !&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;* टिप : फोटो माझे नाही आहेत, गुगलसेवा वापरली आहे..&amp;nbsp; मागे विदा उडाल्यामुळे काही फोटो सापडत नाही आहेत पण जसे सापडतील तसेच ह्यात बदल करेन.&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7905989863687217518?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7905989863687217518/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7905989863687217518&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7905989863687217518'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7905989863687217518'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_24.html' title='भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh5.ggpht.com/_Apk1qnEwLOg/SYa1eJYWRhI/AAAAAAAAAms/v_XGoWyaUv0/s72-c/IMG_1349.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-4637095036804221380</id><published>2009-09-23T20:00:00.001+05:30</published><updated>2009-09-23T20:01:10.537+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='other'/><title type='text'>नियती....</title><content type='html'>*&lt;br /&gt;&lt;br /&gt;केव्हा पासून मी असा वेड्यासारखा पळत आहे, किती दिवस.. किती महिने.. किती वर्ष झाली.. खोल दरीतून डोंगर माथ्यापर्यंत... माथ्यावरुन खाली पायथ्यापर्यंत... रानातून.. जंगलातून.. रणरणत्या उन्हातून असाच सुसाट वेड्या सारखा पळत आहे मी.. ना थकलो.. ना हरलो. का ? कश्यासाठी... माझं गाव तर केव्हाच मागे राहिले तरी देखील मी असा हा वेड्यासारखा धावत आहे... मला ते हवे आहे ते... जे समोर उंच डोगरावर दिसत आहे... जे चमकत आहे तेच तेच ते हवे आहे मला. किती ही कष्ट करायला लागू दे मला ते हवेच आहे.. अरे हे कोण माझी वाट अडवून उभे आहे... जाउ द्या हो मला का उगाच माझी वाट अडवत आहात तुम्ही... मला ते हवे आहे... जाऊ द्या..&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे थांब रे, किती धावशील जरा थांब. मी किती वेळा तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तु थांबतच नाही आहेस, शेवटी मलाच तुझ्या समोर यावे लागले, मी कोण आहे ? मी मी आहे.. मीच तो विश्वकर्मा... परमेश्वर... तुझा देव व मीच तो निसर्ग आहे ! सर्वकाही असलेला मीच तो सर्वशक्तीमान आहे. पण तु सांग मला तु एवढा जीव तोडून पळत का आहेस.. कुठे लागले खरचडले.. अगणित जख्मा झाल्या आहेत तुझ्या शरिरावर.. तु किती जणांना जखमा देऊ इथवर पोहचला आहेस.. पण का जेवढा पळत आहेस ? अरे ती प्रत्येक चमकती वस्तु तुझ्यासाठी नाही आहे रे, का धावतो आहेस जीव तोडून. तुझ्या नियती मध्ये जे लिहले आहे मी तेच तुला भेटणार आहे, जरा थांब, मागे वळून तरी बघ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे असाल तुम्ही सर्वशक्तीमान परमेश्वर ! पण हे जे मी मिळवत आलो आहे हे मी मिळवलं आहे.. माझं रक्त जाळलं आहे मी इंथवर पोहचायला स्वतः स्वतः कष्ट केले आहे, व जे समोर दिसत आहे ना ते देखील मी मिळवणारच तुम्ही कोण मला अडवणारे ? तुमची कधी मदत घेतली मी इथवर पोहचायला ? कधी अपेक्षा तरी केली का मी तुमच्या मदतीची ? तरी ही इथ पर्यंत पोहचलोच ना. माझे लक्ष्य मी ठरवलं व मी मीळवलं ह्यात तुमचा काय संबध ? का अडवत आहात माझी वाट तुम्ही.. जाऊ द्या मला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;थांब, थांब. ठीक आहे रे तुला वाटत आहे ना सर्व तुच मिळवलंस.. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर.. बुध्दीच्या जोरावर ? पण जे तुला मिळालं ते तुलाच का मिळाले इतरांना का नाही मिळालं ? व जे इतरांना मिळाले ते तुला का नाही मिळालं ? ह्याचा कधी विचार केला आहेस ? कधी करणार तु विचार तु तर फक्त पळतो आहेस.. जरा बघ पाहू तुला काय काय मिळालं ? तुला जे जे भेटलं ते सर्व अप्रतिमच होते ना ? तरी ही तु नव नव्या वस्तुचा हव्यास ठेवत गेला व पळत राहिला... व एक एक वस्तु तु जी मिळवत गेलास त्या जागी आपली एक एक वस्तू सोडत आलास तु ? प्रत्येक नव्या वस्तू साठी तु जुनी वस्तू टाकतच आला आहेस रे. मगं असे कसे म्हणतो आहेस की सर्वकाही तुच मिळवलं आहेस... व तुझ्याकडेच आहे. अरे मुर्खा तुझी झोळी रिकामीच राहिली रे तु फक्त नव्याचा हव्यास धरला आहेस व सुसाट पळत सुटलास ह्यालाच नियती म्हणतात रे.. जे मागे राहीले ते सोड आता पण कमीत कमी जे आहे तुझ्याजवळ ते तर संभाळ रे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझं काय चुकलं ? तुम्हीच माझी नियती लिहलीत अशी जगावेगळी त्याला मी काय करु ? माझी काय चूक ? मला जे हवे ते कधीच मिळू दिले नाही साधा प्रयत्न जरी केला तरी अडथळांचा डोंगर उभा केला तुम्ही माझ्यासमोर.. तरी ही मी जिद्दीने सर्व अडथळे पुर्ण करत गेलोच ना.. पण तुम्ही परत माझ्याबरोबर खेळी केली.. माझी झोळी फाटकीच ठेवली तुम्ही.. असू दे माझी झोळी फाटली.. मी प्रयत्न करणारच. मी पण पाहू इच्छीत आहे माझी जिद्द मोठी की तुमची नियती.. मी भांडणार आहे तुमच्याशी .. तुम्ही लिहलेल्या नियतीशी ! बंडखोर आहे मी.. समजा बंड केले आहे मी तुमच्या विरुध्द .. माझ्या नियती विरुध्द ! पाहू कोण मला थोपवतं.. जेव्हा जेव्हा मदती साठी आजूबाजुला पाहीले तर दुर दुर पर्यंत तुम्ही कोठेच नव्हता.. धडपडलो.. पडलो.. तरी ही स्वतःच उभा राहीलो.. जेथे रस्ता नव्हता तेथे मार्ग मी शोधला.. रक्ताचे पाणी करत मी येथेवर पोहचलो व आता अचानक तुम्ही समोर उभे राहता व म्हणता थांब ? का ? का मी थांबावे ? &lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे नियम आहे रे हा.. निसर्गाचा नियम आहे, तु ज्या वस्तुच्या मागे धावत आहेस ती तुझ्या नियती मध्येच नाही आहे म्हणून मी तुला थोपवत आहे.. तुझे कष्ट वाचवत आहे.. तु जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे मान्य.. पण शेवटी जर तुला ती वस्तु मीळालीच नाही तर ? तुझ्यासमोर जे शुन्य उभे राहील त्याचे काय ? ज्या वस्तु साथी तु आपला श्वास विसरुन कष्ट करत आहेस तीच मिळाली नाही तर तुझे श्वास तरी तुझी साथ देतील काय रे ? आपली हद्द ओळख रे.. केव्हा पासून तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे हद्द ओळख.. जर नियती करण्यावर आली तर असल्याचे नसले होऊन जाईल... तुझ्या हातातील हिरे माणिक मोती.. मातीमोल होऊन जातील व तु काहीच करु शकणार नाहीस... असाच उभा राहशील ह्या दगडा सारख ! जरा थांब.. व मागे वळून तरी बघ.. तुझी हद्द तर तु नाहि ना सोडून आलास मागे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी हद्द मी ठरवणार आहे ह्यावेळी.. खुप झाले तुमचे व तुमच्या नियतीचे.. प्रत्येक वेळी मीच का हार मानावी ? मला काही हवे तर लगेच म्हणे आपली हद्द ओळख.. मला नाही माहीत माझी हद्द काय आहे.. व राहिला श्वासांचा प्रश्न तर माझ्या ध्येयासाठी मी ते पण त्यागेन.. पण मी प्रयत्न करणारच भले सर्व काही मातीमोल होवो.. पण हा शेवटाचा प्रयत्न मी करणारच... असेच जर नियती नियती करुन थांबू लागलो तर माझ्यातला मीच हरवेल व मीच हरवलो तर मग ध्येय काय कामाचे व काय कामाचे हे हिरे मोती माणिक ? तेव्हा रस्ता सोडा.. मी पुढे जाणारच आहे.. हार तर हार पण ती हार वीरासारखी छातीवर छेलणार आहे... पण नियती विरुध्द एकदातरी बंड करुन पाहणार आहे....&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-4637095036804221380?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/4637095036804221380/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=4637095036804221380&amp;isPopup=true' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4637095036804221380'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/4637095036804221380'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_1965.html' title='नियती....'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-1681032488220675815</id><published>2009-09-23T17:17:00.000+05:30</published><updated>2009-09-27T15:15:10.960+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='photos'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रवास'/><title type='text'>भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)</title><content type='html'>पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर.  इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..  ह्यांचे समाज जिवन पण विस्कळीत काही जण शेती करत पण मुख्य म्हणजे घरातील एक्-दोन व्यक्ती सैन्यात अथवा कोतवालीत (त्या काळचे पोलिस) , गावात बहुसंख्य हिंदू व मुळ समाज यादव कुलीन मुळ भाषा हरयानवी त्यामुळे सर्वच जण यादव भेटतात येथे भरलेल्या बस मध्ये यादव साहेब अशी आरोळी दिली तर ९५ % लोकं तुमच्याकडे वळून पाहतील एवढी संख्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/87e850a217bb8eb0da55cc09f7dd9ba8a70c2754.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शितला माता मंदिर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९८० च्या पुर्वी  एक राजधानी शेजारचं एक काही खेडी मिळून असलेला भाग म्हणजे गुडगावं, येवढीच ओळख ह्या गावाची, गाव हो त्यावेळी हे गावच होते,  पण १९८१ ला संजय गांधीने येथे मारुती  निर्माण करणारी &lt;strong&gt;कंपनी मारुती उद्योग लिमिटेड &lt;/strong&gt;चालू केली व ह्या खेडेगावाचं भाग्य चमकलं !  लोकांना रोजगार मिळू लागला व नवनवीन काम धंदे येथे चालू झाले,  व पुढे काही वर्षातच होंडाची हिरो होंडाचा प्लान्ट पण येथे चालू झाला व गुडगाव प्रगती पथावर धावू लागला.  १९८० ते ९४ पर्यंतचा कालखंडामध्ये लोकांना कामे उपलब्ध भरपुर झाली पण त्याच्या जिवनमानात काहीच फरक पडला नव्हता, खुप लोकांना एक वेळचे जेवण पण मिळणे दुरापास्त झालेले असायचे , पण त्याकाळात सरकार ने गुडगावंच्या जयपुर हायवे च्या नजदीक  काही शे एकड जमीन कारखाने व उद्योग धंदे काढण्यासाठी आवंटीत केली  "मानेसर" गावाजवळ, आय एम टी मानेसर. पण कामधंदा तेथे चालू होण्यासाठी १९९८ उजाडले, पण जेव्हा येथे कंपन्यांना जागा मिळाली तेव्हा मात्र गुडगाव ची प्रगती तुफान वेगाने झाली,  पण त्या वेगा बरोबरच  स्थानिक लोकांचे पण नशीब उघडले,  ज्या जमीनींत काहीच उगवत नव्हते.. काही हजार मध्ये एकडं अशी विकली जाणारी जमीन .. अचानक लाखो-करोडोचा भाव मिळवून देऊ लागली, आज जो गुडगाव चा पॉश येरिया म्हणून ओळखला जातो तो डीएलएफ फेस पण... तेथे १९८० च्या पुर्वी जंगल होते व ज्यांच्या खानदान मध्ये कोणा आजोबा / पणजोबाला त्यावेळच्या सरकारने / राजाने दान दिलेली जमीन, कित्येकांना माहीत देखील नव्हते की त्यांची जमीन तेथे आहे पण जेव्हा डिएलएफ ने जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला  व त्याच्या मागोमाग बाकीच्या पण रिअल एस्टेच्या कंपन्यांनी पैसा अक्षरश: ओतला.. गुडगांव मध्ये पैश्याचा पाऊस सुरु झाला...  लाख ते करोड पर्यंत आकडा पोहचायला... काहीच महीने लागले !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/4b6383da1607b113a99e261936ce1dfb245b3bc7.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आताचे गुडगाव&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;२००० च्या आयटी बुम मधे जर बेंगलोर हैद्राबाद खालोखाल फायदा झाले असलेले शहर म्हणजे गुडगांव... पावसाळ्यात जसे कुत्राची छत्री  उगवते तश्या भल्या मोठ्या इमारती व त्यामध्ये असंख्य कॉलसेंटर व आयटी कंपन्या.  व ह्या कंपण्यासाठी लागणारा मनुष्यबळ... गुडगाव अफाट वाढले...  आधी काहीच गल्ली-रस्ते असलेले - हायवेच्या दुस-या बाजूला ज्म्गल असलेले गुडगाव .. जसे फाटले होते... सैरावैरा.. वाढत वाढत.. नको तसे वाढले, लोकाच्या हाती प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर बांधकाम व इमारती वर इमारती.... टोलेजंग इमारती... गुडगाव बदलं !&lt;br /&gt;ज्या रस्त्यावर कधी बैलगाडी चालत असे त्या रस्तावर आता बीएमडब्लु.. मर्क्..अश्या महाग गाड्या सरास धावू लागल्या.. ! &lt;br /&gt;मोठ मोठया कंपन्या, बँका, ट्रव्हल कंपन्या... ह्यांनी गुडगाव काबीज केले... पण एकच बाजूला हायवेच्या पलिकडील बाजू पॉश बाजू.... व अली कडे तेच जुने भकास गुडगाव.. आपला जुना डोलारा संभाळत सावरण्याचा व जे काय चालू आहे ते समजण्याचा प्रयत्न करत असलेले.. पण हळू हळू जुने गुडगाव पण ह्या नवीनतेला समरस झाला व तो देखील सहज पणे मॉल्स व कॉप्लेक्स मध्ये फिरु लागला..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/253b9f74043aff6b0768ccb9c4fbb8a56c5596d3.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहरामध्ये मॉल्स एवढे झाले की ओल्ड  महरोली-गुडगाव रोड कधी मॉल रोड मध्ये तबदील झाला प्रशासनाला देखील कळाले नाही, सीटी मॉल, सहारा मॉल, वाटीका, मेट्रोपॉलिटीन, एमबीयन मॉल.. डिएलफ, गोल्डसुक, सीटी मॉल-२, सेंटर मॉल, सीटी सेंटर एक ना दोन २००८ जानेवारीमध्ये मध्ये तयार व वापरत असलेले मॉल्स ४८ होते तर निर्माणाधीन १८५ !  ह्याच मॉल्स नी गुडगाव मध्ये मेट्रो लाईफ स्टाईल आणली...  व गुडगाव दिल्ली एनसीआर मधील सर्वात श्रीमंत भाग झाला, मोठ मोठे ब्रन्डस येथे आम झाले, लोकाच्या बोलण्याचालण्यामध्ये ब्रन्ड झळकु लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/8544fdf2a7ef3c25f614e343cbe0b299a07aecb3.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सिटी सेंटर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिल्ली जवळचे, एयर पोर्ट १५ मिनिटाच्या रस्तावर, चांगले हॉस्पिटल्स, चांगली सुविधा असलेले शहर. ह्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास मागील दहा वर्षात झाला, त्यातच दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे चा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला व दोन वर्षात पुर्ण पण केला आता गाड्या सुसाट धावतात... सकाळाच्या वेळी तर एयरपोर्ट वर फक्त ८-९ मिनिटामध्ये व करोलबाग  ३० मिनिटे.  आता सरकारने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे पिन्क सीटी एक्सप्रेस हायवे.. गुडगाव-जयपुर २०० किलोमिटर... सध्या वेळ चार तास ते पाच पास.. पण हा प्रोजेक्ट चालू झाला तर दोन्-तीन तासात जयपुर. तीकडे दिल्ली हून मेट्रो निघालीच आहे गुडगाव कडे... ६०% काम पुर्ण झाले आहे व ह्या वर्षाच्या अखेरीस ती गुडगाव मध्ये पळू लागेल.. अजून काय हवं !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/740663435051b44ff956a72a701e04f51df332e0.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणतात ना सुंदरतेला / प्रगतीला अभिशाप असतोच त्या पध्दतीने येथे लोकल बस सेवा नाही, रिक्षा चालतात पण मिटर नाही.. वडाप पध्दत सर्वच जागी, मॉल्स आहेत पण घराजवळ असे वाण्याचे दुकान नाही.. की छोटी मोठी भाजी मंडी नाही.. मुले आहेत पण खेळायला ग्राउंड नाही..  कुठ जायचे तर स्वतःचे वाहन असणे सर्वात महत्वाचे हा गुडगावचा अलिखित नियम आहे, त्यामुळे भरमसाट गाड्या, बाइक्स रोडवर त्यामुळे कधी कधी छोटे मोठे तास्-दोन तास असे ट्रफिक जॅम लागतो, तसेच येथे श्रीमंत व गरिब ह्यात गॅप येवढा मोठा झाला की संघटीत गुन्हेगारी वाढू लागली व  प्रगती बरोबरच गुन्हेविश्वात पण गुडगाव ने प्रचंड प्रगती केली, किडनॅपींग, खुन, चो-या-दरोडे तर आम बात.... !  अपघातंचे प्रमाण प्रचंड वाढले.. व प्रशासन जसे भारतात सर्व जागी आहे तसेच ढम्म !   काही फरक पडत नाही.. ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://www.yuvaadda.com/files/gallerix/albums/1/1088/frame/1b7e6caa1ded0a782a8fbe33a16291500d5d1cf5.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सिग्नेचर टॉवर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पण गुडगावं आपले सुखी ... मज्जेत राहणे... आजचा दिवस सुखात काढला उद्याचे उद्यावर हा शहराचा अलिखित नियम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधी आलात इकडे तर नक्की भेट द्या.. मनाला मोहीनी घालेल हे शहर.. ह्याचा चटक्-भडक पणा शक्यतो तुम्हाला आवडेल ही व चुकुन तुम्ही माझ्यासारखेच येथेच स्थाइक व्हाल   :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;em&gt; चित्रे गुगलसेवा !&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-1681032488220675815?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/1681032488220675815/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=1681032488220675815&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1681032488220675815'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1681032488220675815'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_23.html' title='भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7602897055009556204</id><published>2009-09-21T11:35:00.000+05:30</published><updated>2009-09-21T11:36:48.547+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Share Market'/><title type='text'>शेयर मार्केट (बेसिक) भाग -३</title><content type='html'>मागील भागामध्ये आपण अकाउंटसाठी काय काय करावे लागेल व ब्रोकरेज म्हणजे काय हे पाहीले आता आपण आपले ट्रेडिंग कसे करावे हे शिकू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे  तुमच्या व्यक्तीगत संगणकावर कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या प्रणाली द्वारे शेयरची खरेदी / विक्री करणे.&lt;br /&gt;व ऑफलाईन ड्रेडिंग म्हणजे ब्रोकर ने केलेली व्यवस्था ज्याद्वारे तुम्ही त्याच्या ऑफिस मध्ये  / ट्रेडिंग हाऊस मध्ये जाऊन अथवा फोन करुन आपल्या शेयरची खरेदी / विक्री  करु शकतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कंपनी तुम्हाला एक  ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस सुविधा अथवा एक ओडिएन डाएट / नाव्हो  नावाची प्रणाली प्रोव्हाईड करतात ज्याद्वारे तुम्ही खरेदी / विक्री चालू करु शकता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://farm3.static.flickr.com/2450/3788343734_9d25dc2260.jpg" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ओडिएन प्रणाली&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओडिएन चांगले आहे व वापरावयास सोपे पण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसमध्ये कंपनी तुम्हाला जावा बेस्ड सुविधा प्रोव्हाईड करते त्यासाठी तुमच्या संगणकावर एक छोटीसी प्रणाली जावा व्हर्चुअल मशीन (Java Virtual Machine ) प्रस्थापीत करावी लागते.  त्यानंतर तुम्हाला दिलेल्या युजरनेम व पासर्वड द्वारे तुम्ही आपल्या ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश करु शकता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व प्रथम तुम्हाला आपल्यासाठी स्क्रिप्ट प्रोफाईल तयार करावे लागेल.&lt;br /&gt;स्क्रिप्ट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला ज्या शेयर्स मध्ये ट्रेडिंग करावयाचे आहे त्याची एक लिस्ट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तुम्ही सेक्टर प्रमाणे आपली लिस्ट तयार केली तर शेअर वर नजर ठेवण्यासाठी सोपे जाते.&lt;br /&gt;उदा. बँकिंग सेक्टर साठी एक प्रोफाईल , आयटी सेक्टर साठी एक व अ‍ॅटोमोबाईल साठि एक प्रोफाईल.&lt;br /&gt;ह्याचा फायदा हा आहे की  तुम्ही एकाच वेळी एका सेक्टर मधील उतारचढाव व्यवस्थीत पाहू शकता व गोंधळ पण होणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये काही चांगल्या गोष्टि आहेत जसे की नवीन वापरकर्ताला  ह्याचा वापर एकदम सुसह असतो जास्त अडचण वाटत नाही... सर्व काम माऊस द्वारे होऊ शकते. पण जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर आहात तर मात्र ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस तुमच्यासाठी नाही.. कारण येथे थोडा वेग कमी पडतो ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तुम्हाला कंपनी  ओडिएन डाएट / नाव्हो  नावाची प्रणाली  देत असेल तर त्यांची स्थापना पण कंपनीचाच व्यक्ती करुन देईल व त्याच्याकडून थोडे बेसिक माहीती सुध्दा भेटेल.&lt;br /&gt;ज्यांना फास्ट ट्रेडिंग करायचे आहे ( म्हणजे दिवसाला कमीत कमी २५ च्या वर ट्रेड ) त्यांच्यासाठी ओडिएन डाएट / नाव्हो  नावाची प्रणालीच गरजेची आहे कारण ह्यामध्ये सर्वकाम किबोर्ड द्वारे होते व वेगाने ऑर्डर ईन्ट्री करता येते तसेच शेयरचा ग्राफ / मार्केटचा उतारचढाव / सेक्टर प्रमाणे चढ-घट घ्याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वर दिसत राहते व त्यामुळे वेगाने निर्णय घेता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img src="http://appdb.winehq.org/appimage.php?iId=25857" width="६00" height="६00" alt="" /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा तुम्ही एखादी एक स्क्रिप्ट आपल्या प्रोफाईल मध्ये सेव्ह करता त्याच्यावर राईट क्लिक करुन  / अथवा एफ१ दाबला तर  खरेदी विंन्डो तुमच्या समोर येतो व तुम्ही तेथे तुम्हाला काही इंन्ट्री करावी लागेल, जशी तुम्हाला किती शेयर विकत घेणे आहेत, काय रेट ने विकत घेणे आहेत,  मार्केट रेट ने घेणे आहे की तुम्हाला हव्या त्या किंमतीला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समजा तुम्हाला  Sesa Goa स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला  खरेदी (इच्छुक भाव) २५०.१५ पैसे दिसत आहे व विक्री  (इच्छुक भाव) २५०.७५ जर तुम्हाला खरेदी करायचे आहे तर दोन मार्ग आहेत  जो विकणारा आहे त्याचा रेट २५०.७५ आहे तर तुम्ही तुमचा खरेदी भाव २५०.७५  ठरवून घेऊ शकता पण जर तुम्हाला २५०.१५ नेच विकत घेणे आहे तर तुम्हाला तो भाव ठरवावा लागेल पण जो पर्यंत २५०.१५ च्या भावाने विक्रेता येणार नाही मार्केट मध्ये तो पर्यंत तुम्हाला तो शेयर मिळणार नाही.&lt;br /&gt;समजा एखाद्याने आपला विक्रि रेट २५०.१५ ठरवला तर लगेच तुम्हाला शेयर मिळतील असे नाही, कारण तुमच्या प्रमाणेच अनेकजण तो रेट लावून वाट पाहत असतील , तर सिस्टम तुम्हाला नंबर प्रमाणे शेयर देत राहतो म्हणजे समजा तुम्हाला  १०० शेयर खरेदी करायचे आहेत व तुमच्या आधी ४०० शेयर त्याच रेटने खरेदी होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत तर आधी त्यांना मिळेल व मग तुम्हाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;समजा तुमच्याकडे १०० शेयर सेसागोवाचे जमा झाले, खरेदी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे शेयर जमा झाले की नाही हे पहाण्यासाठी तुम्हाला ट्रेड रिपोर्ट चेक करावे लागेल जेव्हा तुमच्या ट्रेड रिपोर्ट मध्ये व नेट पोझिशन मध्ये शेयर दाखवत असेल तेव्हाच तुम्ही ते शेयर विकण्याची प्रक्रिया चालू करा नाही तर शॉर्ट सेलिंग होईल ( हे नंतर समजावून घेउ की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय)  शेयर विकण्यासाठी तुम्हाला खरेदी भाव काय आहे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१ शेयरची किंमत =  २५०.१५ पैसे   X  १०० = २५०१५.०० रु.   जो मार्केट रेट आहे त्याप्रमाणे.&lt;br /&gt;व तुम्ही ते १०० शेयर २५१.५० पैसेच्या भावाने विकले तर २५१५०.०० रु. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt; &lt;span style="color: #FF0000;"&gt;काय काय खर्च जोडला जातो त्याची माहीती.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर्च नंबर एक = ब्रोकरेज   =  ३ पैसे इंन्ट्राडेवर / डिलेव्हरी वर ३० पैसे.&lt;br /&gt;खर्च नंबर दोन = सर्व्हिस टेक्स  =१०.३% बोकरेजवर&lt;br /&gt;खर्च नंबर तीन =  एसटीटी ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) =  इंन्ट्राडे वर  ०.०२५% विक्रिवर फक्त    / डिलेव्हरी विक्रिवर ०.१२५% खरेदी विक्रीवर &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०० शेयर खरेदीवर  २५०१५.०० रु. चा खर्च.&lt;br /&gt;२५०१५.०० रु वर ब्रोकरेज  ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५० पैसे.   /  ३० पैसे दराने  डिलेव्हरीवर ७५.०५ पैसे.&lt;br /&gt;ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७७ पैसे. / डिलेव्हरीवर  ७.७८ पैसे.&lt;br /&gt;_______________________________&lt;br /&gt;&lt;br /&gt;२५०२३.२७  ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) ईन्ट्राडेवर.&lt;br /&gt;२५०९७.८३  ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) डीलेव्हरीवर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता&lt;br /&gt;&lt;br /&gt;विक्री  =  २५१५०.०० रु. &lt;br /&gt;&lt;br /&gt;१०० शेयर खरेदीवर  २५१५०.०० रु. चा खर्च.&lt;br /&gt;२५१५०.०० रु वर ब्रोकरेज  ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५५ पैसे.   /  ३० पैसे दराने  डिलेव्हरीवर ७५.४५ पैसे.&lt;br /&gt;ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७८ पैसे. / डिलेव्हरीवर  ७.७७ पैसे.&lt;br /&gt;विक्रीसाठी एसटिटि ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स )  इंन्ट्राडेसाठी  ६.२९ रु.  / डिलेव्हरीवर ३१.४४ रु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम =  २५१३५.३८  ईन्ट्राडेवर&lt;br /&gt;विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम =  २५०३५.३४ डिलेव्हरीवर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता तुम्हाला फायदा झाला की तोटा हे पाहू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ईन्ट्राडे वर...  &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरेदी भाव -  २५०२३.२७ &lt;br /&gt;   (वजा)         -&lt;br /&gt;विक्रि भाव -   २५१३५.३८&lt;br /&gt;___________&lt;br /&gt;एकुन                 -११२.११&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे ईन्ट्राडेवर तुम्हाला   ११२.११ पैसे फायदा झाला   ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिलेव्हरीवर...&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरेदी भाव -  २५०९७.८३ &lt;br /&gt;   (अधिक)      +&lt;br /&gt;विक्रि भाव -   २५०३५.३४ &lt;br /&gt;___________&lt;br /&gt;एकुन                 +६२.४९ &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे  डिलेव्हरीवर तुम्हाला   ६२.४९ पैसे  तोटा झाला   ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्याचा अर्थ तुम्हाला डिलेव्हरी मध्ये प्रॉफिट मार्जिन नेहमी इन्ट्राडे पेक्षा जास्त ठेवावे लागेल कमीत कमी डिलेव्हरीचा खर्चाचा अंदाज घेऊनच शेयर विक्रीची किमंत ठरवावी जेणे करुन तुम्हाला नकळत तोटा होणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;छायाचित्र गुगलद्वारे&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;क्रमश :&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7602897055009556204?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7602897055009556204/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7602897055009556204&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7602897055009556204'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7602897055009556204'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_21.html' title='शेयर मार्केट (बेसिक) भाग -३'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-3734008041078922792</id><published>2009-09-19T10:36:00.001+05:30</published><updated>2009-09-19T10:37:51.501+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Love'/><title type='text'>लफडा</title><content type='html'>प्रेम बिमसब झुट..  नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?&lt;br /&gt; हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,&lt;br /&gt; त्यांची किव करावी शी वाटते, &lt;br /&gt;अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना.. &lt;br /&gt;पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ? &lt;br /&gt;नाय यार हे काय चांगले नाही !  आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा  :?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता बघ ना,  परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..&lt;br /&gt;मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला  &lt;br /&gt;तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !&lt;br /&gt;मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?&lt;br /&gt;तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !&lt;br /&gt;मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !&lt;br /&gt;&lt;br /&gt;ती हा ना करत बोलली माझ्याशी !&lt;br /&gt;मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !&lt;br /&gt;ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !&lt;br /&gt;मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !&lt;br /&gt;ती म्हणाली... आवडला नाही !&lt;br /&gt;मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?&lt;br /&gt;ती म्हणाली.. हो दोस्ती होती !&lt;br /&gt;मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?&lt;br /&gt;ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !&lt;br /&gt;मी म्हणालो... ती नजर ?  चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना  ?&lt;br /&gt;ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.&lt;br /&gt;मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?&lt;br /&gt;ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !&lt;br /&gt;मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?&lt;br /&gt;ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.&lt;br /&gt;मी म्हणालो... दोस्ताची भीती ?&lt;br /&gt;ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.&lt;br /&gt;मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?&lt;br /&gt;ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.&lt;br /&gt;मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !&lt;br /&gt;ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !&lt;br /&gt;मी म्हणालो...  तुला कोण दुसरा आवडतो ?&lt;br /&gt;ती म्हणाली... हो !&lt;br /&gt;मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?&lt;br /&gt;ती म्हणाली... हो ! &lt;br /&gt;मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?&lt;br /&gt;ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !&lt;br /&gt;मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.&lt;br /&gt;ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.&lt;br /&gt;मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !&lt;br /&gt;ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !&lt;br /&gt;मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?&lt;br /&gt;ती म्हणाली... नाही.. !&lt;br /&gt;मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !&lt;br /&gt;ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !&lt;br /&gt;मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत.  ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.&lt;br /&gt;ती म्हणाली... पण !&lt;br /&gt;मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !&lt;br /&gt;ती म्हणाली... हो कळालं मला पण !&lt;br /&gt;मी म्हणालो...  मग ? &lt;br /&gt;ती म्हणाली... तु समजव त्याला.&lt;br /&gt;मी म्हणालो... तेच करतो आहे.&lt;br /&gt;ती म्हणाली... विचार करेन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेली !  त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?&lt;br /&gt;मला पण नाही  ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !&lt;br /&gt;अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण  व्यर्थ घालवतो ते !&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-3734008041078922792?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/3734008041078922792/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=3734008041078922792&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3734008041078922792'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/3734008041078922792'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_9701.html' title='लफडा'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-5939322371402313290</id><published>2009-09-19T10:34:00.000+05:30</published><updated>2009-09-19T10:35:12.170+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Love'/><title type='text'>माय व्हॅलंटाईन</title><content type='html'>माय लास्ट व्हॅलंटाईन  !&lt;br /&gt;&lt;br /&gt;कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी  पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे...  ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट  व्हॅलंटाईन डे ?  नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं.. तो माझ्या नावाचा काचेचा गोलक.. ते तु दिलेला.. पेन .... ती ग्रिटिंग कार्डस... सर्व काही आहे अजुन ही माझ्या बॆगेत.. ! मी दिलेले गिफ्ट तु असेच जपुन ठेवले आहेस का ? ह्म्म.. नसावी.. तु नाही ठेवणार मला माहीत आहे... ! हरकत नाही..! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तु नेहमी म्हणायचीस ..  आपलं प्रेम कसं नजर लागण्यासारखं आहे नाही... लोकांना तर नवल वाटत असे... ही विचित्र जोडी पाहून... तु परी सारखी रेखीव व मी असाच नमुना ! तरी ही आपलं प्रेम फुललं पण न जाने कुनाची नजर लागली... असल्याचं नसलेले झालं ! हरकत नाही यार हे सगळे माझं नशीब खोटं ... त्यामुळे ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझ्या प्रत्येक शब्दांना मी जपावं व तुझ्या साठीच शेवट पर्यंत श्वास घ्यावा, हा असला विचार मी खुप वेळा केला.... व्हॅलंटाईन डे आला परत.. दर वर्षी येतो... ह्यावेळी पण आला !  तुझी आठवण आली... ! येऊ नये ह्यासाठी खुप प्रयत्न केला.. पण मी वेडा.. !&lt;br /&gt;तुझ्याच आठवणीमध्ये झुरतो.. आहे.. असाच.. वेड्यासारखा !  कधी तरी जाईन ही हे जग सोडून.. तेव्हा मात्र मला खरोखर आनंद मिळेल.. मुक्त झाल्याचा आनंद !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसं पाहता ह्या दिवसाचं मला काहीच अप्रुप नाही गं .... असे अनेक दिवस येतात जाता.. प्रेमी-प्रेमिका आपले मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच दिवस वापरतात... सगळेच वापरतात म्हणून मी देखील वापरत होतो बस्स !  पण आज तु जवळ नसल्यावर मला खरंच ह्या दिवसाचं महत्व कळालं गं ! कधीच आठवण येऊ देत नाही मी तुझी... पण ह्या दिवशी मी मात्र असाह्य होतो...  अगनिक एसएमएस.. मेल... मित्रांचे संदेश.. व प्रत्येकामध्ये..  प्रेमाचा इजहार !  कसं गुदमरल्या सारखं होतं मला हे तुला नाही समजणार कधी !  तु कधी आपलं कोणीतरी हरवलं आहे.. दुर गेलं आहे... असा विचारचं केला नसशील त्यामुळे तुला काहीच वाटत नसेल ... त्यामुळेच तुला कळनार नाही  विरहाचं दुख: काय.. आहे... माझ्या मनाची उलाघाल समजणं तुला जमणारच नाही... शक्यतो हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला ही माहीत आहे.. .. तु आता माझी नाहीस हे  देखील.. पण कधी तरी... कुठल्यातरी जन्मामध्ये तु फक्त माझीच  होण्यासाठी नक्कीच ये  ...  &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;******************&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:..  प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल...  त्याचा हात पकड ! जगण्यातला आनंद तुला नक्कीच सापडेल रे भावा !  आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दिवशी... माझा व्हॅलंटाईन  पण माझ्या ऋणातून व मी त्याच्या ऋणातून मुक्त होईन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*******************&lt;br /&gt;दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है&lt;br /&gt;तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है&lt;br /&gt;मैंने चाहा है बहुत तुझ को&lt;br /&gt;तु मेरी हर एक आरजू में है&lt;br /&gt;तु मेरे साथ है तो लगता है ऐसे&lt;br /&gt;एक उजाला सा मेरी रूह में है&lt;br /&gt;जुदा खुद से करूं तो कैसे करूं&lt;br /&gt;तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। - अनाम कवी&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-5939322371402313290?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/5939322371402313290/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=5939322371402313290&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5939322371402313290'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/5939322371402313290'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_4665.html' title='माय व्हॅलंटाईन'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-7448224774349326837</id><published>2009-09-19T10:33:00.001+05:30</published><updated>2009-09-19T10:33:39.857+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Love'/><title type='text'>वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=poVnOwj0ch4"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां  &lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां &lt;br /&gt;&lt;br /&gt;बीत गये दिन, प्‍यार के पल छिन &lt;br /&gt;&lt;br /&gt;सपना बनी वो रातें &lt;br /&gt;&lt;br /&gt;भूल गये वो, तू भी भुला दे &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्‍यार की वो मुलाक़ातें &lt;br /&gt;&lt;br /&gt;सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई&lt;br /&gt;&lt;br /&gt;दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई &lt;br /&gt;&lt;br /&gt;कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।। &lt;br /&gt;&lt;br /&gt;कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी&lt;br /&gt;&lt;br /&gt;पानी में लिखी कहानी &lt;br /&gt;&lt;br /&gt;है सबकी देखी, है सबकी जानी &lt;br /&gt;&lt;br /&gt;हाथ किसी के ना आई, &lt;br /&gt;&lt;br /&gt;कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।। &lt;br /&gt;&lt;br /&gt;दम ले ले घड़ी भर ये छैंया पायेगा कहां ।। &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाईड मधिल एक माझं आवड्तं गाणं मी एकत आपल्या संगणकावर खेळत होतो... &lt;br /&gt;आज तीला जाऊन काही वर्षे झाली... व आजच अनिल ने वळण.. ही कथा लिहली... !  ह्या दर्द पेक्षा अजून काय मोठा दर्द हवा जिवनामध्ये... हा डोक्यात विचार चालू होताच  तोच काही तरी डोक्यात आलं व लिहायला बसलो.. नाय घाबरु नका प्रेमभंगावर नाही लिहतो आहे  ;)  पण प्रेमावर जरुर लिहतो आहे... सांगावं लागत आहे हो... मी जरी संगणक / नेटवर्कींग / शेयर मार्केट बद्दल जरी लिहले तरी लोकांना वाटतं की त्यात पण प्रेमभंगावरची कथा असू शकेल  =))  पण आज तुम्हाला पिडायचा प्लान नाही आहे.. आज माफ केला....;)  काही प्रश्न पडले मनाला त्यांचे उत्तर शोधत शोधत मनामध्ये काही विचार उमलले तेच लिहतो आहे.. !&lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेक कवी / लेखक / कथा / चित्रपट आम्हाला जवानीच्या उंभरठ्यापासून हेच  सांगून गेले की प्रेम फक्त एकदाचं होतं.. ! पहिलं प्रेम ते प्रेम बाकी.. ? हा प्रश्न डोक्यात आला व मी जरा गोंधळलो.. माझे पहीले प्रेम काय होतं ? त्याकाळी मला कोण तरी दुसरीच आवडत होती... ते माझं प्रेम होतं.. पण प्रेमाचं वय नव्हत.. त्यावेळी मी शाळेत होतो  ;) .. त्यानंतर ही प्रेम झालं.. त्यावेळी मी दहावी मध्ये होते... ;)  तीन एक आठवडे प्रेमप्रकरण चालवलं.. पण मी शाळा सोडली व तीने मला... त्यानंतर ची सर्व कहानी मिपावर आहेच... !  मग हे काय सगळे माझे मुखवटे होते ?  नाही यार.. बॉस ! प्रेम लाईफ मध्ये एकदाचं होतं असे नाही....  प्रेम एक अशी भावना आहे की... ज्यामध्ये तुम्ही कुणावर प्रेम करता आहात.. हे जरुरी नाही पण कोण तुमच्यावर जिवापाड प्रेम करत आहे.. कोण तुम्हाला ह्दयाच्या एका कोप-यातून साद देत आहे....  हे समजणे जरुरी आहे.. !&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणी तरी हळूवार पणे तुमच्या जिवनामध्ये प्रवेश करतो... तुमच्या आवडी निवडी.. तुमचं जगणं.. हसणं .. रडणे.. बिझी असने... रागावणॆ... दुर जाणे.. जवळ येणे.. तुमचा विचित्र स्वभाव... स्वत:च संभाळणे... दुख: मध्ये पण हसणे...  कळत नकळत स्वत:ला हरवणं...  हे कोणी तरी पाहत असतं !  कोणी तरी चुकुन का होईना  तुमच्या कडू आठवणी व तुमच्या मध्ये आलेली / आलेला असतो / असते ... त्यावेळी काय करावं हेच आपल्याला कळत नाही व आपण नकळत त्या प्रेमापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो... मग त्यासाठी आपण खुप बचकानी कारणे देतो.. मी असा आहे ..ती अशी आहे... मी एवढा शिकलेला आहे.. ती एवढी शिकलेली आहे.. मी ह्या लेव्हलला आहे ती त्या लेव्हलला आहे.. मी असा आहे ती अशी आहे... तीच्या बरोबर स्वत:लाच कळत नकळत कंपेयर करतो व आपण त्या नात्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो..  स्वत:ला एका कोषामध्ये गुरफटून घेण्याचा प्रयत्न करतो... व अचानक आपण एक स्वत:ला कुठल्यातरी गोष्टी मध्ये रमवून घेण्याचा प्रयत्न करु लागतो...  सुखाचे पल असेच स्वत: आपल्या जवळ आले असताना आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो..  व त्या मागे आपल्याकडे  कारणे देखील  सशक्त असतात.. असं आपल्याला वाटतं.. पण खरं तर ती कारणे एकदम पोकळ असतात हे आपल्या मनाला पण माहीत असतंच !&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण आपल्या मनाला जुन्या गोष्टी मध्येच रमण्याचा प्रयत्न करतो... आपण स्वत:च आपल्या जुन्या जखमा रोज ओरबडून काढतो... जर ते जमले नाही तर.. कुठतरी कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ आपल्या दुख:शी लावतो.. व जे जवळ आहेत ते थोडेफार किमती अश्रु जो आपल्या जवळच नाही त्याच्यासाठी व्यर्थ करतो.. ते जमले नाही तर मग कुठे... व्यसनामध्ये.. स्वत:ला परत गुरफटून घेतो व म्हणतो... माझं दुख: कुणाला कळणार.... अरे मुर्खा ! कोण तरी जवळ येत आहे हे सोडून शतकामागे झालेल्या प्रेमप्रकरणावर रडत बसलास तर कोण येईल तुझ्या जवळ... हे माझं मत.. पण मी पण चुकतोच.. ना.. बरोबर आहे.. दर्द खुप मोठी गोष्ट असते.. सहन करणे व लपवणे तर खुप मोठ्या गोष्टी... भले भले... बरबाद ह्या दर्द मुळे... !  पण ह्या दर्द वर कोण तरी फुंकर घालायला तयार असले तर ?  तरी ही त्रासच ?  का तर..मागचे जिवन कधी तरी पुढे येईल.. अरे यार.. जर मागचे जिवन तु आपल्या खांद्यावर बाळगण्याची हिंमत ठेवतो तर.. त्याला / तीला सांगायला काय हरकत आहे... जर खरंच ती / तो तुला सर्व गुण - अवगुण माहीत असताना तुझ्या वर प्रेम करत आहे तर काय अडचण सत्य बोलायला ? समजा तीने / त्याने जर तुमचे दुख: दर्द समजुन घेतला तर ?  अरे यार... बहार येईल जिंदगी मध्ये... जे हरवलेले सुख आहे...ते खरचं पदरात येईल... जन्नत दिसेल प्रेमामध्ये !  कोणीतरी हक्काचे असेल आपल्या जवळ.. ! व समजा तीने / त्याने तुमचे सत्य स्विकारलेच नाही तर... अरे बॊस... ना दुनियासे दारु खतम हुई ना.. दोस्त...  ;)  चालूच आहे ना जिने .. ! पण जरा पॉझीटिव्ह विचार करायला काय हरकत आहे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे जरा नशीब कमजोर होतं.. अथवा... प्रेम नावाचा हिस्सा माझ्या नशिबी नव्हताच.. असे अनेक जण डायलॉग मारतात...  अरे प्रेम रोज तुमच्या ह्दयाला टकटक करुन जातं .. पण त्याला तुम्ही प्रतिसाद कुठे देत आहात... म्हणे नशीबात नव्हतं... ! माय फुट... अरे ज्या जगात कुत्र्या माजंरावर जिवापाड प्रेम करणारे आहेत... तेथे एका बोलत्या.. चालत्या.... ह्याचं हदय धडकतं .. ज्याला प्रेम भावना म्हणजे काय कळतं... अश्या मनुष्याशी कोणी प्रेम करणारेच नाही ह्या जगात असं कसं होईल यार... !  कोणी तरी आहे यार.. समजुन घेण्याची बात आहे... जर हे समजल तर मग काय.... गालावर मोरपंखांचा स्पर्श होणे म्हणजे काय हे काही क्षणात समजेल..  पण येथे एक अट आहे...खुप कमी वेळा असं होतं की ती प्रेमाबद्द्ल स्वत: बोलते.. बॉस  हे तुला स्वत:ला ओळखावे लागेल...  नाही तर गाडी कधीच रस्तावर येणार नाही... !  हिंमत तर करावी लागते.. त्याने / तीने केली तर क्या बात ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला ही माहीत आहे ह्या सगळ्या लिहण्या-बोलण्याच्या गोष्टी.. पण मित्रा जर तुला कोण तरी भेटलेच...तर.. तु काय करणार त्यावेळी ? मागे मी एका गोष्टीत गटस बद्द्ल लिहले होते.. ही खुप कामाची गोष्ट आहे बॉस  ज्याच्याकडे गटस आहेत ना.. ती व्यक्ती कधीच मरत नाही... मी लिहून देतो हवं तर.. भरोसा ठेवा...!  अरे जराशी हिंमत... जगण्यातील मजा कळेल यार.. ! शोधा शोधा.... जवळ पास कोणीतरी असेल जो तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल.... !  जेव्हा हे प्रेम मिळेल ना तुम्हाला बॉस ... तु खुषीने पागल होशील हे नक्कीच.. अरे प्रेमाची नशा तुला माहीत असेलच....  जरी माहीत नसली तरी... कोणी तुझ्यावर प्रेम करतं... ही भावनाच अनमोल आहे यार... !  जगणं खुप सोपं आहे.. मित्रा.. अरे आरामात जगता येतं फक्त मुखवटे चढवं बस्स..पण प्रेमात मुखवटे नाही चालत बॉस ... ! चुकुन मुखवटा घालून प्रेम केलंस ना.... तोंडावर पडशील... जेथे प्रेम आहे तेथे सत्य देखील असावेच लागते नाही तर... लफडा.. त्याला प्रेम नाही म्हणत मग... त्याला धोका म्हणतात...!  सत्याला जवळ ठेव .... कधी तरी... जिवनाच्या कुठल्यातरी मार्गावर कोणी ना कोणी एक गुलाबाचं फुलं तुझ्यासाठी खास घेऊन उभे असेल... जेव्हा ती व्यक्ती तुला भेटेल तेव्हा शक्यतो तुझ्या कडे काही नसेल देण्यासाठी.... पण जी व्यक्ती तुला देण्यासाठी काही घेऊन येत आहे त्यासाठी तुझे बोलच अनमोल असतील.. प्रेमाचं असंच असत यार... जे घेण्यावर नाही... देण्यावर भरोसा ठेवतं !!!!   चिल्ड !!  बी कुल !..... जरा मागील रात्र सोड... नवीन पहाट होत आहे.... नवीन सुर्य उगवत आहे..  स्वप्न व सत्य ह्यातील फरक कळण्याचा वेळ आला आहे.... जागा हो बॉस  जागा हो !&lt;br /&gt;&lt;br /&gt;***********&lt;br /&gt;क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे  तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन....  :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;***********&lt;br /&gt;हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे.. हां यार तो होता... खुप मजेशीर, हसमुख व जिंदादिल !  मुडदे मला मित्र म्हणून आवडत नाहीत बॉस !!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-7448224774349326837?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/7448224774349326837/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=7448224774349326837&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7448224774349326837'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/7448224774349326837'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_2857.html' title='वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5811009074052967834.post-1783237084820682173</id><published>2009-09-19T10:27:00.002+05:30</published><updated>2009-09-19T10:28:16.816+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता / विडंबन'/><title type='text'>&lt;बेवडा&gt;</title><content type='html'>येतो एक आवाज गुत्यातून&lt;br /&gt;चीरुन दारुड्यांचा पडदा..&lt;br /&gt;अन रम,  आपली व्हिसकी&lt;br /&gt;दंग  पिण्यात बेवडा...!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;अन इथे...&lt;br /&gt;पुन्हा पिण्याची उबाळ येथे&lt;br /&gt;पडले हो बेवारस...&lt;br /&gt;बेवडा एक परि, करुनी तंगडी वरी&lt;br /&gt;हसले सगळे त्यावरी, खी खी खी... !&lt;br /&gt;&lt;br /&gt;बियर मध्ये स्नानं करिश्ये..&lt;br /&gt;बेंजोचा आवाज जबर&lt;br /&gt;बेवड्यांच्या मुखा वरती&lt;br /&gt;दारु, व्हिसकी ची संतत धार..&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे..&lt;br /&gt;घोंगावती तोंडावरती&lt;br /&gt;असंख्य माशा किती&lt;br /&gt;खिदळतं उभी माणसे.&lt;br /&gt;दुरुनच जरा बघती...&lt;br /&gt;&lt;br /&gt;बारबालेची मिठी गळा&lt;br /&gt;जर गेला माझा हात कमरे वर&lt;br /&gt;मला ती जागा आवडे निरंतर&lt;br /&gt;ती वाजवे थप्पड मला तर&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेची ध्यान..&lt;br /&gt;गुत्यात चाले&lt;br /&gt;डान्स बार..&lt;br /&gt;&lt;br /&gt;आली आली पोलीसाची,&lt;br /&gt;गाडी आली कुठुन&lt;br /&gt;करुनी बंद गुत्ता, बेवड्यांचा&lt;br /&gt;नेले तंगडी पकडून... !!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मदिरेचे शिरोमणी&lt;br /&gt;गाती अम्रुत वाणी..&lt;br /&gt;नवीन पोपट हा:&lt;br /&gt;लागला विटु विटु बोलाया:...&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्र संपली त्याची माझी&lt;br /&gt;अन गुत्येवाला ही झोपला&lt;br /&gt;ॐ शांती : शाती: शांती:&lt;br /&gt;&lt;br /&gt;********&lt;br /&gt;&lt;br /&gt; चन्द्रशेखर गोखले ह्यांची क्षमा मागून त्यांच्या &lt;a href="http://www.misalpav.com/node/6628"&gt;ह्या &lt;/a&gt;कवितेचे विडंबन !&lt;br /&gt;* नाव नाय सुचलं .. सुचवा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5811009074052967834-1783237084820682173?l=rajkiranjain.blogspot.com'/&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://rajkiranjain.blogspot.com/feeds/1783237084820682173/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=5811009074052967834&amp;postID=1783237084820682173&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1783237084820682173'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5811009074052967834/posts/default/1783237084820682173'/><link rel='alternate' type='text/html' href='http://rajkiranjain.blogspot.com/2009/09/blog-post_9957.html' title='&lt;बेवडा&gt;'/><author><name>राज जैन</name><uri>http://www.blogger.com/profile/08835788839593568318</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='11712509020741792930'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry></feed>